Tuesday, 2 December 2025

वर्सोवा मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सहा महिन्यांच्या प्रशिक्षण सत्राचे आयोजन

 वर्सोवा मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात

सहा महिन्यांच्या प्रशिक्षण सत्राचे आयोजन

 

मुंबईदि. 2 : मत्स्यव्यवसायाचा विकास आणि विस्तार साधण्यासाठी वर्सोवा येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सागरी मत्स्यव्यवसायनौकानयन तसेच सागरी डिझेल इंजिन देखभाल व परिचालन या सहा महिन्यांच्या 135 व्या सत्राचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण 1 जानेवारी 2026 ते 30 जून 2026 या कालावधीत होत असून पात्र मच्छिमारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या प्रशिक्षणात मत्स्यव्यवसाय नौकानयनाचे मूलतत्त्वसागरी डिझेल इंजिनचे भागत्यांची दुरुस्तीमासेमारीची आधुनिक साधने तसेच प्रात्यक्षिक सत्रांचा समावेश आहे. दारिद्ररेषेवरील प्रशिक्षणार्थींना प्रतिमहिना 450 रुपये तर दारिद्ररेषेवरील प्रशिक्षणार्थींना प्रतिमहिना 100 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

या प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी प्रशिक्षणार्थी क्रियाशील मच्छिमार व प्रकृतीने सुदृढ असणे आवश्यक असून त्याचे  वय 18 ते 35 वर्षे असावे. प्रशिक्षणार्थीना पोहता येणे बंधनकारक असून तो किमान इयत्ता चौथी उत्तीर्ण असावा. त्याला मासेमारीचा किमान दोन वर्षांचा अनुभव आणि बायोमेट्रिक/आधार कार्ड धारक असावा. त्याचप्रमाणे त्याच्याकडे मच्छिमार संस्थेची शिफारस असलेला परिपूर्ण अर्ज आणि दारिद्ररेषेवरील असल्यास संबंधित प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य आहे.

या प्रशिक्षण सत्राकरिता इच्छुक व पात्र मच्छिमारांनी विहित नमुन्यातील अर्ज संबंधित मच्छिमार सहकारी संस्थेच्या शिफारशीसह मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रपांडुरंग रामले मार्गतेरे गल्लीवर्सोवामुंबई-19 येथे 22 डिसेंबर 2025 पर्यंत सादर करावेतअसे मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी स. श. भालेराव यांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी  सचिन भालेरावमत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी  (9920201207) आणि जयहिंद सूर्यवंशीप्रशिक्षण निर्देशक (7507988552) यांच्याशी संपर्क साधावा.

0000

Monday, 1 December 2025

नवीन फौजदारी कायद्यांवरील प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन

 नवीन फौजदारी कायद्यांवरील प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन

मुंबईदि. २०: केंद्र शासनाने भारतीय न्याय संहिताभारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे नवीन फौजदारी कायदे १ जुलै २०२४ पासून देशभरात लागू करण्यात आले आहेत. या नवीन फौजदारी कायद्यांविषयी जनसामान्यांना माहिती व्हावीयाकरिता १९ ते २३ नोव्हेंबर २०२५ दरम्यान पाच दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन आझाद मैदान येथे करण्यात आले आहे.  

हे प्रदर्शन २३ नोव्हेंबर पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान खुले असणार आहे. प्रदर्शनामध्ये नवीन फौजदारी कायद्यांवर आधारित नियंत्रण कक्षन्याय सहाय्यक प्रयोगशाळा संचालनालयन्याय वैद्यक व विष शास्त्र विभागअभियोग संचालनालयनगर दिवाणी व सत्र न्यायालयउच्च न्यायालयमध्यवर्ती कारागृह यांचे स्टॉल्स आहेत. प्रदर्शनामध्ये प्रात्यक्षिकाद्वारे नाट्य रूपांतर पद्धतीने माहिती देण्यात आली आहे.

 या प्रदर्शनाला सर्व नागरिकांनी भेट द्यावी. विशेषतः विधि शाखेचे विद्यार्थीवकील यांनी भेट देत नवीन कायद्याविषयी माहिती जाणून घ्यावीअसे आवाहन गृह विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार सिंग यांनी केले आहे.


