*पैशालाच किंमत देणारेसाठी अवश्य वाचावे असे*
*"लक्ष्मी आणि विष्णू मधील संवाद"*
*लक्ष्मी म्हणते:-*जग सर्वच पैशावर चालते, पैसा नाहीतर काही नाही म्हणून मलाच किंमत'.*
*विष्णू:-* सिद्ध करुन दाखव.
*लक्ष्मी एक पृथ्वीवरील दृश्य दाखवते त्यात अंतयात्रा चाललेली असते*
*लक्ष्मी वरुन पैशांचा वर्षाव करते, सर्व लोक त्या प्रेताला सोडून पैसे जमा करायला धावतात.*
*लक्ष्मी विष्णूंना म्हणते कि- बघा बघितल,ं पैशाला किती किंमत आहे ते !!*
*विष्णु हसले न म्हणाले-*प्रेत नाही उठले पण ते पैसे जमा करायला?*
*लक्ष्मी:-*प्रेत कसे उठणार तो तर मेलाय !*
*विष्णूंनी खूप सुंदर उत्तर लक्ष्मीमातेला दिले:-*
*'जो पर्यंत मी शरीरात आहे ,तो पर्यंतच तुला ह्या जगात किंमत आहे.*
*ज्या क्षणी मी ह्या शरीरातून*
*जाईन तेव्हा पैसा सर्व माती मोलच'....*
*नाते सांभाळायचे असेल तर..*
*चुका सांभाळून घेण्याची*
*मानसिकता असावी ...*
*आणि*
*नाते टिकवावयाचे असेल तर ..*
*नको तिथे चुका काढण्याची*
*सवय नसावी ....*
*कुटुंब आणि आप्त प्रेम हेच*
*जीवनाचे खरे मुळ आहे*
*रांगोळी पुसली जाणार हे माहीत असूनही आपण ती जास्तीत जास्त रेखीव काढण्याचा आपला प्रयत्न करत असतो.*
*तसेच,आपले जीवनही पुसले जाणार आहे हे माहीत असूनही आपण त्या रांगोळीप्रमाणेच ते जास्तीत जास्त सुंदर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.*
*माणूस कधीच छोटा किंवा मोठा नसतो..मोठी असत ते माणुसकी*
🙏🙏🙏🙏👏👏👏👏
No comments:
Post a Comment