Thursday, 10 April 2025

पाचाड येथे रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून सोयी सुविधांची उभारणी

 पाचाड येथे रायगड विकास प्राधिकरणाच्या

माध्यमातून सोयी सुविधांची उभारणी

-         सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार

मुंबईदि. 19 : रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथील राजमाता जिजाऊ समाधीस्थळी रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून सर्व सोयी सुविधांची उभारणी करण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार यांनी विधानपरिषदेत दिली.

            सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर  देताना शेलार बोलत होते. यावेळी सदस्य विरोधी पक्ष नेते बादास दानवेसदस्य प्रवीण दरेकर यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.

            रायगड किल्ला आणि परिसराच्या विकासासाठी रायगड विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आल्याची माहिती देऊन सांस्कृतिक कार्य मंत्री शेलार म्हणाले कीरायगड विकास प्राधिकरणास शासनाने 600 कोटींचा निधी दिला आहे. हा निधी त्यांच्याकडे वर्गही करण्यात आला आहे. पाचाड येथील राजमाता जिजाऊ यांच्या समाधीस्थळाची जागा आता भारतीय पुरातत्व विभागाकडे आहे. त्यांचे निकष आणि नियमांनुसार या परिसरात  सोयी सुविधा उभारण्यासोबतच सुशोभिकरणाचे काम करण्यात येत आहे. तसेच रायगडचा परिसर जागतिक वारसास्थळ म्हणून जाहीर होण्याच्या अंतिम टप्प्यात आले. त्यामुळे याठिकाणी जागतिक दर्जाच्या सोयी सुविधा उभारण्यात येत आहेत. यामध्ये पाचाडच्या परिसराचाही समावेश आहे. जवळच उपलब्ध असलेल्या पर्यटन विभागाच्या जागेमध्येही पर्यटकांसाठी सुविधा निर्माण करण्यात येतील. तसेच सातारा जिल्ह्यातील संगम माहुली येथील छत्रपती शाहू महाराज यांची समाधी आणि महाराणी ताराराणी यांच्या समाधीस्थळाचेही संवर्धन करण्यात येणार आहे. सिंखेडराजा येथील राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाचे जतन आणि सवंर्धन करण्यात येत असल्याची माहितीही सांस्कृतिक कार्य मंत्री शेलार यांनी दिली.

0000

टीसीएस आणि एअर न्यूझीलँड यांच्यात एआय-सक्षम परिवर्तनासाठी भागीदारी

 टीसीएस आणि एअर न्यूझीलँड यांच्यात

एआय-सक्षम परिवर्तनासाठी भागीदारी

 

मुंबईदि. १९ : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि एअर न्यूझिलँड यांनी पाच वर्षांची भागीदारी जाहीर केली आहे. या कराराअंतर्गतटीसीएस एअरलाइनच्या डिजिटल पायाभूत सुविधा सुधारणार असूनएआय-सक्षम नवकल्पना आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी सहाय्य करणार आहे. या सहयोगामुळे एअर न्यूझिलॅडच्या डिजिटल क्षमता वाढणार असूनप्रवासी अनुभव सुधारेल आणि तांत्रिक कार्यक्षमता मजबूत केली जाईल. यामध्ये फ्लिट मॅनेजमेंटक्रू शेड्युलिंग आणि ग्राउंड सर्व्हिसेस यांसारख्या प्रमुख सेवा क्षेत्रांचा समावेश आहे.

मुंबईतील टीसीएस येथे झालेल्या कराराच्या औपचारिक घोषणेसाठी न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्टोफर लक्सनटाटा समूहाचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरनएअर न्यूझिलॅंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रेग फोरन आणि टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. कृतिवासन आदी उपस्थित होते.

न्यूझिलंडचे क्रिस्टोफर लक्सन म्हणाले कीटाटा समुहाने भारताच्या विकासात आणि उद्योगांच्या वृद्धीमध्ये मोठा प्रभाव टाकला आहे. न्यूझिलंड आंतरराष्ट्रीय स्तरावर गुंतवणुकीसाठी उत्सुक आहे. न्यूझिलंड आणि भारत या दोन देशांमधील आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.

टाटा समुहाचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन म्हणाले कीभारतीय अर्थव्यवस्था अतिशय वेगाने वाढत आहे. त्याचबरोबर रस्तेग्रामीण भागातील सुविधागोदामेबंदरेसुविधा केंद्रेविमानतळरूग्णालये आणि शाळा यांची गरज आहे. उत्पन्नाच्या संधी वाढत असून ही वाढ बऱ्याच काळ सुरू राहणार आहे. त्यामुळे न्यूझिलँड आणि भारत यांच्यातील व्यापार वाढेल आणि यात भारत सक्रिय सहभाग घेईल.

एअर न्यूझिलँडचे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रेग फोरन म्हणाले कीटीसीएसच्या अत्याधुनिक तंत्रज्ञान कौशल्याचा वापर करून आम्ही ग्राहक अनुभव सुधारूऑपरेशन्स अधिक सुरळीत करू आणि सायबरसुरक्षा तसेच डेटा संरक्षण मजबूत करू. या भागीदारीमुळे आमच्या डिजिटल प्रवासाला गती मिळेल.

टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. कृतिवासन म्हणाले कीएअर न्यूझिलँड सोबत ही भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. आमच्या नवकल्पनाशील तंत्रज्ञानाच्या मदतीने एअरलाइन ऑपरेशन्समध्ये नवीन मानके प्रस्थापित करू. ही भागीदारी जागतिक स्तरावर डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असेल.

एअर न्यूझिलँडला डिजिटलदृष्ट्या प्रगत एअरलाइन बनविण्याच्या उद्देशाने ही भागीदारी करण्यात आली असून एआयऑटोमेशन आणि क्लाउड तंत्रज्ञानाच्या मदतीने एअरलाइनच्या कार्यपद्धती सुधारल्या जातील. त्याचबरोबर प्रवाशांसाठी अधिक वेगवानसुरक्षित आणि सुलभ सेवा निर्माण करण्यात येणार आहेत. टीसीएसच्या कस्टमाइज्ड डिजिटल सोल्यूशन्सच्या मदतीने कार्गो सेवाडिस्रप्शन मॅनेजमेंटरिटेल ऑफरिंग्समेंटेनन्स सिस्टीम आणि क्रू ऑपरेशन्स यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात येणार आहे.

टीसीएस ही गेल्या ३७ वर्षांपासून न्यूझीलंडमधील डिजिटल परिवर्तनासाठी विश्वासू भागीदार आहे. ऑकलंडमधील कार्यालयातून बँकिंगरिटेलबांधकामउत्पादन आणि स्थानिक प्रशासन क्षेत्रातील वीसपेक्षा जास्त प्रमुख कंपन्यांसाठी सेवा देत आहे.

एअर न्यूझिलॅंड दरवर्षी १५ दशलक्षाहून अधिक प्रवाशांना सेवा देतेआणि आठवड्यातून ३ हजार ४०० हून अधिक उड्डाणे पार पाडते. या नव्या करारामुळे एअरलाइनच्या डिजिटल रीटेल आणि लॉयल्टी प्रोग्रॅम मध्येही सुधारणा होणार आहे. या महत्त्वाच्या भागीदारीमुळे एआय-सक्षम डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन च्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले असूनएव्हिएशन इंडस्ट्रीसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा असेल.

एमपीएससी परीक्षा यावर्षीपासून युपीएससीच्या धर्तीवर होणार

 एमपीएससी परीक्षा यावर्षीपासून युपीएससीच्या धर्तीवर होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. १९ : सन २०२५ पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा ह्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीप्रमाणे डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात घेण्यात येईल. तसेच या स्पर्धा परीक्षांचे आणि मुलाखतीचे संपूर्ण वेळापत्रक तयार करून त्यानुसार त्या घेतल्या जातीलअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.

विधान परिषद सदस्य शिवाजीराव गर्जेप्रवीण दरेकर आणि विक्रम काळे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होतीत्यास मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १२ नोव्हेंबर २०२४ च्या पत्रान्वये ६१७ उमेदवाराची शासनास शिफारस केली होती. त्यातील कागदपत्रे तपासणीसाठी हजर ५४० उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आली. महाराष्ट्रातील विद्यार्थी हा युपीएससी सोबत एमपीएससीची परीक्षा देत असतो. दोन्ही परीक्षेचा पॅटर्न वेगळा असल्याने तो आता एकसमान करण्यात येत आहे. त्याचबरोबर एमपीएससीला अधिक सक्षम करण्यासाठी नवीन पदे सुधारित आकृतीबंधाद्वारे मंजूर करण्याची कार्यवाही सुरू आहे. यापुढे वर्ग १वर्ग २ आणि वर्ग ३ ची पदभरती अधिक गतीने करण्यासाठी आयोगाची पुनर्रचना केली जाईलअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

कैंसर निदान और उपचार हेतु संदर्भ सेवाओं की कार्यप्रणाली निर्धारित करें

 आरोग्य संस्थानों को मजबूत करने के लिए एशियाई विकास बैंक के सहयोग से 'मिशनचलाएं – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कैंसर निदान और उपचार हेतु संदर्भ सेवाओं की कार्यप्रणाली निर्धारित करें

 

मुंबईदिनांक 9 अप्रैल – राज्य में स्वास्थ्य उपकेंद्रों से लेकर संदर्भ सेवा अस्पतालों तक की विभिन्न स्वास्थ्य संस्थाओं को सशक्त बनाने के लिए एक विस्तृत परियोजना तैयार करने का निर्देश देते हुए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि इस परियोजना को एशियाई विकास बैंक (ADB) के सहयोग से एक मिशन’ के रूप में क्रियान्वित किया जाए।

सह्याद्री अतिथि गृह में एशियाई विकास बैंक के सहयोग से चिकित्सा शिक्षा और सार्वजनिक स्वास्थ्य विभाग की परियोजनाओं की समीक्षा बैठक आयोजित की गई थी। इस बैठक की अध्यक्षता मुख्यमंत्री श्री फडणवीस ने की। इस अवसर पर चिकित्सा शिक्षा मंत्री हसन मुश्रीफसार्वजनिक स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्री प्रकाश आबिटकरमित्रा संस्था के मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशीवित्त विभाग के अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्तासार्वजनिक स्वास्थ्य विभाग के सचिव वीरेंद्र सिंहचिकित्सा शिक्षा विभाग के सचिव धीरज कुमारआयुक्त राजीव निवतकर आदि उपस्थित थे। एशियाई विकास बैंक के प्रतिनिधि निशांत जैन वीडियो कॉन्फ्रेंसिंग के माध्यम से बैठक में शामिल हुए।

मुख्यमंत्री ने कहा कि केंद्र सरकार ने राष्ट्रीय कैंसर उपचार नीति लागू की है। इसी तर्ज पर कैंसर के निदान और उपचार के लिए प्रभावी संदर्भ सेवा प्रणाली की कार्यप्रणाली तय की जानी चाहिए। कैंसर उपचार में कीमोथैरेपीरेडिएशन थैरेपी जैसी पद्धतियों को शामिल किया जाना चाहिए और इसके लिए निर्धारित समयसीमा के अंतर्गत कार्यवाही सुनिश्चित की जानी चाहिए।

चिकित्सा शिक्षा और सार्वजनिक स्वास्थ्य विभाग को निर्देश दिया गया कि वे स्वास्थ्य संस्थाओं को मजबूत करने हेतु विस्तृत परियोजना रिपोर्ट तैयार करें। नागरिकों को गुणवत्तापूर्ण स्वास्थ्य सेवाएं प्रदान करने के लिए नवाचारों का समावेश किया जाए।

मुख्यमंत्री ने कहा कि राज्य में सरकारी मेडिकल कॉलेज स्थापित किए जा रहे हैं। इन कॉलेजों के लिए संबंधित जिलों के सार्वजनिक स्वास्थ्य विभाग के अस्पतालों को संलग्न किया गया है। जहां जनसंख्या और रोगियों की संख्या अधिक हैवहां स्वतंत्र अस्पतालों की स्थापना के भी निर्देश दिए गए।

मुख्यमंत्री फडणवीस ने यह भी कहा कि जिन जिलों में सरकारी मेडिकल कॉलेज प्रारंभ हो चुके हैंवहां चिकित्सा शिक्षा विभाग के स्वतंत्र अस्पतालों की आवश्यकता का मूल्यांकन किया जाए। चिकित्सा शिक्षा और सार्वजनिक स्वास्थ्य विभाग के लिए आवश्यक अस्पतालों की पहचान कर विस्तृत नियोजन और योजना तैयार की जाए। धाराशिव में चिकित्सा शिक्षा विभाग का अस्पताल स्थापित किया जाए।

इसके साथ हीमुख्यमंत्री ने यह भी निर्देश दिए कि पीजी (पदव्युत्तर) मेडिकल कोर्स में प्रवेश पाने वाले विद्यार्थियों को पढ़ाई पूरी करने के बाद एक निश्चित अवधि के लिए शासकीय अस्पतालों में सेवा अनिवार्य करने की संभावना की जांच की जाए।

राज्य में एशियाई विकास बैंक के सहयोग से चल रही परियोजनाएं:

