Friday, 4 April 2025

अती दुर्गम भागातील 'कनेक्टिव्हिटी' वाढविण्यासाठी केंद्राला राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य

 अती दुर्गम भागातील 'कनेक्टिव्हिटीवाढविण्यासाठी केंद्राला राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

राज्यामध्ये गडचिरोलीसह दुर्गम आणि अतीदुर्गम भागात संपर्क यंत्रणा निर्माण करण्यास राज्यशासन केंद्राला संपूर्ण सहकार्य करेल. टॉवर उभारण्यासाठी गडचिरोलीच्या अतीदुर्गम भागात संपूर्ण सुरक्षा दिली जाईल. या भागात संपर्क यंत्रणा उत्तम प्रकारे निर्माण झाल्यास येथील युवकांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणे सोयीचे होईलअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीदरम्यान सांगितले.

 

 गडचिरोलीसह अन्य ठिकाणी दुर्गम भागातही संपर्क यंत्रणा निर्माण करण्यात येत आहे. भारत नेट टप्पा दोन अंतर्गत संपूर्ण ग्रामपंचायतीमध्ये राज्यात संपर्क यंत्रणा निर्माण करण्यासाठी शासन काम करेल. या टप्प्यातही राज्य देशात सर्वात पुढे राहून काम करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

 

बीएसएनएल व एमटीएनएलच्या मुंबईतील मालमत्तांवर असलेली आरक्षणे आणि उद्देश तपासून घेण्यात येतील. यापैकी नियमानुसार काढणे शक्य असलेली आरक्षणे काढण्याची कार्यवाही करण्यात येईल. या मालमत्तांवर नागरिकांसाठी विविध सोयी सुविधा निर्माण करण्याचा शासनाचा मानस आहे. याबाबत गठित केलेल्या समितीचा अहवाल आल्यानंतर राज्य शासन कार्यवाही करेलअसेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

 

गडचिरोलीच्या अती दुर्गम भागात संपर्क यंत्रणा निर्माण झाल्यास नक्षलवादाचा संपूर्णपणे बीमोड करणे राज्य शासनाला शक्य होणार आहे. शासनाने नक्षलवाद संपवण्यासाठी सुरू केलेल्या कार्यवाहीत संपर्क यंत्रणा निर्माण झाल्यास अधिक बळ मिळेलअसे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

 

बैठकीत बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या मुंबईतील मालमत्तामोबाईल टॉवर उभारणीप्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत भारत नेटच्या अंतर्गत निर्माण होणारी संपर्क यंत्रणा आदींबाबत सविस्तर चर्चा झाली.

मंदिर स्थळांचे रहस्य**

 मंदिर स्थळांचे रहस्य**❕


 🔹तुम्ही अंदाज लावू शकता की या प्रमुख मंदिरांमध्ये काय सामान्य आहे❔:


 1. केदारनाथ,

 2. कलहष्टी,

 3. एकंबरनाथ- कांची,

 ४. तिरुवनमलाई,

 ५. तिरुवनाइकावल,

 6. चिदंबरम नटराज,

 7. रामेश्वरम,

 8. कलेश्वरम.


 "सर्व शिवमंदिरे आहेत" असे तुमचे उत्तर असेल, तर तुम्ही अंशतः बरोबर आहात.  प्रत्यक्षात ही मंदिरे ज्या रेखांशात आहेत.


 "ते सर्व 79° रेखांशांमध्ये स्थित आहेत."


 आश्चर्याची गोष्ट म्हणजे या मंदिरांच्या अनेक शेकडो किलोमीटरच्या वास्तुविशारदांनी जीपीएसशिवाय ही अचूक स्थाने कशी तयार केली.


 1. केदारनाथ *79.0669°*

 २. कलहष्टी *७९.७०३७°*

 3. एकंबरनाथ- कांची *79.7036°*

 ४. तिरुवनमलाई *७९.०७४७°*

 5. तिरुवनैकवल *78.7108°*

 ६. चिदंबरम नटराज *७९.६९५४°*

 ७. रामेश्वरम *७९.३१२९°*

 8. कलेश्वरम *79.9067°*


 नकाशा पहा.  सर्व सरळ रेषेत आहेत❕


 "केदारनाथ ते रामेश्वरम पर्यंत" सरळ रेषेत बांधलेली शिव मंदिरे भारतात आहेत.


