Wednesday, 13 August 2025

महाराष्ट्रातील 15 सरपंच स्वातंत्र्यदिनी विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार नऊ महिला सरपंचांचा समावेश

 महाराष्ट्रातील 15 सरपंच स्वातंत्र्यदिनी

विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार

नऊ महिला सरपंचांचा समावेश

 

नवी दिल्ली, 13 : राजधानी दिल्ली येथे लाल किल्ल्यावर 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी देशभरातील 28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 210 ग्रामपंचायत सरपंचांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 15  सरपंचांचा समावेश असून यात नऊ महिला सरपंच असून केंद्र सरकारच्या पंचायती राज विभागाकडून या सर्व  सरपंचांचा विशेष सन्मान होणार आहे.

सन्मानित होणाऱ्या सरपंचांनी आपल्या गावांमध्ये पायाभूत सुविधासार्वजनिक सेवा आणि सर्वसमावेशक उपक्रमांमध्ये उल्लेखनीय सुधारणा घडवल्या आहेत. ‘हर घर जल’, ‘प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण’, ‘मिशन इंद्रधनुष’ यांसारख्या केंद्र सरकारच्या योजनांचे शंभर टक्के प्रभावी कार्यान्वयन करताना स्थानिक गरजांनुसार नवीन उपक्रमही राबवले आहेत.

महाराष्ट्रातून निवड झालेले ग्रामपंचायत सरपंच खालीलप्रमाणे आहेत: श्री. प्रमोद नरहरी लोंढे (लोंढेवाडीता. माढाजि. सोलापूर)श्रीमती जयश्री धनंजय इंगोले (खासळा नाकाता. कामठीजि. नागपूर)श्री. संदीप पांडुरंग ढेरंगे (कोरेगाव भीमाता. शिरूरजि. पुणे)श्रीमती डॉ. अनुप्रिता सचिन भांडे (म्हातोडीता. अकोलाजि. अकोला)श्रीमती नयना अशोक भुसारे (भावसेता. शहापूरजि. ठाणे)श्रीमती सुनिता दत्तात्रय मिटकरी (ढोरखेडाता. मालेगावजि. वाशिम)श्रीमती अपर्णा नितीन राऊत (कोंढाळाता. देसाईगंजजि. गडचिरोली)श्रीमती संजीवनी वैजनाथ पाटील (खर्डाता. जामखेडजि. अहिल्यानगर)श्री. चंद्रकुमार काशीराम बहेकार (भेजपारता. सालेकसाजि. गोंदिया)श्रीमती रोमिला रामेश्वर बिसेन (केसलवाढा/पवारता. लाखनीजि. भंडारा)श्री. सूरज संतोष चव्हाण (चिंचाळीता. दापोलीजि. रत्नागिरी)श्रीमती पार्वती शेषराव हरकल (कुंभारीता. जिंतूरजि. परभणी)श्री. प्रमोद किसन जगदाळे (बिदलता. मानजि. सातारा)श्री. शशिकांत माधवराव मांगले (कसबेगव्हाणता. अंजनगाव सुर्जीजि. अमरावती)श्रीमती  प्रभावती राजकुमार बिराजदार (बामणीता. उदगीरजि. लातूर) असे एकूण 15 सरपंच आहेत.

गुरुवारी 14 ऑगस्ट रोजी  या विशेष अतिथींचा औपचारिक सत्कार होणार असूनयावेळी केंद्रीय पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंहकेंद्रीय राज्य मंत्री प्रा. एस. पी. सिंह बघेल आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. आत्मनिर्भर पंचायतविकसित भारताची ओळख या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात कृत्रिम बुद्धिमत्ता ( AI) आधारित ‘सभा सार’ अ‍ॅप लाँच होणार असून, ‘ग्रामोदय संकल्प’ मासिकाचा 16 वा अंक प्रकाशित केला जाणार आहे

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi