Monday, 2 June 2025

रोगों पर नियंत्रण के लिए संयमित जीवनशैली आवश्यक

 रोगों पर नियंत्रण के लिए संयमित जीवनशैली आवश्यक

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक२ जून : नागरिकों की बदलती जीवनशैली के कारण विभिन्न बीमारियों का प्रकोप बढ़ता जा रहा है। ऐसे रोगों पर नियंत्रण पाने के लिए आधुनिक चिकित्सा पद्धतियों के साथ-साथ संयमित और संतुलित जीवनशैली अपनाना अत्यंत आवश्यक हैऐसा मत महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने व्यक्त किया।

वे श्री साईंबाबा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलहार्ट इंस्टिट्यूट और रिसर्च सेंटर (नाशिक) के उद्घाटन समारोह में बोल रहे थे। इस अवसर पर जल संसाधन मंत्री गिरीश महाजनसांसद डॉ. शोभा बच्छावविधायक सीमा हीरेराहुल ढिकलेहिरामण खोसकरअस्पताल प्रमुख डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारीडॉ. पल्लवी धर्माधिकारीअण्णासाहेब मोरे तथा अन्य गणमान्य व्यक्ति उपस्थित थे।

मुख्यमंत्री फडणवीस ने कहा कि अस्पताल को श्री साईंबाबा के नाम से जोड़ा गया है। यदि हम अपने जीवन में साईंबाबा का "श्रद्धा और सबुरी" (आस्था और धैर्य) का मंत्र अपनाएंतो कोई भी बीमारी हमें प्रभावित नहीं कर सकती। पिछले कुछ वर्षों में चिकित्सा क्षेत्र में काफी प्रगति हुई हैजिससे भारतीयों का जीवन स्तर बेहतर हुआ है। साईंबाबा हॉस्पिटल की आधुनिक सुविधाएं मरीजों को उत्तम स्वास्थ्य सेवा प्रदान करेंगी।

उन्होंने यह भी कहा कि इस अस्पताल की स्थापना का उद्देश्य सेवा करना हैइसलिए यहाँ गरीब से गरीब व्यक्ति को भी इलाज की सुविधा मिलेगी। उन्होंने शुभकामनाएं देते हुए कहा कि यहाँ आने वाले प्रत्येक व्यक्ति को उत्तम स्वास्थ्य लाभ प्राप्त हो।

0000

Disciplined Lifestyle Essential for Disease Control

 Disciplined Lifestyle Essential for Disease Control

– Chief Minister Devendra Fadnavis

 

Nashik, June 2: Due to the changing lifestyles of citizens, the prevalence of various diseases is increasing. In order to control such ailments, along with modern medical treatments, a disciplined and balanced lifestyle is essential, stated Chief Minister Devendra Fadnavis.

He was speaking at the inauguration ceremony of the Shri Saibaba Multispeciality Hospital, Heart Institute and Research Centre in Nashik. On this occasion, Water Resources Minister Girish Mahajan, MP Dr. Shobha Bachhav, MLAs Seema Hire, Rahul Dhikle, Hiramani Khoskar, hospital heads Dr. Aniruddha Dharmadhikari and Dr. Pallavi Dharmadhikari, Annasaheb More, and others were present.

Chief Minister Fadnavis said that the hospital has been named after Shri Saibaba. If people adopt Saibaba’s message of “Shraddha (faith) and Saburi (patience)” in their lives, no disease can affect them. In recent years, improved medical technologies have enhanced the quality of life of Indians. The advanced treatment facilities at Saibaba Hospital will provide excellent healthcare to patients.

He emphasized that the core purpose behind setting up the hospital is to serve. Hence, even the poorest individuals will receive care here. He expressed confidence in this vision and extended his best wishes, hoping that everyone who comes to the hospital will attain good health.

0000

 

बंदरे विभागाने लोकाभिमूख होण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा

 बंदरे विभागाने लोकाभिमूख होण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा

- बंदरे मंत्री नितेश राणे

 

मुंबई, दि. २ : बंदरे विभागाने मुख्यमंत्र्यांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पहिल्या तीन विभागांमध्ये क्रमांक मिळवण्याच्या दृष्टीने काम करावे. तसेच अधिक लोकाभिमूख होण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.

