Tuesday, 20 January 2026

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसकडे रवाना ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’द्वारे जागतिक पातळीवर भारताच्या विकासगाथेचा गजर

 वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसकडे रवाना

मॅग्नेटिक महाराष्ट्रद्वारे जागतिक पातळीवर भारताच्या विकासगाथेचा गजर

 

मुंबईदि. 18 : महाराष्ट्राला 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे नेण्याचा वेग अधिक वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) 2026 मध्ये सहभागी होण्यासाठी स्वित्झर्लंडमधील दावोसकडे रवाना झाले आहेत. या परिषदेसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

 

जागतिक व्यासपीठावर भारताचे विकास इंजिन म्हणून 'मॅग्नेटिक महाराष्ट्रअधिक बळकट करण्याचा निर्धार असून या नव्या महा-ग्रोथ’ गाथेकडे जग अपेक्षेने पाहत आहे. महाराष्ट्राची 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल अधिक वेगवान करण्यासाठी WEF 2026 महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. गेल्यावर्षी 16 लाख कोटींचे गुंतवणूक करार महाराष्ट्राने केले होते. यावर्षी अधिक गुंतवणूक आणण्याचे उद्धिष्ट राज्य शासनाने ठेवले आहे.

 

दावोस येथे होणाऱ्या या परिषदेदरम्यान जागतिक उद्योगसमूहगुंतवणूकदार आणि धोरणकर्त्यांशी चर्चा करून महाराष्ट्रात थेट विदेशी गुंतवणूकऔद्योगिक प्रकल्परोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकासाला चालना देण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

000

 

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या गुण पडताळणीसाठी 21 जानेवारीपर्यंत आक्षेप नोंदविता येतील

 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या गुण पडताळणीसाठी

21 जानेवारीपर्यंत आक्षेप नोंदविता येतील

-परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक

 

मुंबई दि. १९ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) २०२५ चा अंतरिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. निकालाच्या अनुषंगाने गुण पडताळणी करावयाची असल्यास अथवा त्रुटी / आक्षेप असल्यास http://mahatet.in या संकेतस्थळावर २१ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत उमेदवार/ परीक्षार्थींना लॉगिन करुन ऑनलाईन पद्धतीने आक्षेप नोंदविता येईलअसे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.

 

अन्य मार्गाने आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाहीयाची संबंधित सर्व उमेदवार परीक्षार्थींनी नोंद घ्यावीअसेही स्पष्ट करण्यात आले आहे.

बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत कृष्‍णा व गोदावरी

 बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत कृष्‍णा व गोदावरी महामंडळाच्‍या अंतर्गत सुरु असलेल्‍या प्रकल्‍पांच्‍या कामापैकी १५ प्रकल्‍प पूर्ण झाले आहेत. उर्वरित दोन प्रकल्‍प पूर्ण करण्‍याकरिता विभागाचे प्रयत्‍न असूनया दोन्‍हीही योजनांच्‍या अंतर्गत सुरु असलेल्‍या  कामांची गती वाढवून ही कामे पूर्णत्‍वास जाण्‍यासाठी सहकार्य करण्‍याची ग्‍वाही केंद्रीय मंत्री सी.आर पाटील यांनी दिली.

अहिल्‍यानगर जिल्‍ह्यातील निळवंडे २ प्रकल्‍पाचे काम पूर्ण होऊन

 अहिल्‍यानगर जिल्‍ह्यातील निळवंडे २ प्रकल्‍पाचे काम पूर्ण होऊन यामध्‍ये पाणीसाठाही होत आहे. डाव्‍या व उजव्‍या कालव्‍यांची कामेही पूर्ण होत आहेत. प्रकल्‍पाच्‍या कालव्‍यांचे अस्‍तरीकरणाचे काम प्रगतीपथावर असूनपाण्‍याची वितरण व्‍यवस्‍था बंदिस्‍त करण्‍याचे धोरण घेण्‍यात आले असूनयासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून निधी उपलब्‍ध व्‍हावा अशीही मागणी या बैठकीत करण्‍यात आली. यासाठी २ हजार ३८ कोटी रुपयांच्‍या निधीचा प्रस्‍ताव सादर करण्‍यात आला असूननिधी उपलब्‍ध झाल्‍यास बंदिस्‍त नलिका वितरण प्रणालीव्‍दारे ६४ हजार २६० हेक्‍टर क्षेत्राचे काम जलदगतीने पूर्ण होईल असा विश्‍वासही या बैठकीत व्यक्त करण्‍यात आला.


बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत कृष्‍णा व गोदावरी

 बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत कृष्‍णा व गोदावरी महामंडळाच्‍या अंतर्गत सुरु असलेल्‍या प्रकल्‍पांच्‍या कामापैकी १५ प्रकल्‍प पूर्ण झाले आहेत. उर्वरित दोन प्रकल्‍प पूर्ण करण्‍याकरिता विभागाचे प्रयत्‍न असूनया दोन्‍हीही योजनांच्‍या अंतर्गत सुरु असलेल्‍या  कामांची गती वाढवून ही कामे पूर्णत्‍वास जाण्‍यासाठी सहकार्य करण्‍याची ग्‍वाही केंद्रीय मंत्री सी.आर पाटील यांनी दिली.

       मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या नेतृत्‍वाखाली राज्‍य  दुष्‍काळमुक्‍त करण्‍याच्‍या दृष्‍टीने मोठ्या प्रमाणात नदीजोड प्रकल्‍पांची कामे हाती घेण्‍यात आली आहेत. यामध्‍ये प्राधान्‍याने दमणगंगा- एकदरे-गोदावरीदमणगंगा-वैतरणा-गोदावरीकोकण गोदावरी खोरेनळगंगा- वैनगंगापार गोदावरी या प्रकल्‍पांच्‍या कामासाठी अधिकच्‍या  निधीची गरज असूनकेंद्र सरकारने यासाठी निधी उपलब्‍ध करुन द्यावा  अशी विनंती जलसंपदा मंत्री राधाकृष्‍ण 

राज्‍यामध्‍ये सुरु असलेल्‍या सिंचन प्रकल्‍पांच्‍या कामाची माहिती

 राज्‍यामध्‍ये सुरु असलेल्‍या सिंचन प्रकल्‍पांच्‍या कामाची माहिती केंद्रीय मंत्र्यांना देण्‍यात आली.  सुरु असलेल्‍या कामाबाबत त्‍यांनी समाधानही व्‍यक्‍त केले. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत राज्‍यातील २९ प्रकल्‍पांचा समावेश करण्‍यात आला असूनयामध्‍ये कोकण पाटबंधारे विकास महामंडळअंतर्गत ५विदर्भ पाटबंधारे महामंडळा अंतर्गत ७कृष्‍णा खोरे विकास महामंडळ अंतर्गत ९ आणि गोदावरी विकास महामंडळ अंतर्गत ४ तसेच तापी पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत ४ प्रकल्‍पांची कामे सुरु असल्‍याचे केंद्रीय मंत्र्यांच्‍या निदर्शनास आणून देण्यात आले. यापैकी कृष्‍णा व गोदावरी प्रकल्‍पाअंतर्गत सुरु असलेल्‍या  १३ प्रकल्‍पांपैकी दहा प्रकल्‍प पूर्ण झाले असल्‍याची माहिती मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी बैठकीत दिली.

नदीजोड प्रकल्‍प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने अर्थसहाय्य करावे - महाराष्ट्राची मागणी

 नदीजोड प्रकल्‍प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने अर्थसहाय्य करावे

- महाराष्ट्राची मागणी

नवी दिल्ली, दि.१९ : मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या नेतृत्‍वाखाली महाराष्‍ट्र दुष्‍काळमुक्‍त करण्‍याकरिता राज्य सरकारने सुरु केलेल्‍या नदीजोड प्रकल्‍पाच्‍या पूर्णत्वासाठी केंद्र सरकारने अर्थसहाय्य करावे अशी विनंती राज्याच्या वतीने केंद्रीय जलशक्‍ती मंत्री सी.आर पाटील यांच्याकडे  करण्‍यात आली.

राज्‍यातील सिंचन प्रकल्‍पांचा आढावा घेण्‍यासाठी नवी दिल्‍ली  येथे  केंद्रीय जलशक्‍ती मंत्री सी.आर पाटील यांच्‍या  उपस्थितीत विशेष बैठकीचे आयोजन करण्‍यात आले. या बैठकीस  जलसंपदा मंत्री डॉ.राधाकृष्‍ण विखे पाटीलमंत्री गिरीष महाजनजलशक्‍ती विभागाचे केंद्रीय सचिव कांतारावआयुक्‍त प्रविण कुमारविभागाचे अपर मुख्‍य सचिव दिपक कपूरसचिव डॉ.संजय बेलसरे यांच्‍यासह राज्‍याच्‍या सर्व पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक आणि वरिष्‍ठ अधिकारी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi