Wednesday, 13 August 2025

फुलांना शेतमाल नियमानाखाली आणून खरेदी विक्री बाजारपेठेसाठी अत्याधुनिक सोयी-सुविधांयुक्त युक्त जागा उपलब्ध करुन द्यावी

 फुलांना शेतमाल नियमानाखाली आणून खरेदी विक्री बाजारपेठेसाठी

अत्याधुनिक सोयी-सुविधांयुक्त युक्त जागा उपलब्ध करुन द्यावी

- पणन मंत्री जयकुमार रावल

 

मुंबईदि. १२ : राज्यात मोठ्या प्रमाणात फुलांचे उत्पादन होते. जानेवारी आणि फेब्रुवारी वगळता मुंबई हे फुलांचे सर्वात मोठे खरेदी विक्री केंद्र आहे. वर्षभर या ठिकाणी फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात होते. फुल हा शेतमाल नियमनाखाली नसल्याने आणि सर्व सुविधायुक्त स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. बृहन्मुंबईत फुलांची स्वतंत्र बाजारपेठ सुरू करणे आवश्यक आहे. त्यासाठी तातडीने कार्यवाही करुन दादरगोरेगाव अथवा नवी मुंबई येथे अत्याधुनिक सोयी-सुविधांयुक्त फुल बाजारासाठी जागा शोधून ती उपलब्ध करून देण्यात यावीअसे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.

मुंबई या देशाच्या आर्थिक राजधानीच्या ठिकाणी शेतकरीव्यापारी आणि ग्राहकांच्या सोयीच्या ठिकाणी एक अत्याधुनिक आणि सोयी सुविधांनी युक्त अशी बाजारपेठ असावी या मागणीसाठी दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनच्या प्रतिनिधींनी मंत्री श्री.रावल यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत आमदार मनिषा चौधरीपणन विभागकृषी उत्पन्न बाजार समितीबृहन्मुंबई महानगरपालिका आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पणन मंत्री श्री.रावल म्हणालेराज्यात मोठ्या प्रमाणात फुलांची शेती केली जाते. मुंबईत फुलांची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. फुल निर्यातीच्याही संधी आहेत. मात्र फुलांची सर्व सुविधायुक्त बाजारपेठ असणे आवश्यक आहे. दादर येथे माँसाहेब मीनाताई ठाकरे फुल बाजारपेठेची अस्तित्वातील जागा लहान असल्याने तिचा पुनर्विकास होणार असल्यास महानगरपालिकेमार्फत तेथे आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. ही जागा अपुरी असल्यास गोरेगाव येथे उपलब्ध असलेल्या जागेत अथवा नवी मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात जागा उपलब्ध करुन देण्यात यावी. परळ येथील कामगार मैदान येथे सकाळी ५ ते ९ या वेळेत जागा उपलब्ध होऊ शकेल काया पर्यायांचाही विचार करण्यात यावाअसेही त्यांनी यावेळी सुचविले.

मुंबई शहर हे देशाची आर्थिक राजधानी आहे. पॉलिहाऊस आणि शेडनेट मध्ये दर्जेदार फुलांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून बृहन्मुंबईमध्ये अत्याधुनिक कट फ्लॉवर्स बाजार असणे गरजेचे आहेअशी मागणी असोसिएशनच्या वतीने यावेळी करण्यात आली.

इच्छुक विद्यार्थ्यांना सहभागी होता यावे यासाठी जास्तीत जास्त शाळांमध्ये स्काऊट गाईडची अंमलबजावणी करावी

 इच्छुक विद्यार्थ्यांना सहभागी होता यावे यासाठी

जास्तीत जास्त शाळांमध्ये स्काऊट गाईडची अंमलबजावणी करावी

- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

 

मुंबई, दि. 12 : विद्यार्थ्यांना बालवयापासूनच मूल्य शिक्षण, स्वावलंबन, शिस्त, संस्कारांच्या माध्यमातून उत्तम भावी नागरिक घडविण्यात स्काऊट, गाईडची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. इच्छुक शालेय विद्यार्थ्यांना यात सहभागी होता यावे यासाठी जास्तीत जास्त शाळांमध्ये स्काऊट गाईडची अंमलबजावणी करावी, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

       राज्यातील जास्तीत जास्त शाळांमध्ये स्काऊट गाईडची अंमलबजावणी करण्याबाबत आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, प्रधान सचिव रणजित सिंह देओल, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव, उपसचिव तुषार महाजन, क्रीडा विभागाचे सहायक संचालक तथा महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस् चे राज्य चिटणीस मिलिंद दिक्षित उपस्थित होते. तर शालेय शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह, एससीईआरटीचे संचालक राहुल रेखावार हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

