Tuesday, 28 September 2021

 जीएसटी’ प्रणालीतील त्रूटी दूर करुन ती सोपीदोषविरहीत करण्यासाठी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रस्तरीय मंत्रीगट स्थापन

 

          मुंबईदि. 27 :- वस्तू व सेवा करप्रणालीतील (जीएसटी) त्रूटी दूर करुन ती सहजसोपी करण्यासंदर्भात सुधारणा सुचविण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विविध राज्यांच्या उपमुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांचा मंत्रीगट स्थापन करण्यात आला आहे. मंत्रीगटाने शिफारस केलेल्या आणि जीएसटी परीषदेने मंजूर केलेल्या सुधारणांच्या अंमलबजावणीवर देखील हाच मंत्रीगट देखरेख ठेवणार आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने त्यासंदर्भातील आदेश नुकतेच जारी केले. 

          उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या मंत्रीगटात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीयाहरयाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौतालाआंध्रप्रदेशचे अर्थमंत्री  बुग्गना राजेंद्रनाथआसामचे अर्थमंत्री अजंटा निओगछत्तीसगडचे व्यापार करमंत्री टी. एस. सिंगदेवओडीसाचे अर्थमंत्री निरंजन पुजारीतामिळनाडूचे अर्थमंत्री डॉ. पलानीवेल थैगाराजन यांचा समावेश आहे. हा मंत्रीगट सध्याचीजीएसटी भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करणेकरदात्यांनी दिलेल्या माहितीची पडताळणी करणेकरवसुलीतील गैरप्रकार थांबवणे,  माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन करप्रणाली सक्षमदोषविरहीत बनवणेकेंद्र व राज्यांच्या करयंत्रणेमध्ये समन्वयासाठी यंत्रणा प्रस्थापित करणे आदी विषयांसंदर्भात वेळोवेळी शिफारशी करणार आहे. मंत्रीगटाने केलेल्या व जीएसटी परिषदेने मंजूर केलेल्या शिफारशींच्या कालबद्ध अंमलबजावणीवरही हाच मंत्रीगट लक्ष ठेवणार आहे. 17 सप्टेंबर रोजी झालेल्या जीएसटी  परिषदेच्या 45 व्या बैठकीनंतर हा मंत्रीगट स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासंदर्भातील परिपत्रकही जारी करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi