Wednesday, 2 July 2025

महाराष्ट्र शेती क्षेत्रात पथदर्शी काम करेल -

 महाराष्ट्र शेती क्षेत्रात पथदर्शी काम करेल - राज्यमंत्री आशिष जयस्वाल

भविष्यातील कृषि क्षेत्राची दिशा व शेतकऱ्यांसाठी किफायतशीर वाण विकसित करण्याबाबत संयुक्‍त कृषि संशोधन आणि विकास समिती परिषदेत मंथन होईल. राज्यातील शेती व शेतकरी यांच्या प्रगतीचा वेग अधिक वाढविण्यासाठी ही परिषद उपयुक्त ठरेल. शेती क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर  महत्त्वाचा आहे. आगामी पाच वर्षात महाराष्ट्र शेती क्षेत्रात नक्कीच पथदर्शी काम करेलअसा विश्वास राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केला.

            यावेळी राज्यातील चारही कृषि विद्यापिठांच्या स्मरणिका व विविध कृषि विद्यापीठांच्या पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले.

उत्कृष्ट कृषि संशोधन पुरस्कार-2025 पुरस्काराने गौरव

राज्यातील चारही कृषि विद्यापीठांच्या उत्कृष्ट कृषि संशोधन शास्त्रज्ञांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापिठाचे डॉ. मदन पेंडकेडॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे डॉ. संतोष गहुकरबाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापिठाचे डॉ. विजय दळवीमहात्मा फुले कृषि विद्यापिठाचे डॉ. सुनील कदम यांचा उत्कृष्ट कृषि संशोधन पुरस्कार-2025 देवून गौरव करण्यात आला.

संयुक्‍त कृषि संशोधन आणि विकास समिती बैठक-2025 कृषि विद्यापीठांनी पिकांच्या उत्पादन वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापराचे मॉडेल तयार करावे

 संयुक्‍त कृषि संशोधन आणि विकास समिती बैठक-2025

कृषि विद्यापीठांनी पिकांच्या उत्पादन वाढीसाठी

कृत्रिम बुद्धिमत्ता वापराचे मॉडेल तयार करावे

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

परभणी दि. 29 (जिमाका) : शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू झाला आहे. राज्यातील कृषि विद्यापिठांनी प्रमुख पिकांच्या उत्पन्न वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रभावी वापराचे मॉडेल तयार करण्याबाबत संशोधन करावेअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. वातावरणीय बदलकीड व्यवस्थापनतसेच पावसाचा खंड पडल्यानंतरही तग धरू शकणारे वाण शेतकरी बांधवांना उपलब्ध देण्याबाबतचे संशोधन अपेक्षित असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेच्यावतीने आयोजित संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समितीच्या 53 व्या बैठकीचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटेकृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वालपालकमंत्री मेघना बोर्डीकरखासदार संजय जाधवआमदार सर्वश्री सतीश चव्हाणराहुल पाटीलरत्नाकर गुट्टेराजेश विटेकर यांच्यासह कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवारकृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगीकृषि आयुक्त सुरज मांढरेवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. इंन्द्र मणिडॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाखबाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. संजय भावेजिल्हाधिकारी रघुनाथ गावडेसंशोधक संचालक डॉ. खिजर बेगडॉ. किशोर शिंदे उपस्थित होते. प्रारंभी स्वर्गीय वसंतराव नाईकमहाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेकेंद्र शासनाने राज्यात आयसीआरच्या माध्यमातून सुरु केलेल्या नव्या योजनेत शेतीशी सबंधित विविध शास्त्रज्ञया क्षेत्रात कार्यरत संस्थाअधिकारी एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाणार आहेत. संशोधक आणि शेतकरी यांच्यामध्ये या माध्यमातून एक नवीन नाते निर्माण होईल. या अंतर्गत पुढील पंधरा ते वीस दिवस एकात्मिक कार्यक्रम संपूर्ण देशामध्ये राबविण्यात येत असूनया कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्रापासून होत आहे ही महत्त्वाची बाब आहे. या माध्यमातून संशोधक एका दिवशी तीन ते चार गावांमध्ये जातील व शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन संवाद साधतील. या संवादातून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यास मदत होणार आहे. केंद्र शासनाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात शेती क्षेत्राच्या विकासासाठी हाती घेतलेला हा उपक्रम नक्कीच उपयुक्त ठरेलअसा विश्वास मुखमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

