Tuesday, 8 April 2025

राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था (SIDM)

 राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था (SIDM)

नागपूर येथे राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या (SIDM) इमारत बांधकामासाठी राज्य निधीमधून रुपये १८४ कोटींच्या निधीच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. ही संस्था राज्यातील सर्व घटकांसाठी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यासाठी आणि आपत्ती संबंधित विविध विषयावर संशोधन केंद्र म्हणून कार्य करेल.

अद्यावत राज्य आपत्कालीन कार्य केंद्राबाबाबत...

 अद्यावत राज्य आपत्कालीन कार्य केंद्राबाबाबत...

आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन मानकांनुसार हे केंद्र नव्याने उभे करण्यात आले आहे. नव्या SEOC मध्ये बेझल-फ्री व्हिडिओ वॉलउच्च क्षमतेचे AV कॉन्फरन्सिंगडेटा सर्व्हरहाय-स्पीड संगणक, SATPHONES, हॅम रेडिओ, VHF/UHF वायरलेस सेट यांचा समावेश आहे. हे सर्व घटक आपत्तीच्या वेळी वेळेवर प्रतिसाद देण्यासाठी आणि सर्व यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

तसेच Geo-DSS या प्रणालीद्वारे AI आणि मशीन लर्निंगवर आधारित 'चेंज डिटेक्शनप्रक्रिया राबवली जात आहे. ही प्रक्रिया उपग्रह इमेजरीवर आधारित असूनआपत्तीच्या ठिकाणी जवळपास प्रत्यक्ष वेळेत परिस्थिती समजून नुकसान मूल्यांकन व मदत कार्याची दिशा ठरवणे अधिक सोपे होणार आहे.

विशेष म्हणजे, ‘आपत्ती सहाय्यक’ नावाचे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आले असूनयामार्फत नागरिक आपत्तीच्या वेळी SOS अलर्टद्वारे माहिती देऊ शकतात. हे अ‍ॅप द्वि-मार्गी संवादाचे एक महत्त्वाचे माध्यम ठरणार आहे.

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या नवीन संकेतस्थळावर आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सर्व माहितीमार्गदर्शक तत्त्वे व उपक्रम सहज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे संकेतस्थळ नागरिकस्थानिक प्रशासन आणि यंत्रणा यांच्यात अधिक सुसूत्रता निर्माण करण्यासाठी  मोलाची भूमिका बजावणार आहे.

अद्ययावत राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आपत्कालीन कार्य केंद्र अधिक सक्षम

 अद्ययावत राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आपत्कालीन कार्य केंद्र अधिक सक्षम

-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. 8 :-  राज्य आपत्कालीन कार्य केंद्रात आधुनिक तंत्रज्ञानवेगवान संवादव्यवस्था आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वापरामुळे आपत्ती व्यवस्थापनाला तंत्रज्ञानाचे बळ मिळाले आहे. या नव्या अद्ययावत आपत्कालीन कार्य केंद्रामुळे आपत्तीच्या वेळी जलदअचूक आणि समन्वित प्रतिसाद देणे अधिक प्रभावी होणार आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्रातील नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे केवळ आपत्तीच्या वेळी नाहीतर आपत्तीपूर्व सजगतेपासून पुनर्वसनापर्यंतची परिस्थिती व आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षमपणे हाताळता येईलअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी केले.

मंत्रालयात नवीन तंत्रज्ञानाने अद्ययावत केलेल्या राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारआपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनपर्यटनखनिकर्म माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाईशालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसेइतर मागास बहुजन कल्याणदुग्धविकास अपारंपरिक ऊर्जामंत्री अतुल सावेराज्यमंत्री आशिष जयस्वालमुख्य सचिव सुजाता सौनिक‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी,

मदत व पुनर्वसन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सोनिया सेठी,आपत्ती व्यवस्थापन संचालक सतीशकुमार खडके यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

 

मुख्यमंत्री श्री. फडवणीस म्हणालेहवामानातील बदलामुळे आपत्तीचे स्वरूपतीव्रता आणि वारंवारता बदलत आहे. त्यामुळे मिटिगेशन’ आणि घटनांनंतर तात्काळ प्रतिसाद यावर भर देणे आवश्यक आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी एक सशक्त कमांड आणि कम्युनिकेशन सिस्टीम’ असणे महत्त्वाचे असूननिर्णय लवकर घेता यावेतजलद प्रतिसाद देता यावायासाठी हे केंद्र उपयुक्त ठरेलअसा विश्वास मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातही अशा प्रकारची आधुनिक व्यवस्था उभारण्याचे काम सुरू असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले. तसेच नागपूर येथे प्रस्तावित आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या स्थापनेच्या निर्णयाचेही मुख्यमंत्री महोदयांनी स्वागत केले.

आपत्ती येऊ नयेहीच आपली इच्छा आहेपण आलीचतर तिच्याशी सक्षमपणे लढण्यासाठी आपली व्यवस्था पूर्णपणे सज्ज असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी या आपत्कालीन केंद्राच्या उभारणीत योगदान दिलेल्या सर्व अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच अत्यंत आधुनिक आणि सुसज्जित व्यवस्था उभी केल्याबद्दल आपत्ती व्यवस्थापन विभागास त्यांनी शुभेच्छा दिल्या.

कटात मदतीसाठी धावून जाणारा आपत्ती व्यवस्थापन कक्ष नव्याने सुरू केला त्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवारआपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागास शुभेच्छा दिल्या

मुंबई महानगर क्षेत्रातील पायाभूत सुविधा विकासासाठी ४ लाख ७ हजार कोटींचे विविध सामंजस्य करार एमएमआर क्षेत्राच्या आणि पुण्याच्या विकासाला मिळणार मोठा बुस्टर

 मुंबई महानगर क्षेत्रातील पायाभूत सुविधा विकासासाठी

४ लाख ७ हजार कोटींचे विविध सामंजस्य करार

एमएमआर क्षेत्राच्या आणि पुण्याच्या विकासाला मिळणार मोठा बुस्टर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुण्यात मॅग्नम आइस्क्रीमचे जीसीसी साठीही करार

 

मुंबईदि. ८ : मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्राच्या पायाभूत सुविधा विकासासाठी करण्यात आलेल्या ४ लाख ७ हजार कोटींच्या सामंजस्य करारामुळे या क्षेत्राच्या विकासाला मोठा बुस्टर मिळणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केले.

   वांद्रे कुर्ला संकुल येथील जियो वल्ड सेंटर येथे आयोजित इंडिया ग्लोबल फोरम २०२५ या कार्यक्रमामध्ये विविध सामंजस्य करार करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

एमएमआर क्षेत्रामध्ये मोठी आर्थिक क्षमता असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीएकट्या एमएमआर क्षेत्रामध्ये दीड ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेची क्षमता आहे. आज झालेल्या सामंजस्य करारामुळे या क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या उभारणीस मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होणार आहे. तसेच युनिलिव्हर कंपनी सोबत झालेल्या करारामुळे पुण्याच्या विकासासाठी फायदा होणार आहे. पुणे शहरात मोठ्या संधी आहेत. या करारामुळे या संधीमध्ये वाढ होऊन रोजगार निर्मिती सोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावर पुण्याचे स्थान उंचावणार आहे.

एमएमआरडीए आणि हुडको यांच्या मध्ये पायाभूत सुविधा विकासासाठी दीड लाख कोटी रुपयांचा करार करण्यात आला. तसेच आर. ई. सी. सोबत एक लाख कोटीपी. एफ. सी. सोबत एक लाख कोटीआय आर एफ सी ( इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन) सोबत एक लाख कोटी आणि नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रकचर अँड डेव्हलपमेंट यांच्या सोबत ७ हजार कोटींचा असे एकूण ४ लाख ७ हजार कोटींचे करार करण्यात आले. तसेच युनिलिव्हर कंपनीच्या मॅग्नम आइस्क्रीम व्यापारासाठीचे ग्लोबल कापॅबिलिटी सेंटर पुणे येथे उभारण्याचा सामंजस्य करारही करण्यात आला. या केंद्रामध्ये ९०० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून ५०० रोजगार उपलब्ध होणार आहेत.  

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेहुडकोचे अध्यक्ष संजय कुलक्षेत्रआर ई सी आणि पी एफ सीचे अध्यक्ष परमिंदर चोप्राआय. आर. एफ. सी. चे संचालक शेली वर्माएन. ए. बी. एफ. आय. डी. चे व्यवस्थापकीय संचालक राजकिरण रायमॅग्नम आइस्क्रीम कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित भट्टाचार्यउद्योग विभागाचे सचिव पी. अनबलगम आदी उपस्थित होते.

००००

सेवा आणि अहंकार* !! श्री स्वामी समर्थ!!

 !!*सेवा आणि अहंकार* !! श्री स्वामी समर्थ!!


