Wednesday, 13 August 2025

गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याची शासनाची भूमिका

 गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याची शासनाची भूमिका

- मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

मुंबईदि. १३ : गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याची शासनाची भूमिका असून प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वते प्रयत्न केले जातील. या प्रकल्पग्रस्तांना नियमाप्रमाणे सर्व लाभ देण्यात यावेत अशा सूचना मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी दिल्या. मंत्रालयात आज गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांसदर्भात आयोजित बैठकीवेळी राज्यमंत्री ॲड. जयस्वाल बोलत होते.

 यावेळी पुनर्वसन उपसचिव श्री. बागडेगोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता जयंत गवळी यांच्यासह संबंधित अधिकारीप्रकल्पग्रस्त उपस्थित होते. तर नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्रीजिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकरभंडारा जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

 गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांना शासनाच्या नियमाप्रमाणे मिळणारे मात्र प्रलंबित असेलेले सर्व लाभ लवकरात लवकर देण्याच्या सूचना देऊन राज्यमंत्री ॲड. जयस्वाल म्हणाले कीधरणग्रस्तांचे दाखले देण्याची प्रक्रिया गतीने करावी. वाढीव कुटुंबांचा लाभ नियमानुसार देण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. पुनर्वसीत गावातील नागरी सुविधा पूर्ण कराव्यात. तसेच पर्यटनमासेमारी आणि गाळपेरीबाबत स्थानिक प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देण्याचा प्रस्ताव तयार करावा अशा सूचनाही राज्यमंत्री ॲड. जयस्वाल यांनी दिल्या.

बालविवाह प्रथा समुळ नष्ट करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणार

 बालविवाह प्रथा समुळ नष्ट करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणार

- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 

मुंबई, दि. 13 : बालविवाह प्रथा समुळ नष्ट करण्याच्या दृष्टीने शासन धोरणात्मक निर्णय घेणार आहे. बालविवाह प्रथेमुळे शाळेतून मुलींचे प्रमाण कमी होणेकमी वयात गर्भधारणा आणि कुपोषण अशा समस्या वाढतात या सर्व दुष्परिणामांना आळा बसण्यासाठी बालिका पंचायतच्या सहभागाने बालप्रथेविरोधात अभियान राबविणे गरजेचे असल्याचे मत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केले.

बालविवाह प्रथा राज्यातून समुळ नष्ट करण्याच्या दृष्टीने आज मंत्रालयात युनिसेफ संस्थेसोबत चर्चा करण्यात आली. यावेळी युनिसेफचे राज्याचे मुख्य अधिकारी संजय सिंगबालसंरक्षण तज्ज्ञ अल्पा वोरान्युट्रीशीयन तज्ज्ञ राजी नायर उपस्थित होते.

मंत्री तटकरे म्हणाल्या कीबालकांच्या सुरक्षेसाठी आणि बालविवाहास प्रतिबंध घालण्यासाठी मुलींच्या सहभागातून बालिका पंचायत राबविण्यात येते. याचबरोबर मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे यासाठी लेक लाडकी योजना राबविण्यात येत असूनया योजनेचे अनुदान थेट शाळेचे शुल्क भरण्यासाठी देता येईल का यासंदर्भात्‍ सकारात्मक विचार करण्यात येत आहे. जेणेकरून या योजनेचा थेट संबंधित लाभार्थी मुलींना फायदा होईल आणि शिक्षणासाठी त्यांना प्रोत्साहन मिळेल.

इतर राज्यापेक्षा महाराष्ट्रात बाल विवाहाचे प्रमाण कमी असूनयासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविले जातात. ज्या राज्यात बालविवाह रोखण्यासाठी अभियान यशस्वी ठरले आहे अशा राज्यांचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.  बालविवाह प्रथा समुळ नष्ट केल्यासकिशोरवयीन मुलींचे सक्षमीकरणउच्च शिक्षणात त्यांचे वाढते प्रमाणकमी वयातील गर्भधारणेस आळा बसणे तसेच कुपोषण रोखण्यास सहकार्य लाभणार आहे.

रायगड जिल्ह्यातील बसस्थानकांच्या नुतनीकरणाची कामे गतीने पूर्ण करावे

 रायगड जिल्ह्यातील बसस्थानकांच्या नुतनीकरणाची कामे

गतीने पूर्ण करावे

- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई दि. १३ : रायगड येथील रोहाम्हसळाश्रीवर्धनमाणगांवतळा येथील नागरिकांच्या सुविधेसाठी बसस्थानाकाच्या नुतनीकरणाची कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

श्रीवर्धन येथील रोहातळामाणगांवश्रीवर्धनम्हसळा येथील एस.टी.डेपोच्या दुरूस्तीच्या कामासंदर्भात आज मंत्रालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचेमुंबई सेंट्रलचे व्यवस्थापकीय संचालकविभागीय नियंत्रक आणि डेपो मॅनेजर उपस्थित होते.

मंत्री तटकरे म्हणाल्या कीतळा येथील वाहनतळ समतल करण्याचे काम पूर्ण झाले असूनकुपणभिंतप्रसाधनगृह व त्यावर चालक/मालकाचे विश्रांतीगृहाचे नुतनीकरण कामकाजासाठी अंदाजपत्रक सादर करावे. तसेच रोहा येथील कामकाजासाठी रस्त्यांची डागडुजी आणि निवासस्थानाच्या कामकाजासाठी वेगळे अंदाजपत्रक तयार करावे. माणगाव बसस्थानकात बैठक व्यवस्थेचे काम पूर्ण असूनउर्वरित काम तातडीने पूर्ण करावे. तसेचम्हसळा येथील काम जलद गतीने सुरू करण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

महाराष्ट्रातील 15 सरपंच स्वातंत्र्यदिनी विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार नऊ महिला सरपंचांचा समावेश

 महाराष्ट्रातील 15 सरपंच स्वातंत्र्यदिनी

विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार

नऊ महिला सरपंचांचा समावेश

 

नवी दिल्ली, 13 : राजधानी दिल्ली येथे लाल किल्ल्यावर 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी देशभरातील 28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 210 ग्रामपंचायत सरपंचांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 15  सरपंचांचा समावेश असून यात नऊ महिला सरपंच असून केंद्र सरकारच्या पंचायती राज विभागाकडून या सर्व  सरपंचांचा विशेष सन्मान होणार आहे.

सन्मानित होणाऱ्या सरपंचांनी आपल्या गावांमध्ये पायाभूत सुविधासार्वजनिक सेवा आणि सर्वसमावेशक उपक्रमांमध्ये उल्लेखनीय सुधारणा घडवल्या आहेत. ‘हर घर जल’, ‘प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण’, ‘मिशन इंद्रधनुष’ यांसारख्या केंद्र सरकारच्या योजनांचे शंभर टक्के प्रभावी कार्यान्वयन करताना स्थानिक गरजांनुसार नवीन उपक्रमही राबवले आहेत.

महाराष्ट्रातून निवड झालेले ग्रामपंचायत सरपंच खालीलप्रमाणे आहेत: श्री. प्रमोद नरहरी लोंढे (लोंढेवाडीता. माढाजि. सोलापूर)श्रीमती जयश्री धनंजय इंगोले (खासळा नाकाता. कामठीजि. नागपूर)श्री. संदीप पांडुरंग ढेरंगे (कोरेगाव भीमाता. शिरूरजि. पुणे)श्रीमती डॉ. अनुप्रिता सचिन भांडे (म्हातोडीता. अकोलाजि. अकोला)श्रीमती नयना अशोक भुसारे (भावसेता. शहापूरजि. ठाणे)श्रीमती सुनिता दत्तात्रय मिटकरी (ढोरखेडाता. मालेगावजि. वाशिम)श्रीमती अपर्णा नितीन राऊत (कोंढाळाता. देसाईगंजजि. गडचिरोली)श्रीमती संजीवनी वैजनाथ पाटील (खर्डाता. जामखेडजि. अहिल्यानगर)श्री. चंद्रकुमार काशीराम बहेकार (भेजपारता. सालेकसाजि. गोंदिया)श्रीमती रोमिला रामेश्वर बिसेन (केसलवाढा/पवारता. लाखनीजि. भंडारा)श्री. सूरज संतोष चव्हाण (चिंचाळीता. दापोलीजि. रत्नागिरी)श्रीमती पार्वती शेषराव हरकल (कुंभारीता. जिंतूरजि. परभणी)श्री. प्रमोद किसन जगदाळे (बिदलता. मानजि. सातारा)श्री. शशिकांत माधवराव मांगले (कसबेगव्हाणता. अंजनगाव सुर्जीजि. अमरावती)श्रीमती  प्रभावती राजकुमार बिराजदार (बामणीता. उदगीरजि. लातूर) असे एकूण 15 सरपंच आहेत.

गुरुवारी 14 ऑगस्ट रोजी  या विशेष अतिथींचा औपचारिक सत्कार होणार असूनयावेळी केंद्रीय पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंहकेंद्रीय राज्य मंत्री प्रा. एस. पी. सिंह बघेल आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. आत्मनिर्भर पंचायतविकसित भारताची ओळख या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात कृत्रिम बुद्धिमत्ता ( AI) आधारित ‘सभा सार’ अ‍ॅप लाँच होणार असून, ‘ग्रामोदय संकल्प’ मासिकाचा 16 वा अंक प्रकाशित केला जाणार आहे

नवीन बाजारपेठांकडे लक्ष केंद्रीत करावे देशांतर्गत बाजारातही मत्स्य विक्री वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत

 नवीन बाजारपेठांकडे लक्ष केंद्रीत करावे

देशांतर्गत बाजारातही मत्स्य विक्री वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत

- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबईदि. 13 : अमेरिकेने भारतीय उत्पादनांवर मोठ्या प्रमाणावर टेरिफ वाढवले आहे. त्यामुळे भारतीय उत्पादने अमेरिकेत महाग होऊन त्याची मागणी घटण्याची शक्यता आहे. देशातून मोठ्या प्रमाणावर मत्स्योत्पादन अमेरिकेत निर्यात केले जाते. या टेरिफ वाढीच्या पार्श्वभूमीवर मत्स्योत्पादनासाठी नवनवीन बाजारपेठांकडे लक्ष केंद्रीत करावे. तसेच देशांतर्गत बाजारातही मत्स्यविक्री आणि मत्स्य पुरवठा वाढण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.

