Thursday, 14 August 2025

देशातील पारंपरिक खेळांना प्रोत्साहन दिल्यास

 क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे म्हणाले की,  देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात योग दिवस सुरू करून देशी क्रीडा प्रकार जगभरात पोहोचवला. पारंपरिक देशी खेळांना त्यांनी विशेष महत्त्व दिले आहे. देशातील पारंपरिक खेळांना प्रोत्साहन दिल्यास सध्याच्या आभासी आणि मोबाईलच्या वापराकडे वळलेल्या तरुणाईला वेळीच आवरता येईल. यासाठी देशी खेळ आणि खेळाडूंना शासकीय स्तरावर मान्यता देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर प्राथमिक शाळांमध्ये लंगडीदोरीच्या उड्यालगोरी यासारख्या खेळांना अनिवार्य करण्यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल. तसेच दरवर्षी शासकीय स्तरावर पारंपरिक देशी खेळांच्या स्पर्धा भरविण्यात येतील, असे मंत्री अॅड. कोकाटे यांनी यावेळी सांगितले. 

ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांनी प्रतिकूल परिस्थितीत ऑलिम्पिक पदक मिळवून देशाचे नाव उज्ज्वल

 मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणालेमहाराष्ट्राचे सुपुत्र कुस्तीपटू ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांनी प्रतिकूल परिस्थितीत ऑलिम्पिक पदक मिळवून देशाचे नाव उज्ज्वल केले. या महाराष्ट्राच्या सुपुत्राच्या नावाने दरवर्षी पारंपरिक खेळांच्या स्पर्धा शासकीय पातळीवर झाल्या पाहिजेत. खेळाडूंना शासकीय सवलती मिळाल्या पाहिजेत, असे त्यांनी यावेळी सांगितले.

कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक देशी क्रीडा महाकुंभचे कुर्ला येथील जामसासाहेब मुकादम व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण केंद्राच्या पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर देशी खेळांच्या मैदानावर आयोजन करण्यात आले आहे

पारंपरिक देशी खेळाडूंना शासकीय नियुक्त्यांबाबत प्रयत्न करणार

  पारंपरिक देशी खेळाडूंना शासकीय नियुक्त्यांबाबत प्रयत्न करणार

- क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे

दरवर्षी पारंपरिक खेळांच्या स्पर्धा शासकीय पातळीवर झाल्या पाहिजेत

मंत्री मंगलप्रभात लोढा

ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक देशी क्रीडा महाकुंभ उद्घाटन

 

मुंबई, दि. १३ : पारंपरिक देशी खेळाडूंना शिव छत्रपती पुरस्कारशासकीय लाभ आणि नियुक्त्यांबाबत शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी कुर्ला येथे ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक देशी क्रीडा महाकुंभ उद्घाटन कार्यक्रमात दिले. ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या नावाने दरवर्षी पारंपरिक खेळांच्या स्पर्धा शासकीय पातळीवर झाल्या पाहिजेत, असे मत कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले.

मंत्री ॲड.कोकाटे आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत या क्रीडा महाकुंभचे उद्घाटन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर देशी खेळांच्या मैदानाचे लोकार्पण करण्यात आले. भारतीय परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या देशी मैदानी खेळांच्या खेळाडूंना शासकीय लाभ मिळण्याबाबतची मागणी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली होती.

स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रशासनाची जय्यत तयारी; मंत्रालयात ध्वजारोहण समारंभाची रंगीत तालीम

 स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रशासनाची जय्यत तयारी;

मंत्रालयात ध्वजारोहण समारंभाची रंगीत तालीम

 

मुंबईदि. 13 : भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मंत्रालयात ध्वजारोहण समारंभाची सामान्य प्रशासन (राजशिष्टाचार) विभागाने जय्यत तयारी केली आहे. राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9.05 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरा होणार आहे. यानिमित्त आज राजशिष्टाचार विभागाचे अवर सचिव सुनील सोनार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन रंगीत तालीम पार पडली.

यावेळी पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढेमुख्यमंत्री सुरक्षाचे सहायक पोलीस आयुक्त मिलिंद कुरडेश्रीनिवास घाडगे यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारीसार्वजनिक बांधकामपोलीस दलातील अधिकारीकर्मचारी उपस्थित होते.

श्री. सोनार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर ध्वजाला सलामी देण्यात आली. संचलनात मुंबई पोलीसराज्य राखीव पोलीस दलमध्यप्रदेश पोलीस दल आणि घोडेस्वार सामील झाले होते.