*रावणाशी युद्धाच्या दरम्यान प्रभु श्री रामचंद्रांच्या सैन्यासाठी लागणारी रसद अन्नसामग्रीतले पीठ एकदा संपले होते. श्री राम हनुमंताला* म्हणाले *चित्रकूट पर्वतावर* जा तिथे तुला *अन्नपुर्णामाता दळण दळत* असल्याचा आवाज येईल. तीच्या कडून आपल्या सैन्यासाठी पीठ घेऊन ये. *हनुमंतांनी श्री रामाना* विचारले, "पण *अन्नपुर्णामाता* मला कशी काय ओळखणार ?"

*श्री राम म्हणाले,* "ओळख म्हणून ही माझी *अंगठी* तीला दे" आणि त्यांनी स्वतःची *अंगठी हनुमंतांना* दिली.

*हनुमंत* पर्वतावर पोहोचले, त्यांच्या मनात विचार आला मी जर पीठ नेले नाही तर *श्री रामांच्या सैन्याची* काय अवस्था होईल, शेवटी माझ्या शिवाय *प्रभु श्री रामचंद्रांचे* कोणतेही काम होणे अशक्यच. *हनुमंताना अहंकाराने* ग्रासले. 

एका मोठ्या गुहेतून *जात्यावर दळण्याचा* आवाज येत होता. त्या गुहेवर एक भली मोठी *दगडाची शिळा* होती. त्या गुहेसमोर जाऊन *हनुमंतांनी अन्नपुर्णामातेला* हाक मारली, म्हणाले *"माते मी प्रभु श्री रामचंद्रांचा सेवक हनुमंत, मला त्यांनी तुमच्याकडून सैन्यासाठी पीठ* आणण्यासाठी पाठविले आहे. गुहेतून *अन्नपुर्णामातेचा* आवाज आला, *"हे हनु ! गुहेवरची शिळा बाजूला करून आत ये".*

*हनुमंत* आपल्या शेपटीने *शिळा* बाजूला करू लागले, *शिळा* काही जागची हलेना. मग दोन्ही हातांनी *शिळा* बाजुला करायला लागले तरी शिळा काही तसूभरही हलली नाही. मग शरीरातील सर्व शक्तीनीशी जोर लावून *शिळा* बाजुला करायचा प्रयत्न करू लागले, घामाघूम झाले, काही केल्या *शिळा* बाजुला काही सरकत नव्हती. *हनुमंतांच्या* मनात विचार आला मोठे मोठे पर्वत उचलण्याची शक्ती माझ्यात असून देखील हा एवढासा यत्किंचित दगड मला बाजूला करता आला नाही. शेवटी *हार* मानून *हनुमंत* म्हणाले, "माते, ही *गुहेवरची शिळा* काही मला बाजूला करता येत नाही." 

*अन्नपुर्णामातेने* विचारले, *"हनु , तू अहंकार केलास का?"* तर *हनुमंत* म्हणाले, "होय माते !

"मला आता त्याचा *पश्र्चाताप* होतो आहे."

*अन्नपुर्णामाता* म्हणाली,

*"तुला पश्र्चाताप होतो आहे ना?* मग आता पुन्हा एकदा *शिळा* बाजुला करायचा प्रयत्न कर."

*अन्नपुर्णामातेने* सांगितल्याप्रमाणे *हनुमंतांनी* शिळा बाजुला करायचा प्रयत्न केला, तर काय शिळा अलगद बाजूला सरकली. गुहेमध्ये आत गेल्यावर *हनुमंतांनी अन्नपुर्णामातेला प्रभु श्री रामचंद्रांनी* दिलेली अंगठी दाखवली, *अन्नपुर्णामाता* म्हणाली, "त्या पलीकडे तो कोपरा आहे ना तीथे ही अंगठी टाक आणि तुला हवे तेवढे पीठ घेऊन जा". 

*हनुमंत* अंगठी ठेवायला गेले, पहातात तर काय तिथे अगणित अंगठी मुद्रांचा डोंगरच जणू खच पडला होता. हे पाहून *हनुमंतांनी अन्नपुर्णामातेला* विचारले "माते, हा इथे अंगठी मुद्रांचा खच कसा काय ?"

*अन्नपुर्णामाता* म्हणाली, "अरे हनु , प्रभुंनी तुझ्यासारखे कित्येक *हनुमंत* कित्येकदा माझ्याकडे अंगठी घेऊन पाठविले तेव्हापासूनच्या आहेत त्या मुद्रा अंगठ्या"

हे ऐकल्यावर मात्र *हनुमंतांचा गर्व* पुर्णपणे नाहीसा झाला.