 अमेरिकेने केलेल्या टेरीफ वाढीचा मत्स्योद्योगआंबा आणि काजू निर्यातीवर होणाऱ्या परिणांमाविषयी आढावा घेण्यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी मंत्री राणे यांनी सूचना दिल्या. या बैठकीस मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. एन रामास्वामीमत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडेमत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश पाठकमहाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 टेरीफ वाढीमुळे होणाऱ्या परिणामांचा विचार करून सागरी उत्पादन विकास प्राधिकरणाची बैठक आयोजित करावी असे सूचित करुन मंत्री राणे म्हणाले कीइतर देशातील बाजारांचा विचार करत असतानाच देशांतर्गत बाजारातही जास्तीत जास्त मासळी विशेषतः कोळंबी विक्रीसाठी कशी आणता येईल. यासाठी शासनस्तरावरून कशा स्वरुपे योजना आणता येईल. तसेच निर्यातदारांना कशा प्रकारे मदत करता येईल याचा प्रारुप आराखडा सादर करण्यात यावा. तसेच देशांतर्गत बाजारपेठेत मासळी पुरवठा वाढवण्याविषयी या व्यवसायातील खासगी संस्थांशी बैठक आयोजित करावी. आंबा निर्यातीसोबतच देशातील महत्वाच्या शहरांमध्ये जसे दिल्लीबेंगलोरग्वाल्हेरजबलपूर येथे आंबा महोत्सवाचे आयोजन करून आंब्याची देशांतर्गत मागणी वाढवण्यासाठी प्रयत्न करावेतअशा सूचना मंत्री राणे यांनी यावेळी दिल्या.

ग्राहक भांडारांचा सप्टेंबरमध्ये मेळावा

 ग्राहक भांडारांचा सप्टेंबरमध्ये मेळावा

राज्यातील ग्राहक भांडारांना ऊर्जितावस्था मिळावीज्या संस्था उत्कृष्ट काम करीत आहेतत्यांचे काम इतरांना प्रेरणादायी ठरावेया उद्देशाने सर्व ग्राहक भांडारांचा मेळावा सप्टेंबर महिन्यात नाशिक येथे आयोजित करण्यात यावाअसे निर्देश पणन मंत्री श्री.रावल यांनी महासंघाला दिले. यामध्ये इतर राज्यांमध्ये चांगले काम करणाऱ्या संस्थांचेइ कॉमर्स जाणणाऱ्या व्यक्तीसंस्थांचेआधुनिक तंत्रज्ञानाचे सहकार्य घ्याअसेही त्यांनी सांगितले.

            प्रारंभी कार्यकारी संचालक श्री. रसाळ यांनी महासंघाच्या कार्याची सविस्तर माहिती दिली.

००००

राज्यात 'अपना भांडार'च्या माध्यमातून खरेदी विक्रीची साखळी उभारणार

 राज्यात 'अपना भांडार'च्या माध्यमातून

खरेदी विक्रीची साखळी उभारणार

- पणन मंत्री जयकुमार रावल

 

मुंबईदि. 13 : राज्यात महाराष्ट्र सहकारी ग्राहक महासंघाच्या माध्यमातून शेतकरी आणि ग्राहक या दोन्ही घटकांचा लाभ होईलया उद्देशाने 'अपना भांडारया नावाने बहुउद्देशीय ग्राहक भांडारे चालवली जातात. भविष्यात सर्व जिल्ह्यांमध्ये अशी भांडारे उभारून खरेदी-विक्रीची साखळी उभारण्यात येईलअसे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

महाराष्ट्र सहकारी ग्राहक महासंघाच्या कामकाजाचा मंत्री श्री.रावल यांनी मुंबईतील महासंघाच्या कार्यालयात जाऊन आढावा घेतला. यावेळी महासंघाच्या प्राधिकृत समितीचे अध्यक्ष विठ्ठलराव भोसलेकार्यकारी संचालक विकास रसाळमहासंघाचे संचालक जयसिंग गिरासेसंचालक गोकुळ परदेशी यांच्यासह संबंधित पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.

पणन मंत्री श्री.रावल म्हणालेमहासंघाच्या मालकीच्या जागांचा पुनर्विकास करुन त्या सुस्थितीत करुन घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे जेथे भाडेतत्वावर जागा आहेतत्यांची मालकी मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत. जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी कार्यालयकृषी उत्पन्न बाजार समितीबचत गटांसाठी उभारले जाणारे मॉल्स आदी ठिकाणी अपना भांडार’ सुरू करण्यात यावेत तसेच याठिकाणी महिला बचत गटांच्या उत्पादनांना सहभागी करुन घ्यावे. राज्यात ग्राहक महासंघाच्या माध्यमातून खरेदी विक्रीची प्रभावी साखळी तयार करून राज्यात एक ब्रँड निर्माण करावाअशी सूचनाही त्यांनी केली.

Featured post

Lakshvedhi