Saturday, 16 August 2025

सणासुदीच्या कालावधीमध्ये नागरिकांना निर्भेळ सकस व शुद्ध अन्न उपलब्ध करून देण्याला

 सचिव धीरज कुमार म्हणाले कीसणासुदीच्या कालावधीमध्ये नागरिकांना निर्भेळ सकस व शुद्ध अन्न उपलब्ध करून देण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही याची दक्षता अन्न व्यावसायिकांनी घ्यावी. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून जनजागृती, प्रशिक्षण अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. राज्यात पुणेनागपूर, छत्रपती संभाजीनगर तसेच इतर शहरातही अशाप्रकारचे प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता आहे. अन्न व्यवसायिकांनी आपल्यामध्ये असलेल्या कल्पनाविचार आहेत ते कृतीत आणावे. अन्न व औषध प्रशासन मंत्री व राज्यमंत्री यांच्या निर्देशानुसार विभागाने पुढे येऊन काम करावे व अंमलबजावणीमध्ये अग्रस्थानी राहिले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याची शासनाची भूमिका

 गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याची शासनाची भूमिका

- मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

मुंबईदि. १३ : गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याची शासनाची भूमिका असून प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वते प्रयत्न केले जातील. या प्रकल्पग्रस्तांना नियमाप्रमाणे सर्व लाभ देण्यात यावेत अशा सूचना मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी दिल्या. मंत्रालयात आज गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांसदर्भात आयोजित बैठकीवेळी राज्यमंत्री ॲड. जयस्वाल बोलत होते.

 यावेळी पुनर्वसन उपसचिव श्री. बागडेगोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता जयंत गवळी यांच्यासह संबंधित अधिकारीप्रकल्पग्रस्त उपस्थित होते. तर नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्रीजिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकरभंडारा जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

 गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांना शासनाच्या नियमाप्रमाणे मिळणारे मात्र प्रलंबित असेलेले सर्व लाभ लवकरात लवकर देण्याच्या सूचना देऊन राज्यमंत्री ॲड. जयस्वाल म्हणाले कीधरणग्रस्तांचे दाखले देण्याची प्रक्रिया गतीने करावी. वाढीव कुटुंबांचा लाभ नियमानुसार देण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. पुनर्वसीत गावातील नागरी सुविधा पूर्ण कराव्यात. तसेच पर्यटनमासेमारी आणि गाळपेरीबाबत स्थानिक प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देण्याचा प्रस्ताव तयार करावा अशा सूचनाही राज्यमंत्री ॲड. जयस्वाल यांनी दिल्या.

बालविवाह प्रथा समुळ नष्ट करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणार

 बालविवाह प्रथा समुळ नष्ट करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणार

- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 

मुंबई, दि. 13 : बालविवाह प्रथा समुळ नष्ट करण्याच्या दृष्टीने शासन धोरणात्मक निर्णय घेणार आहे. बालविवाह प्रथेमुळे शाळेतून मुलींचे प्रमाण कमी होणेकमी वयात गर्भधारणा आणि कुपोषण अशा समस्या वाढतात या सर्व दुष्परिणामांना आळा बसण्यासाठी बालिका पंचायतच्या सहभागाने बालप्रथेविरोधात अभियान राबविणे गरजेचे असल्याचे मत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केले.

बालविवाह प्रथा राज्यातून समुळ नष्ट करण्याच्या दृष्टीने आज मंत्रालयात युनिसेफ संस्थेसोबत चर्चा करण्यात आली. यावेळी युनिसेफचे राज्याचे मुख्य अधिकारी संजय सिंगबालसंरक्षण तज्ज्ञ अल्पा वोरान्युट्रीशीयन तज्ज्ञ राजी नायर उपस्थित होते.