गणेशोत्सवाला राज्य शासनाने राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे

 मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेगणेशोत्सवाला राज्य शासनाने राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे राज्य शासनातर्फे हा महोत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विस्तृत नियोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सव मंडळांना मागील वर्षी दिलेल्या सर्व सवलती याही वर्षी कायम ठेवण्यात येतील. हा उत्सव साजरा करताना कायद्याचे योग्य पालन करावे. ईद ए मिलाद सणही गणेशोत्सवा दरम्यान येत असल्याने समन्वयाने धार्मिक सौहार्दता ठेवत कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडणार नाहीयाची दक्षता घेण्यात यावी. गणेशोत्सवादरम्यान ध्वनिक्षेपकांना दिलेल्या परवानगीचे दिवस वाढविण्यासाठी न्यायालयाच्या अधीन राहून सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यालयांसाठी मालमत्ता कराची आकारणी करताना या कार्यालयांचा व्यावसायिक कारणासाठी उपयोग होत नसल्याबाबत मंडळांनी प्रशासनाला लेखी दिल्यासअशा मंडळांच्या कार्यालयांवर मालमत्ता कराची आकारणी करण्यात येणार नाहीअसा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी

 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी

'ऑपरेशन सिंदूरआणि 'स्वदेशीविषयी जनजागृती करावी

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शांतता व उत्साहपूर्ण वातावरणात गणेशोत्सव साजरा करावा

गणेशोत्सव निमित्त कायदा व सुव्यवस्था बैठक

मुंबईदि. 13 : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये भारताने जगाला ऑपरेशन सिंदूरद्वारे दाखविलेली शक्ती आणि स्वदेशी वस्तूंच्या वापराविषयी जनजागृती करावी. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनासोबत समन्वय ठेवून हा गणेशोत्सव शांतता व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करावाअसे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करीत ऑपरेशन सिंदूरवर आधारित देखावे हे जवानांसाठी समर्पित असण्याची अपेक्षाही व्यक्त केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सवा दरम्यान गणेश भक्तांना कुठल्याही प्रकारे अडचणी येणार नाहीतत्यापद्धतीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या. सार्वजनिक गणेशोत्सव निमित्त कायदा व सुव्यवस्था बैठकीचे आयोजन सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस आढावा घेताना बोलत होते. बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवारकौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढागृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरगृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदममुख्य सचिव राजेश कुमार उपस्थित होते.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाप्रमाणे मूर्तीकरांनाही सलग पाच वर्ष परवानगी देण्याचे निर्देश देत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेमूर्तीकारांनी या परवान्यांचे दरवर्षी नूतनीकरण करावे. परवानगीसाठी महापालिके मार्फत सुरू करण्यात आलेल्या संगणकीय प्रणालीवर आधारित एक खिडकी योजनेचा लाभ घेण्यात यावा. गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलावांची संख्या आणि उंच मूर्तींचे खोल समुद्रात विसर्जनासाठी बोटींची संख्याही समुद्रकिनारी वाढविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या

राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासनाच्या दिनांक ५ डिसेंबर, १९९१ आणि दिनांक ११ मार्च, १९९८ च्या

 राज्यातील सर्व सार्वजनिक व शासकीय इमारतीवर (ग्रामीण भागात सुध्दा तसेच ऐतिहासिक महत्त्वाच्या किल्ल्यांवर (उदा. रायगड, सिंहगड, शिवनेरी, पुरंदर, वसई, प्रतापगड, दौलताबाद, सिताबडी) राष्ट्रध्वज उभारण्यात यावा.


राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासनाच्या दिनांक ५ डिसेंबर, १९९१ आणि दिनांक ११ मार्च, १९९८ च्या परिपत्रकान्वये दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. ध्वजारोहणाची रंगीत तालीम घेतली जाईल याचीही दक्षता घ्यावी, राष्ट्रध्वज चांगल्या स्थितीत असल्याची व सूर्यास्तास उतरवला जाईल याचीही दक्षता घेण्यात यावी.


स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद/ पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नींना व आई-वडीलांना, शौर्य पुरस्कार विजेत्यांना, स्थानिक राजकीय पक्षांचे प्रमुख, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती, स्थानिक शासकीय अधिकारी आणि प्रमुख नागरिक यांना मुख्य शासकीय कार्यक्रमास निमंत्रित करावे.

Featured post

Lakshvedhi