Friday, 2 January 2026

दिल्लीत रंगणार अस्सल मराठमोळी 'हुरडा पार्टी' आणि संक्रांत महोत्सव · महाराष्ट्र सदनात ग्रामीण संस्कृतीचा सुगंध दरवळणार

 दिल्लीत रंगणार अस्सल मराठमोळी 'हुरडा पार्टीआणि संक्रांत महोत्सव

·         महाराष्ट्र सदनात ग्रामीण संस्कृतीचा सुगंध दरवळणार

 

नवी दिल्ली, दि. 1 : दिल्लीकरांना महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीची माहिती देण्यासाठी कस्तुरबा गांधी मार्ग स्थित नवीन महाराष्ट्र सदनात हुरडा पार्टी’ आणि मकर संक्रांत महोत्सवाचे ते 11 जानेवारी या कालावधीत दु. 12 ते रात्रौ 9.30 या वेळेत आयोजन करण्यात आले असल्याची माहिती निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी दिली.

 

महाराष्ट्र सदनात डिसेंबर  महिन्यात पार पडलेल्या महाराष्ट्र खाद्य महोत्सवाला दिल्लीकरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहताआता हिवाळी हंगामाची मेजवानी म्हणून 'हुरडा पार्टी'चे आयोजन करण्यात आले आहे.

 

संक्रांतीचा गोडवा आणि हुरड्याचा खमंग स्वाद

मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या महोत्सवात 'तिळगूळआणि पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. पुणेसोलापूरनाशिक आणि मराठवाड्यातील शेतांमध्ये ज्याप्रमाणे शेकोटीवर हुरडा भाजून आनंद साजरा केला जातोतसाच अनुभव येथे दिला जाणार आहे. हुरड्यासोबतच खमंग लसूण चटणीशेंगदाणा कूटपिवळाधमक गूळसाजूक तूपताक आणि चुलीवरचे वाफाळलेले पिठलं-भाकरी,भरीत भाकरीबटाटेवडाभजी सोबतच ऊसबोरंओला हरबरा अशा अस्सल गावरान पदार्थांची रेलचेल येथे असणार आहेथंडी,  शेकोटीची ऊब आणि संगीत मैफिलीत हुरड्याचा आस्वादअसा दुग्धशर्करा योग या निमित्ताने जुळून येणार आहे. याबरोबरच  संक्रात वाणासाठी महिलांनी बनविलेल्या विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.

 

शहर आणि गाव यांना जोडणारा हा भावनिक पूल दिल्लीकरांना महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या अधिक जवळ घेऊन जाणारा ठरणार आहे. ते 11 जानेवारी दरम्यान नवीन महाराष्ट्र सदन येथे होणाऱ्या या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन महाराष्ट्राच्या आदरातिथ्याचा आणि चवीचा आनंद घ्यावाअसे आवाहन निवासी आयुक्त आर विमला आणि गुंतवणूक निवासी आयुक्त सुशील गायकवाड यांनी केले आहे

वैद्यकीय अधिकाऱ्यांना नववर्षाची भेट वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवा अखंड क्षमापित पत्राचे वितरण

 वैद्यकीय अधिकाऱ्यांना नववर्षाची भेट

 वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवा अखंड क्षमापित पत्राचे वितरण

 

            मुंबई, दि. 2 : आरोग्यसेवा आयुक्तालय मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात राज्यातील 195 वैद्यकीय अधिकाऱ्यांना 'सेवाखंड कालावधीत क्षमापित पत्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. गेली 20 वर्ष प्रलंबित असलेल्या या प्रश्नाची सोडवणूक केल्याबद्दल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरोग्यमंत्री आबिटकर यांचे आभार मानले. यावेळी डॉक्टरांनी लोकांना अधिक चांगली आरोग्यसेवा देण्याची जबाबदारी पार पाडावी. चांगले काम करावे. तुमच्या हक्काच्या गोष्टी देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे मंत्री आबिटकर म्हणाले.

नुकतेच 150 डॉक्टरांना 'सेवा खंड कालावधी क्षमापितकेले होते. एकूण 345 डॉक्टरांना पत्र देण्यात आले असूनउर्वरित सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना येत्या महिन्याभरात क्षमापण पत्राचे वितरण करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री आबिटकर यांनी यावेळी सांगितले. या ऐतिहासिक निर्णयामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांना अनेक प्रकारचे लाभ मिळू शकणार आहेत. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल वैद्यकीय अधिकाऱ्यांकडुन समाधान व्यक्त होत आहे.

             आरोग्य विभागात 2009 पूर्वी अस्थायी स्वरूपात अनेक वैद्यकीय अधिकारी कार्यरत होते. 2009 मध्ये या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांचा शासकीय सेवेत समावेश झाला आहे. मात्र सेवाखंड कालावधी क्षमापित नसल्याने त्यांना इतर लाभापासून वंचित राहावे लागत होते. वैद्यकीय अधिकारी यांचे संघटनेकडून याबाबत वारंवार मागणी होत होती. त्या अनुषंगाने आरोग्यमंत्र्यांनी पारदर्शकपणे सर्व पात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवाखंड क्षमापित करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांची सलग सेवा ग्राह्य धरण्यात येणार असून त्यामुळे इतर आर्थिक व प्रशासकीय लाभ त्यांना मिळतील.