मंत्री तटकरे म्हणाल्या कीबालकांच्या सुरक्षेसाठी आणि बालविवाहास प्रतिबंध घालण्यासाठी मुलींच्या सहभागातून बालिका पंचायत राबविण्यात येते. याचबरोबर मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे यासाठी लेक लाडकी योजना राबविण्यात येत असूनया योजनेचे अनुदान थेट शाळेचे शुल्क भरण्यासाठी देता येईल का यासंदर्भात्‍ सकारात्मक विचार करण्यात येत आहे. जेणेकरून या योजनेचा थेट संबंधित लाभार्थी मुलींना फायदा होईल आणि शिक्षणासाठी त्यांना प्रोत्साहन मिळेल.

इतर राज्यापेक्षा महाराष्ट्रात बाल विवाहाचे प्रमाण कमी असूनयासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविले जातात. ज्या राज्यात बालविवाह रोखण्यासाठी अभियान यशस्वी ठरले आहे अशा राज्यांचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.  बालविवाह प्रथा समुळ नष्ट केल्यासकिशोरवयीन मुलींचे सक्षमीकरणउच्च शिक्षणात त्यांचे वाढते प्रमाणकमी वयातील गर्भधारणेस आळा बसणे तसेच कुपोषण रोखण्यास सहकार्य लाभणार आहे.

अमेरिकेने टेरिफ वाढ केल्याच्या पार्श्वभूमीवर मत्स्योत्पादनांसाठी नवीन बाजारपेठांकडे लक्ष केंद्रीत करावे

 अमेरिकेने टेरिफ वाढ केल्याच्या पार्श्वभूमीवर मत्स्योत्पादनांसाठी

नवीन बाजारपेठांकडे लक्ष केंद्रीत करावे

देशांतर्गत बाजारातही मत्स्य विक्री वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत

- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबईदि. 13 : अमेरिकेने भारतीय उत्पादनांवर मोठ्या प्रमाणावर टेरिफ वाढवले आहे. त्यामुळे भारतीय उत्पादने अमेरिकेत महाग होऊन त्याची मागणी घटण्याची शक्यता आहे. देशातून मोठ्या प्रमाणावर मत्स्योत्पादन अमेरिकेत निर्यात केले जाते. या टेरिफ वाढीच्या पार्श्वभूमीवर मत्स्योत्पादनासाठी नवनवीन बाजारपेठांकडे लक्ष केंद्रीत करावे. तसेच देशांतर्गत बाजारातही मत्स्यविक्री आणि मत्स्य पुरवठा वाढण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.

 अमेरिकेने केलेल्या टेरीफ वाढीचा मत्स्योद्योगआंबा आणि काजू निर्यातीवर होणाऱ्या परिणांमाविषयी आढावा घेण्यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी मंत्री राणे यांनी सूचना दिल्या. या बैठकीस मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. एन रामास्वामीमत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडेमत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश पाठकमहाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 टेरीफ वाढीमुळे होणाऱ्या परिणामांचा विचार करून सागरी उत्पादन विकास प्राधिकरणाची बैठक आयोजित करावी असे सूचित करुन मंत्री राणे म्हणाले कीइतर देशातील बाजारांचा विचार करत असतानाच देशांतर्गत बाजारातही जास्तीत जास्त मासळी विशेषतः कोळंबी विक्रीसाठी कशी आणता येईल. यासाठी शासनस्तरावरून कशा स्वरुपे योजना आणता येईल. तसेच निर्यातदारांना कशा प्रकारे मदत करता येईल याचा प्रारुप आराखडा सादर करण्यात यावा. तसेच देशांतर्गत बाजारपेठेत मासळी पुरवठा वाढवण्याविषयी या व्यवसायातील खासगी संस्थांशी बैठक आयोजित करावी. आंबा निर्यातीसोबतच देशातील महत्वाच्या शहरांमध्ये जसे दिल्लीबेंगलोरग्वाल्हेरजबलपूर येथे आंबा महोत्सवाचे आयोजन करून आंब्याची देशांतर्गत मागणी वाढवण्यासाठी प्रयत्न करावेतअशा सूचना मंत्री राणे यांनी यावेळी दिल्या.