अलिबाग और सिंधुदुर्ग में शासकीय सामान्य अस्पतालों का निर्माण कार्य प्रगति पर है। अमरावतीवाशिम और धाराशिव के अस्पताल टेंडर स्तर पर हैं। गुणवत्ता सुधार के लिए उत्कृष्टता केंद्रों का नेटवर्क तैयार किया जा रहा है। इसमें महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विश्वविद्यालय (MUHS) को हब’ और सात अन्य को स्पोक’ के रूप में प्रस्तावित किया गया है। एक आधुनिक स्वास्थ्य प्रबंधन सूचना प्रणाली (HMIS) विकसित की जा रही है। साताराचंद्रपुर शासकीय अस्पताल और सर जे. जे. सुपर स्पेशलिटी अस्पताल के लिए उपकरणों की खरीद की जा रही है। अवयवदान और प्रत्यारोपण से संबंधित संस्थाएं भी स्थापित की जाएंगी।

0000


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस द्वारा भगवान महावीर जन्म कल्याणक दिवस की शुभकामनाएँ

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस द्वारा

भगवान महावीर जन्म कल्याणक दिवस की शुभकामनाएँ

 

मुंबईदिनांक 10 अप्रैल: तीर्थंकर भगवान महावीर के जन्म कल्याणक दिवस के पावन अवसर पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने उन्हें श्रद्धापूर्वक नमन किया और राज्यवासियों को हार्दिक शुभकामनाएँ दीं।

 

मुख्यमंत्री ने प्रार्थना की कि भगवान महावीर का यह जन्मोत्सव सभी के जीवन में सुखशांति और समृद्धि लेकर आए। उन्होंने कहा कि भगवान महावीर का जीवन समाज के लिए सदैव प्रेरणास्रोत बना रहेगा। उनका संदेश—"जियो और जीने दो"केवल मानव जाति के लिए ही नहींबल्कि सम्पूर्ण जीव सृष्टि के कल्याण का दार्शनिक दृष्टिकोण है।

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून भगवान महावीर जन्म कल्याणक दिनाच्या शुभेच्छा

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून

भगवान महावीर जन्म कल्याणक दिनाच्या शुभेच्छा

 

मुंबई, दि. १० : तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणक दिनाच्या निमित्ताने त्यांना भक्तिपूर्वक नमन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 

भगवान महावीर यांचे जन्म कल्याणक पर्व सर्वांच्या आयुष्यात सुखशांतीसमृद्धी घेऊन येवोअशी प्रार्थना करतानाच भगवान महावीर यांचे जीवन समाजाला सदैव प्रेरणा देत राहील. जगा व जगू द्या हा त्यांचा संदेश केवळ मानवतेसाठी नाही तर अखंड जीवसृष्टीच्या कल्याणाचे तत्त्वज्ञान आहे. अहिंसासत्यअस्तेयब्रह्मचर्य आणि अपरिग्रह ही त्यांनी दिलेली पंचशील तत्वे आपल्याला नेहमीच मार्गदर्शन करत राहतीलअसे मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

 

वजनकाटा २ महिन्यासाठी ठेवला आहे झाकून..😀*

 *वजनकाटा २ महिन्यासाठी ठेवला आहे झाकून..😀* 


उन्हाळ्याच्या सुरवातीला खायची ओल्या काजूची उसळ....

चव बदलायला कधी तरी लागते मग मिसळ....


रसरशीत बिटक्या चोखताना  तोंड जातंय माखून.....

वजनकाटा २ महिन्यासाठी ठेवला आहे झाकून..😀


कैरीची डाळ आणि झकास पन्हं थंडगार....

रात्री पण आइस्क्रीमचा मारा चाललाय फार.....


व्यायाम करायचा निश्चय केलाय सोमवार पासुन... 

वजनकाटा २ महिन्यासाठी ठेवला आहे झाकून..😅


करवंद जांभळे कलिंगड 

खावी ताव मारून....

फणसाचे गरे आणि सांदण जरा थोडी जपून...


रिचवावा पायरीचा रस आणि हापूस थोडा कापून...

वजनकाटा २ महिन्यासाठी ठेवला आहे झाकून..😃


आमरस पुरीच जेवून करतो थोडा आराम...

वजन कमी करण्यासाठी 

कोणते करू मी व्यायाम...


हाताची बोटं पायांच्या बोटाला टेकतात अजून वाकून..

वजनकाटा २ महिन्यासाठी ठेवला आहे झाकून..

🤣🤣🤣

Featured post

Lakshvedhi