गिरणी कामगारांना हक्काचे घर देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा एकही पात्र गिरणी कामगार घरापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश

 गिरणी कामगारांना हक्काचे घर देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा

एकही पात्र गिरणी कामगार घरापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश

-         सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

 

मुंबईदि. २० : एकही पात्र गिरणी कामगार हक्काच्या घरापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

 

कोल्हापूर जिल्ह्यातील गिरणी कामगारांच्या घरांबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असिमकुमार गुप्ता यांच्यासह म्हाडानगर विकास विभागाचे अधिकारी व कोल्हापूर जिल्ह्यातील गिरणी कामगारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, शासनाने गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे अनेक गिरणी कामगारांना मुंबईत हक्काचे घर मिळाल आहे.  उर्वरित गिरणी कामगारांनाही  लवकर घरे मिळावीत,  एकही गिरणी कामगार घरापासून वंचित राहू नये. सेंच्युरीएनटीसी व इतर गिरण्यातील कामगारांनाही लवकर घरे मिळावित यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करून काम गतीने करण्यावर भर देण्याचे निर्देशही आरोग्यमंत्री आबिटकर यांनी दिले.

 

            ज्या  गिरणी कामगारांनी शेलू (कर्जत) आणि कारव (ठाणे) येथील गृह प्रकल्पात संमती दिली आहे त्याची पुन्हा एकदा खात्री करावी. पात्र गिरणी कामगारांना न्याय मिळावा यासाठी संमतीपत्रांची पुन्हा पडताळणी करावी. संबंधित विभागांना प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे आणि गिरणी कामगारांना घरे मिळण्यासाठी प्रशासनाने तातडीने व समन्वयाने काम करण्याचे आदेशही आरोग्यमंत्री आबिटकर यांनी दिले.

सीएमआरएस प्रमाणपत्र नंतर दहिसर – काशीमिरा मेट्रोला हिरवा कंदील

 सीएमआरएस प्रमाणपत्र नंतर दहिसर – काशीमिरा मेट्रोला हिरवा कंदील

दहिसर ते काशीमिरा या नव्या मेट्रो मार्गाला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे (सीएमआरएस) प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे. ते मिळाल्यानंतर डिसेंबर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या नवीन मेट्रो मार्गाचे लोकार्पण करण्याचे नियोजन करण्यात येईलअशी माहिती परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिली.


डिसेंबर -2026 अखेर मेट्रो सुभाषचंद्र बोस मैदानापर्यत..

 डिसेंबर -2026 अखेर मेट्रो सुभाषचंद्र बोस मैदानापर्यत..

            दहिसर - काशीमिरा मेट्रो डिसेंबर-2026 पर्यंत नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत विस्तारित होणार आहे. त्याबरोबरच वसई - विरार मेट्रो लाईनचे काम देखील लवकरच सुरू करण्यात येईल. त्यामुळे वसई - विरारपासून अंधेरी आणि तिथून विमानतळ स्थानक इंटरचेंजने थेट कुलाब्यापर्यंत मेट्रोची सेवा पुढील काही वर्षांमध्ये सुरू होऊ शकतेअशी आशा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी व्यक्त केली.

डिसेंबर -2026 अखेर मेट्रो सुभाषचंद्र बोस मैदानापर्यत..

 डिसेंबर -2026 अखेर मेट्रो सुभाषचंद्र बोस मैदानापर्यत..

            दहिसर - काशीमिरा मेट्रो डिसेंबर-2026 पर्यंत नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत विस्तारित होणार आहे. त्याबरोबरच वसई - विरार मेट्रो लाईनचे काम देखील लवकरच सुरू करण्यात येईल. त्यामुळे वसई - विरारपासून अंधेरी आणि तिथून विमानतळ स्थानक इंटरचेंजने थेट कुलाब्यापर्यंत मेट्रोची सेवा पुढील काही वर्षांमध्ये सुरू होऊ शकतेअशी आशा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी व्यक्त केली.

डिसेंबर -2026 अखेर मेट्रो सुभाषचंद्र बोस मैदानापर्यत..

 डिसेंबर -2026 अखेर मेट्रो सुभाषचंद्र बोस मैदानापर्यत..

            दहिसर - काशीमिरा मेट्रो डिसेंबर-2026 पर्यंत नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत विस्तारित होणार आहे. त्याबरोबरच वसई - विरार मेट्रो लाईनचे काम देखील लवकरच सुरू करण्यात येईल. त्यामुळे वसई - विरारपासून अंधेरी आणि तिथून विमानतळ स्थानक इंटरचेंजने थेट कुलाब्यापर्यंत मेट्रोची सेवा पुढील काही वर्षांमध्ये सुरू होऊ शकतेअशी आशा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी व्यक्त केली.

Featured post

Lakshvedhi