राज्यात 'अपना भांडार'च्या माध्यमातून खरेदी विक्रीची साखळी उभारणार

 राज्यात 'अपना भांडार'च्या माध्यमातून

खरेदी विक्रीची साखळी उभारणार

- पणन मंत्री जयकुमार रावल

 

मुंबईदि. 13 : राज्यात महाराष्ट्र सहकारी ग्राहक महासंघाच्या माध्यमातून शेतकरी आणि ग्राहक या दोन्ही घटकांचा लाभ होईलया उद्देशाने 'अपना भांडारया नावाने बहुउद्देशीय ग्राहक भांडारे चालवली जातात. भविष्यात सर्व जिल्ह्यांमध्ये अशी भांडारे उभारून खरेदी-विक्रीची साखळी उभारण्यात येईलअसे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

महाराष्ट्र सहकारी ग्राहक महासंघाच्या कामकाजाचा मंत्री श्री.रावल यांनी मुंबईतील महासंघाच्या कार्यालयात जाऊन आढावा घेतला. यावेळी महासंघाच्या प्राधिकृत समितीचे अध्यक्ष विठ्ठलराव भोसलेकार्यकारी संचालक विकास रसाळमहासंघाचे संचालक जयसिंग गिरासेसंचालक गोकुळ परदेशी यांच्यासह संबंधित पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.

पणन मंत्री श्री.रावल म्हणालेमहासंघाच्या मालकीच्या जागांचा पुनर्विकास करुन त्या सुस्थितीत करुन घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे जेथे भाडेतत्वावर जागा आहेतत्यांची मालकी मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत. जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी कार्यालयकृषी उत्पन्न बाजार समितीबचत गटांसाठी उभारले जाणारे मॉल्स आदी ठिकाणी अपना भांडार’ सुरू करण्यात यावेत तसेच याठिकाणी महिला बचत गटांच्या उत्पादनांना सहभागी करुन घ्यावे. राज्यात ग्राहक महासंघाच्या माध्यमातून खरेदी विक्रीची प्रभावी साखळी तयार करून राज्यात एक ब्रँड निर्माण करावाअशी सूचनाही त्यांनी केली.

ग्राहक भांडारांचा सप्टेंबरमध्ये मेळावा

राज्यातील ग्राहक भांडारांना ऊर्जितावस्था मिळावीज्या संस्था उत्कृष्ट काम करीत आहेतत्यांचे काम इतरांना प्रेरणादायी ठरावेया उद्देशाने सर्व ग्राहक भांडारांचा मेळावा सप्टेंबर महिन्यात नाशिक येथे आयोजित करण्यात यावाअसे निर्देश पणन मंत्री श्री.रावल यांनी महासंघाला दिले. यामध्ये इतर राज्यांमध्ये चांगले काम करणाऱ्या संस्थांचेइ कॉमर्स जाणणाऱ्या व्यक्तीसंस्थांचेआधुनिक तंत्रज्ञानाचे सहकार्य घ्याअसेही त्यांनी सांगितले.

            प्रारंभी कार्यकारी संचालक श्री. रसाळ यांनी महासंघाच्या कार्याची सविस्तर माहिती दिली

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेसाठी तालुकास्तरावर समिती नेमावी

 राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेसाठी

तालुकास्तरावर समिती नेमावी

- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

·         शाळेच्या मुख्याध्यापकांनी या योजनेचे प्रस्ताव स्वतः पाठवण्याची कार्यवाही करावी

 

मुंबईदि. 12 : राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेच्या पात्रतेस मान्यता देणारी सध्याची जिल्हास्तरीय समिती ऐवजी तालुकास्तरावर समिती स्थापन करावी. जेणेकरून या योजनेचे प्रस्ताव लवकर मार्गी लागतील. तसेच संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी असे प्रस्ताव स्वतः तयार करून पाठवावेतअसे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