मंत्री श्री.भुसे म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या माता पित्यांचा, वडीलधाऱ्यांचा, गुरुजनांचा आदर करणेशिस्त अंगिकारणे आदी बाबी शिकणे आवश्यक आहे. स्काऊट, गाईड, एनसीसी, आरएसपी आदी माध्यमातून अशी शिस्त आणि संस्कार लाभतात. यामुळे इच्छुक विद्यार्थी यापासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी असेही त्यांनी सांगितले. आनंददायी शनिवार अंतर्गत स्काऊट गाईडचा एक तास घेण्याची तसेच ज्या शाळेत स्काऊट गाईडचे विद्यार्थी असतील, तेथे दिल्या जाणाऱ्या गणवेशापैकी एक गणवेश स्काऊट गाईडला अनुरुप असावा, असा प्रयत्न करण्याची सूचनाही त्यांनी दिली.

       राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी स्काऊटचा गणवेश उत्कृष्ट असून तो घातल्यानंतर विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढतो, असे यावेळी नमूद केले. 

समाजातील भेदाभेद दूर करून एकात्म

 समाजातील भेदाभेद दूर करून 

एकात्मतेचा संदेश देणे हा संतांचा धर्म

– मंत्री छगन भुजबळ

मुंबईदि. 12 : महाराष्ट्र ही संतभूमी आहे. संत चोखामेळासंत जनाबाईसंत नामदेव यांसह अनेक संतांनी जात-पात व उच्च-नीच भेद नष्ट करून समतेचा संदेश दिला. संत साहित्याच्या माध्यमातून दयाक्षमाकरुणा आणि प्रेम यांचा प्रसार झाला. समाजातील भेदाभेद दूर करून एकात्मतेचा संदेश देणे हा संतांचा धर्म असल्याचे प्रतिपादन अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

वारकरी साहित्य परिषदेच्यावतीने आयोजित कार्यक्रमात मंत्री श्री.भुजबळ बोलत होते. या कार्यक्रमाला मराठी भाषाउद्योग मंत्री उदय सामंतसामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटआमदार संतोष बांगरमाजी आमदार शहाजी पाटीलवारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. विठ्ठल महाराज पाटीलह.भ.प. निवृत्ती महाराज रामदासह.भ.प. नरहरी महाराज चौधरीह.भ.प.रामदास महाराज तसेच राज्यभरातील वारकरी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एस ए च्या नव्याने पूर्ण झालेल्या भारत मुंबई कंटेनर टर्मिनल टप्पा 2 ची पाहणी

 पी एस ए च्या नव्याने पूर्ण झालेल्या भारत मुंबई कंटेनर टर्मिनल टप्पा 2 ची पाहणी केली असून भारत आणि सिंगापूर यांच्यातील दृढचिरस्थायी भागीदारीचे हे प्रतीक आहे.  जवळपास तीन दशकांमध्ये,पी एसने  भारतात एकूण 2.3 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. फेज 1 मुळे कार्यक्षमता वाढली असूनजहाजांचा परतण्याचा वेळ कमी झाला आहे. याचा भारताच्या निर्यात-आयातदारांना फायदा झाला आहे  फेज 2 मुळे टर्मिनलची क्षमता 2.4 दशलक्ष TEUs वरून दुप्पट होऊन 4.8 दशलक्ष TEUs झाली आहेज्यामुळे भारत मुंबई कंटेनर टर्मिनल हे भारतातील सर्वात मोठे स्वतंत्र कंटेनर टर्मिनल बनले आहे. यामुळे आर्थिक विकासाला गती मिळून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. बंदर व्यवस्थापनापलीकडेसिंगापूरच्या कंपन्या भारतातील मेरिटाइम क्षेत्रात जहाजबांधणी आणि हिरव्या शिपिंग उपायांसह विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. सिंगापूर हा भारतातील सर्वात मोठ्या परदेशी थेट गुंतवणुकीच्या स्रोतांपैकी एक आहेआणि अनेक सिंगापूरच्या कंपन्या महाराष्ट्रात विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. मॅपल ट्री इन्व्हेस्टमेंट्स आणि महाराष्ट्र शासन यांच्यातील औद्योगिक आणि लॉजिस्टिक्स विकासासाठीचा नवीन सामंजस्य करार या भागीदारीला आणखी मजबूत करेल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.

केंद्रीय बंदरेजहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाचे मंत्री सर्बानंद सोनवाल यांचा व्हिडीओ संदेश दाखविण्यात आला.

सागरी दृष्टिकोन विकसित करत असून, २०२९, २०३५ आणि २०४७ साठी स्पष्ट उद्दिष्टे निश्चित केली आहेत.

