Thursday, 6 November 2025

वंदे मातरम् 150वर्ष पूर्ण देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही यासंदर्भात देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात कौशल्य विभागानेही राज्यस्तरीय तसेच तालुका स्तरावर समित्या स्थापन केल्या आहेत. राज्यभरात निबंध लेखन, परिसंवाद, प्रदर्शने आणि वक्तृत्व स्पर्धा आदि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्यावतीने राज्यभरात सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.


विविध सामाजिक संघटना, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तसेच समाजमाध्यमांवर या ऐतिहासिक सोहळ्याला व्यापक रूप देण्याचा कौशल्य आणि सांस्कृतिक विभागाचा प्रयत्न आहे. देशभक्ती जागृत करणाऱ्या सार्ध शताब्दी महोत्सवात सर्वानी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा,असे आवाहन मंत्री लोढा यांनी केले आहे.

‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्ष पूर्ण; मंत्रालयात निनादणार समूहगान

 ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्ष पूर्णमंत्रालयात निनादणार समूहगान

 

·         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सार्ध शताब्दी महोत्सवाला होणार सुरुवात

·         मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राज्यभरात विविध कार्यक्रम

 

मुंबई, दि. ६ : स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी व शहिदांना वंदन आणि देशप्रेमाचे प्रतीक असलेल्या 'वंदे मातरम्गीताला १५० वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त राष्ट्रभक्तीच्या भावनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात शुक्रवार, ७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९.४५ वाजता 'वंदे मातरम् चे समूहगान होणार आहे. पुढील वर्षभर याअंतर्गत सार्ध शताब्दी महोत्सवाच्या माध्यमाने राज्यभरात कौशल्य विकास विभागाच्या वतीने विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती कौशल्यरोजगारउद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

थोर कवी आणि तत्वज्ञ बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी १८७५ साली लिहिलेल्या 'वंदे मातरमया गीताला ७ नोव्हेंबर रोजी १५० वर्ष पूर्ण होत असल्याने मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यासंदर्भात मंत्री लोढा म्हणाले कीवंदे मातरम गीताला ऐतिहासिक पार्श्वभूमी असून देशप्रेम निर्माण करण्याचे सामर्थ्य या गीतात आहे. स्वातंत्र्य लढ्यातील शहिदांना अभिवादन आणि मातृभूमीला वंदन करणारे संस्कार या गीताच्या समूह गायनातून होणार असल्याने शासकीय स्तरावरून शैक्षणिक संस्था आणि शासकीय आस्थापनांमध्ये 'वंदे मातरम्गीताचे समूहगान आयोजित करण्याबाबत परिपत्रक आणि अध्यादेश जारी करण्यात आले असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले.

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही यासंदर्भात देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात कौशल्य विभागानेही राज्यस्तरीय तसेच तालुका स्तरावर समित्या स्थापन केल्या आहेत. राज्यभरात निबंध लेखनपरिसंवादप्रदर्शने आणि वक्तृत्व स्पर्धा आदि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्यावतीने राज्यभरात सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

विविध सामाजिक संघटनाशाळा आणि महाविद्यालयांमध्ये तसेच समाजमाध्यमांवर या ऐतिहासिक सोहळ्याला व्यापक रूप देण्याचा कौशल्य आणि सांस्कृतिक विभागाचा प्रयत्न आहे. देशभक्ती जागृत करणाऱ्या सार्ध शताब्दी महोत्सवात सर्वानी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा,असे आवाहन मंत्री लोढा यांनी केले आहे.

, चैत्यभूमी येथे अनुयायांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी मुंबई महापालिका, गृह विभाग व सामाजिक न्याय विभाग

 राज्यमंत्री आठवले म्हणालेचैत्यभूमी येथे अनुयायांची कोणतीही गैरसोय होऊ नयेयासाठी मुंबई महापालिकागृह विभाग व सामाजिक न्याय विभाग तसेच सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. प्रत्येक विभागाने आपल्याला दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडावी. गर्दी टाळण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारी घ्यावी. गर्दी नियंत्रणवाहतूक व्यवस्थापनसुरक्षा व्यवस्थापिण्याचे पाणीशौचालयआरोग्य सुविधाप्रकाश व्यवस्था आणि परिसर स्वच्छता या सर्व बाबींकडे विशेष लक्ष द्यावे. तसेच पोलीस प्रशासनाने अनुचित प्रकार टाळण्यासाठी सतर्क राहावेअसे राज्यमंत्री आठवले यांनी सांगितले.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांसाठी उत्तम दर्जाच्या सुविधा पुरवाव्यात

 महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांसाठी उत्तम दर्जाच्या सुविधा पुरवाव्यात

- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

 

मुंबईदि. ६ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे देशभरातून लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात. या अनुयायांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवाव्यातअसे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीबाबत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस माजी राज्यमंत्री अविनाश महातेकरमुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल  गोयलपोलीस महानिरीक्षक मनोज शर्मामुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त प्रशांत सपकाळेबार्टीचे महासंचालक सुनिल वारेसामाजिक न्याय विभागाचे सहसचिव सो. ना. बागुलतसेच भन्ते डॉ.राहुल बोधीमहापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

एम्स मधील नॅट केंद्राचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

 एम्स मधील नॅट केंद्राचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

 

