Monday, 7 July 2025

एलईडी मच्छीमारीवर बंदीची कारवाई

 एलईडी मच्छीमारीवर बंदीची कारवाई

मत्स्य व्यवसायाशी संबंधित विविध समस्या सोडवण्यासाठी मच्छीमारांसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात येणार आहे. या धोरणात पारंपरिक मच्छीमारीला प्राधान्य दिले जाणार असून एलईडी मच्छीमारीसारख्या पर्यावरणविरोधी पद्धतींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी यासंदर्भात लवकरच स्वतंत्र बैठक घेऊन निर्णय घेतला जाईलअसे सांगितले.

कांद्याचे दर नियंत्रणासाठी केंद्रस्तरीय बैठक

 कांद्याचे दर नियंत्रणासाठी केंद्रस्तरीय बैठक

कांद्याचे दर स्थिर ठेवण्यासाठी धोरण निश्चित करण्यासाठी लवकरच केंद्रीय पणन मंत्र्यांसोबत विशेष बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात येणार असून यासाठी केंद्रीय पणन मंत्री यांच्याशी संपर्क साधून भेटीची वेळ निश्चित केली असल्याचे महसूलमंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मच्छिमार व मेंढपाळांच्या समस्या सोडविण्याबाबत सकारात्मक

 शेतकरीशेतमजूरदिव्यांग, मच्छिमार व मेंढपाळांच्या समस्या

 सोडविण्याबाबत सकारात्मक

-महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

मुंबई,दि.३: शेतकरीशेतमजूर दिव्यांगमच्छिमार व मेंढपाळांच्या समस्यासंदर्भात सकारात्मक  निर्णय घेण्यात येईल  असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

            विधानभवन येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांवर बैठक झाली. माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उपस्थित केलेल्या विविध विषयांवर बैठक आयोजित करण्यात आली.

बैठकीस इतर मागास बहुजन कल्याणदुग्धविकासअपारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावेकृषी मंत्री अॅड माणिकराव कोकाटे,पणनराजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावलमत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणेरोजगार हमी योजनाफलोत्पादनखारभूमी विकास मंत्री भरत गोगावले,वने मंत्री गणेश नाईककामगार मंत्री आकाश फुंडकर,मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील उपस्थित होते.तसेच दूरदृश्य संवाद प्रणाली द्वारे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते. याबरोबरच संबंधित विभागाचे सचिव आणि वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

वैयक्तिक जागांमधील कांदळवनांच्या संरक्षणासाठी 'कार्बन क्रेडिट' देण्याबाबत शासन सकारात्मक

 वैयक्तिक जागांमधील कांदळवनांच्या संरक्षणासाठी

'कार्बन क्रेडिटदेण्याबाबत शासन सकारात्मक

- पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

 

मुंबईदि. ४ : समुद्रकिनारी असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अथवा वैयक्त‍िक जागेत कांदळवन आहेत. या कांदळवनांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना ताकद दिली जाईल. अशा जागांमधील कांदळवनांच्या संरक्षणाकरिता कार्बन क्रेडिटदेण्याबाबत शासनाकडून सकारात्मक पावले उचलण्यात येतीलअसे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

पालघर जिल्ह्यातील कांदाळवनांच्या अतिक्रमणाबाबत सदस्य स्नेहा दुबे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेमध्ये सदस्य मनीषा चौधरीसंजय केळकर राजेंद्र गावित यांनीही सहभाग घेतला.

या प्रश्नाच्या उत्तरात अधिक माहिती देताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्याकांदळवनांवर अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. कांदळवनांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी वन विभागाकडे मॅग्रोव्ह सेल कार्यरत आहे. या सेलच्या माध्यमातून कांदळवन संवर्धनाचे काम होत आहे. महाराष्ट्राच्या समुद्रकिनारी असलेल्या कांदळवनांचे ऱ्हास करून पर्यावरणाचा असमतोल निर्माण करणाऱ्या घटकांवर निश्चितच कारवाई केली जाईल. अशा १९ प्रकरणात गुन्हेही दाखल करण्यात आले आहेतअशी माहितीही पर्यावरण मंत्री श्रीमती मुंडे यांनी दिली.

0000

राज्याच्या समुद्रकिनारी असलेल्या कांदळवनांचे सर्वेक्षण सुरू

 राज्याच्या समुद्रकिनारी असलेल्या कांदळवनांचे सर्वेक्षण सुरू

- वनमंत्री गणेश नाईक

 

मुंबईदि. ४ : गुजरातच्या सीमेपासून ते गोवा राज्याच्या सीमेपर्यंत राज्याच्या समुद्रकिनारी कांदळवन आहेत. या कांदळवनांचे वनविभागाच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू आहे. यामुळे लवकरच कांदळवनांच्या अचूक क्षेत्रफळाची माहिती मिळणार आहेअसे वन मंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

याबाबत सदस्य भास्कर जाधव यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

प्रश्नाच्या उत्तरात वनमंत्री गणेश नाईक म्हणालेपालघर जिल्ह्यातील कांदळवनांच्या संरक्षणासाठी सीसीटीव्ही लावण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच वन महसूल व गृह विभागाच्या अधिकाऱ्यांनी आळीपाळीने कांदळवनांच्या संरक्षणासाठी गस्त घालण्याचेही सूचित करण्यात आले आहे. मुंबईतील डेब्रिज कांदळवनांमध्ये टाकताना आढळल्यास त्यावरत कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

कांदळवनांच्या संवर्धनासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिकाही दाखल करण्यात येईलअशी माहितीही वनमंत्री श्री. नाईक यांनी दिली.

0000

Sunday, 6 July 2025

The Wari of Pandharpur

 The Wari of Pandharpur — A Living Tradition

The very soil of this land began to speak through its saints. In the 13th century, Chakradhar Swami founded the Mahanubhava Sect, rejecting caste divisions and preaching in simple language. Later, the tradition of the Wari (pilgrimage) was rooted in humility and faith. Rarely does such a pilgrimage exist globally, one that symbolizes social equality.

Sant Dnyaneshwar gave us the Dnyaneshwari, with its concluding Pasaydan considered one of the world’s finest spiritual prayers. Nivruttinath initiated the Nath tradition. Muktai’s verses are spellbinding. Sant Namdev’s thoughts are enshrined in the Guru Granth Sahib. In Punjab, the literary conference held in Ghumman showed the reverence he commands. Sant Eknath, Sant Chokhamela, and Soyarabai were not just preachers but democratizers of devotion — nonviolent warriors of faith.

 

The Wari tradition is a walking, talking heritage. It is a memory that carries the pride of Maharashtra. It continued uninterrupted even during Islamic rule and British colonialism. Thousands of Dindis (pilgrim groups) participate annually — including this year, where even Artificial Intelligence was used during the pilgrimage. That is the extraordinary glory of Pandharpur.

The Story of Maharashtra Begins with Divine Footsteps

 The Story of Maharashtra Begins with Divine Footsteps...

The story of Maharashtra begins with divine footsteps. It is mentioned in the Ramayana, during Lord Rama’s exile. The Dandakaranya forest mentioned then extended from Vidarbha to Nashik-Panchavati. The Mahabharata too has references to this land. The tale of Damayanti unfolded in Vidarbha. Arjuna is believed to have meditated in caves along the Konkan coast. Rukmini’s abduction and the ensuing war by Lord Krishna happened in Vidarbha. The Pandavas lived in exile in Chikhaldara. The fall of Keechak was a tale of truth triumphing over tyranny — a saga of Maharashtra’s land.

Gautam Buddha’s message of peace also resonated in this land. The teachings were not just heard, but carved into stone by monks in the serene hills of Ajanta. The divine energy of this land attracted seekers, saints, and philosophers. Shankaracharya, who travelled across India, established the Karveer Peeth here. Goddess Mahalakshmi resides here. Maharashtra thus bridges North and South India

Featured post

Lakshvedhi