वातावरणीय बदलामुळे शेतीसमोर अनेक आव्हाने उभा राहिली आहेत. बदलत्या तंत्राचा वापर करत गुंतवणूक आधारित शेती आपल्याला करावी लागणार आहे. संरक्षित शेतीसाठी शेतीमध्ये गुंतवणूक वाढवावी लागेल. शासनाच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसमोरील अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. वातावरणीय बदलामुळे निर्माण होणाऱ्या पावसातील खंड सारख्या संकटात तग धरू शकेलअसे वाण विकसित करावे लागणार आहेत. पावसाचा खंडकीड व्यवस्थापनवातावरणीय बदलात पावसाचा खंड आदी संकटात तग धरू शकणारे वाण विकसित करण्यासाठी कृषि विद्यापीठांमध्ये संशोधन होणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याला कामे करावे लागेल तसेच शेती क्षेत्रात संशोधन करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषि विद्यापीठांनी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू झाला आहे. हा वापर वाढविण्यासाठी कृषि विद्यापीठांनी मिशन कृत्रिम बुद्धिमत्ता’ सुरु करावे. या माध्यमातून प्रमुख पिकांच्या उत्पादन वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापराचे नवे मॉडेल विकसित करावे. यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातून अभियानाचा शुभारंभ विकसित कृषि संकल्प अभियान

 विकसित कृषि संकल्प अभियाना’चे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातून अभियानाचा शुभारंभ

परभणीदि. 29 (जिमाका) : राष्ट्रव्यापी ‘विकसित कृषि संकल्प अभियाना’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन झाले.

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ येथे या अभियानाच्या चित्ररथाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवून या अभियानाचा शुभारंभ केला.

यावेळी कृषि मंत्री ॲड. माणिकराव कोकाटेसार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणपाणी पुरवठा व स्वच्छता,उर्जामहिला व बालकल्याणसार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्हयाच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकरकृषिवित्तनियोजनमदत व पुनर्वसनविधी व न्यायकामगार राज्यमंत्री  अॅड. आशिष जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताच्या संकल्पनेला गती देण्यासाठी आधुनिक कृषि पद्धतीसमृद्ध शेतकरी आणि विज्ञानाधिष्ठित शेती आवश्यक आहे. कृषि क्षेत्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून अन्नसुरक्षेसोबतच देशाच्या अर्ध्याहून अधिक लोकसंख्येला रोजगार पुरवते. याकरिता केंद्र सरकारच्या कृषि व शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्रालयाच्यावतीने केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वात दि. 29 मे ते 12 जून 2025 या कालावधीत देशभरात विकसित कृषि संकल्प अभियान राबविण्यात येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे अभियान यशस्वी होवून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या माध्यमातून खरीप पिकाच्या नियोजनासाठी अचूक मार्गदर्शन मिळेल, शेतकऱ्यांना आधुनिक कृषि तंत्रज्ञान आत्मसात करण्याची सुवर्णसंधी यानिमित्ताने लाभणार असून त्यांना शाश्वत उत्पादन घेता येईलअसे नमूद करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी खासदार संजय जाधवआमदार, कार्यकारी परिषद सदस्य सतीश चव्हाणआमदार व कार्यकारी परिषद सदस्य आमदार डॉ. राहुल पाटीलआमदार रत्नाकर गुट्टेआमदार राजेश विटेकरप्रधान सचिव (कृषि) विकासचंद्र रस्तोगीपुणे येथील कृषि परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडेकृषि आयुक्त सूरज मांढरे (भाप्रसे)‘पोकरा’चे प्रकल्प संचालक परिमल सिंहकृषी विद्यापीठाचे कुलगुरू  प्रा. डॉ. इन्द्र मणि‘पिडीकेव्ही’ अकोला आणि ‘एमपीकेव्ही’ राहुरीचे कुलगुरू डॉ. शरद गडाख‘बीएसकेकेव्ही’ दापोलीचे  कुलगुरू डॉ. संजय भावेजिल्हाधिकारी रघुनाथ गावडेपोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशीजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  नतिशा माथुरमनपा आयुक्त धैर्यशील जाधव आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

विकसित कृषि संकल्प अभियानाच्या माध्यमातून  शेतकऱ्यांचे कल्याण साधण्यासाठी कृषि क्षेत्रात कार्य करणारी देशाची सर्वोच्च संस्था भारतीय कृषि अनुसंधान परिषद परिश्रम घेत आहे. या अभियानामध्ये देशातील 723 जिल्ह्यांमधील 65 हजारपेक्षा जास्त गावांना भेट देणारी दोन हजार 170 तज्ज्ञ पथके सहभागी होणार आहेत. प्रत्येक पथकात किमान चार वैज्ञानिक असतील. या पथकांमध्ये कृषि विद्यापीठांचे वैज्ञानिकसंशोधन संस्थांचे तज्ज्ञशासकीय विभागांचे अधिकारीनाविन्यपूर्ण कार्य करणारे शेतकरी आणि एफपीओचे कर्मचारी यांचा समावेश असेल. या अभियानाद्वारे देशातील 1.3 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्यात हे अभियान कृषि विभाग आणि 50 कृषि विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून 4 हजार 500 गावांत राबविले जाणार आहे. मराठवाडा विभागासाठी  कुलगुरू प्रा.डॉ. इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनखाली वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील आठ जिल्ह्यांतील 12 कृषि विज्ञान केंद्रे आणि सर्व विस्तार यंत्रणा सक्रिय सहभागी होणार आहेत. या उपक्रमासाठी विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे आणि मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी विद्यापीठस्तरीय सूक्ष्म नियोजन केले आहे. यासाठी शास्त्रज्ञांचे चमू तयार केले असून याद्वारे प्रत्येक गावात 200 शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जवळपास दोन लाख 1 हजार 600 शेतकऱ्यांना खरीप पिकाचे अचूक नियोजन करण्यासाठी तंत्रज्ञान पोहचविण्यात येणार असून त्याद्वारे संपूर्ण परिसरात तंत्रज्ञान पोहोचले जाईल.

*-*-*-*

पंढरपूर शहर महास्वच्छता अभियान 2025..... महास्वच्छता अभियानातून स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहोचवण्याचे कार्य झाले

 पंढरपूर शहर महास्वच्छता अभियान 2025.....

महास्वच्छता अभियानातून स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहोचवण्याचे कार्य झाले

- पालकमंत्री जयकुमार गोरे

आषाढी सोहळ्यात पंढरपूर येथे सर्व पालख्यादिंड्यावारकरी व भाविक यांची सर्व व्यवस्था करणार, पंढरपूरचा कॉरिडॉर सर्वांच्या संमतीनेच होणार..

 

पंढरपूर/सोलापूरदिनांक 22(जिमाका):- पंढरपूर शहर महास्वच्छता अभियान 2025 अंतर्गत एकाच वेळी सकाळी सात ते दहा या कालावधीत 42 ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून 148 टन कचरा गोळा करण्यात आला. या मोहिमेत सोलापूर जिल्हा प्रशासनातील अधिकारीकर्मचारीसामाजिक संस्थांचे स्वयंसेवकविविध सामाजिक संघटनापंढरपूर शहरातील नागरिक यांनी सक्रिय सहभाग घेऊन विठुरायाची नगरी स्वच्छ केली. या मोहिमेतून पंढरपूर शहर व येथे येणाऱ्या हजारो भाविकांच्या घरोघरी स्वच्छतेचा संदेश पोहोचविण्याचे कार्य घडले असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

            पंढरपूर शहर महास्वच्छता अभियान 2025 चा समारोप कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे मार्गदर्शन करत होते. यावेळी आमदार समाधान आवताडेआमदार सचिन कल्याणशेट्टीआमदार देवेंद्र कोठेजिल्हाधिकारी कुमार आशीर्वादमुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगमसोलापूर महापालिकेचे आयुक्त सचिन ओम्बासेमाजी आमदार प्रशांत परिचारकपंढरपूरचे उपविभागीय अधिकारी सचिन इथापेकार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके,नगरपालिका प्रशासन अधिकारी वीणा पवारपंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख व मान्यवर उपस्थित होते.

        पालकमंत्री श्री गोरे म्हणाले कीया स्वच्छता अभियानातून श्री विठुरायाची नगरी स्वच्छ करण्याचे काम आपल्या सर्वांच्या श्रमातून झालेले आहे. ही वारी पूर्वीची स्वच्छता असून वारीनंतरही स्वच्छता करण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी सोलापूर जिल्ह्यासह सातारा जिल्ह्यातील ही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला असून आजच्या मोहिमेत सात ते आठ हजार स्वयंसेवक नागरिकांनी सहभाग घेतला. यामध्ये तरुणांचा सहभाग ही महत्त्वपूर्ण बाब होती व पुढील काळात या स्वच्छतेच्या संदेशाबाबत नागरिकांमध्ये प्रबोधन करतील व स्वतःही क्रियाशीलपणे राबवतील असे त्यांनी सांगितले.

