*मी....*.
*मी तर एकच आहे तरीही,*
*प्रत्येकास वेगळा वाटत गेलो.*
*ज्याचा जसा भाव माझ्याशी*
*त्याला तसाच भेटत गेलो..!*
*प्रेमळ माणसांना घरचा वाटलो.*
*कावेबाजांना परका वाटलो,*
*सोबत चालणाऱ्यांस सखा वाटलो.*
*पाय ओढणाऱ्यांस पुढचा वाटलो.!*
*मैफलीत कधी कवी वाटलो,*
*कुणाला सुरेल गायक वाटलो.*
*व्यासपीठावर वक्ता वाटलो,*
*आंदोलनामध्ये नायक वाटलो.*
*कुणाला संगीतकार वाटलो,*
*कुणाला कलाकार वाटलो.*
*मैदानावर मी खेळाडू वाटलो,*
*मैत्रीच्या दुनियेत खिलाडू वाटलो.*.
*सज्जनांना मी भावूक वाटलो,*
*बाजारबुणग्यांना घाऊक वाटलो.!*
*जळणाऱ्यांना मुजोर वाटलो,*
*मुजोरांना मी शिरजोर वाटलो.!*
*लबाडांनी राजकारणी मानलं,*
*चोरट्यांनी मलाच चोर मानलं.!*
*टवाळांनी तर 'हा पोर' मानलं,*
*पण शहाण्यांनी 'थोर ' मानलं.*
*हिरा म्हणून कुणी जवळ केलं.*
*दगड समजून फेकून ही दिलं.*
*सुगंध लुटण्यास जवळ केलं,*
*मन भरल्यावर निर्माल्य केलं.*
*मैत्री नावाचे बुरखे चढवून,*
*दोस्तीत कुणी कुस्ती केली.*
*विश्वास,वचनांच्या गाठी बांधून*,
*नात्यांत काहींनी मस्ती केली.*
*प्रेम करणाऱ्यांनी जवळ केलं.*
*सोंग करणाऱ्यांनी दूर केलं*.
*संधीसाधूंनी साधून घेतलं.*
*जाणकारांनी पण जाणून घेतलं..*
*चरित्र नसलेल्यांनीच माझ्या*
*चारित्र्यावर कचरा फेकला.*
*वासनेच्या दलदलीतून सहज*
*माझ्या प्रेमाचा निचरा केला..!*
*ज्याने ज्या चष्म्यातून पाहिलं,*
*त्याला तसाच मी वाटत गेलो.*
*पण त्या प्रत्येकालाच मी मात्र*
*आनंदाचे क्षण वाटत गेलो*....
🙏🙏🙏🙏🙏
No comments:
Post a Comment