वाळूची तस्करी रोखण्यासाठी पोलीस विभागाकडून कडक उपाययोजना . - शंभूराज देसाई
मुंबई, दि. 24 : वाळूची तस्करी रोखण्यासाठी पोलीस विभागाकडून कडक उपाययोजना करण्यात येतील अशी माहिती गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिली.
बुलढाणा जिल्हयातील गोळेगाव येथे वाळू माफीयांतर्फे वाळू वाहतूक विरोध केल्याने एका व्यक्तीस विष पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी विधानसभा सदस्य सुनिल प्रभु,विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे-पाटील,सदस्य बबनराव लोणीकर यांनी प्रश्न उपस्थित केला.या प्रश्नाला उत्तर देताना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री श्री. देसाई म्हणाले, बुलढाणा जिल्ह्यातील गोळेगाव मध्ये 11 जानेवारी 2022 रोजी या विषयासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून. यामध्ये तीन आरोपीं आहेत.त्यांचा पोलीसांनी तपास केला असता ते कुठेच सापडले नाहीत. हे आरोपी फरार असल्यामुळे पोलीसांनी त्यांना अटक करता आली नाही. त्याचदरम्यान आरोपींनी अंतरिम जामीन घेतला आहे.अंतरिम जामीन रद्द करण्यासाठी पोलीस विभागाकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येईल.तसेच वाळू तस्करीच्या घटना घडू नयेत यासाठी पोलीस विभागाकडून नेहमीच महसूल विभागाला सहकार्य केले जाते.पोलीस विभाग व महसूल या दोन्ही विभागांनी वाळू तस्करी रोखण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात यासाठी या दोन्ही विभागाची संयुक्त बैठक बोलविण्यात येईल असेही राज्यमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.
0000
No comments:
Post a Comment