            पंढरपूर शहरातील सर्व नागरिक व्यापारी,  व्यावसायिक यांनी आपापल्या दुकानासमोर कचरा टाकण्यासाठी छोट्या छोट्या कचरा पेट्या ठेवाव्यात व त्यामध्येच कचरा टाकून तो नगरपालिकेच्या कचरा संकलन टीम कडे द्यावा. त्याप्रमाणेच विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर नगरीत येणाऱ्या वारकरी भावी यांनीही कचरा कोठेही रस्त्यावर टाकू नये नगरपरिषदेने उपलब्ध करून दिलेल्या जवळपासच्या कचराकुंड्यामध्येच कचरा टाकावा, स्वच्छ पंढरपूरस्वच्छ चंद्रभागानमामी चंद्रभागा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे पालकमंत्री यांनी सांगितले.

            पंढरपूर हे राज्यासाठी महत्त्वाचे व पवित्र धार्मिक ठिकाण असून या विठुरायाच्या नगरीचा सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. पंढरपूरच्या कॉरिडॉरच्या विषयी सर्वांच्या संमतीनेच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री गोरे यांनी दिली. तसेच सर्व मानाच्या पालख्या सह अन्य पालख्यादिंड्या यांचे प्रस्थान पंढरपूरसाठी झालेले आहे. आषाढी यात्रा सोहळ्यासाठी पंढरपूर येथे आल्यानंतर या सर्वांना व्यवस्था प्रदान केली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच या मोहिमेत सहभाग घेतल्याबद्दल जिल्हाधिकारीमुख्य कार्यकारी अधिकारीमहापालिका आयुक्त यांच्यासह सर्व विभाग प्रमुखसामाजिक संस्थानागरिक व स्वयंसेवक यांचे त्यांनी कौतुक केले.

            आमदार सचिन आवताडे यांनी पालकमंत्री महोदयांनी त्यांच्या संकल्पनेतून वारी पूर्वी पंढरपूर शहर स्वच्छ करण्यासाठी राबवलेल्या महा स्वच्छता अभियानाचे कौतुक केले व वारी संपल्यानंतर ही अशी मोहीम राबवण्याची मागणी केली.

            प्रारंभी उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी प्रास्ताविकात स्वच्छता अभियानाचे महत्त्व सांगून प्रशासनाच्या वतीने येथे येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा देण्याबरोबरच शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले. तर मोहिमेत सर्वांनी सहभाग घेतल्याबद्दल मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी आभार मानले.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सफाई मित्रांचा सन्मान

            आजच्या महास्वच्छता अभियानात सहभाग घेऊन स्वच्छता मोहीम राबवलेल्या काही सफाई मित्रांचा प्रतिनिधी स्वरूपात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये लक्ष्मण गोविंद सोनवणेरविकिरण दोडियाश्रीमती शांता विठ्ठल वाघमारे ,अजय शंकर तावरेओंकार जनार्दन वाघमारे यांच्यासह कोळगाव ग्रामपंचायत तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. तसेच लायन्स क्लब पंढरपूरवृक्षप्रेमी ग्रुप पंढरपूरएव्हर ग्रीन क्लबक्रीडाई संस्था व लोकमान्य विद्यालय पंढरपूर यांचाही सत्कार करण्यात आला.

महास्वच्छता अभियानाचा शुभारंभ

         पंढरपूर शहर महास्वच्छता अभियान 2025 चा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पालकमंत्रीजिल्हाधिकारीमुख्य कार्यकारी अधिकारी व अन्य मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात स्वच्छता केली.

All Roads Connecting Nashik to be Upgraded Ahead of Simhastha Kumbh Mela

 All Roads Connecting Nashik to be Upgraded Ahead of Simhastha Kumbh Mela - Chief Minister Devendra Fadnavis

 

 A high-level meeting on highways connecting Nashik held in presence of Union Minister for Road Transport & Highways, Nitin Gadkari

 

          Nagpur, June 22: In view of the upcoming Simhastha Kumbh Mela in Nashik and the expected massive influx of pilgrims, Union Minister Nitin Gadkari has given in-principle approval for the development and construction of necessary road infrastructure through the Union Ministry of Road Transport. A Detailed Project Report (DPR) will be prepared soon and funding will be allocated accordingly. This decision was taken during a meeting focused on the preparations for the Nashik Kumbh Mela.

 

          Considering the growing faith of devotees and the increasing crowd at the Kumbh Mela, Chief Minister Devendra Fadnavis had earlier requested Prime Minister Narendra Modi for support from the central government for infrastructure development. Acting upon this, the high-level meeting was held at the Chief Minister’s office in Nagpur with the presence of Union Minister Nitin Gadkari, Maharashtra government officials, and relevant department heads.

 

          The meeting was attended by Water Resources Minister and Nashik’s Guardian Minister Girish Mahajan, Public Works Minister Shivrendra Singh Arunraje Abhay Sinhraje Bhosale, MP Smita Wagh, MLAs Devyani Pharande and Mangesh Chavan, Secretary of Ministry of Road Transport V. Umashankar, NHAI Chairman Yadav, Additional Chief Secretary of PWD Manisha Mhaiskar, Nashik Divisional Commissioner Pravin Gedam, Special IG Dattatray Karale, Nashik Police Commissioner Sandeep Karnik, Collector Jalaj Sharma, Municipal Commissioner Manisha Khatri, and other senior officials.

 

          Nashik is connected via approximately eight major routes including Mumbai, Gujarat, Palghar, Pune, Ahilyanagar, Sambhajinagar, and Dhule. These routes are crucial during the Kumbh period. The internal roads in and around Nashik that connect to national highways were also considered for development. Union Minister Nitin Gadkari gave in-principle approval for nearly all these roads. DPRs will be prepared soon, and funding will be provided to complete the works in time.

 

          CM Fadnavis stated that the expanded road network will help manage the huge traffic expected during the Kumbh Mela and ensure better safety and convenience for devotees. During the meeting, approval was granted for the Nashik Ring Road, and a decision was made to upgrade the Nashik-Trimbakeshwar road to a six-lane highway.

 

To streamline traffic in Nashik, special emphasis was placed on strengthening infrastructure at the Dwarka Circle, modeled after the Kalamboli Junction. The development of Dwarka Circle will happen in two phases—works to be completed before the Kumbh Mela, and works to be taken up after the event.

These routes will be developed – Important road projects in view of the Simhastha Kumbh Mela 2027:

1. Ghoti – Pahine – Trimbakeshwar – Jawhar Phata

2. Dwarka Circle – Sinnar I.C. 21 (Samruddhi Expressway) – Nandur Shingote – Kolhar

3. Nashik to Kasara

4. Sawli Vihir (I.C. 20 Samruddhi Expressway) – Shirdi – Shani Shingnapur Phata (Rahuri Khurd)

5. Nashik to Dhule

6. Trimbakeshwar – Jawhar – Manor

7. Sawli Vihir – Manmad – Malegaon

8. Ghoti – Sinnar – Wavi – Shirdi

9. Shani Shingnapur Phata (Rahuri Khurd) – Ahilyanagar (Kharwandi Phata

नाशिक सिंहस्थ कुंभ मेले के दृष्टिकोण से नाशिक को जोड़ने वाले सभी मार्गों का होगा विकास

 नाशिक सिंहस्थ कुंभ मेले के दृष्टिकोण से नाशिक को जोड़ने वाले सभी मार्गों का होगा विकास

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

 केंद्रीय सड़क परिवहन मंत्री नितिन गडकरी की प्रमुख उपस्थिति में नाशिक को जोड़ने वाले राजमार्गों को लेकर बैठक संपन्न।

 

          नागपुरदिनांक 22: आगामी नाशिक सिंहस्थ कुंभ मेले में श्रद्धालुओं की अपार भीड़ और यातायात व्यवस्थाओं को ध्यान में रखते हुए आवश्यक सड़क सुविधाओं और नई सड़कों के निर्माण को केंद्रीय सड़क परिवहन मंत्रालय द्वारा सैद्धांतिक मंज़ूरी दी गई है। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने कहा कि शीघ्र ही इन परियोजनाओं के लिए डीपीआर (विस्तृत परियोजना रिपोर्ट) तैयार की जाएगी और आवश्यक धनराशि उपलब्ध कराई जाएगी।

          मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कुंभ मेले की बढ़ती महत्ता और श्रद्धालुओं की आस्था को देखते हुए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से केंद्र स्तर पर सहायता की विनती की थी। उनके मार्गदर्शन में नागपुर में मुख्यमंत्री कार्यालय में एक उच्चस्तरीय बैठक का आयोजन हुआजिसमें यह निर्णय लिया गया।

          गिरीश महाजनशिवेंद्रसिंह भोसलेसांसद सुमिता वाघविधायक देवयानी फरांदेमंगेश चौहानसड़क परिवहन मंत्रालय के सचिव वी. उमाशंकरराष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अध्यक्ष यादवअपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकरनाशिक संभागीय आयुक्त प्रवीण गेडामविशेष पुलिस महानिरीक्षक दत्ता करालेपुलिस आयुक्त संदीप कर्णिकजिलाधिकारी जलज शर्मामनपा आयुक्त मनीषा खत्री एवं अन्य वरिष्ठ अधिकारी।

          नाशिक से लगभग आठ प्रमुख मार्ग जुड़े हैं – मुंबईगुजरातपालघरपुणेअहिल्यानगरसंभाजीनगरधुले आदि। ये सभी मार्ग कुंभ मेले के दौरान अत्यंत महत्वपूर्ण होंगे। इसके अलावा आंतरिक सड़कें भी राष्ट्रीय राजमार्ग से जुड़ी जाएंगी। इन सभी मार्गों के विकास पर बैठक में विचार किया गयाऔर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने लगभग सभी मार्गों को सैद्धांतिक मंजूरी दे दी है।

          मुख्यमंत्री फडणवीस ने कहा कि कुंभ मेले के दौरान भारी ट्रैफिक को ध्यान में रखते हुए विस्तृत सड़कों का जाल तैयार किया जाएगा जिससे भक्तों को सुरक्षित और सुगम यात्रा सुविधा मिलेगी। बैठक में नाशिक रिंग रोड को भी मंजूरी दी गई तथा नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्ग को छह लेन का करने का निर्णय लिया गया।

          द्वारका सर्कल का विकास:द्वारका सर्कल पर विशेष ध्यान देते हुए इसे दो चरणों में विकसित करने का निर्णय लिया गया कुंभ मेले से पहले किया जाने वाला कार्य, कुंभ मेले के बाद का कार्य यह विकास कळंबोली जंक्शन की तर्ज पर किया जाएगा।

 

विकसित किए जाने वाले प्रमुख मार्ग:

1. घोटी – पाहिने – त्र्यंबकेश्वर – जव्हार फाटा

2. द्वारका सर्कल – सिन्नर IC 21 (समृद्धि एक्सप्रेसवे) – नांदूर शिंगोटे – कोल्हार

3. नाशिक – कसारा

4. सावली विहीर (IC 20) – शिर्डी – शनिशिंगणापूर फाटा (राहुरी खुर्द)

5. नाशिक – धुले

6. त्र्यंबकेश्वर – जव्हार – मनोर

7. सावली विहीर – मनमाड – मालेगांव

8. घोटी – सिन्नर – वावी – शिर्डी

9. शनिशिंगणापूर फाटा – अहिल्यानगर (खरवंडी फाटा)

0000

नागपूर विभागातील शालार्थ लॉगिन गैरवापर प्रकरणाची सखोल चौकशी सुरू

 विधानसभा लक्षवेधी सूचना :

नागपूर विभागातील शालार्थ लॉगिन गैरवापर प्रकरणाची सखोल चौकशी सुरू

- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

 

 मुंबईदि. १ : नागपूर विभागात शालार्थ प्रणालीच्या लॉगिन आयडीचा गैरवापर झाल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी विशेष तपासणी पथक तसेच शालेय शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत सुरू असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत दिली.

विधानसभेत सदस्य अजय चौधरी यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली. या चर्चेत सदस्य नरेंद्र भोंडेकरप्रशांत बंबकाशिनाथ दातेप्रवीण दटकेसुरेश भोळे, मुफ्ती महोम्मद इस्माईल अब्दुल खालिक या सदस्यांनी सहभाग घेतला.

            मंत्री श्री. भुसे म्हणालेयामध्ये दोषी आढळणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला पाठीशी घालण्यात येणार नाही. आतापर्यंत या प्रकरणात १९ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून यामध्ये वरिष्ठ शासकीय अधिकारीसंस्था चालक आणि संचालक यांचा समावेश आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी संचालक योजना यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे.

***

Featured post

Lakshvedhi