Wednesday, 5 November 2025

मालवणी, अंबोजवाडी परिसरात शासकीय जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित ; १०००० चौ.मी. शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त

  

मालवणीअंबोजवाडी परिसरात शासकीय जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित ;

१०००० चौ.मी. शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त

 

मुंबई, दि. ४ : मुंबई उपनगर जिल्ह्यातील मौजे मालवणी क्षेत्रातील न.भू.क्र. २६७० व १९१६ या शासकीय जमिनीवर मोठ्या प्रमाणात झालेले अतिक्रमणतसेच संरक्षित कांदळवन (मॅग्रोव्ह) क्षेत्राला लागून असलेला भराव आणि कत्तल थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठी निष्कासन मोहीम राबवून २८० पेक्षा जास्त अतिक्रमण हटवून सुमारे १०००० चौ.मी. एवढी शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त करण्याची मोहिम यशस्वीरित्या पार पाडली आहे.

 

महाराष्ट्र शासनाने २००० पर्यतच्या झोपड्यांना संरक्षण दिले असून तद्नंतर पुन्हा २०११ पर्यंतच्या झोपडयांना सशुल्क संरक्षण दिले आहे. तथापियापुढेही झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये मोफत घर मिळवण्याच्या उद्देशाने शासकीय जमिनीवर अतिक्रमणे करण्याची प्रवृत्ती बळावलेली आहे. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या तक्रारी देखील प्राप्त होत होत्या. याची गंभीर दखल प्रशासनाने घेऊन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर व मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सर्व संबंधित यंत्रणांना कारवाईचे आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले होते,

 

त्या अनुषंगाने अपर जिल्हाधिकारी (अति/निष्का)पश्चिम उपनगरे गणेश मिसाळ आणि प्रभारी उपजिल्हाधिकारी (अति/निष्का) मालाड विनायक पाडवी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मालवणी पोलीस ठाणे यांच्या मदतीने दिनांक ३ व ४ नोव्हेंबर २०२५ रोजी ही मोहीम हाती घेतली.

 

या कारवाईत सुमारे २८० झोपड्या निष्कासित करण्यात आल्या असूनअंदाजे १०००० चौ.मी. झोपडीखालील क्षेत्र मोकळे करण्यात आले आहे. तसेचअली तलाव या नैसर्गिक तलावाच्या परिसरातील अतिक्रमणे निष्कासित करुन तलाव क्षेत्र अतिक्रमणमुक्त केले आहे. विशेष म्हणजे यापैकी काही अतिक्रमणे २ ते ३ मजल्यांची पक्की बांधकामे होती. अतिक्रमण निष्कासित करतानाची निष्कासन कामगारांची कामगिरी देखील उल्लेखनीय आहे. तसेच अतिक्रमणे निष्कासित करण्यासाठी प्रशासनाने प्रथमच सॅटेलाईट छायाचित्राची मदत घेऊन २०११ नंतरची अतिक्रमण शोधून अतिक्रमणे निष्कासित करण्याची कारवाई सुरु केली आहे. त्यामुळे यापुढे अतिक्रमणे केल्यास ती आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन निष्कासित केले जातील व या नुकसानीची सर्वस्वी जबाबदारी संबंधित अतिक्रमणधारक यांची राहील अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

 

शासकीय जमीन आणि संरक्षित वन क्षेत्रांचे अतिक्रमण कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही आणि अशा प्रकारची कारवाई भविष्यातही सातत्याने सुरू राहील, असे अपर अपर जिल्हाधिकारी (अति/निष्का) गणेश मिसाळ यांनी कळविले आहे.

राज्य विमा महामंडळाच्या सेवांचा लाभ पोहोचविण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करा

 राज्य विमा महामंडळाच्या सेवांचा लाभ पोहोचविण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करा

- कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर

मुंबईदि. ४ : राज्यातील कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) अंतर्गत सध्या सुमारे ४८ लाख कर्मचारी नोंदणीकृत आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांपर्यंत आरोग्यविषयक तसेच आर्थिक लाभांच्या सुविधा गतीने पोहचविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करावाअसे निर्देश कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या प्रादेशिक मंडळाच्या ११६ व्या बैठकीत कामगार मंत्री ॲड.फुंडकर बोलत होते.  बैठकीस कामगार विभागाचे सचिव कुंदन एसमहामंडळाचे आयुक्त रामजीलाल मीनातसेच प्रादेशिक मंडळाच्या सदस्या संगीता जैन आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर म्हणाले कीकर्मचाऱ्यांना त्यांच्या आरोग्याशी संबंधित सुविधाविमा लाभआर्थिक मदतसुरक्षा आणि विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती सहज उपलब्ध होण्यासाठी डिजिटल यंत्रणा विकसित करणे अत्यावश्यक आहे. एमआयडीसी क्षेत्रात कर्मचाऱ्यांसाठी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी स्वतंत्र रुग्णालयांची उभारणी करावी.  तसेच कर्करोगग्रस्त कर्मचाऱ्यांसाठी विशेष कर्करोग रुग्णालय सुरू करण्यासाठी  कार्यवाही करावी. रुग्णालयांमधील सर्व वैद्यकीय अहवाल ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक तांत्रिक प्रणाली उभारण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

तसेच ज्या ठिकाणी कर्मचारी उपलब्ध नाहीततेथे कंत्राटी पद्धतीने नियुक्त्या करून सेवा सुरळीत ठेवाव्यातअसेही ॲड. फुंडकर यांनी सांगितले. रुग्णसंख्या कमी असलेल्या रुग्णालयांचे विलिनीकरण  आणि २५ नवीन रुग्णालयांच्या बांधकामास गती देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

000

राज्य बालनाट्य संदर्भातील वृत्त खोडसाळपणाचे

 राज्य बालनाट्य संदर्भातील वृत्त खोडसाळपणाचे - सांस्कृतिक कार्य संचालनालय


जळगाव (प्रतिनिधी) : गेले अनेक दिवस बालरंगभूमी परिषदेची वेगवेगळ्या संस्था व व्यक्तींकडून माध्यमांमध्ये बदनामी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने सविस्तर खुलासा प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला आहे. बालरंगभूमी परिषदेने यापुर्वी जाहीर केलेल्या भूमिकेप्रमाणे राज्य बालनाट्य स्पर्धा हायजॅक केली नाही तर दि. ४ ऑगस्ट २०२५ च्या पत्राप्रमाणेच बालरंगभूमी परिषद स्थानिक समन्वय व इतर बाबींमध्ये कार्यरत असणार आहे. सदर बाबीच्या खुलासा राज्य सरकारने केला आहे. त्यामुळे बदनामी करणाऱ्यांचा खोडसाळपणा उघड झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या बालकलाकारांबाबतच्या सर्व उपक्रमांमध्ये बालरंगभूमी परिषद सदैव सहकार्य करण्यास तत्पर आहे. महाराष्ट्रातील बालकलाकारांसाठी बालरंगभूमी परिषद कायम स्वतःचे उपक्रम राबवित राहील आणि नव्या पिढीसाठी कलाक्षेत्रात नवी दिशा देण्यासाठी बालरंगभूमी परिषद स्वतःला कार्यरत ठेवेल.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाने काढलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, बालरंगभूमी परिषद ही अखिल भारतीय नाट्य परिषदेशी संलग्न असल्यामुळे बालकांच्या भावविश्वाशी व कलागुणांशी संबंधित काम या संस्थेमार्फत चालत असते. त्यामुळेच बालनाट्य स्पर्धेत बालरंगभूमीने विना मोबदला स्थानिक आयोजनात सहकार्य आणि समन्वय करावे असे बालरंगभूमी परिषदेबरोबरच्या बैठकीत ठरलेले होते. त्यानुसार ४ ऑगस्ट, २०२५ रोजी बालरंगभूमी परिषदेस तसे पत्रही देण्यात आले होते. या पत्रानुसार समन्वयक नावे सुचवणे, परीक्षक नावे सुचवणे याबरोबरच अन्य काही बाबीसाठी बालरंगभूमी परिषदेने सहकार्य करावे असे नमूद करण्यात आले होते. बालरंगभूमी परिषदेने परिक्षकांची व समन्वयांची नावे सुचवली असली तरी, अंतिम निवड सांस्कृतिक कार्य संचालनालयाची आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने बालरंगभूमी परिषदेस दिलेल्या पत्रामुळे काही माध्यमांमधून या पत्रांमधील काही मुद्द्यांवर आक्षेप घेण्यात आलेले होते. वास्तविक पाहता या पत्रामध्ये बालरंगभूमी परिषदेने स्पर्धा आयोजनात स्थानिक सहकार्य करावे आणि स्थानिक समन्वय करावा असे अभिप्रेत आहे, याचा अर्थ महाराष्ट्र राज्य हौशी बाल नाट्य स्पर्धा हायजॅक केली असा होत नाही.
या पत्रामध्ये स्पष्टपणे बालरंगभूमी परिषदेने स्थानिक आयोजन सहकार्याने समन्वय करावा असे नमूद करण्यात आलेले होते. मात्र निवेदनाद्वारे काही संस्थानी ही स्पर्धा संपूर्ण आयोजनाकरीता दिली आहे असे म्हटले होते. स्पष्ट करण्यात येते की, यामध्ये काहीही तथ्य नाही. कारण कोणत्याही संस्थेस शासनाने ही स्पर्धा संपूर्णपणे आयोजन करण्यासाठी दिलेली नाही. या स्पर्धेदरम्यान स्थानिक सहकार्य आणि समन्वय करण्यासाठी बालरंगभूमी ही शासनास पुर्वीपासून मदत करत होती व यापुढेही मदत करेल अशी अपेक्षा आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या निर्णयाचा काही संस्थांनी विपर्यास केला तसेच या सदंर्भात केलेल्या खुलासाचा नोंदणीकृत नसलेल्या एका रंगभूमी कलावंत संघटनेंने श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. तसेच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांने देखील श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते, हे सांस्कृतिक चळवळीसाठी बाधक आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाने कोणत्याही संस्थेच्या किंवा राजकीय पक्षाच्या / संघटनेच्या राजकीय दबावाखाली बळी पडून हा निर्णय घेतलेला नाही. गेली अनेक वर्षे सांस्कृतिक कार्य संचालनालय विविध संस्थांची मदत घेऊन विविध स्पर्धा आयोजित करीत असते. त्यामुळे स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी कोणीही गैरसमज पसरवू नये. सदरील स्पर्धा पूर्णपणे पूर्वीपासूनच शासनाच्या नियंत्रणाखाली आहे. कोणत्याही खाजगी संस्थेला याचे अधिकार दिलेले नाहीत. त्यामुळे पूर्वीपासून शासनाच्या वतीने स्पर्धेचे नियोजन करण्यात येत असते, तसे यावर्षी देखील होणार आहे. या वृत्ताचे स्वागत बालरंगभूमी परिषदेच्या महाराष्ट्रातील सर्व २७ शाखांचे पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.

उमेदवारांसाठी खर्च मर्यादा

 उमेदवारांसाठी खर्च मर्यादा

            नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांतील थेट अध्यक्ष आणि सदस्यपदाच्या उमेदवारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक खर्च मर्यादा वाढविली आहे. ती पुढीलप्रमाणे वर्ग नगरपरिषद: थेट अध्यक्ष- 15,00,000, सदस्य- 5,00,00

मतदान केंद्र आणि ईव्हीएम

 मतदान केंद्र आणि ईव्हीएम

नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी एकूण 1 कोटी 7 लाख 3 हजार 576 मतदार असून त्यासाठी सुमारे 13 हजार 355 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणुकांसाठी पुरेशा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात 13 हजार 726 कंट्रोल युनिट आणि 27 हजार 452 बॅलेट युनिटची उपलब्धता केली आहे. अन्य निवडणुकांच्यादृष्टीनेदेखील पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.

नामनिर्देशनपत्रासाठी संकेतस्थळ

 नामनिर्देशनपत्रासाठी संकेतस्थळ

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांतील उमेदवारांना नामनिर्देशनपत्र व शपथपत्र दाखल करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने https://mahasecelec.in हे संकेतस्थळ विकसित केले आहे. त्यावर नोंदणी करून नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करता येईल. एका नोंदणीद्वारे  संबंधित प्रभागात एका उमेदवारास चार नामनिर्देशनपत्र दाखल करता येऊ शकतील. संकेतस्थळावर संपूर्ण नामनिर्देशनपत्र व शपथपत्र भरल्यानंतर त्याची मुद्रित प्रत काढून त्यावर स्वाक्षरी करावी लागेल. त्यानंतर ती प्रत विहित मुदतीत संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दाखल करणे आवश्यक राहील.

जात वैधता प्रमाणपत्राचा पुरावा

 जात वैधता प्रमाणपत्राचा पुरावा

राखीव प्रभागातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहेपरंतु जातवैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्यासाठी पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची पोहोच पावती नामनिर्देशनपत्रासोबत सादर करण्याची मुभा देण्यासाठी शासनाने संबंधित अधिनियमात दुरुस्ती केली आहे. मात्र, असा उमेदवार निवडून आल्याचे घोषित झाल्याच्या दिनांकापासून त्याला सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहेअन्यथा त्यांची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द करण्याची संबंधित अधिनियमात तरतूद करण्यात आली आहेअसेही वाघमारे यांनी सांगितले.

Featured post

Lakshvedhi