Wednesday, 17 June 2026

पुणे-साईनगर शिर्डी एक्सप्रेसचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून शुभारंभ

 वृत्त 2210

पुणे-साईनगर शिर्डी एक्सप्रेसचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून शुभारंभ

मुंबई, दि. १७ :- पुणे-साईनगर शिर्डी एक्स्प्रेसला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतून ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहत तर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुण्यातून झेंडा दाखवून शुभारंभ केला.

 

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे उपस्थित होते.पुणे रेल्वे स्थानक येथे केंद्रीय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, आमदार विवेक कोल्हे आदी उपस्थित होते.

 

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, पुणे रेल्वे परिसराची क्षमता वाढविण्यासाठी हडपसर, शिवाजीनगर, खडकी, उरुळी आणि आळंदी परिसरातील विविध रेल्वे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. पुणे जंक्शनचे आधुनिकीकरण, अतिरिक्त प्लॅटफॉर्म उभारणी, आकुर्डी येथे मेगा कोचिंग टर्मिनल; तसेच अत्याधुनिक डिजिटल सिग्नलिंग व्यवस्था यामुळे पुढील तीन ते साडेतीन वर्षांत पुणे रेल्वेची क्षमता दुप्पट होईल आणि सुमारे 20 अतिरिक्त गाड्या चालविणे शक्य होणार आहे.

महाराष्ट्र हे देशातील आघाडीचे औद्योगिक राज्य, नवोपक्रम व उद्योजकतेचे केंद्र;

 मुंबई हे दीर्घकाळापासून जागतिक स्तरावरील महत्त्वाचे शहर राहिले आहे. महाराष्ट्र हे देशातील आघाडीचे औद्योगिक राज्य, नवोपक्रम व उद्योजकतेचे केंद्र; तसेच परकीय गुंतवणुकीसाठी आकर्षक ठिकाण म्हणून उदयास आल्याने अनेक देशांनी येथे आपली राजनैतिक आणि व्यापारी कार्यालये स्थापन केली आहेत.  महाराष्ट्राने भारताच्या जागतिक संवादासाठी नेहमीच प्रवेशद्वाराची भूमिका बजावली असून विविध देशांचे राष्ट्रप्रमुख, पंतप्रधान, मंत्री, राजदूत आणि आंतरराष्ट्रीय नेत्यांनी राज्याला भेट दिली आहे. या भेटींमुळे आर्थिक, तांत्रिक आणि सांस्कृतिक सहकार्याला चालना मिळाल्याचे राज्यपालांनी नमूद केले.

विविध क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार्य वृद्धिंगत करण्यात महावाणिज्यदूतांची भूमिका महत्त्वपूर्ण

 विविध क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार्य वृद्धिंगत करण्यात

 महावाणिज्यदूतांची भूमिका महत्त्वपूर्ण

-राज्यपाल जिष्णु देव वर्मा

 

मुंबई, दि. 17 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारताचा जागतिक स्तरावरील प्रभाव आणि प्रतिष्ठा लक्षणीयरित्या वाढली असून विकसित भारत 2047’ या राष्ट्रीय ध्येयपूर्तीसाठी आंतरराष्ट्रीय समुदाय, भारतीय प्रवासी आणि राजनैतिक प्रतिनिधी हे महत्त्वाचे भागीदार ठरत आहेत. याचबरोबर विविध क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार्य वृद्धिंगत करण्यात महावाणिज्य दूतांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

 

बॉम्बे जिमखाना येथे गेट वे हाऊस संस्थेमार्फत आयोजित विविध देशांच्या महावाणिज्यदूतांच्या वार्षिक बैठकीत ते बोलत होते. राज्यपाल म्हणाले की, ‘वसुधैव कुटुंबकम्या भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब विविध देशांच्या राजनैतिक प्रतिनिधींच्या उपस्थितीत दिसून येते. मुंबईतील कॉन्सुलर समुदाय आंतरराष्ट्रीय संबंध दृढ करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असून व्यापार, गुंतवणूक, सांस्कृतिक देवाणघेवाण, पर्यटन, व्हिसा सुविधा आणि लोकसंपर्क वाढविण्यासाठी त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.

मानखुर्द परिसरातील महामार्गालगत नव्याने उभारली जात असलेली बेकायदेशीर

 पालकमंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले, मानखुर्द परिसरातील महामार्गालगत नव्याने उभारली जात असलेली बेकायदेशीर गोदामे, उच्चदाब वीजवाहिन्यांखाली सुरू असलेली बांधकामे आणि विविध स्वरूपातील अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करुन ते हटविण्यात यावीत; तसेच या भागातील गॅस पाइपलाइन आणि उच्चदाब वीजवाहिन्यांच्या सुरक्षितता क्षेत्रात सुरू असलेल्या अनधिकृत वापरावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. चिल्ड्रन्स एड सोसायटी, टाटा पॉवर, पीडब्ल्यूडी आणि शासकीय जमिनींच्या सीमा निश्चित करण्यासाठी सिटी सर्व्हे विभागाने तातडीने सर्वेक्षण पूर्ण करून सर्व संबंधित विभागांच्या स्वाक्षरीसह अधिकृत नकाशे उपलब्ध करून द्यावेत.