नागपूर, दि. ६ : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) नागपूर येथील न्युक्लिक ॲसिड टेस्टिंग (एनएटी) सेंटरचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. अशा प्रकारची सुविधा असणारी एम्स ही मध्य भारतातील पहिलीच सरकारी आरोग्य संस्था आहे. याचवेळी गॅमा ब्लड इरॅडिएटर या उपकरणाचेही उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. एम्सच्या रक्त संक्रमण विभागातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

               एनएटी ही रक्तलाळ किंवा इतर नमुन्यातून रोगजंतू त्वरेने शोधणारी चाचणी आहे. या चाचणी द्वारे एचआयव्हीहेपेटायटिस बीहेपेटायटिस सी या सारख्या गंभीर आजारांचे निदान प्राथमिक अवस्थेतच होऊन संबंधित रुग्णावर तातडीने उपचार सुरू होऊ शकतात. अचूक निदान हे या चाचणीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. हे उपकरण रक्तपेढ्यांमध्ये लावल्यास गरजू रुग्णांना दूषित रक्त देण्याचा धोका जवळपास संपतो. गॅमा ब्लड इरॅडिएटरद्वारे अतिशय शुद्ध रक्त गरजू रुग्णांना मिळू शकते. रक्त संक्रमणातून होणारे आजार या उपकरणामुळे रोखले जातात.

 

              मुख्यमंत्री फडणवीस यांनी या दोन्ही उपकरणांची प्रशंसा करतानाच समाजातील गरजूंना त्याचा अधिकाधिक लाभ मिळावाअशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. प्रारंभी एम्सचे कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत जोशी यांनी मुख्यमंत्र्यांचे यावेळी स्वागत केले. अधिष्ठाता डॉ. मृणाल पाठकमहाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे प्रशासक डॉ. विंकी रुघवाणीएम्स मधील रक्त संक्रमण विभाग प्रमुख डॉ. सौम्या दासडॉ. पराग फुलझेलेडॉ. रौनक दुबे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

00000

सप्तसूत्री कातकरी उत्थान समितीच्या कामकाजाचा सविस्तर अहवाल सादर करावा

 सप्तसूत्री कातकरी उत्थान समितीच्या कामकाजाचा

 सविस्तर अहवाल सादर करावा

-         आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

 

मुंबईदि. 4 : राज्यातील कातकरी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी गठीत सप्तसूत्री कातकरी उत्थान समितीच्या कामकाजाचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिल्या.

 

कातकरी जमातीच्या विविध प्रश्नाच्या अनुषंगाने श्रमजीवी  संघटनेने विविध मागण्याबाबत निवेदन सादर केले होते. या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास मंत्री डॉ. वुईके यांनी मंत्रालयात आढावा बैठक  घेतली. यावेळी आमदार स्नेहा पंडित व संबंधित अधिकारी व संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच दुरदृश्य प्रणालीद्वारे कोकण विभागाचे विभागीय आयुक्त,  ठाणे पालघर जिल्हाधिकारी उपस्थित होते.

 

            मंत्री डॉ. अशोक वुईके म्हणालेया समितीमार्फत कातकरी समाजाच्या शिक्षणआरोग्यनिवासरोजगारउद्योग प्रशिक्षणजमीन हक्क व सामाजिक सक्षमीकरण या सातही घटकांवर विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना देऊन पुढील कालावधीसाठी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. तसेच लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचविण्यासाठी जिल्हास्तरीय समित्यांनी अधिक कार्यक्षमतेने काम करावेअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

ठाणे पालघर जिल्ह्यात कातकरी जमातीच्या लहान मुलांची खरेदी विक्रीबाल विवाहाच्या घटना ह्या गंभीर असून यासाठी पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलावीत. या मुलांना बालमजुरीवेठबिगारी यातून मुक्त करून त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिल्या.

 

कोलामकातकरी व माडिया जमातीसाठी असणाऱ्या केंद्राच्या योजनांच्या अंतर्गत घरकुलाचा लाभ तात्काळ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे. कातकरी जमातीला आधार कार्ड मिळवून देण्यासाठी ठाणे पालघर प्रशासनाने कॅम्पचे आयोजन करावे. तसेच कातकरी जमातीच्या सर्वांगीण विकासासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची सूचना ही मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केली

शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जीवन कौशल्ये महत्वाची

 शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जीवन कौशल्ये महत्वाची

- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

 

मुंबईदि. ४ : शालेय विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी जीवन कौशल्य महत्वाची असून त्यासाठी कार्यक्रम तयार करावा अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या. मंत्रालयात आज शासकीय शाळांमध्ये योग आणि जीवनकौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याबाबत बैठक झाली त्यावेळी मंत्री भुसे बोलत होते.

 

,,यावेळी शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजीत सिंह देओल यांच्यासह संबंधित अधिकारी आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

मुलांमध्ये चांगले विचार तयार होणे आणि चारित्र्य संपन्न विद्यार्थी घडवणे हा शिक्षणाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगून मंत्री भुसे म्हणाले कीयोगा हा जीवन कौशल्यचा एक भाग आहे. तसेच स्व संरक्षण आणि कलागुणांनाही वाव मिळाला पाहिजे. मुलांमध्ये या सर्व गोष्टींचा विकास करण्यासाठी कर्यक्रम तयार करावा. प्रायोगिक तत्वावर नाशिक जिल्ह्यातील काही शाळांमध्ये हा उपक्रम रबावण्यात यावा. तसेच येत्या आठ दिवसात या उपक्रमांचा आराखडा तयार करावाअशा सूचनाही मंत्री भुसे यांनी दिल्या.


Featured post

Lakshvedhi