            आरोग्यव्यवस्थेत समर्पित सेवा देण्याचा निश्चय करूयाया निर्णयामुळे आरोग्य सेवेत गुणात्मक वाढ होईल. नक्षलग्रस्त आदिवासी व डोंगरी भागात कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनसह विशेष इन्सेटिव्ह देण्यासाठी देखील वित्त विभागास प्रस्ताव पाठवला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरु झाली असुन उपचारासाठी मान्य असलेल्या आजारांची संख्या वाढवून 2399 करण्यात आली आहे . तज्ञ डॉक्टरांच्या मानधनातही भरघोस वाढ केली असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी उपसचिव केंद्रेसहसंचालक राजेंद्र भालेरावअवर सचिव गायकवाडमुख्य प्रशासकीय अधिकारी कारेगावकरआरोग्य विभागाचे इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

०००००

महामार्ग क्षमता सुधारणे हा या प्रस्तावित ॲक्सेस-कंट्रोल्ड

 महामार्ग क्षमता सुधारणे हा या प्रस्तावित ॲक्सेस-कंट्रोल्ड सहा-पदरी ग्रीनफिल्ड प्रकल्पाचा मुख्य उद्देश असूनयामुळे प्रवासाचा वेळ 17 तास आणि प्रवासाचे अंतर 201 कि.मी. ने कमी होण्याची अपेक्षा आहे. नाशिक-अक्कलकोट (सोलापूर) मार्गामुळे कोप्पर्थी आणि ओरवाकल या प्रमुख नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनआयसीडीसीनोड्सवर येणाऱ्या आणि जाणाऱ्या मालाची लॉजिस्टिक क्षमता सुधारणार आहे. नाशिक-तळेगाव दिघे हा भाग पुणे-नाशिक एक्सप्रेसवेच्या विकासाच्या दृष्टीने  देखील महत्वाचा आहे. एनआयसीडीसीने महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे हाती घेतल्या जाणाऱ्या प्रस्तावित नवीन एक्सप्रेसवेचा भाग म्हणून हा प्रकल्प असेल. या प्रकल्पामुळे सुधारित सुरक्षा आणि विनाव्यत्यय वाहतुकीसाठी  द्रुत-गती मार्ग उपलब्ध होणार आहे.  यामुळे प्रवासाचा वेळवाहतूक कोंडी आणि परिचालन खर्च कमी व्हायला मदत होईल.  महत्त्वाचे म्हणजेहा प्रकल्प या क्षेत्रातील पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याबरोबरच नाशिकअहिल्यानगरधाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांच्या सर्वांगीण आर्थिक विकासात मोलाचे योगदान देईल.

हा सहा पदरी ॲक्सेस-कंट्रोल्ड ग्रीनफिल्ड कॉरिडॉर 'क्लोज टोलिंग'  सुविधेसह असणार आहे.  सरासरी ताशी 60 कि.मी. आणि ताशी 100 कि.मी. डिझाइन स्पीडची अनुमती असेल. यामुळे प्रवासाचा एकूण वेळ अंदाजे 17 तासांपर्यंत कमी होईल (31 तासांवरून 45टक्केची घट)तसेच प्रवासी आणि मालवाहू  वाहनांसाठी अधिक सुरक्षितवेगवान आणि विनाव्यत्यय दळण वळणाची सुविधा उपलब्ध होईल.

 

या प्रकल्पामुळे सुमारे 251.06 लाख मनुष्य-दिवस प्रत्यक्ष रोजगार आणि 313.83 लाख मनुष्य-दिवसांचा अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होईल. या प्रस्तावित मार्गिकेच्या आसपासच्या परिसरात आर्थिक घडामोडी वाढल्यामुळे अतिरिक्त रोजगाराच्या संधी देखील निर्माण होतील.

नाशिक ते अक्कलकोट दरम्यानचा हा ग्रीनफिल्ड मार्ग वाढवण

 नाशिक ते अक्कलकोट दरम्यानचा हा ग्रीनफिल्ड मार्ग वाढवण बंदर इंटरचेंजजवळ दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेलानाशिकमध्ये राष्ट्रीय महामार्ग -60 (आडेगाव) च्या जंक्शनवर आग्रा-मुंबई कॉरिडॉरला आणि पांगरी (नाशिक जवळ) येथे समृद्धी महामार्गाला जोडण्याचे प्रस्तावित आहे. हा प्रस्तावित मार्ग पश्चिम किनारपट्टीपासून पूर्व किनारपट्टीपर्यंत थेट दळण वळण उपलब्ध करेल. चेन्नई बंदराच्या बाजूनेतिरुवल्लूररेणिगुंटाकडप्पा आणि कुर्नूलमार्गे चेन्नई ते हसापूर (महाराष्ट्र सीमा) पर्यंत (700 कि.मी. लांब) चार पदरी मार्गिकेचे काम प्रगतीपथावर आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाची महाराष्ट्रातील नाशिक-सोलापूर-अक्कलकोट या सहा पदरी ग्रीनफील्ड कॉरिडॉरला मंजुरी