मंत्रालयात या विषयी झालेल्या बैठकीत मंत्री श्री.भुसे बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरप्रधान सचिव रणजित सिंह देओलसंचालक कृष्णकुमार पाटीलउपसचिव तुषार महाजन यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदानाच्या योजनेत सुटसुटीतपणा असावा असे सांगून मंत्री श्री.भुसे म्हणाले कीयासाठी कमीत कमी कागदपत्रांची मागणी असावी. हे सानुग्रह अनुदान सध्या असलेल्या रकमेऐवजी वाढवून देण्याचा प्रस्ताव तीन आठवड्यात सादर करावा. या योजनेचा निधी वर्षाच्या सुरुवातीस मिळण्याविषयीच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करावा. गडचिरोली आणि नाशिक जिल्ह्यात विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू आणि काही विद्यार्थी जखमी झाले आहेतया प्रकरणाचे प्रस्ताव तातडीने मागवून घ्यावेतअशा सूचना मंत्री श्री.भुसे यांनी दिल्या.

०००००

. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार

 डॉ. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार

राज्यस्तरीय ग्रंथालय कार्यकर्ता (ग्रंथमित्र)

१) श्री. धनंजय वसंतराव पवारअध्यक्षश्री. गुणवंतराव रामचंद्र पाटील सार्वजनिक वाचनालयहासाळापो. बुधोडाता. औसाजि. लातूर

राज्यस्तरीय ग्रंथालय सेवक (ग्रंथमित्र)

१) श्रीमती श्रध्दा अशोक आमडेकरग्रंथपालश्री सदगुरु लोकमान्य वाचनालय देवरुखतालुका संगमेश्वरजिल्हा-रत्नागिरी

विभागस्तरीय पुरस्कार

१) अमरावती : श्री. रामभाऊ पंढरी मुळेसचिवछत्रपती शाहू सार्वजनिक वाचनालयमु. पो. हनुमाननगरअकोलाता.जि. अकोला.

२) छत्रपती संभाजीनगर :  श्री. खंडेराव साहेबराव सरनाईकअध्यक्षश्री संत ज्ञानेश्वर सार्वजनिक वाचनालयकेंद्रा बु.ता. सेनगावजि. हिंगोली.

३) नाशिक : श्री. राहुलकुमार मालजी महिरेअध्यक्षबौध्दवासी शांताई महिरे वाचनालयआखाडेमु.पो. आखाडेता. साक्रीजि.धुळे

४) पुणे : श्री. दत्तात्रय सखाराम देशपांडेअध्यक्षज्ञानदा मोफत वाचनालयजरळीता. गडहिंग्लजजि. कोल्हापूर

५) मुंबई : श्री. सुभाष सीताराम कुळकर्णीअध्यक्षप्रा. माणिकराव कीर्तने वाचनालय वाशीनवी मुंबई

डॉ. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय सेवक पुरस्कार

१) अमरावती : श्री. अनंत श्रीराम सातवग्रंथपालसरस्वती वाचनालयपातुर्डा बु.ता.संग्रामपूरजि.बुलडाणा

२) छत्रपती संभाजीनगर : श्री. सूर्यकांत कमलाकर जाधवग्रंथपालविवेकानंद वाचनालयआलमलाता. औसाजि. लातूर

३)नागपूर : श्री. खेमचंद अंताराम डोंगरवारग्रंथपाल, श्रीमती सोनाबाई सितारामजी खुणे सार्वजनिक वाचनालयनवेगाव / बांधता.अर्जुनी मोरगावजि. गोंदिया

४)नाशिक : श्री. चिंतामण संतोष उगलमुगलेग्रंथपालओंकार नगर सार्वजनिक वाचनालयओंकारनगरपेठ रोडता.जि. नाशिक

५)पुणे : श्रीमती रुपाली यशवंत मुळेग्रंथपालश्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालयसातारा.

६)मुंबई : श्री. संजय काशिनाथ शिंदेग्रंथपालनगर वाचन मंदिरमालवणजि. सिंधुदुर्ग

ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावाया ग्रंथालयांकडून राज्यातील जनतेला अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाकडून दरवर्षी उत्कृष्ट ग्रंथालयांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

या समयी पुरस्कार प्राप्त परिचय पुस्तिकेचे व राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या सन 2023 च्या मराठी ग्रंथसूचीचे प्रकाशन मान्यवराच्या हस्ते करण्यात आले.

Featured post

Lakshvedhi