Friday, 7 January 2022

 जल जीवन मिशन अंतर्गत विविध पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता प्रदान

पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पत्र प्रदान

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडूनही मंत्री गुलाबराव पाटील यांचे अभिनंदन

            मुंबई, दि. 5 : ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर व्हावी यासाठी पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या जल जीवन मिशन अंतर्गत औरंगाबाद, बुलडाणा, अकोला आणि नाशिक जिल्ह्यातील विविध प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचे पत्र आज पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संबंधितांना देण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेमुळे ग्रामीण भागाशी निगडित ही कामे वेगाने मार्गी लावता येत असल्याची भावना श्री. पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीही दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहून सर्व संबंधितांचे अभिनंदन केले आणि या योजना वेळेत पूर्ण होतील आणि कामे दर्जेदार होतील याकडे लक्ष देण्याची सूचना केली.

            मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमास रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, खासदार प्रताप जाधव, आमदार अंबादास दानवे, आमदार श्री.रायमुलवार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते

            पाणी पुरवठा मंत्री श्री.पाटील म्हणाले, राज्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणाऱ्या गावामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत प्रादेशिक पाणी पुरवठा योजना राबविल्या जात आहेत. नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी ओढाताण थांबावी यासाठी या योजनेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. आज झालेल्या कार्यक्रमात जानेफळ कळंबेश्वर प्रादेशिक पाणी पुरवठा योजना (ता. मेहकर जि. बुलढाणा), चिंचोली व 30 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना (ता. खामगाव व शेगाव जि. बुलढाणा), पाडळी व 5 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना (ता. जि. बुलढाणा), 178 गावे पैठण ग्रीड पाणी पुरवठा योजना (ता. पैठण व औरंगाबाद जि. औरंगाबाद ), तेल्हारा व 69 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ता. तेल्हारा जि. अकोला, घाटपुरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना (ता. खामगाव जि. बुलढाणा) आणि घोटी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना (ता. इगतपुरी, जि. नाशिक) या योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचे मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

            जल जीवन मिशन अंतर्गत 178 गावे पैठण ग्रीड पाणी पुरवठा योजनेची अंदाजपत्रकीय किंमत रू. 307 कोटी आहे. या योजनेअंतर्गत पैठण व औरंगाबाद तालुक्यातील 178 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. योजनेच्या रू. 307 कोटी किंमतीच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

            जानेफळ कळंबेश्वर प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची अंदाजपत्रकीय किंमत रू. 10 कोटी आहे. या योजनेअंतर्गत जानेफळ व कळंबेश्वर या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. योजनेच्या रू. 10 कोटी किंमतीच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली. 

            जल जीवन मिशन अंतर्गत चिंचोली व 30 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची अंदाजपत्रकीय किंमत रू. 88 कोटी 35 लक्ष आहे. या योजनेअंतर्गत खामगाव व शेगाव तालुक्यातील 31 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या योजनेच्या रू. 88 कोटी 35 लक्ष किंमतीच्या निधीसही प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

            पाडळी व 5 प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची अंदाजपत्रकीय किंमत रू. 16 कोटी 09 लक्ष आहे. या योजनेअंतर्गत बुलढाणा तालुक्यातील 6 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या योजनेच्या रू. 16 कोटी 09 लक्ष किंमतीच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

            तेल्हारा व 69 प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची अंदाजपत्रकीय किंमत रू. 148 कोटी 43 लक्ष आहे. या योजनेअंतर्गत तेल्हारा तालुक्यातील 70 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या योजनेच्या रू. 148 कोटी 43 लक्ष किंमतीच्या निधीसही प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

            घाटपुरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची अंदाजपत्रकीय किंमत रू. 18 कोटी 78 लक्ष आहे. या योजनेअंतर्गत घाटपुरी या गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या योजनेच्या रू. 18 कोटी 78 लक्ष किंमतीच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली. याशिवाय घोटी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या २२ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिल्याचे मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.


**

दि. 5 जानेवारी 2022

                                                         वृत्त विशेष क्र. 38

पैठण व औरंगाबाद तालुक्यातील १७८ गावांच्या ३०७ कोटींच्या

ग्रामीण नळ पाणी पुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता

रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्या पाठपुराव्याला यश

            मुंबई, दि. ५ : रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या पाठपुराव्याने जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत पैठण व औरंगाबाद तालुक्यातील १७८ गावे या ग्रीड पाणी पुरवठा योजनेच्या ३०७.०६५ कोटी इतक्या किंमतीच्या अंदाजपत्रकास जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

            मंत्रालयात जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत पैठण व औरंगाबाद तालुक्यातील १७८ गावे या ग्रीड पाणी पुरवठा योजनेविषयी बैठक आयोजित करण्यात आली होती.

            याबैठकीस पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे (दूरदृश्य प्रणालीद्वारे), पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, आमदार अंबादास दानवे, औरंगाबाद जिल्हा परिषदेचे माजी सभापती विलास भुमरे उपस्थित होते.

            रोहयो मंत्री संदिपान भुमरे म्हणाले, वॉटर ग्रीड पाणी पुरवठा योजनेच्या कामास लवकरच सुरुवात होणार आहे. पैठण आणि औरंगाबाद तालुक्यातील १७८ गावातील लोकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. ही योजना तात्काळ कार्यान्वित करण्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सूचना दिल्या असल्याने लवकरात लवकर योजना पूर्ण होवून लोकांना पाणी मिळणार आहे.

            पैठण तालुक्यातील १७८ गावांतील ५५ लिटर दरडोई दरदिवशी क्षमतेच्या रु. ६ हजार २७२ इतका दरडोई खर्च व सुट धरून दरडोई खर्च रू. १ हजार ६६५ असलेल्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या रु. ३०७.०६५ कोटी इतक्या किमतीच्या अंदाजपत्रकास व आराखड्यास जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत अटी व शर्तीची पूर्तता करण्याच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात असल्याचे मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.

0000000







No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi