Saturday, 29 June 2024

संस्थेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही

 


 

विधानपरिषद लक्षवेधी सूचना क्रमांक 3

 

संस्थेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ            

            मुंबईदि. 29 :अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या मुला-मुलींनी कॉलेजचे अध्यक्ष व व्यवस्थापनाच्या मनमानी विरोधात विद्यार्थ्यांनी केलेल आंदोलन लक्षात घेता शासनाने विद्यार्थ्यांच्या हिताची भूमिका घेतलेली आहे.कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होणार याची काळजी घेतली जाईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानपरिषदेत सांगितले.

          अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या व्यवस्थापन आणि विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा अशी लक्षवेधी विधानपरिषद सदस्य  प्रा. राम शिंदे यांनी मांडली. या लक्षवेधीच्या चर्चेत विधानपरिषद सदस्य डॉ. मनीषा कायंदे यांनी सहभाग घेतला.

        मंत्री श्री.मुश्रीफ म्हणाले कीरत्नदीप मेडिकल फाउंडेशन आणि रिसर्च सेंटर रत्नापूर ता.जामखेड जिल्हा अहमदनगर मधील एकाच आवारात व इमारतीत विविध सात महाविद्यालये चालवली जातात.या संस्थेविरोधात ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी लक्षात घेता शासनाने विद्यार्थ्यांच्या हितानुसार निर्णय घेतला आहे तसेच संस्थेविरोधात प्राप्त तक्रारीनुसार कायदेशीर कारवाई देखील सुरू आहे.संस्थेत प्रवेश घेतलेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेतली आहे.

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानासाठी लवकरच कार्यवाही होणार

 अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानासाठी लवकरच कार्यवाही होणार

मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

            मुंबईदि. 29 : जानेवारी ते मे 2024 या कालावधीत अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानासाठीची कार्यवाही सुरू असून लवकरच शेतक-यांना मदत मिळणार असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले.

        ८ ते ११ एप्रिल या दरम्यान राज्यात पडलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानापोटी भरपाई मिळावी, अशी लक्षवेधी सदस्य अमोल मिटकरी यांनी मांडली होती.

         मंत्री श्री.पाटील म्हणाले कीराज्यात केवळ ८ ते ११ एप्रिल २०२४ याच कालावधीत पडलेला अवकाळी पाऊस नाही, तर जानेवारी ते मे २०२४ या कालावधीत पडलेल्या पावसाने नुकसान भरपाई मिळावी यासाठी या भागातील पंचनामे करावेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व मदत व पुनर्वसन विभागाने जिल्हाधिका-यांना आदेश दिले होते. त्याप्रमाणे या भागात २ लाख ९१ हजार४३३ हेक्टर क्षेत्रात पंचनामे प्राप्त झाले आहेत. त्याच्यामध्ये ३ लाख २३ हजार २१९ शेतकरी आहेत.४९५ कोटी रुपयांचे प्रस्ताव आहेत.या नुकसानासाठी मदतीच्या निकषापेक्षा जास्त देण्यात यावी यासाठी  जुलैपर्यंत सर्व कार्यवाही पूर्ण होईल, असे मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.

दावोस येथील गेल्या तीन वर्षातील केलेल्या सामंजस्य कराराबाबत श्वेतपत्रिका काढणार

 दावोस येथील गेल्या तीन वर्षातील केलेल्या

सामंजस्य कराराबाबत श्वेतपत्रिका काढणार

-उद्योग मंत्री उदय सामंत

            मुंबई, दि.२९ : थेट परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्राला सलग दोन वर्ष प्रथम स्थानावर ठेवण्याचे काम उद्योग विभागाच्या माध्यमातून झाले असून मोठ्या प्रमाणात परदेशी उद्योग समूह राज्यात गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत. दावोस येथे गेल्या तीन वर्षांत राज्याने केलेल्या विविध सामंजस्य करारांची (एमओयू),गुंतवणूक प्रकल्पाबाबतची माहिती देणारी श्वेतपत्रिका उद्योग विभाग प्रसिद्ध करणार असल्याचे घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितले.

             विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी  छत्रपती संभाजीनगर येथील ऑरिक सिटीच्या अनुषंगाने उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री श्री.सामंत बोलत होते.

            मंत्री श्री.सामंत म्हणाले की, सलग दोन वर्षापासून महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत प्रथम स्थानावर असून या वर्षी दावोस येथे तीन लाख ७२ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे रत्ने आणि दागिन्यांचा (जेम्स ॲन्ड ज्वेलरी पार्क) मोठा प्रकल्प नवी मुंबई येथे सुरु करण्यात येणार आहे. गेल्या तीन वर्षात दावोस येथे उद्योग विभागाच्या तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मार्फत आणि इतर विभागांच्यावतीने किती सामंजस्य करार करण्यात आलेत्याची अंमलबजावणी या सर्वांची माहिती देणारी श्वेतपत्रिका उद्योग विभागाद्वारे काढली जाईल, असे सांगून श्री. सामंत यांनी छत्रपती संभाजीनगरपासून जवळच शेंद्रा येथे असलेल्या ऑरिका सिटी अंतर्गत दिल्लीमुंबई इंडस्ट्रीअल कॉरिडॉअरच्या शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक पट्टयात मोठ्या संख्येने विविध परदेशी कंपन्यांनी भरीव गुंतवणूक करत आपले उद्योग सुरु केलेले आहेत. त्यातून रोजगाराच्या संधी व्यापक प्रमाणात  निर्माण झालेल्या आहेतत्यासोबतच अनेक नवीन परदेशी उद्योग समूह या ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी पुढे येत असल्याची माहिती यावेळी दिली.

            तसेच ऑरिक सिटीमध्ये मोठ्या प्रकल्पांना बाधा न होणारी मुख्य ठिकाणी असलेली  जमीन  ही एमएसईबीसाठी  राखीव  ठेवली जाईल. तसेच त्या  ठिकाणी  होणा-या एमएसईबीला पूरक योजना उपलब्ध करुन दिल्या जातील. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर येथील वाळूजचितेगावशेंद्राबिडकीन येथील एमआयडीसींना एकमेकांसोबत जोडणारा अंतर्गत वाहतुकीसाठीच्या रस्त्याच्या कामाचा प्रस्ताव ही तयार असून  येत्या महिनाभरातच त्याचे काम सुरु करण्यात येईल. तसेच ऑरिक सिटी पासून ९८० किमी अतंरावर असलेल्या समृद्धी महामार्गाला जोडणा-या रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया ही लवकरच सुरु करण्यात येणार आहेया ऑरिक सिटीला समृद्धी महामार्गाला जोडणा-या अंतर्गत रस्त्याचा लाभ येथील उद्योजकउत्पादन वितरणाला मोठ्या प्रमाणात होणार आहे, असे सांगून दक्षिण कोरियाचा ह्युंदाईचा प्रकल्प पुण्यात येत आहे. या कंपनीने चार हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात करण्याचे ठरवलेले आहे. ज्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती, मंत्री श्री.सामंत यांनी यावेळी दिली.

            या चर्चेत विधान परिषद सदस्य सचिन अहीरअभिजित वंजारी यांनी सहभाग घेतला.

राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केल्याबद्दल भगिनींनी मानले मुख्यमंत्री भाऊरायाचे आभार भगिनींनी बांधल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना राखी महिलांसाठीच्या योजनांच्या अंमलबजावणीची मुख्यमंत्र्यांकडून ओवाळणी

 राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केल्याबद्दल

भगिनींनी मानले मुख्यमंत्री भाऊरायाचे आभार

भगिनींनी बांधल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना राखी

महिलांसाठीच्या योजनांच्या अंमलबजावणीची मुख्यमंत्र्यांकडून ओवाळणी

 

            मुंबई दि.२९ :- राज्याच्या अर्थसंकल्पात महिला- भगिनींसाठी अनेक निर्णय घेऊन त्यांना दिलासा दिल्याबद्दल विविध क्षेत्रातील महिला- भगिनींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओवाळून राखी बांधत त्यांचे आभार मानले. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी १ जुलैपासून करत असल्याचे सांगत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी त्यांना अनोखी ओवाळणी दिली.

            विधानभवनाच्या प्रांगणात आज विविध क्षेत्रातील महिला भगिनी एकत्र जमल्या होत्या. विधिमंडळात काल सादर झालेल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक निर्णय घेण्यात आले. या निर्णयामुळे राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळाल्याने त्यांनी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांना ओवाळून राखी बांधून त्यांचे आभार मानले.

            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेअर्थसंकल्पात राज्यातील महिला- भगिनींना दिलासा देणारे अनेक निर्णय आम्ही घेतले आहेत. मुख्यमंत्री माझी बहिण योजनेचा शासन निर्णय देखील तातडीने काढण्यात आला असून त्याचा लाभ येत्या 1 जुलैपासून भगिनींना देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत. या निर्णयाचा फायदा अडीच कोटींहून जास्त महिलांना होणार आहे.

            महिलांना वर्षातून 3 सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाही सुरू करण्यात येणार आहे. तसेच 25 लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. बचतगटांतील महिलांचे खेळते भांडवल 15 हजारावरून वाढवून 30 हजार केले आहे. मुलींना उच्च शिक्षणापर्यंतचे शिक्षण मोफत देण्याचा10 हजार महिलांना पिंक रिक्षांचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महिलांना मोफत प्रवास50 टक्क्यांपर्यंत मोफत एसटी प्रवास यापूर्वीच दिलेला आहेराज्यातील सर्व माता-भगिनींच्या पाठीशी त्यांचा मुख्यमंत्री भाऊराया म्हणून नेहमी पाठीशी असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. राखी बांधल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्व भगिनींचे आभार मानले.

            यावेळी मंत्री दादाजी भुसेआमदार प्रताप सरनाईकआमदार नरेंद्र भोंडेकर आणि विविध क्षेत्रातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

००००


 

विंचू चावणे उपचार

 


धनगर समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांसाठी

 धनगर समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांसाठी  खारघरनवी मुंबई येथे 4 हजार चौरस मीटरचा भूखंड

माझी लाडकी बहिण योजना







 

Featured post

Lakshvedhi