Wednesday, 7 January 2026

नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची सुवर्णसंधी

 नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची सुवर्णसंधी

    -वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ

·        महाराष्ट्र-बाडेन वुटेमबर्ग राज्यांदरम्यान संयुक्त करार

मुंबईदि. ०५ :- महाराष्ट्र आणि जर्मनीतील बाडेन-वुटेमबर्ग राज्यादरम्यान नर्सिंग क्षेत्रातील सहकार्य दृढ करण्यासाठी महत्त्वपूर्ण संयुक्त करार करण्यात आला आहेयामुळे महाराष्ट्रातील नर्सिंग विद्यार्थ्यांनी जर्मनीत प्रशिक्षण घेऊन करिअरची सुवर्णसंधी उपलब्ध झाली असल्याचे वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.

वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि बाडेन-वुटेमबर्ग राज्याचे मंत्री मॅनफ्रेड लुखा यांनी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे संयुक्त जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमारवैद्यकीय शिक्षण आयुक्त डॉ. अनिल भंडारीवैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. अजय चंदनवालेवैद्यकीय शिक्षण विभागाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरातयांच्यासह अर्चना बडेधीरेंद्र रामटेकेतसेच बाडेन-वुटेमबर्ग राज्य येथील सामाजिक व्यवहारआरोग्य आणि एकात्मता मंत्रालयाचे उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळ तसेच वैद्यकीय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

दुर्मिळ आतड्यांच्या आजारावर वेळेत केलेल्या आपत्कालीन शस्त्रक्रियेमुळे मणिपाल हॉस्पिटल, बाणेर येथे ३ दिवसांच्या नवजात बाळाचे वाचले प्राण*

 *दुर्मिळ आतड्यांच्या आजारावर वेळेत केलेल्या आपत्कालीन शस्त्रक्रियेमुळे मणिपाल हॉस्पिटल, बाणेर येथे ३ दिवसांच्या नवजात बाळाचे वाचले प्राण* 


वेळीच निदान व आपत्कालीन शस्त्रक्रियेमुळे आतडयांना बसलेल्या जीवघेण्या पिळ्यातून नवजात बाळाला जीवनदान


 *अलिबाग* : मणिपाल हॉस्पिटल, बाणेर येथील डॉक्टरांनी इंटेस्टाइनल मॅलरोटेशन विथ मिडगट व्हॉल्व्युलस या दुर्मिळ आणि जन्मजात आतड्यांच्या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या केवळ ३ दिवसांच्या नवजात बाळावर यशस्वी उपचार केले. हा आजार वेळेत उपचार न झाल्यास काही तासांत जीवघेणा ठरू शकतो. लक्षणांची लवकर ओळख, तातडीची तपासणी आणि योग्य वेळी करण्यात आलेली शस्त्रक्रिया यामुळे बाळाचे प्राण वाचवणे शक्य झाले.


हे बाळ मणिपाल हॉस्पिटल, बाणेर येथेच जन्माला आले होते आणि सुरुवातीला त्याची प्रकृती स्थिर होती. मात्र दुसऱ्या दिवशी बाळाला दूध पिण्यात अडचण येऊ लागली आणि प्रत्येक फीडनंतर उलट्या होऊ लागल्या. ही धोक्याची चिन्हे ओळखताच बालरोग तज्ज्ञांच्या पथकाने तातडीने सखोल तपासण्या सुरू केल्या.


 *या प्रकरणाबाबत माहिती देताना डॉ. परितोषा दलाल, सल्लागार – बालरोग व नवजात शल्यचिकीत्सक, मणिपाल हॉस्पिटल, बाणेर म्हणाल्या,* “ही अवस्था म्हणजे शस्त्रक्रियेची तातडीची गरज असलेली आपत्कालीन परिस्थिती आहे. बाळाची तत्काळ तपासणी करण्यात आली आणि तातडीची पोटाची सोनोग्राफी तसेच इतर उच्चस्तरीय तपासण्या केल्या. त्यामध्ये लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागात अडथळा निर्माण करणारा इंटेस्टाइनल मॅलरोटेशन विथ मिडगट व्हॉल्व्युलस हा आजार असल्याचे स्पष्ट झाले. या स्थितीत चुकीच्या पद्धतीने बसलेली आतडी स्वतःच्या रक्तपुरवठ्याभोवती (सुपीरियर मेसेन्टेरिक आर्टरी) वळतात, ज्यामुळे आतड्यांना जाणारा रक्तपुरवठा थांबण्याचा आणि आतडी सडण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे बाळाला तातडीने शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले.”


 *त्या पुढे म्हणाल्या* , “अशा परिस्थितीत रक्तपुरवठा तात्काळ पूर्ववत करणे अत्यंत महत्त्वाचे असते, अन्यथा आतड्यांचे कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते.”


डॉ. परितोषा दलाल यांच्या नेतृत्वाखालील नवजात शस्त्रक्रिया डॉक्टरांनी अतिशय काळजीपूर्वक आतड्यांवर बसलेला पीळ सोडवून त्वरित रक्तपुरवठा पुन्हा सुरू केला आणि गँग्रीन होण्यापासून आतड्यांचे संरक्षण केले. या वेळी केलेल्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे बाळाची पचनसंस्था सुरक्षित राहिली.

त्या पुढे सांगतात, “अशा नवजात बाळांना नेक्रोटायझिंग एंटरोकॉलायटिस (NEC) या गंभीर आजाराचा धोका अधिक असतो, ज्यामुळे आतड्याला छिद्र पडू शकते. या बाळामध्येही पुढे अशीच स्थिती निर्माण झाली आणि खराब झालेला आतड्याचा भाग काढण्यासाठी आणखी एक आपत्कालीन शस्त्रक्रिया करावी लागली. त्यानंतर बाळाला नवजात अतिदक्षता विभागात (NICU) ठेवून सतत निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आणि सखोल नवजात व शस्त्रक्रियात्मक उपचार देण्यात आले. सुमारे तीन आठवड्यांच्या उपचारानंतर बाळाची प्रकृती स्थिर झाली आणि त्याला घरी सोडण्यात आले. सध्या बाळाचे वजनवाढ व आहार नियमितपणे तपासला जात असून त्याच्या वाढीत सातत्याने सुधारणा दिसून येत आहे.”


आनंद मोटे, क्लस्टर डायरेक्टर, मणिपाल हॉस्पिटल, बाणेर, पुणे म्हणाले, “मणिपाल हॉस्पिटल्समध्ये दुर्मिळ आणि गुंतागुंतीच्या परिस्थितीतही उत्कृष्ट वैद्यकीय सेवा सातत्याने दिली जाते. या प्रकरणातून विविध तज्ज्ञ विभागांमधील समन्वय, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि एका छताखाली उपलब्ध असलेल्या सखोल वैद्यकीय अनुभवाचे महत्त्व अधोरेखित होते.”


ही शस्त्रक्रिया बहुवैद्यकीय पथकाच्या सहकार्याने पार पडली. या पथकात बालशस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. परितोषा दलाल, बालरोगतज्ज्ञ डॉ. मुबाशिशीर खान (निओनॅटोलॉजिस्ट) आणि डॉ. उज्ज्वला केसकर, तसेच नवजात अतिदक्षता विभाग आणि रेडिओलॉजी टीमचा समावेश होता.


हे यशस्वी प्रकरण नवजात बाळांमधील जीवघेणाऱ्या आजारांच्या व्यवस्थापनासाठी वेळीच निदान, तातडीची शस्त्रक्रिया आणि रुग्णालयातील एकत्रित तज्ज्ञ सेवांची अत्यंत महत्त्वाची भूमिका अधोरेखित करते.


विक्रमासाठी ३५ हजार पंप स्थापित करणे आवश्यक होते मात्र प्रत्यक्षात ४५ हजार ९११ पंप

 कार्ल सॅबेले म्हणाले कीविक्रमासाठी ३५ हजार पंप स्थापित करणे आवश्यक होते मात्र प्रत्यक्षात ४५ हजार ९११ पंप स्थापित करण्यात आलेहा एक विश्वविक्रम आहे. या प्रत्येक पंपाच्या उभारणी ते कार्यान्वयन या सर्व टप्प्यांवर पडताळणी करुनच या विक्रमास मान्यता देण्यात आली आहे.

            राज्यमंत्री मेघना बोर्डीकर व मंत्री अतुल सावे यांनीही यावेळी उपस्थितांशी संवाद साधून सौर कृषी पंप योजनेमुळे शेती क्षेत्रात आणि अर्थकारणात मोठे बदल होतील,असा विश्वास व्यक्त केला. या ठिकाणी लावलेल्या सौर ऊर्जा उत्पादनांच्या प्रदर्शनालाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट दिली व पाहणी केली.

            प्रास्ताविक लोकेश चंद्रा यांनी केले. तर निता पानसरे यांनी आभार मानले. नीता पानसरेआश्विनी दाशरथेप्रेषित रुद्रावतार यांनी सूत्रसंचालन केले.

०००००

महाराष्ट्र थांबणार नाही

 महाराष्ट्र थांबणार नाही

            मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात सुरुवातीला शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त राज्यातील जनतेचे आभार व्यक्त केले. जनतेला समर्पित वर्ष होते. सगळ्यांच्या जीवनात मूलभूत परिवर्तनसाठी योजना आणल्या त्या कार्यान्वित केल्या. महाराष्ट्र थांबणार नाहीअसाच पुढे जात राहीलहा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सुरुवातीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यातील सौरकृषी पंपाचे डिजिटल लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी लाभार्थी  शेतकऱ्यांशी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. गिनीज बुक विक्रम नोंदचे निरीक्षक पंच कार्ल सॅबेले यांनी  विक्रमाची घोषणा केली. प्रमाणपत्र व मेडल मान्यवरांना प्रदान केले. सौर कृषी पंप योजनेसाठी अर्थसहाय्य करणाऱ्या एआयआयएम बॅंकेसोबतच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. बॅंकेचे प्रत्युष मिश्रा व  महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

मराठवाड्याचा वाटा मोठा

 मराठवाड्याचा वाटा मोठा

            मराठवाड्याचे कौतुक करतांना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीया योजनेच्या अंमलबजावणीत मराठवाड्याने आघाडी घेतली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १४ हजार पंप लावण्यात आले. शेतकऱ्यांना नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजनेमार्फत अन्य लाभबाजाराची उपलब्धता देऊन शेती शाश्वत कशी होईलयासाठी शासन प्रयत्न करीत आहे. नदी जोड सारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून वाहून जाणारे पुराचे पाणी मराठवाड्यात,विदर्भात व उत्तर महाराष्ट्रात नेऊन दुष्काळ मुक्ती करायची आहे. या सर्व उपाययोजनांमुळे शेती समृद्ध आणि शाश्वत होईल. आमचे सरकार हे शेतकऱ्यांप्रती समर्पित सरकार असून शेती शाश्वत होईपर्यंत आम्ही प्रयत्न करीत राहूअसा शब्द त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला.

सौर ऊर्जेद्वारे १६ हजार मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता

 सौर ऊर्जेद्वारे १६ हजार मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता

            मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीअशा प्रकारे सौर ऊर्जेचा वापर वाढवून आपण शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र १६ हजार मेगा वॅट वीज निर्मिती करु शकतो. शिवाय ही वीज निर्मिती कोणत्याही प्रदूषणाशिवाय असेल. तिचा निर्मिती खर्च कमी असल्याने इतर क्षेत्राला लागणारी वीज मुबलक आणि स्वस्तात उपलब्ध होईल. त्यामुळे दरवर्षी ३ टक्क्यांनी आपण विजेचे दर कमी करुअशी आशा त्यांनी व्यक्त केली.

सौरपंप स्थापित करण्याच्या क्षमतेत वाढ

 सौरपंप स्थापित करण्याच्या क्षमतेत वाढ

            मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीप्रखर दुष्काळाचा सामना करतांना नेहमीच पाण्याची आणि विजेची अडचण होती. जलयुक्त शिवार योजनेमुळे पाण्याची उपलब्धता करतांना विजेच्या समस्येमुळे शेतकऱ्यांना सिंचन करण्यात अडचण होती. दिवसा वीज मिळावी ही प्रमुख मागणी होती. रात्री अपरात्री शेतावर जाण्यात विषारी जीवजंतूजनावरांची भीती होती. त्यासाठी शासनाने  शेतकऱ्यांचे फिडर हे सौर ऊर्जेवर नेण्याचे धोरण निश्चित केले. त्यातून एक लाख सोलर पंप ची योजना आखण्यात आली. ही योजना इतकी ,खूप चांगली असल्याने अन्य राज्यांनी जशीच्या तशी राबवावी,असे पत्र केंद्रांमार्फत इतर राज्यांना पाठविण्यात आले. त्यानुसार कुसुम’ ही केंद्राची योजना तयार झाली. याच योजनेअंतर्गत आज देशात सर्वाधिक ७ लाख पंप राज्याने बसविले आहेत. शेतकऱ्यांनी मागणी केल्यापासून ते पंप बसविण्याच्या क्षमतेत वाढ करुन आपण  प्रतिक्षा कालावधी कमी केला. महावितरणचे कर्मचारी अधिकारी. सगळ्या पुरवठादारांचे कर्मचारीतंत्रज्ञ यांच्या मेहनतीमुळे आज आपण हा विश्वविक्रम करु शकलो. आता हा आपला विक्रम आपणच मोडू,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुढच्या वर्षभरात सौर कृषी पंपांची संख़्या १० लाख झाली पाहिजे,असेही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले.

Featured post

Lakshvedhi