Friday, 17 April 2026

महात्मा जोतीराव फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करणे या योजनेत नवीन शैक्षणिक धोरणानुसार

    मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले कीमहात्मा जोराव फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र  सुरू करणे या योजनेत  नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणासोबत कौशल्याची सांगड घालण्यात येणार आहे. झोपडपट्टी परिसरातही ही प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. शहरी भागात आवश्यक असलेले कौशल्य प्रशिक्षण केंद्रात शिकविण्यात येतील. पदवी सोबत कौशल्य अवगत असेल तरच रोजगाराच्या संधी अधिक उपलब्ध होतात त्यामुळे हा उपक्रम अधिकाधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.

       मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, हँगिंग गार्डन (फिरोजशहा मेहता गार्डन) येथे ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधेसाठी रॅम्प तयार करणेसायन येथील 'अम्मान देखनीसंस्थेजवळील डीपी रोडवर झालेले अतिक्रमण हटवून तो रस्ता रहिवाशांसाठी मोकळा करावायाबाबत मुंबई महापालिका आयुक्तांशी चर्चा करण्यात आली. मुंबईतील पायाभूत सुविधा आणि तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महानगरपालिका आणि राज्य शासन मिळून काम करअसा विश्वास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी व्यक्त केला.

                                         

महात्मा जोतीराव फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करणे या योजनेत

   मुंबई महानगरपालिकेत आयोजित पत्रकारांशी संवाद साधताना कौशल्यरोजगारउद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा बोलत होते. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचीही भेट त्यांनी यावेळी घेतली. या भेटीदरम्यान मुंबईच्या विविध समस्यांसह तरुणांच्या रोजगारासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या महात्मा जोराव फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

         मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले कीमहात्मा जोराव फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र  सुरू करणे या योजनेत  नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणासोबत कौशल्याची सांगड घालण्यात येणार आहे. झोपडपट्टी परिसरातही ही प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. शहरी भागात आवश्यक असलेले कौशल्य प्रशिक्षण केंद्रात शिकविण्यात येतील. पदवी सोबत कौशल्य अवगत असेल तरच रोजगाराच्या संधी अधिक उपलब्ध होतात त्यामुळे हा उपक्रम अधिकाधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.

       मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, हँगिंग गार्डन (फिरोजशहा मेहता गार्डन) येथे ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधेसाठी रॅम्प तयार करणेसायन येथील 'अम्मान देखनीसंस्थेजवळील डीपी रोडवर झालेले अतिक्रमण हटवून तो रस्ता रहिवाशांसाठी मोकळा करावायाबाबत मुंबई महापालिका आयुक्तांशी चर्चा करण्यात आली. मुंबईतील पायाभूत सुविधा आणि तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महानगरपालिका आणि राज्य शासन मिळून काम करअसा विश्वास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी व्यक्त केला.

एकल महिला धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीस गती

 ‘

प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्याचे मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश


· एकल महिला धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीस गती


 


मुंबई, दि. १६: राज्यातील एकल महिलांना सर्व शासकीय योजनांचा लाभ सुलभ आणि एकत्रित स्वरूपात मिळावा यासाठी कार्यप्रणाली तयार करावी. एकल महिला धोरणाची अंमलबजावणी अधिक परिणामकारक करण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती तातडीने तयार करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.


 


एकल महिलांच्या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत सचिव अनुप कुमार यादव, आयुक्त माधवी सरदेशमुख, सहसचिव वि. रा. ठाकूर, उपायुक्त गिरासे, उपसचिव भोंडवे तसेच अवर सचिव कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या.


 


मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, महिलांसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ ‘एकाच छताखाली’ उपलब्ध करून देण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करा. त्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर समित्यांची स्थापना करण्यात आली असून, एकल महिलांची नोंदणी प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी. धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करून सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे.


 


एकल महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष हेल्थ कॅम्प आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, विविध ठिकाणी जनजागृती व सेवा शिबिरे घेऊन अधिकाधिक महिलांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्यावर भर देण्यात येणार आहे.


 


या सर्व उपक्रमांमुळे राज्यातील एकल महिलांचे सामाजिक, आर्थिक आणि आरोग्यदृष्ट्या सक्षमीकरण होण्यास मोठी चालना मिळणार आहे.


 

बांद्रा (पूर्व) येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ‘नियोजन भवन’ उभारण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

 बांद्रा (पूर्व) येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नियोजन भवन’ उभारण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असूनजिल्हा नियोजन समितीच्या कामकाजासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र नियोजन भवन उभारण्याच्या सूचनेनुसार हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

 

या प्रकल्पाला 19 नोव्हेंबर 2025 रोजी सुमारे 741.04 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली असून6 फेब्रुवारी 2026 रोजी तांत्रिक मान्यताही प्रदान करण्यात आली आहे. एकूण 1031.25 चौरस मीटर बांधकाम क्षेत्र असलेल्या या इमारतीचे काम दोन टप्प्यांत पूर्ण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात तळमजला आणि एक मजला असलेली मुख्य इमारत उभारण्यात येणार आहे. यामध्ये 300 आसनक्षमतेचे भव्य सभागृहदोन स्वतंत्र ग्रीन रूमकिचन व पॅन्ट्री तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सुविधा उभारल्या जाणार आहेत. पहिल्या मजल्यावर जिल्हा नियोजन समितीचे कार्यालय आणि लहान सभागृहाचीही व्यवस्था असेल.

 

दुसऱ्या टप्प्यात अंतर्गत सजावटसभागृहाचे ध्वनीरोधक कामफॉल्स सिलिंगदरवाजे तसेच आवश्यक फर्निचर आणि इतर पूरक सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री ॲड.शेलार यांनी सर्व संबंधितांना यावेळी दिल्या.


वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नियोजन भवन · मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

 वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नियोजन भवन

·         मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

 

मुंबईदि. 16 : मुंबई उपनगर  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बांधण्यात येणाऱ्या नियोजन भवन इमारतीचा भूमिपूजन सोहळा वांद्रे पूर्व येथे पार पडला. मुंबई उपनगरचे पालकमंत्री तसेच माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी भूमिपूजन करून या इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ केला.

 

भूमिपूजन सोहळ्यास  आमदार संजय उपाध्यायजिल्हाधिकारी सौरभ कटियार तसेच जिल्हा नियोजन अधिकारी संजय शिंदे व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. तत्पूर्वी सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जागेची पूजा केली.


‘एकाच छताखाली’ सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्याचे मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश · एकल महिला धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीस गती

 एकाच छताखाली’ सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी

प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्याचे मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश

·         एकल महिला धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीस गती

 

मुंबई, दि. १६: राज्यातील एकल महिलांना सर्व शासकीय योजनांचा लाभ सुलभ आणि एकत्रित स्वरूपात मिळावा यासाठी कार्यप्रणाली तयार करावी. एकल महिला धोरणाची अंमलबजावणी अधिक परिणामकारक करण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती तातडीने तयार करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

 

एकल महिलांच्या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत सचिव अनुप कुमार यादवआयुक्त माधवी सरदेशमुख, सहसचिव वि. रा. ठाकूरउपायुक्त गिरासेउपसचिव भोंडवे तसेच अवर सचिव कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या.

 

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या कीमहिलांसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली’ उपलब्ध करून देण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करा. त्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर समित्यांची स्थापना करण्यात आली असून, एकल महिलांची नोंदणी प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी. धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करून सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे.

 

एकल महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष हेल्थ कॅम्प आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या असूनविविध ठिकाणी जनजागृती व सेवा शिबिरे घेऊन अधिकाधिक महिलांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्यावर भर देण्यात येणार आहे.

 

या सर्व उपक्रमांमुळे राज्यातील एकल महिलांचे सामाजिकआर्थिक आणि आरोग्यदृष्ट्या सक्षमीकरण होण्यास मोठी चालना मिळणार आहे.

 

महिला व बालविकास विभागातील विविध पदांच्या भरती प्रक्रियेला वेग

  

महिला व बालविकास विभागातील पदभरतीचे

निकाल जाहीर करण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी

- मंत्री आदिती तटकरे

 

मुंबई, दि.१६ : महिला व बालविकास विभागातील विविध पदांच्या भरती प्रक्रियेला वेग देण्यात यावा. विशेषतः वर्ग ३ व ४ च्या सरळसेवा भरती प्रक्रियेसंदर्भात परीक्षांचे निकाल तातडीने जाहीर करण्याच्या सूचना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या.

 

पदभरती प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात झालेल्या बैठकीत सचिव डॉ. अनुपकुमार यादवआयुक्त माधवी सरदेशमुख तसेच सहसचिव वि. रा. ठाकूर, उपायुक्त गिरासे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या कीविभागातील विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षा निकाल अंतिम टप्प्यात असूननिकाल जाहीर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पदभरती करण्यात येणार आहे. त्यामुळे विभागातील रिक्त पदे भरून सेवा वितरण अधिक सक्षम आणि गतिमान होणार आहे.

 

मंत्री आदिती तटकरे यांनी भरती प्रक्रिया पारदर्शकवेळेत आणि कार्यक्षम पद्धतीने पूर्ण करण्यावर भर देतनिकाल जाहीर करण्याची प्रक्रिया गतीमान करण्याचे निर्देश दिले. या निर्णयामुळे महिला व बालविकास विभागाच्या कामकाजाला अधिक बळकटी मिळणार असून नागरिकांना मिळणाऱ्या सेवांमध्येही गुणवत्ता वाढणार आहे.

०००

Featured post

Lakshvedhi