*सद्गुरूंची* सेवा करताना कुठल्या गोष्टीचा *अहंकार* नसावा.*मी* करतो म्हणून सेवा होते, हा भ्रम आहे.परमेश्वर प्रत्येक कार्यासाठी कोणा न कोणाची निवड करतो.आपण असलो नसलो तरी ते कार्य ठरलेलंच असतं व ते कोणा न कोणाच्या हातून घडतचं. त्यामुळे सेवेची जी संधी मिळाली आहे तिचं भाग्य माना व संधीचं सोनं करा. अहंकार युक्त,*दिखावटी* केलेली सगळी सेवा व्यर्थ आहे.


          *💫!!श्री गुरूदेव दत्त!!✨*!! श्री स्वामी समर्थ!!

                       🙏🏻🌹

शासकीय आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी महाविद्यालयांतील अध्यापकांच्या मानधनात वाढ

 शासकीय आयुर्वेदयुनानीहोमिओपॅथी महाविद्यालयांतील अध्यापकांच्या मानधनात वाढ

राज्यातील शासकीय आयुर्वेदयुनानीहोमिओपॅथी तसेच योग व निसर्गोपचार महाविद्यालयांतील कंत्राटी अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

शासकीय महाविद्यालयांतील सेवानिवृत्तीराजीनामापदोन्नती व इतर कारणांमुळे पदे सातत्याने रिक्त होत असतात. या रिक्त पदांवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नियमित भरती होईपर्यंत २०२२ मध्ये कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार ठोक मानधन तत्वावर अध्यापकांची नियुक्ती करण्यात येत आहे.

काही विषयांसाठी पात्र उमेदवार सहज उपलब्ध होत नसल्याने ठोक मानधनात वाढ करण्याची आवश्यकता जाणवत होती. या पार्श्वभूमीवर ठोक मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नवीन मानधन पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे – प्राध्यापक -१ लाख ५० हजार रुपयेसहयोगी प्राध्यापक १ लाख २० हजार रुपयेसहाय्यक प्राध्यापक – १ लाख रुपये मानधन देण्यास मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे रिक्त पदे भरताना अधिक पात्र उमेदवार आकर्षित होण्यास मदत होणार असूनशैक्षणिक गुणवत्ताही कायम राहीलअसा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

--0

सिंधी निर्वासितांच्या जमिनींचे पट्टे नियमित करण्यासाठी विशेष अभय योजना

 सिंधी निर्वासितांच्या जमिनींचे पट्टे नियमित करण्यासाठी विशेष अभय योजना

राज्यातील सिंधी समाजातील निर्वासितांच्या जमिनींचे पट्टे "विशेष अभय योजना-२०२५" अंतर्गत नियमित करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयामुळे सिंधी निर्वासित बांधवांच्या राज्यातील ३० ठिकाणच्या वसाहतींमधील जमिनींचे पट्टे नियमित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही अभय योजना वर्षभरासाठी लागू राहणार आहे.

            भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी पश्चिम पाकिस्तानातून आलेल्या निर्वासितांसाठी महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणच्या मालमत्ता भरपाई संकोष मालमत्ता म्हणून घोषीत करण्यात आल्या आहेत. अशा जमिनी नियमित करण्याबाबत विशेष मोहिम राबविण्याबाबत शासनाच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यामध्ये समावेश केला होता. त्याअनुषंगाने ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर वगळून २४ जानेवारी १९७३च्या राजपत्रात घोषित ३० अधिसूचित क्षेत्रात ही विशेष अभय योजना राबविण्यात येणार आहे. यात सिंधी निर्वासितांच्या निवासी व वाणिज्यिक जमिनींचे पट्टे नियमित करण्यात येणार आहेत. या जमिनी नियमित (मालकी हक्काचे पट्टे नियमानुकुल/फ्री होल्ड (भोगवटादार वर्ग-१/सत्ता प्रकार-अ) करण्याकरिता १५०० चौ. फुटापर्यंत सवलतीचे दर लागू करण्यात आले आहेत. जमीन १५०० चौ.फुटांपर्यंत निवासी वापरात असल्यास ५  टक्के अधिमूल्य तर वणिज्यिक प्रयोजनासाठी वापरात असल्यास १०  टक्के अधिमूल्य आकारले जाणार आहे. तर १५०० चौ.फुटांपेक्षा जास्त क्षेत्रफळासाठी या दराच्या दुप्पट अधिमुल्य आकारले जाणार आहे. या योजनेस आवश्यकता वाटल्यास पुढे एक वर्षापर्यंत मुदतवाढ देण्यात येणार आहे.

--0--

Featured post

Lakshvedhi