 भारताच्या समृद्ध सागरी इतिहासाचा उल्लेख करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी चौल साम्राज्य आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दूरदृष्टीचा दाखला दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत काळ सागरी दृष्टिकोन २०४७ अंतर्गत महाराष्ट्र स्वतःचा सागरी दृष्टिकोन विकसित करत असून२०२९२०३५ आणि २०४७ साठी स्पष्ट उद्दिष्टे निश्चित केली आहेत. यामुळे भारताच्या सागरी क्षेत्राचे पुनर्रूपण होण्यास महाराष्ट्र महत्त्वपूर्ण योगदान देईल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

सिंगापूर नेहमीच भारताला सहकार्य करतो. या दोन्ही देशातील भागीदारीचा विस्तार जेएनपीएपासून वाढवण बंदरापर्यंत होण्यासाठी निश्चित सामंजस्य करार होतीलअशी अपेक्षाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.

सिंगापूरचे उपपंतप्रधान गान किम येंग म्हणाले कीहवामान बदल ही जागतिक स्तरावरील एक गंभीर समस्या आहे त्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत. सिंगापूर आणि भारत एकत्रितपणे ग्रीन आणि डिजिटल शिपिंग कॉरिडॉर विकसित करण्यासाठी सामंजस्य करार (MOU) तयार करत आहेत. हा करार मजबूत आणि प्रभावी मेरिटाइम क्षेत्राला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देईल.

भारत आणि सिंगापूर यांच्यातील हरित आणि डिजिटल सागरी मार्गिकांच्या स्थापनेसाठीच्या सहकार्यावर भर

 भारत आणि सिंगापूर यांच्यातील हरित आणि डिजिटल सागरी मार्गिकांच्या स्थापनेसाठीच्या सहकार्यावर भर देताना मुख्यमंत्र्यांनी शाश्वत सागरी परिसंस्थेची गरज अधोरेखित केली. दोन्ही देश नवीन तंत्रज्ञानहरित इंधने आणि कार्यक्षमता यावर एकत्रित काम करीत असून भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांमधील प्रगती  मध्ये ईस्ट समुद्र उपक्रमा मुळे सागरी सेवांच्या कार्यक्षमतेत वाढ होणार आहे.

राज्यातील  वाढवण बंदर प्रकल्प हा भारतातील सर्वात मोठे बंदरप्रकल्प असून हा प्रकल्प वेळेत पूर्ण होईल आणि महाराष्ट्र तसेच भारताला सागरी महासत्ता म्हणून स्थापित करेलअसा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रकल्पामुळे भारताच्या सागरी पायाभूत सुविधांना नवीन दिशा मिळेल असेही त्यांनी सांगितले

वाढवण विकासासाठी सिंगापूर ने सहकार्य करावे

 महाराष्ट्र आणि सिंगापूर यांच्यातील सागरी सहकार्याला नवा आयाम

वाढवण विकासासाठी सिंगापूर ने सहकार्य करावे

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

रायगड जिमाका दि. 12 : भारत आणि सिंगापूर यांच्यातील सागरी व्यापारपायाभूत सुविधाडिजिटायझेशनडेटा सेंटर्स आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील वाढते सहकार्य आणि अनेक सामंजस्य करारांमुळे आर्थिक बंध अधिक दृढ होत असून यामुळे विशेषतः महाराष्ट्र आणि सिंगापूरमधील संबंधांना नवीन आयाम मिळेलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी व्यक्त केला. तसेच वाढवण बंदर विकासासाठी सहकार्य करावे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

बंदरेजहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या  जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी आणि इंडियन पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने जे. एन. पी. ए. बिझनेस सेंटरउरण येथे ग्रीन अँड डिजिटल मेरिटाईम कॉरिडॉर्स लिडर्स डायलॉग आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर सिंगापूरचे उप पंतप्रधान गान किम येंगसिंगापूर परिवहन मंत्री जेफरी सियोजे. एन. पी. ए. चेअरमन उन्मेष वाघबंदरेजहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे सचिव टी. के. रामचंद्रन  उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेजवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी (जेएनपीए) येथील नवीन पीएसए टर्मिनलचे लवकरच उद्घाटन होणार असून ही अत्याधुनिक सुविधा जेएनपीएच्या ५०% कंटेनर क्षमतेचे नियोजन करेल तसेच भारताच्या जागतिक व्यापाराला चालना देईल. या सुविधेमुळे भारताची सागरी शक्ती अधिक सक्षम होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी  सिंगापूरने केलेल्या  सहकार्याबद्दल त्यांनी विशेष आभार मानले

Featured post

Lakshvedhi