            मंत्रालयात १५० दिवसांच्या अनुषंगाने बंदरे विभागाचा आढावा मंत्री श्री. राणे यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी परिवहनबंदरे आणि हवाई वाहतूक विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठीमहाराष्ट्र सागरी महामंडळाचे प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीये यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. राणे म्हणाले, १५० दिवसांच्या कार्यक्रमासाठी बंदरे विभागाने परिपूर्ण तयारी करावी. वेगवेगळ्या राज्यात बंदरे हाताळणीसाठी वापरण्यात येत असलेल्या नवनवीन तंत्रज्ञानाचा विभागाने अभ्यास करावा. बोटींना ट्रॅक करण्यासाठी ॲप विकसित करावे. बंदरे विकास आणि बोटींच्या नियंत्रणासाठी विभागाची स्वतःची अधुनिक व्यवस्था विकसीत करावी. या सर्व गोष्टींसाठी अभ्यास दौऱ्यांचे नियोजन करावे. सविस्तर अभ्यास करून त्याचा आराखडा तयार करावा. प्रलंबित असलेली पदभरती तसेच रिक्त पदांवरील नियुक्त्या मार्गी लावाव्यात. ‘आय गॉट’ नोंदणी करावीहरीत बंदर उभारणीवर भर द्यावाअशा सूचनाही मंत्री श्री. राणे यांनी दिल्या.

वॉटर टॅक्सी सुरू करण्यासाठी बंदर विभागाने नियोजन करावे

 वॉटर टॅक्सी सुरू करण्यासाठी बंदर विभागाने नियोजन करावे


- बंदरे मंत्री नितेश राणे


 


मुंबई, दि. २ : गेट वे ऑफ इंडिया येथील रेडिओ जेट्टी ते नवी मुंबई विमानतळ येथे वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी बंदरे विभागाने याबाबतचे नियोजन पूर्ण करावे. तसेच गरजेच्या ठिकाणी जेट्टी उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करावेत, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.


            वॉटर टॅक्सी सुरू करण्याबाबत मंत्रालयात बैठक संपन्न झाली. त्यावेळी मंत्री राणे बोलत होते. बैठकीस परिवहन, बंदरे आणि हवाई वाहतूक विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, नवी मुंबई विमानतळ प्राधिकरणाचे ब्रिजेश सिंघल, महाराष्ट्र सागरी मंडळाचे प्रदीप बढीये यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


मंत्री श्री. राणे म्हणाले, वॉटर टॅक्सी सुरू करण्यासाठी टर्मिनल उभारणी टप्प्या टप्प्याने सुरू करावी. तसेच यासाठी विमानतळ प्राधिकरणाने आवश्यक परवानग्यांसाठी प्रस्ताव सादर करावेत. माल वाहतुकीसाठीही जेटी उभारण्यासाठी ठिकाणे निश्चित करावीत. मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राज्य सरकारने जलवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.


नवीन वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे मुंबई आणि नवी मुंबईतील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. या सेवेमुळे नवी मुंबईतील विविध भाग मुंबईशी चांगल्या प्रकारे जोडला जाईल. प्रवासाची वेळ सुमारे ४० मिनिटे असणार आहे. या वॉटर टॅक्सी सेवांमध्ये इलेक्ट्रिक बोट्सचा वापर केल्यामुळे प्रदूषण कमी होईल आणि पर्यावरणाला फायदा होईल. तसेच मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवाशांना आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळेल, असेही मंत्री श्री. राणे यांनी सांगितले.

आजारावर नियंत्रणासाठी संयमी जीवनशैली आवश्यक

 आजारावर नियंत्रणासाठी संयमी जीवनशैली आवश्यक

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

नाशिकदि. २ : नागरिकांच्या बदलत्या जीवनशैलीमुळे  विविध आजारांचे प्रमाण वाढत आहे. अशा आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आधुनिक उपचार पद्धतीसोबत संयमी जीवनशैली आवश्यक आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

श्री साईबाबा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलहार्ट इन्स्टिट्यूट ॲण्ड रिसर्च सेंटर नाशिकच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजनखासदार डॉ. शोभा बच्छावआमदार सीमा हिरेआमदार राहुल ढिकलेआमदार हिरामण खोसकररुग्णालयाचे प्रमुख डॉ.अनिरुद्ध धर्माधिकारीडॉ.पल्लवी धर्माधिकारीअण्णासाहेब मोरे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणालेरुग्णालयाला श्री साईबाबा यांचे नाव देण्यात आले आहे. साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र जीवनात अंगिकारता आल्यास कुठलाच आजार होऊ शकत नाही. गेल्या काही वर्षात चांगल्या चिकित्सा पद्धती विकसित झाल्याने भारतीयांचे जीवनमान वाढले आहे. साईबाबा हॉस्पिटलमधील आधुनिक उपचार पद्धतींमुळे रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा मिळेल. सेवा करणे हा रुग्णालय काढण्यामागचा उद्देश असल्याने गरिबातील गरीब माणसाची सेवा येथे होईलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येकाला उत्तम आरोग्य लाभावेअशा शुभेच्छा मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

भारतीय सर्जनशीलतेला भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्था सारख्या उपक्रमांद्वारे सक्षम करण्यासाठी वचनबद्ध

 भारतीय सर्जनशीलतेला भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्था सारख्या उपक्रमांद्वारे सक्षम करण्यासाठी वचनबद्ध –केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

·         वेव्हज 2025 मध्ये भारतात निर्मिती करण्याच्या आव्हानांतर्गत 32 सर्जनशील आव्हानांच्या विजेत्यांचा सन्मान

·          60 हून अधिक देशांमधील 750 हून अधिक अंतिम स्पर्धक नाविन्य आणि प्रतिभेचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र

·         तरुण मने सर्जनशीलता आणि तंत्रज्ञान यांचे सुंदर संमिश्रण कसे करतात याचे हे व्यासपीठ एक उत्कृष्ट उदाहरण : राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन

 

मुंबई२ :-जगभरातील सर्जकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या भारतात निर्मिती आव्हानाच्या (सीआयसी) पहिल्या सत्राचा समारोप वेव्हज 2025 मध्ये एका भव्य समारंभात झालाज्याने भारताच्या सर्जनशील परिदृश्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा चिन्हांकित केला. या ऐतिहासिक कार्यक्रमात माध्यम आणि मनोरंजन उद्योगाच्या प्रत्येक क्षेत्रातल्या 32 विविध आव्हानांच्या  विजेत्यांचा सन्मान करण्यात आलात्यात अॅनिमेशनगेमिंगचित्रपट निर्मितीकृत्रिम प्रज्ञासंगीत आणि डिजिटल कला यांचा समावेश होता.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री  अश्विनी वैष्णव यांनी तरुण सर्जक आणि दूरदृष्टी असलेल्यांना संबोधित करताना हा एक ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हटले.

तिसऱ्या मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाची सर्जनशील इकोसिस्टम उभारणार,जिओ वर्ल्ड सेंटर मधील जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेतील राऊंडटेबल बैठकीत

 तिसऱ्या मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाची सर्जनशील इकोसिस्टम उभारणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिओ वर्ल्ड सेंटर मधील जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेतील राऊंडटेबल बैठकीत निर्मातेउद्योजकस्टार्टअप्स आणि क्रिएटिव्ह इंडस्ट्रीतील तज्ञांशी सकारात्मक चर्चा

 

मुंबईदि. २ : मुंबई हे सर्जनशीलतेचे केंद्र असून माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात महाराष्ट्राचे स्थान जागतिक स्तरावर अधिक बळकट करण्यासाठी तिसऱ्या मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाची सर्जनशील इकोसिस्टम उभारण्यात येईलअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेमधील भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ (एफआयसीसीआय) यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ‘स्टुडिओ आणि तंत्रज्ञान’ या विषयावरील राऊंडटेबल बैठकीत ते बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगेउद्योग विभागाचे सचिव पी. अन्बलगनएमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासूविकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्रसिंह कुशवाहअभिनेते आणि निर्माते अमीर खानएफआयसीसीआयचे आशिष कुलकर्णीपी.जयकुमार रेड्डी यांच्या यांच्यासह या क्षेत्रातील तज्ञ मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीनवी मुंबईत जागतिक थीम पार्कबाबत राज्य शासन सकारात्मक आहे. नवी मुंबईत निर्माण होणाऱ्या तिसऱ्या मुंबईसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. याकरिता प्राईम फोकस आणि गोदरेजसोबत दोन महत्त्वाचे सामंजस्य करार करण्यात आले आहेतयामुळे मुंबईत जागतिक दर्जाचे स्टुडिओ सुविधा उपलब्ध होणार आहेत.

‘आयआयटी’ मुंबईच्या तांत्रिक सहकार्याने ‘आयआयसीटी’ उभारले जाणार आहे. यामध्ये सर्जनशील उद्योग अभ्यासक्रमात समाविष्ट करून नव्या पिढीला करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच ई-स्पोर्ट्ससाठी धोरणात्मक पाठबळ आणि आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

चित्रपटवेबसिरीज जाहिरात आणि इतर व्हिज्युअल कंटेंटसाठी चित्रीकरण परवानगी मिळवण्याची प्रक्रिया आता अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यात आली असून नोंदणीअर्ज भरणेशुल्क भरणेपरवाना प्राप्तीसाठी आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर सात दिवसात परवानगी मिळतेअसे मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितले.

या चर्चासत्रात विविध क्षेत्रातील तज्ज्ञउद्योजकस्टार्टअप्स आणि क्रिएटिव्ह इंडस्ट्रीशी संबंधित प्रतिनिधींनी सहभाग घेतला.

Featured post

Lakshvedhi