 केंद्रीय मंत्रिमंडळाची महाराष्ट्रातील नाशिक-सोलापूर-अक्कलकोट या

सहा पदरी ग्रीनफील्ड कॉरिडॉरला मंजुरी

 

नवी दिल्ली दि. 31- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने आज महाराष्ट्रात 374 कि.मी. लांबीच्या सहा पदरी ग्रीनफिल्ड ॲक्सेस-कंट्रोल्ड  नाशिक-सोलापूर- अक्कलकोट मार्गिकेच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्त्वावर राबवल्या जाणाऱ्या या प्रकल्पाचा एकूण भांडवली खर्च 19,142 कोटी रुपये आहे.

नाशिकअहिल्यानगरसोलापूर या महत्त्वाच्या  शहरांसह पुढे कुर्नुलला जोडणारा हा प्रकल्प पायाभूत सुविधा पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहद्  आराखड्याच्या तत्त्वांतर्गत एकात्मिक वाहतूक पायाभूत सुविधा विकासाला गती देण्यासाठीचा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे.

नाशिक ते अक्कलकोट दरम्यानचा हा ग्रीनफिल्ड मार्ग वाढवण बंदर इंटरचेंजजवळ दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेलानाशिकमध्ये राष्ट्रीय महामार्ग -60 (आडेगाव) च्या जंक्शनवर आग्रा-मुंबई कॉरिडॉरला आणि पांगरी (नाशिक जवळ) येथे समृद्धी महामार्गाला जोडण्याचे प्रस्तावित आहे. हा प्रस्तावित मार्ग पश्चिम किनारपट्टीपासून पूर्व किनारपट्टीपर्यंत थेट दळण वळण उपलब्ध करेल. चेन्नई बंदराच्या बाजूनेतिरुवल्लूररेणिगुंटाकडप्पा आणि कुर्नूलमार्गे चेन्नई ते हसापूर (महाराष्ट्र सीमा) पर्यंत (700 कि.मी. लांब) चार पदरी मार्गिकेचे काम प्रगतीपथावर आहे.


अमरावती के अंबादेवी संस्थान को चिखलदरा स्थित महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडल की तीन एकड़ भूमि

 अमरावती के अंबादेवी संस्थान को चिखलदरा स्थित महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडल की तीन एकड़ भूमि

 

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की अध्यक्षता में आयोजित राज्य मंत्रिमंडल की बैठक में अमरावती जिले के मौजे चिखलदरा स्थित महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडल (एमटीडीसी) की 3 एकड़ 8 आर भूमि श्री अंबादेवी संस्थानअमरावती को देने की मंजूरी प्रदान की गई।

 

चिखलदरा क्षेत्र में पर्यटकों के लिए मूलभूत सुविधाएं विकसित करने के उद्देश्य से वर्ष 1975 में लगभग साढ़े सात एकड़ भूमि एमटीडीसी को आवंटित की गई थीलेकिन यह भूमि लंबे समय से उपयोग में नहीं लाई गई थी।

 

इस बीचचिखलदरा स्थित देवी प्वाइंट तथा विराट देवी मंदिर के प्रबंधन की जिम्मेदारी संभालने वाले श्री अंबादेवी संस्थानअमरावती ने इन दोनों तीर्थस्थलों के विकास हेतु शासन से भूमि की मांग की थी। इसके अनुरूपएमटीडीसी की लगभग 3 एकड़ 8 आर भूमि शासन द्वारा वापस लेकर श्री अंबादेवी संस्थान को निःशुल्क उपलब्ध कराने का निर्णय लिया गया है।

 

यह भूमि मंदिर संस्थान को भोगवटादार वर्ग–2 के रूप में प्रदान की जाएगी तथा इसका उपयोग केवल धार्मिक प्रयोजनों के लिए ही किया जा सकेगा।

 

Three Acres of MTDC Land at Chikhaldara to Amravati’s Ambadevi Sansthan

 

Three Acres of MTDC Land at Chikhaldara to Amravati’s Ambadevi Sansthan

Mumbai: The State Cabinet, at its meeting chaired by Chief Minister Devendra Fadnavis, has approved the allotment of 3 acres and 8 R of land belonging to the Maharashtra Tourism Development Corporation (MTDC) at Mouje Chikhaldara in Amravati district to the Shri Ambadevi Sansthan, Amravati.

The land in question is part of approximately 7.5 acres that was allotted to MTDC in 1975 for developing basic facilities for tourists at Chikhaldara. However, the land had remained unused.

Shri Ambadevi Sansthan, Amravati—which is responsible for the management of Devi Point and the Virat Devi Temple at Chikhaldara—had requested land from the government for the development of these religious sites. Accordingly, the government has decided to resume about 3 acres and 8 R of land from MTDC and allot it free of cost to Shri Ambadevi Sansthan.

The land will be allotted to the temple trust as Occupant Class–II, and it shall be used exclusively for religious purposes.

Featured post

Lakshvedhi