Monday, 2 June 2025

सिक्कीम येथे भुस्खलनामुळे अडकलेल्या राज्यातील प्रवाशांचा पुढील प्रवास सुखरूपणे सुरू राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

 सिक्कीम येथे भुस्खलनामुळे अडकलेल्या

राज्यातील प्रवाशांचा पुढील प्रवास सुखरूपणे सुरू

राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

 

मुंबईदि. २ :- अतिवृष्टी आणि तिष्टा नदीला पूर आल्याने सिक्कीम लॅचुंग येथे भुस्खलनाची घटना घडली. या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील ४० पर्यटक अडकले होते. या घटनेसंदर्भात राज्य आपत्कानील कार्य केंद्राकडून सिक्कीम येथील आपत्कालीन कार्य केंद्रासी तत्काळ संपर्क साधण्यात आला.  या संदर्भात सिक्कीम प्रशासन यांनी सूचना/ अॅडवायसरी निर्गमित केल्या आहेत. याविषयी महाराष्ट्र सदन येथील निवासी आयुक्त यांनी सिक्कीम प्रशासनाशी संपर्क साधला. सद्य:स्थितीत पाऊस थांबला असल्याने नॉर्थ सिक्कीम ते गंगटोक रस्ता चालू झाला आहे. रस्ता सुरू झाल्याने अडकलेल्या प्रवाशांचा पुढील प्रवास  सुरू झाला असल्याची माहिती राज्य आपत्कानील कार्य केंद्राकडून देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून एनटीपीसीच्या सामाजिक दायित्व निधीतून एम्समध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिटसाठी अर्थसाहाय्य एम्स नागपूरमध्ये बोन म‌ॅरो ट्रान्सप्लांट केंद्रासाठी एनटीपीसीचे महत्त्वपूर्ण योगदान

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून एनटीपीसीच्या सामाजिक दायित्व निधीतून एम्समध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिटसाठी अर्थसाहाय्य

  • एम्स नागपूरमध्ये बोन म‌ॅरो ट्रान्सप्लांट केंद्रासाठी एनटीपीसीचे महत्त्वपूर्ण योगदान

 

मुंबईदि. २ : विदर्भातील सिकल सेल आणि थायलेमिया ग्रस्त रुग्णांना नजीकच उपचारांची सोय व्हावी आणि त्यांचे उपचारांसाठी मुंबईवर असलेले अवलंबित्व कमी व्हावे यासाठी एम्स नागपूर येथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिट सुरू करण्याची संकल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. या संकल्पनेस सकारात्मक प्रतिसाद देत एनटीपीसीने या युनिटसाठी अर्थसाहाय्य दिले आहे. याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. या कराराअंतर्गत एनटीपीसी त्यांच्या सामाजिक दायित्व निधी (सीएसआरउपक्रमांतर्गत एम्स नागपूरला आर्थिक मदत करणार आहे. ही मदत बोन मॅरो ट्रान्सप्लांट (बीएमटीयुनिट उभारणी आणि गरजू रुग्णांसाठी उपचार साहाय्यासाठी वापरण्यात येणार आहे. या केंद्राचा फायदा विदर्भातील लोकांसोबत विशेषतः लहान मुलांच्या उपचारासाठी होणार आहे.

एम्स नागपूरमध्ये पहिल्या बोन मॅरो ट्रान्सप्लांट केंद्राच्या स्थापनेसाठी एनटीपीसी कडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंपनीचे आभार व्यक्त केले. हे केंद्र मध्य भारतातील संपूर्ण जनतेसाठीविशेषतः लहान मुलेआदिवासी आणि ग्रामीण भागातील लोकांसाठीएक महत्त्वाची वैद्यकीय सुविधा ठरेल. मध्य भारतात सिकल सेल आजार आणि इतर आनुवंशिक रोगांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असूनया रोगांचे उच्चाटन करणे हे देशाचे राष्ट्रीय उद्दिष्ट असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. एनटीपीसी कडून या उपक्रमासाठी पुढाकार घेतल्याने एम्स नागपूरमध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट केंद्र उभारणीसाठी आवश्यक निधी उपलब्ध होणार असूनया उपक्रमामुळे गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

साहाय्याचा तपशील :: बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिटच्या पायाभूत सुविधांसाठीरुग्णांच्या उपचार व औषधोपचारासाठी साहाय्य देण्यात येणार आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये : हे युनिट एम्स नागपूरच्या एमआयएचएएन येथील परिसरात उभारले जाणार आहे. यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसहप्रत्यारोपणासाठी आवश्यक तपासण्याऔषधेबाह्य तज्ज्ञांच्या सेवा व रुग्णोपचाराचा संपूर्ण खर्च समाविष्ट आहे. एनटीपीसीच्या निधीच्या अटींनुसारयुनिटमध्ये एनटीपीसीचा लोगो आणि सीएसआर अंतर्गत साहाय्याचे स्पष्टपणे उल्लेख केले जाणार आहे.

एनटीपीसी गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्यशिक्षण व सामाजिक विकास क्षेत्रात सामाजिक दायित्व (सीएसआरअंतर्गत विविध प्रकल्प राबवत आहे. एम्स नागपूरसारख्या शासकीय वैद्यकीय संस्थेसोबत भागीदारी करून समाजातील गरजू घटकांपर्यंत अत्याधुनिक उपचार सेवा पोहोचविण्याचा प्रयत्न आहे.

एम्स नागपूर हे प्रगत वैद्यकीय सेवा व संशोधनासाठी झपाट्याने नावारूपाला येत आहे. बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिटच्या स्थापनेमुळे ब्लड कॅन्सर व इतर गंभीर आजारांवरील उपचार नागपूरसह संपूर्ण विदर्भातील रुग्णांना मिळणार असूनत्यांना दिल्ली किंवा मुंबईसारख्या शहरांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही

एआय’च्या सहाय्याने महाराष्ट्र अन्नधान्य निर्यातीत सर्वोत्तम ठरू शकतो — देबजानी घोष

 एआय’च्या सहाय्याने महाराष्ट्र अन्नधान्य निर्यातीत सर्वोत्तम ठरू शकतो

— देबजानी घोष

 

मुंबई, दि. 5 : ‘एआय’चा वापर करून महाराष्ट्र अन्नधान्य उत्पादनात आणि निर्यातीत जगातील सर्वोत्तम राज्य बनू शकतोअसा विश्वास निती आयोगाच्या फेलो आणि नॅसकॉमच्या माजी अध्यक्षा देबजानी घोष यांनी व्यक्त केला.

'टेक वारी – महा तंत्रज्ञान प्रशिक्षण सप्ताहअंतर्गत मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात 'विकसित महाराष्ट्रासाठी फ्रंटियर तंत्रज्ञानया विषयावर त्या बोलत होत्या. यावेळी महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त आर. विमला उपस्थित होत्या. मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देबजानी घोष म्हणाल्या, "सध्या जग अन्नधान्याच्या तुटवड्याच्या संकटाला सामोरे जात आहे. महाराष्ट्राकडे  तज्ज्ञकृषी उपकरणेप्रशिक्षित कामगार आणि नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याची क्षमता आहे. योग्य नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणीद्वारे राज्य अन्नधान्याच्या जागतिक निर्यातीत आघाडीवर राहू शकते. नवीन तंत्रज्ञानसुधारित बियाणंड्रोनसिंचन प्रणाली यांचा वापर करून कृषी क्षेत्रात उत्पादनक्षमता वाढवता येईल.

२०२० ते २०३० हे दशक कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआयपर्व असणार आहे. कृषीआरोग्यऊर्जा आणि उत्पादन क्षेत्रात ‘एआय’च्या साहाय्याने मूलभूत बदल घडवता येऊ शकतात. बायोटेक म्हणजे जीवशास्त्र आणि ‘एआय’ यांचा संयोग आहे. बायोटेक म्हणजे जीवन नव्याने घडविणे होय. महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीचा पाया म्हणजे ‘आयआयटी’ मुंबईसारखी शिक्षणसंस्थास्टार्टअप इकोसिस्टमउद्योगजगतडिजिटल इकॉनॉमीग्रीन एनर्जी आणि प्रगत धोरणे यामुळे राज्य देशाच्या ‘जीडीपी’मध्ये मोठा वाटा उचलू शकते. असेही त्यांनी सांगितले.

आर. विमला यांनी सांगितले कीफक्त ‘एआय’वर अवलंबून राहून चालणार नाहीतर विज्ञान आणि ‘एआय’ व इतर आघाडीच्या तंत्रज्ञानांच्या साहाय्याने उद्योग आणि कृषी क्षेत्रात ठोस योजना आखून काम करणे गरजेचे आहे. त्यासाठी अंमलबजावणी अत्यंत महत्त्वाची असल्याचेही त्यांनी सांगितले.

कामकाजात सुलभता आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा

 कामकाजात सुलभता आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा

– मंदार कुलकर्णी

 

 मुंबईदि. 5 : प्रशासकीय कामकाज अधिक सुलभगतिमान आणि कार्यक्षम करण्यासाठी आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे आवश्यक आहेअसे मत मायक्रोसॉफ्टचे अधिकारी मंदार कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

   टेक-वारी कार्यक्रमाच्या निमित्ताने मंत्रालयात शासकीय कामकाज प्रभावीपणे कसे करावे’ या विषयावर मंदार कुलकर्णी बोलत होते.

   मंदार कुलकर्णी म्हणालेगुगलडॉक्ससारख्या डिजिटल साधनांद्वारे फाईल तयार करणेती सुरक्षित जतन करणे आणि थेट ईमेलद्वारे पाठवणे शक्य होते. त्यामुळे कागदपत्रांची देवाणघेवाण अधिक वेगाने होते आणि वेळेची बचत होते. डिजिटल साधनांचा वापर करून प्रशासनिक कामकाज अधिक सुलभ करता येते. मायक्रोसॉफ्ट कोपायलट हा एक एआय-संचालित डिजिटल सहायक असूनतो विविध कार्यालयीन कामकाजात मदतीसाठी डिझाइन करण्यात आला आहे.

 डेटा विश्लेषणासाठी पिव्होट टेबल्स सारख्या सुविधांचा वापर करून मोठ्या प्रमाणातील डेटा वर्गवारीनुसार सादर करता येतो. डिजिटल युगात सायबर सुरक्षेचे वाढते महत्त्व अधोरेखित करताना श्री. कुलकर्णी म्हणालेवैयक्तिक माहितीशासकीय कागदपत्रे किंवा कार्यालयीन डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी नियमित बॅकअप व विश्वासार्ह अँटीव्हायरस वापरणे अत्यावश्यक आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशासनातील कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा असेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रश्नोत्तर सत्रात त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

3मीरा-भाईंदर महापालिकेच्या विकासकामांचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आढावा

 3मीरा-भाईंदर महापालिकेच्या विकासकामांचा

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आढावा

 

मुंबईदि. 5 :- मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात  सुरू असलेल्या विविध विकासकामांचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आढावा घेऊन विकासकामे गतीने करण्याच्या सूचना  यंत्रणेला दिल्या.

मंत्रालय येथे परिवहन मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्यासह पुरातत्वपरिवहनमहसूलपर्यावरण आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

परिवहन मंत्री सरनाईक म्हणालेमीरा-भाईंदर महापालिकेकडील विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. विकासकामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्याबरोबरच ती विहित कालमर्यादेत करावीत. महसूल विभागाने बी.एस.यू.पी. योजनेंतर्गत यापुर्वी हस्तांतर केलेल्या जागेपैकी सद्यस्थितीत झोपडपट्टी असलेल्या जागेत पीपीपी तत्त्वावर इमारती बांधकामांसाठी जागा मीरा भाईंदर महापालिकेला हस्तांतर करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा.

विकासकामांचा आढावा घेताना परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले कीशिवसृष्टीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू करावेखाडी किनारा विकसित करणे व स्काय वॉकची जागा रिकामी करून काम सुरू करावेचेना रिव्हर फ्रंट 18 मीटर जागेचे भूसंपादन करावेमहापालिका मुख्यालय भूसंपादनासाठी आवश्यक असलेला निधी वर्ग करावापर्यटन स्थळ विकासशिवसृष्टी प्रकल्पकांदळवन उद्यान या कामांचाही यावेळी आढावा घेण्यात आला. घोडबंदर किल्ला व परिसरात कामे करण्याबाबत महापालिकेस परवानगी देण्याबाबतही परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांनी निर्देश दिले.

Many Tools Available for Using Innovative Technology in Government Work

 Many Tools Available for Using Innovative Technology in Government Work

– Agriculture Commissioner Suraj Mandhare

 

Mumbai, May 6: Several tools are available for using innovative technology in government work for managing information, time planning, monitoring tasks, and reporting. Using such tools will certainly enhance efficiency in official operations, said Agriculture Commissioner Suraj Mandhare.

As part of the skill development of administrative officers and staff under the "Tech Wari: Maharashtra Tech Learning Week," a lecture on “Effective Use of Technology” was delivered by Agriculture Commissioner Suraj Mandhare and Dr. Vikas Naik, Joint CEO of the Maharashtra State Innovation Society, at the Conference Hall, 6th Floor, Mantralaya. Resident Commissioner R. Vimala from Maharashtra Sadan, New Delhi, along with trainees, was present at the session.

Commissioner Mandhare stated that tools like Google Keep, Evernote, Microsoft OneNote, Google Drive, Dropbox, ClickUp, Microsoft To Do, Google Calendar, Google Sheets, and Telegram can help speed up work. Technology is something that brings everyone to the same level without any discrimination. It benefits everyone regardless of physical ability, color, caste, or religion.

He added that using tools like Microsoft OneNote can help resolve many governance-related challenges. Tablets with stylus pens are extremely useful in administrative tasks. The focus should be on smart work rather than hard work. While working for the government, one is also expected to be technologically proficient, he emphasized.

Dr. Vikas Naik, Joint CEO of the Maharashtra State Innovation Society, said that if technology is used properly, government functioning can be more effective and timely. Applications like "Any.do" can be used for task management and Excel can be useful for managing data at the field level.

      While giving information about the ‘Maharashtra Civil Service’ website, Mr. Naik stated that citizens can ask questions related to any department on this platform and receive direct responses from officials.

He also provided information about the "Mahasampark" application, which helps in easily accessing information about officers in the Indian Administrative Service and public representatives. He emphasized that there is a need for problem-solving technologies in the administrative system, and technology provides powerful tools for that purpose.

Highlighting the importance of combining innovative initiatives with technology, he gave details of various schemes of the Maharashtra State Innovation Society.

0000

 

सरकारी कार्यों में नवाचार तकनीक के उपयोग के लिए कई टूल्स उपलब्ध

 सरकारी कार्यों में नवाचार तकनीक के उपयोग के लिए कई टूल्स उपलब्ध

– कृषि आयुक्त सूरज मांढरे

 

मुंबई6 मई : सरकारी कार्यों में सूचना प्रबंधनसमय नियोजनकार्य की निगरानी और रिपोर्टिंग के लिए नवाचार तकनीक के कई टूल्स उपलब्ध हैं। इन टूल्स का उपयोग करने से निश्चित ही शासकीय कामकाज में गति आएगीऐसा मत कृषि आयुक्त सूरज मांढरे ने व्यक्त किया।

"टेक वारी: महाराष्ट्र टेक लर्निंग वीक" के अंतर्गत प्रशासनिक अधिकारियों और कर्मचारियों के कौशल विकास हेतु मंत्रालय के परिषद सभागृह6वीं मंजिल पर प्रभावी तकनीकी उपयोग’ विषय पर कृषि आयुक्त सूरज मांढरे और महाराष्ट्र राज्य नवाचार सोसायटी के सह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास नाईक द्वारा व्याख्यान आयोजित किया गया। इस अवसर पर महाराष्ट्र सदननई दिल्ली की निवासी आयुक्त आर. विमला समेत प्रशिक्षणार्थी उपस्थित थे।

कृषि आयुक्त मांढरे ने कहा कि गूगल कीपएवरनोटमाइक्रोसॉफ्ट वन नोटगूगल ड्राइवड्रॉपबॉक्सक्लिकअपमाइक्रोसॉफ्ट टू डूगूगल कैलेंडरगूगल शीट्स और टेलीग्राम जैसे टूल्स का उपयोग कर कार्य को अधिक गतिशील बनाया जा सकता है। टेक्नोलॉजी एक ऐसी चीज है जो बिना किसी भेदभाव के सभी को एक समान स्तर पर लाती है। यह शारीरिक स्थितिरंगजाति या धर्म की परवाह किए बिना सभी के लिए उपयोगी होती है।

उन्होंने यह भी कहा कि अगर माइक्रोसॉफ्ट वन नोट जैसे टूल्स का सही उपयोग किया जाए तो शासन के कई मुद्दे हल हो सकते हैं। पेंसिल के साथ टैबलेट प्रशासनिक कार्यों में बेहद उपयोगी हैं। अब मेहनत से अधिक स्मार्ट कार्य प्रणाली पर जोर देना चाहिए। शासन के लिए कार्य करते हुए स्वयं को भी तकनीकी रूप से दक्ष बनाना आवश्यक हैयह भी उन्होंने कहा।

महाराष्ट्र राज्य नवाचार सोसायटी के डॉ. विकास नाईक ने बताया कि तकनीक का सही उपयोग करने से शासकीय कार्य अधिक प्रभावी और समयबद्ध हो सकते हैं। टास्क मैनेजमेंट के लिए 'Any.do' जैसे एप्लिकेशन का उपयोग कर कार्य की जानकारी रखी जा सकती है और एक्सेल का उपयोग क्षेत्रीय स्तर पर डेटा प्रबंधन के लिए उपयुक्त होता है।

महाराष्ट्र सिविल सर्विस’ पोर्टल की जानकारी देते हुए श्री. नाईक ने कहा कि इस प्लेटफॉर्म पर नागरिक किसी भी विभाग से संबंधित प्रश्न पूछ सकते हैं और अधिकारियों से सीधे उत्तर प्राप्त कर सकते हैं। साथ ही, 'महासंपर्कएप्लिकेशन के माध्यम से भारतीय प्रशासनिक सेवा के अधिकारियों और जनप्रतिनिधियों की जानकारी सरलता से प्राप्त की जा सकती हैयह जानकारी भी उन्होंने दी। प्रशासनिक व्यवस्था में समस्याओं के समाधान हेतु तकनीक आधारित उपायों की आवश्यकता है और इसके लिए तकनीक प्रभावी साधन प्रदान करती हैयह भी उन्होंने कहा।

महाराष्ट्र स्टेट इनोवेशन सोसायटी की विभिन्न योजनाओं की जानकारी देते हुए उन्होंने नवाचार पहल और तकनीकी साधनों के समन्वय का महत्व रेखांकित किया।

0000

Featured post

Lakshvedhi