 ही मंदिरे 4000 वर्षांपूर्वी बांधली गेली होती.  मग, पाच मंदिरे इतक्या अचूकपणे कशी स्थापन झाली?  फक्त देवच जाणे.

 केदारनाथ आणि रामेश्वरममध्ये 2383 किमी अंतर आहे.


 ही सर्व मंदिरे 5 तत्वांची अभिव्यक्ती दर्शवतात, पंच तत्व (पांच तत्व), म्हणजेच पृथ्वी, पाणी, अग्नि, वायु आणि अवकाश.


 *श्री कलाहस्ती* मधील चमकणारा दिवा हा आकाशवाणी घटकाचे प्रतिनिधित्व करतो


 थिरुवनिक्काच्या आतील पठारातील *वॉटर स्प्रिंग* हे पाण्याच्या घटकाचे प्रतिनिधित्व करते.


 अन्नामलाई टेकडीवरील मोठा *दिवा* अग्नि तत्वाचे प्रतिनिधित्व करतो.


 कांचीपुरम येथील *सँड्सचे स्वयंभू लिंग* पृथ्वीचे घटक दाखवते.


 चिदंबरम यांचे निराकार (निराकार) राज्य हे देवाच्या स्वर्ग (आकाश) घटकाचे प्रतिनिधित्व करत आहे.


 आपल्या प्राचीन ज्ञानाचा आणि बुद्धिमत्तेचा आपल्याला अभिमान असायला हवा.  असे मानले जाते की ही केवळ 5 मंदिरे नाहीत तर *"शिव-शक्ती अक्ष रेखा"* या ओळीत अनेक आहेत.


 आश्चर्याची गोष्ट म्हणजे, महाकालचे देशभरातील सर्व ज्योतिर्लिंगांशी नाते आहे.


 ज्योतिर्लिंगाचे अंतर आहे:


 * उज्जैन ते सोमनाथ- 777 किमी

 * उज्जैन ते ओंकारेश्वर - 111 किमी

 * उज्जैन ते भीमाशंकर- 666 किमी

 * उज्जैन ते काशी विश्वनाथ- 888 किमी

 * उज्जैन ते मल्लिकार्जुन - 888 किमी

 * उज्जैन ते केदारनाथ- 1111 किमी

 * उज्जैन ते त्र्यंबकेश्वर - 555 किमी

 *उज्जैन ते बद्यनाथ- 1399 किमी

 * उज्जैन ते रामेश्वरम- 1999 किमी


 "उज्जैन हे पृथ्वीचे केंद्र मानले जाते."  *हिंदू धर्म* मध्ये विनाकारण काहीही नव्हते.


 सनातन धर्माचे 1000 वर्षांचे केंद्र म्हणून, उज्जैनमध्ये सूर्य आणि ज्योतिषाची गणना करण्यासाठी मानवनिर्मित साधन सुमारे *2050* वर्षांपूर्वी बांधले गेले होते❕


 आणि, जेव्हा पृथ्वीवरील काल्पनिक रेषा सुमारे 100 वर्षांपूर्वी ब्रिटीश शास्त्रज्ञाने तयार केली, तेव्हा तिचा मध्य भाग उज्जैन होता.

 आजही उज्जैनमध्ये सूर्य आणि अवकाशाची माहिती घेण्यासाठी वैज्ञानिक येतात.


 👍🏻👍🏻

 आपल्या शिव मंदिराविषयी खूप छान शास्त्रीय माहिती

दोडामार्ग परिसरातील रानटी हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी प्राथमिक प्रतिसाद दल स्थापन करावे

 दोडामार्ग परिसरातील रानटी हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी

प्राथमिक प्रतिसाद दल स्थापन करावे

- वनमंत्री गणेश नाईक

 

मुंबईदि. ४ :- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांना होणारा हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी प्राथमिक प्रतिसाद दल स्थापन करावे. तसेच या हत्तींना तिलारी धरणाच्या परिसरातील संरक्षित क्षेत्रात नेण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश वन मंत्री गणेश नाईक यांनी दिले.

 दोडामार्ग तालुक्यातील रानटी हत्तींच्या उपद्रवामुळे होणारा त्रासासंदर्भात उपाययोजना करण्यासंदर्भात  मंत्रालयात वनमंत्री श्री. नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या विनंतीनुसार ही बैठक लावण्यात आली होती. यावेळी वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकरप्रधान मुख्य वन संरक्षक शोमिता बिश्वासउपसचिव विवेक होसिंगअतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक बी.व्ही. रामाराव आदी यावेळी उपस्थित होते.

 श्री. नाईक म्हणाले कीसिंधुदुर्ग जिल्ह्यात रानटी हत्तींमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. या हत्तींपासून संरक्षण करण्यासाठी वन विभागाने सविस्तर आराखडा तयार करावा. या हत्तींना नैसर्गिक अधिवासात ठेवल्यास ते शेताकडे येणार नाहीत. त्यासाठी तिलारी प्रकल्पाच्या संरक्षित भागात या हत्तींना ठेवण्यासाठी त्या ठिकाणी हत्तींच्या उपजिवीकेसाठी आवश्यक असलेले बांबूकेळीफणस आदी झाडे लावण्यात यावे. तसेच हत्तींचा वावर असलेल्या परिसरात रेल्वे रुळांचे फेन्सिंग करण्यासंदर्भात नियोजन करावे. या रानटी हत्तींना रेडिओ कॉलरिंग करून त्यांच्या वावरावर लक्ष ठेवण्यात यावे. यासाठी कर्नाटक व पश्चिम बंगालच्या वन विभागातील प्रशिक्षत मनुष्यबळांचे मार्गदर्शन घ्यावे.

वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसान भरपाईच्या रक्कमेत वाढ करण्याचा प्रस्ताव पाठवावा. तसेच यामध्ये बांबू पिकाच्या समावेशाबद्दलही प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश श्री. नाईक यांनी दिले.

श्री. केसरकर यांनी दोडामार्ग तालुक्यात रानटी हत्तींमुळे होणाऱ्या नुकसानीची माहिती देऊन लवकरात लवकर मार्ग काढण्याची विनंती केली.

००००

ऐरोली परिसरात मँग्रोव्ह पार्क उभारण्यासंदर्भात अभ्यास अहवाल तयार करावा

 ऐरोली परिसरात मँग्रोव्ह पार्क उभारण्यासंदर्भात

अभ्यास अहवाल तयार करावा

- वनमंत्री गणेश नाईक

 

मुंबईदि. ४ : ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई भागातील ऐरोली खाडी किनारी मोठ्या प्रमाणात कांदळवन असून येथे फ्लेमिंगो पक्ष्यांचे वास्तव्य असते. पर्यटनाच्या दृष्टिने या भागात कांदळवन सफारी पार्क (मँग्रोव्ह पार्क) उभारण्याच्या दृष्टिने अभ्यास करून अहवाल देण्याचे निर्देश वन मंत्री गणेश नाईक यांनी दिले.

 वन विभागाच्या विविध विषयासंदर्भात वनमंत्री श्री. नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी महाराष्ट्र इस्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशीवन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकरप्रधान मुख्य वन संरक्षक शोमिता बिश्वासउपसचिव विवेक होसिंगअतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक बी.व्ही. रामाराव आदी उपस्थित होते.

 श्री. नाईक म्हणाले कीपर्यटन विकासासाठी नवी मुंबईतील खाडी किनारी उत्तम संधी आहेत. कांदळवनफ्लेमिंगो पक्षी हे निसर्ग पर्यटकांसाठी आकर्षण ठरू शकतात.त्यामुळे या परिसरातील ऐरोलीघनसोली या भागात जागतिक दर्जाचे मँग्रोव्ह पार्क उभारता येईल का याचा अभ्यास करून जागा पाहणी करावी. यासंदर्भातील सविस्तर अहवाल द्यावा.

तसेच वन्यजीव व मानव संघर्ष टाळण्यासाठी उपाय योजना करण्यात याव्यात. विशेषतः जुन्नरकराड व संगमनेर परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर आहे. राजस्थानमधील जवाई बिबट सफारीच्या धर्तीवर या तीन तालुक्यातही बिबट सफारी करता येईल का याचाही अभ्यास करण्याचे निर्देश वन मंत्री श्री. नाईक यांनी दिली.

 रान म्हैसमाळढोक या सारख्या संकटग्रस्त प्रजाती वाचविण्यासाठी नागपूरमधील गोरेवाडा प्रकल्पात आंतरराष्ट्रीय प्रजनन केंद्र स्थापण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीबरोबर सामंजस्य करार करण्याचा निर्णय घेतला असून या संदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही श्री. नाईक यांनी यावेळी दिले.

श्री. परदेशी यांनी आंतरराष्ट्रीय प्रजनन केंद्र व बीएचएनएसबरोबरचा करार महत्त्वाचा असून यास चालना देण्याची आवश्यकता व्यक्त केली.


मिशन लक्ष्यवेध अंतर्गत खासगी अकादमीच्या सक्षमीकरणासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 मिशन लक्ष्यवेध अंतर्गत खासगी अकादमीच्या सक्षमीकरणासाठी

प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 

मुंबई, दि. ४ : अद्ययावत क्रीडा प्रशिक्षण यंत्रणापायाभूत सुविधाक्रीडा वैद्यकशास्रक्रीडा स्पर्धांचे आयोजनखेळाडूंना पुरस्कार व प्रोत्साहनखेळाडूंकरीता करीअर मार्गदर्शन व खेळाडूंच्या क्षमतांचा विकास करण्याच्या उद्देशाने "मिशन लक्ष्यवेध" या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मिशन लक्ष्यवेध अंतर्गत खाजगी अकादमींना आर्थिक सहाय्य करण्यात येणार असून, इच्छुक क्रीडा अकादमींनी २१ एप्रिल पर्यंत अर्ज करावेत अशी माहिती मुंबई उपनगरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी रश्मी आंबेडकर यांनी दिली आहे.

 

राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धनप्रचार प्रसार व जोपासना करण्यासाठी व प्रतिभावंत खेळाडू तयार करण्यासाठी शासन सतत प्रयत्नशील आहे. खेळाडूंनी ऑलिम्पिकसारख्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदके संपादित करण्याकरिता नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात येत आहेत. मिशन लक्ष्यवेध अंतर्गत निवडण्यात आलेल्या अॅथलेटिक्सआर्चरीबॅडमिंटनबॉक्सिगहॉकीलॉन टेनिसरोईंगशुटींगसेलींगटेबल टेनिसवेटलिफ्टिंगकुस्ती या १२ क्रीडा प्रकारांच्या राज्यातील उत्तम खेळाडू निर्माण करणाऱ्या खाजगी अकादमींना आर्थिक सहाय्य देऊन अशा संस्थांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. तरी मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी वॉक्सिगअथलेटीक्सकुस्तीटेबल टेनिसव शूटिंग हे खेळ आहेत.

 