मंत्री ॲड.शेलार यांनी मुंबई महानगरपालिकेला नियोजन प्राधिकरण म्हणून महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम (एमआरटीपी) अंतर्गत कारवाईची प्रक्रिया गतीमान करण्यासंबंधी निर्देश दिले. तसेच विविध विभागांनी स्वतंत्र कारवाई करण्याऐवजी समन्वित पद्धतीने नोटिसा बजावून अतिक्रमणे हटविण्याचे सांगितले. त्याचबरोबर बेकायदेशीर गोदामांना देण्यात आलेले परवाने, अग्निसुरक्षा परवानग्या, वीजजोडण्या, पाणीपुरवठा आणि इतर सुविधा तपासून आवश्यक त्या रद्द करण्याचेही निर्देशही देण्यात आले.

मानखुर्द येथील चिल्ड्रन्स एड सोसायटीची जागा अतिक्रमणमुक्त करा

 मानखुर्द येथील चिल्ड्रन्स एड सोसायटीची जागा अतिक्रमणमुक्त करा

- पालकमंत्री ॲड. आशिष शेलार

 

मुंबई, दि. १० : मानखुर्द येथील राज्य शासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि टाटा पॉवरच्या ताब्यातील जमिनींवरील अतिक्रमणे हटवून ती जागा चिल्ड्रन्स एड सोसायटीच्या मूळ उद्देशासाठी उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने आणि तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.

मानखुर्द येथील अतिक्रमित झालेल्या जागेसंदर्भात पालकमंत्री ॲड.शेलार यांच्या अध्यक्षतेखाली आज पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे आढावा बैठक झाली. या बैठकीस माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यासह मुंबई महानगर पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस, महिला व बालविकास, टाटा पॉवर चे अधिकारी उपस्थित होते.


दशावतार कलेच्या संवर्धनासाठी शासन सकारात्मक

 दशावतार कलेच्या संवर्धनासाठी शासन सकारात्मक

– सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

·         कलाकारांच्या मागण्यांवर विभागीय समन्वय बैठकीचे निर्देश

 

मुंबई, दि. १० : महाराष्ट्र शासनाकडून पात्र दशावतार कलापथकांना अनुदान दिले जाते; तसेच ज्येष्ठ कलावंत मानधन योजनेअंतर्गत दरमहा पाच हजार रुपयांचे मानधनही उपलब्ध आहे. मात्र, दशावतार नाट्यमंडळाच्या मागण्या ह्या विविध विभागांशी संबंधित असल्याने या मागण्यांबाबत मुख्य सचिवांच्या स्तरावर समन्वय बैठक घेण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सांगितले.

कोकणातील पारंपरिक दशावतार लोककलेच्या जतन, संवर्धन आणि कलाकारांच्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी प्रभादेवी येथे बैठक झाली. या बैठकीस आमदार प्रमोद जठार, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार मंडळांचे प्रतिनिधी, कलावंत आणि विविध पदाधिकारी उपस्थित होते.

मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, कोकणातील दशावतार महोत्सवांची संख्या वाढवून मुंबई आणि ठाणे येथेही शासनाच्या माध्यमातून विशेष दशावतार महोत्सव आयोजित करण्यात येतील. त्याचबरोबर दशावतार विषयक प्रशिक्षण कार्यशाळा अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी स्थानिक संस्थांशी समन्वय साधावा.

महाराष्ट्रातील लोककलांचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करण्याबाबत बालभारतीला पत्र पाठविण्याचे निर्देश मंत्री ॲड.शेलार यांनी कलाकारांच्या प्रवास सवलतीसाठी परिवहन विभागाशीही पाठपुरावा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दशावतार कलाकारांच्या वाहनांवरील करसवलत, विश्रांतीगृहे, मुंबई-ठाणे परिसरात निवास व्यवस्था; तसेच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी सांस्कृतिक भवन उभारणीच्या मागण्यांवरही सकारात्मक विचार करण्यात येईल, असे मंत्री ॲड.शेलार यांनी यावेळी सांगितले.

कोकणच्या सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक असलेल्या दशावतार कलेच्या संवर्धनासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगून मंत्री ॲड.शेलार यांनी दशावतार कलाकारांची अधिकृत निर्देशिका (डिरेक्टरी) तयार करण्याच्या प्रस्तावालाही यावेळी मान्यता दिली.

आजच्या काळात रोटी, कपडा आणि मकाननंतर इंटरनेट ही मूलभूत गरज

 ई-पीक पाहणीसंदर्भातील शेतकऱ्यांच्या अडचणींचा स्वतंत्र अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभागाकडे पाठवावा, तसेच आवश्यक असल्यास ऑफलाईन प्रक्रियेबाबत निर्णय घेण्यासाठी राज्य शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आजच्या काळात रोटी, कपडा आणि मकाननंतर इंटरनेट ही मूलभूत गरज बनली आहे. त्यामुळे कोकणातील प्रत्येक गावापर्यंत दर्जेदार मोबाईल आणि इंटरनेट सेवा पोहोचलीच पाहिजे, असेही मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले.

Featured post

Lakshvedhi