Wednesday, 13 August 2025

समाजातील भेदाभेद दूर करून एकात्म

 समाजातील भेदाभेद दूर करून 

एकात्मतेचा संदेश देणे हा संतांचा धर्म

– मंत्री छगन भुजबळ

मुंबईदि. 12 : महाराष्ट्र ही संतभूमी आहे. संत चोखामेळासंत जनाबाईसंत नामदेव यांसह अनेक संतांनी जात-पात व उच्च-नीच भेद नष्ट करून समतेचा संदेश दिला. संत साहित्याच्या माध्यमातून दयाक्षमाकरुणा आणि प्रेम यांचा प्रसार झाला. समाजातील भेदाभेद दूर करून एकात्मतेचा संदेश देणे हा संतांचा धर्म असल्याचे प्रतिपादन अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

वारकरी साहित्य परिषदेच्यावतीने आयोजित कार्यक्रमात मंत्री श्री.भुजबळ बोलत होते. या कार्यक्रमाला मराठी भाषाउद्योग मंत्री उदय सामंतसामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटआमदार संतोष बांगरमाजी आमदार शहाजी पाटीलवारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. विठ्ठल महाराज पाटीलह.भ.प. निवृत्ती महाराज रामदासह.भ.प. नरहरी महाराज चौधरीह.भ.प.रामदास महाराज तसेच राज्यभरातील वारकरी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi