Wednesday, 16 April 2025

Policy for Compensation in Case of Death in Custody Finalized

 Policy for Compensation in Case of Death in Custody Finalized

If a prisoner in the state's jails dies due to unnatural causes, compensation will be provided to their heirs as per the recommendation of the National Human Rights Commission. The Cabinet approved this policy during today's meeting, chaired by Chief Minister Devendra Fadnavis.

Under this policy, if a death occurs in prison due to an accident during work, negligence by medical officers, assault by jail staff, or disputes among prisoners, and if administrative negligence is proven during the investigation, the heirs of the deceased will receive a compensation of five lakh rupees. In the case of suicide, the heirs will receive a compensation of one lakh rupees.

This policy will be applicable across all prisons in the state. No compensation will be given in cases where the death occurs due to old age, prolonged illness, during an escape attempt, while on bail, or due to denial of treatment. However, compensation will be provided as per the existing government policy in case of death due to a natural disaster.

To claim compensation, the concerned prison authorities will need to submit a report along with documents such as preliminary inquiry, post-mortem report, medical records, police investigation, and district collector’s examination to the regional department heads. After a detailed investigation, the final proposal will be submitted to the Additional Director General and Inspector General of Prisons and Correctional Services, Maharashtra, Pune. After their recommendations, the decision will be made at the government level, and compensation will be provided. Action will be taken against officials found guilty in death-related case

दर्गाह शरीफ शाह तजम्मुल शाह ऊर्फ पंखेवाले बाबा ट्रस्टच्या मिळकतीची फेरमोजणी करा

 दर्गाह शरीफ शाह तजम्मुल शाह ऊर्फ पंखेवाले

बाबा ट्रस्टच्या मिळकतीची फेरमोजणी करा

मंत्री दत्तात्रय भरणे

 

मुंबईदि. १६ : घाटकोपर येथील दर्गाह शरीफ शाह तजम्मुल शाह ऊर्फ पंखेवाले बाबा अ‍ॅण्ड मस्जिद ट्रस्टच्या मिळकतीमध्ये होत असलेल्या अनधिकृत बांधकामांबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मिळकतीची फेरमोजणी करण्याच्या सूचना अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.

मंत्रालयात दर्गाह शरीफ शाह तजम्मुल शाह अलियास पंखेवाले बाबा अँण्ड मस्जीद ट्रस्टघाटकोपरमुंबई यांच्या मिळकतीमध्ये होत असलेल्या अनाधिकृत बांधकामाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मंत्री श्री. भरणे बोलत होते. यावेळी अल्पसंख्याक विभागाचे सचिव रुचेश जयवंशीउपसचिव मिलिंद शेनॉयमुख्य कार्यकारी अधिकारी जुनेद सय्यददर्गाह शरीफ शाह तजम्मुल शाह अलियास पंखेवाले बाबा अँण्ड मस्जीद ट्रस्टचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री श्री. ेभरणे यावेळी म्हणाले कीफेरमोजणी दरम्यान दोषी आढळणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी,  असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

00000


तमाशा व कलाकेंद्र कलावंतांच्या तक्रारी निवारणासाठी समिती गठीत

 तमाशा व कलाकेंद्र कलावंतांच्या तक्रारी निवारणासाठी समिती गठीत

 

मुंबईदि. 16 : राज्यातील तमाशा आणि कलाकेंद्र कलावंतांच्या विविध तक्रारींचे निवारण करण्यासाठी दोन स्वतंत्र समित्यांच्या गठनाचा निर्णय सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी घेतला आहे.  

या समित्या तमाशा आणि कलाकेंद्र क्षेत्रातील फड मालककलाकारवादक यांच्यासमोरील समस्या समजून घेऊनपारंपरिक लोककला टिकवून ठेवण्यासाठी उपाययोजना सुचवतीलअशी माहिती मंत्री ॲड.शेलार यांनी दिली.

तमाशा तक्रार निवारण समितीमध्ये सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे अध्यक्ष असणार असूनतमाशा फड मालक रघुवीर खेडकरतमाशा फड मालक गोपाळ नाना शेषेराव, फड मालक संभाजी जाधवकलाकार मंगलाताई बनसोडेकलाकार अतांबर तात्या शिरढोणकरअभ्यासक गणेश चंदनशिवेअभ्यासक खंडुराज गायकवाड व सहसंचालक सदस्य म्हणून काम पाहतील. 

कलाकेंद्र तक्रार निवारण समितीमध्ये संचालक सांस्कृतिक कार्य हे अध्यक्ष असणार असूनकलाकेंद्र मालक बाळासाहेब काळेकलाकेंद्र मालक अभिजित काळेकलाकार रेश्मा परितेकरकलाकार सुरेखा पुणेकरकलाकार प्रमिला लोदगेकरकलाकार संघटनेचे धोंडीराम जावळेअभ्यासक प्रकाश खांडगे व सहसंचालक हे सदस्य म्हणून काम पाहतील.

या समित्यांचा कार्यकाळ 30 दिवसांचा असूनआवश्यकतेनुसार या क्षेत्रातील इतर अभ्यासककलाकार आणि कलाकेंद्र चालक यांनाही पाचारण करण्यात येणार आहे. या समित्यांमार्फत प्राप्त होणाऱ्या शिफारसीनुसार शासनाकडून निर्णय घेतला जाणार आहे.

 

बनावट शालार्थ आयडी प्रकरणी संबंधितांविरोधात फौजदारी गुन्हा

 बनावट शालार्थ आयडी प्रकरणी संबंधितांविरोधात फौजदारी गुन्हा

-शालेय शिक्षण विभागाची माहिती

 

            मुंबईदि. 15 - नागपूर जिल्ह्यामधील बनावट शालार्थ आयडी प्रकरणाचे गांभीर्य विचारात घेता सर्व संबंधितांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावाअसे निर्देश शालेय शिक्षण आयुक्त यांना देण्यात आले असल्याचे शालेय शिक्षण विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

            नागपूर जिल्ह्यामध्ये 2019 पासून सुमारे 580 प्राथमिक / माध्यमिक शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक मान्यतेचे आदेश तसेच शालार्थ आयडी प्रदान करण्याच्या आदेशांची कोणतीही शहानिशा न करता बनावट शालार्थ आयडी प्रदान करण्यात आल्याबाबत विविध माध्यमांमधून बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. याअनुषंगाने शिक्षण विभागामार्फत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. शिक्षण संचालक, (प्राथमिक)पुणे यांनी 23 ऑगस्ट 2024 रोजीच्या आदेशान्वये विभागीय अध्यक्षनागपूर विभागीय मंडळ यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत केली होती. त्यानुसार चौकशी अधिकारी यांनी सन 2019 पासून बनावट शालार्थ आयडी प्रदान झालेल्या एकूण 580 प्राथमिक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची यादी विभागीय शिक्षण उपसंचालकनागपूर यांच्या कार्यालयास उपलब्ध करुन दिली आहे.

            या यादीची तपासणी केली असताविभागीय शिक्षण उपसंचालकनागपूर यांच्या कार्यालयाकडून शालार्थ आयडीचे आदेश निर्गमित झालेले नसताना ऑनलाईन शालार्थ प्रणालीचा पासवर्ड हॅक करुन किंवा गैरवापर करुन शालार्थ आयडीचे ड्राफ्ट जनरेट केल्याची बाब निदर्शनास आल्याचे तसेच आहरण व संवितरण अधिकारीलेखाधिकारी यांचा शालार्थ लॉगीन आयडी व पासवर्डचा गैरमार्गाने वापर करुन संबंधित शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नावाचा ड्राफ्ट शालार्थ प्रणालीमध्ये टाकून सदर ड्राफ्ट शाळेकडे फॉरवर्ड करुन अधीक्षकवेतन व भ.नि.नि. पथक (प्राथमिक) जिल्हा परिषद नागपूर यांनी अॅप्रुव्हड करून वेतन देयक व थकीत देयक काढल्याचे निदर्शनास आले असल्याचे दि. मार्च 2025 च्या पत्रान्वये शिक्षण आयुक्त यांच्या कार्यालयास कळविले आहे.

            शिक्षण आयुक्त कार्यालयाने 10 मार्च, 2025 च्या पत्रान्वये सदर प्रकरणामध्ये शासकीय निधीचा अपहार झाल्याबाबतचा अहवाल शासनास सादर केला आहे. त्यानुषंगाने वेतन व भ.नि.नि. पथक (प्राथमिक) जिल्हा परिषद नागपूरचे अधीक्षक निलेश वाघमारे यांचा उपरोक्त नमूद शासकीय निधीच्या अपहारामध्ये सहभाग असल्याचे चौकशीमध्ये आढळून आले असल्याने त्यांच्याविरुद्ध तसेच सर्व संबंधित अधिकारीकर्मचारी यांच्याविरोधात शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली आहे. तसेच एप्रिल, 2025 च्या आदेशान्वये निलेश वाघमारे यांना शासन सेवेतून निलंबित करण्यात आलेले आहे.

            या प्रकरणाचे गांभीर्य विचारात घेता विभागीय शिक्षण उपसंचालकनागपूर कार्यालयशिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक) नागपूर कार्यालयअधीक्षकवेतन व भ.नि.नि. पथक (प्राथमिक) जि.प. नागपूर कार्यालयातील संबंधित सर्व अधिकारी/ कर्मचारी तसेच खासगी अनुदानित शाळांमधील जबाबदार कर्मचारी/ पदाधिकारी यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावाअसे निर्देश शिक्षण आयुक्त यांना देण्यात आले असल्याचे शालेय शिक्षण विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

00000

बी.सी.झंवर/विसंअ

लघु सिंचन योजनासह,जलसाठ्यांच्या प्रगणनेचे काम यंत्रणांनी समन्वयाने करावे

 लघु सिंचन योजनासह,जलसाठ्यांच्या

प्रगणनेचे काम यंत्रणांनी समन्वयाने करावे

-जिल्हाधिकारी आंचल गोयल

 

मुंबईदि 15 :- लघु सिंचन योजनांची व जलसाठ्यांचे प्रगणनेचे काम विहित  वेळेत पूर्ण होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावेअशा सूचना मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिल्या.

 

लघु पाटबंधारे योजनांची सातवी प्रगणना व जलसाठ्यांची प्रगणना कामांबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी तथा समितीच्या अध्यक्षा आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. बैठकीस ठाणे जिल्ह्याचे जलसंधारण अधिकारी तथा  समन्वय समितीचे सदस्य सचिव फरीद खानउपसचिव सुशील महाजन यांच्यासह संबधित अधिकारी उपस्थित होते.

 

जल व्यवस्थापनामध्ये जलसाठ्यांच्या प्रगणनेला अधिक महत्व असल्याचे सांगून जिल्हाधिकारी श्रीमती गोयल म्हणाल्याप्रगणनेद्वारे प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे भविष्यातील नवीन लघु सिंचन योजनांसाठी  व पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी सुयोग्य नियोजन करणे शक्य होणार आहे. लघुसिंचन योजनेची सातवी प्रगणनाजलसाठ्यांची दुसरी प्रगणना आणि मोठ्या व मध्यम प्रकल्पाची पहिली प्रगणना मुंबई शहर जिल्ह्यासाठी प्रथमच होत आहे. जलसाठ्यांच्या प्रगणनेचे हे काम सहा महिन्यात पूर्ण करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. प्रगणनेच्या कामासाठी प्रगणक व परीक्षकांची नियुक्ती करून त्यांना पुढील आठवड्यात याबाबतचे प्रशिक्षण देण्यात यावे. त्यानंतर त्वरित प्रगणेनेच्या कामास सुरुवात करावीअशा सूचनाही जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी दिल्या.

अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करा

 अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करा

- कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर

 

मुंबईदि १५ : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी कुरकुंभ (ता. दौंड जि. पुणे) येथील औद्योगिक क्षेत्रात संयुक्तीकरित्या मोहिम राबवून कारखान्याद्वारे होणाऱ्या प्रदूषणाचे नमुने घेऊन आवश्यक कार्यवाही करावी. या मोहिमेमध्ये संबंधीत ग्रामपंचायत प्रतिनिधी सुध्दा घ्यावेतअसे निर्देश कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी दिले.

 

अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित झालेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने कामगार विभागाने बैठक आयोजित करणे तसेच पुणे जिल्ह्यातील कुरकुंभ येथील अल्कली अमाइन्स कंपनीमध्ये नुकताच झालेला स्फोट आणि त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीसंदर्भात उद्योग विभागपर्यावरण विभाग आणि कामगार विभाग यांची बैठक कामगार मंत्री ॲड. फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस आमदार राहुल कुलकुरकुंभ एमआयडीसीमधील संबंधित अधिकारीरासायनिक उद्योग प्रतिनिधीपर्यावरण विभागकामगार विभागसंबंधित ग्रामपंचायत प्रतिनिधी तसेच मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी परिसरातील सुरक्षेच्या उपाययोजनांची माहिती दिली. कुरकुंभ परिसरात बहुसंख्य रासायनिक उद्योग कार्यरत असल्याने संभाव्य अपघात रोखण्यासाठी विशेष उपाययोजना आवश्यक असल्याचे मत मंत्री ॲड.फुंडकर यांनी व्यक्त केले. त्यांनी त्वरित उपाययोजना करण्यासाठी स्वतंत्र पथक गठित करून औद्योगिक परिसराची सखोल तपासणी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना यावेळी दिले.

यावेळी आमदार राहुल कुल यांनी एमआयडीसी परिसरातील कॉमन इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट (CETP) संदर्भातील मुद्दा उपस्थित केला. त्यांनी निदर्शनास आणून दिले कीजे उद्योग प्रदूषित पाण्याची निर्मिती करताततेच उद्योग सीईटीपी चालवतातयामुळे प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण राहात नाही. याबाबत धोरणात्मक फेरआढावा घेऊन अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे पाहणी करावी आणि आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यातअसे निर्देश मंत्री ॲड.फुंडकर यांनी दिले.

कामगार मंत्री ॲड.फुंडकर यांनी फायर ऑडीट संबधित महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम२००६ अंतर्गतचे नियम तात्काळ कार्यान्वित करण्यासाठी उद्योग विभागासोबत समन्वय साधण्याच्या सूचना यावेळी दिल्या.

कामगार विभागाकडे प्रदूषण नियंत्रण व सांडपाण्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी नसल्याने कामगार मंत्री ॲड.फुंडकर यांनी संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश यावेळी 

थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्रासाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्यात येणार -

 थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्रासाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्यात येणार

-         आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

 

मुंबई, दि. 15 : थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्रासाठी लवकरच प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले .

निर्मल भवन येथे थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र बाबत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी  सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त अमगोथू श्रीरंग नायक तसेच मंत्रालयातील संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या म्हणणे थॅलेसेमिया आजारावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात थॅलेसेमिया मुक्तीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी हे पाऊल उचललं आहे.या उपक्रमांद्वारे थॅलेसेमिया सारख्या गंभीर अनुवंशिक आजारावर नियंत्रण मिळवूनमहाराष्ट्राला या आजारापासून मुक्त करण्याचा राज्य शासनाने निर्धार केला आहे.

जनजागृतीचे विशेष अभियान

थॅलेसेमिया आजाराबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्यभर व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे.  ग्रामपंचायत स्तरापासून ते शहरांपर्यंत विविध माध्यमांतून माहिती दिली जाणार आहे. थॅलेसेमियाच्या निदानासाठी खासगी रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये काही विशिष्ट तपासण्या अनिवार्य केल्या जाणार आहेत. यामुळे वेळेवर निदान होऊन पुढील पिढीत हा आजार पसरण्यापासून रोखता येईल.

थॅलेसेमिया आजाराचे निदानव्यवस्थापन आणि समुपदेशन यासाठी आरोग्य यंत्रणेतील अधिकाधिक कर्मचाऱ्यांना विशेष कार्यशाळांद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे गावागावांपर्यंत या आजाराविषयी योग्य माहिती पोहोचवता येईल.

थॅलेसेमिया झालेल्या रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक आधार देण्यासाठी समुपदेशन सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यावेळी लक्ष्मीकांत पिंपळगावकर यांनी या आजारावरील सविस्तर माहितीच्या सादरीकरण केले.

०००००००

Featured post

Lakshvedhi