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत खाजगी अकादमींना आर्थिक सहाय्य करावयाच्या दृष्टीने संबंधित अकादमी मधील खेळाडूक्रीडामार्गदर्शकसहाय्यक प्रशिक्षकप्रशिक्षणासाठी उपलब्ध पायाभूत सुविधा व त्यांचा स्तरक्रीडा साहित्य व क्रीडा अकादमीच्या कामगिरींचे गुणांकन करण्यात येऊन३५ ते ५० गुण प्राप्त करणाऱ्या संस्था ‘क’ वर्ग५१ ते ७५ गुण प्राप्त करणाऱ्या संस्था ‘ब’ वर्ग तसेच ७६ ते १०० गुण प्राप्त करणाऱ्या संस्था ‘अ’ वर्ग अशा प्रकारे वर्गीकरण करण्यात येणार आहे. ‘क’ वर्ग अकादमींना वार्षिक रु.१०.०० लक्ष‘ब’ वर्ग रु.२०.०० लक्ष व ‘अ’ वर्ग रु.३०.०० लक्ष आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. यामध्ये पायाभूत क्रीडा सुविधा उभारणीक्रीडा सुविधा उन्नत करणेप्रशिक्षक मानधनक्रीडा व प्रशिक्षण उपकरणे इ बाबींवर खर्च करण्यासाठी शासना मार्फत देण्यात येणार आहे. त्यानुसार इच्छुक संस्थांनी अधिक माहिती व अर्जाचे नमुन्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी शासकीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय परिसरसंभाजी नगर समोरआकुर्ली रोडकांदिवली पूर्वमुंबई-४००१०१ या पत्त्यावर संपर्क साधावा व या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती रश्मी आंबेडकर यांनी केलेले आहे. तरी अधिक माहितीसाठी श्रीमती प्रिती टेमघरे (क्रीडा कार्यकारी अधिकारी) मो. क्र. ९०२९२५०२६८ यांच्याशी संपर्क साधावा असेही त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

०००

ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार यांच्या निधनामुळे भारतभूमीचा सच्चा सुपुत्र हरपला

 ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार यांच्या निधनामुळे

भारतभूमीचा सच्चा सुपुत्र हरपला

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबईदि. ४ : मेरे देश की धरतीए वतन ए वतन हम को तेरी कसमअशी एकाहून एक सरस देशभक्तीपर गीते ज्यांच्यावर चित्रित झालीअसे ज्येष्ठ निर्मातेपटकथाकारदिग्दर्शक,अभिनेते मनोजकुमार म्हणजे सर्वांचे 'भारतकुमारयांच्या निधनामुळे भारतभूमीचा एक सच्चा सुपुत्र हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

आपल्या शोकसंदेशात उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे कीआपल्या अभिनय कारकिर्दीत शहीदपुरब और पश्चिमहिमालय की गोद मैहरियाली और रास्तारोटी कपडा और मकानक्रांती अशा विविध सिनेमात मनोजकुमार यांनी मुख्य भूमिका साकारल्या. सिनेमांमधून देशभक्तीशेतकरी कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसहित भारतीयत्वाची भावना देशवासियांच्या मनात रुजवण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला.

आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य हे क्रांतिकारकांच्या बलिदानाने मिळलेले असून त्यांचा आपल्याला कधीही विसर पडू नये यासाठी त्यांनी आपल्या कलाकृतीमधून लोकांना त्यांची जाणीव करून दिली.  मनोजकुमार यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत दिलेल्या योगदानाबद्दल २०१६ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले.

भारतभूमीला वंदनीय मानणारा हा सच्चा कलावंत आज भारतभूमीच्या कुशीत कायमचा विसावला आहे. अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

००००


देशप्रेमाची भावना रुजवणारा महान अभिनेता गमावला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मनोजकुमार यांना श्रद्धांजली

 देशप्रेमाची भावना रुजवणारा महान अभिनेता गमावला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मनोजकुमार यांना श्रद्धांजली

मुंबईदि. ४ :- ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोजकुमार यांच्या निधनाने भारतीय सिनेसृष्टीतील एका महान व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे. चित्रपटांच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती आणि भारतीय समाजजीवन जनमानसावर बिंबवणाऱ्या या अष्टपैलू आणि भारतकुमार हे नाव खऱ्या अर्थाने सार्थकी लावणाऱ्या कलाकाराला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात  म्हटले आहे.

'शहीदमध्ये भगतसिंग साकारून मनोजकुमार हे देशाला सुपरिचित झाले. त्यानंतर शेतीसारखा विषय त्यांनी चित्रपटातून हाताळला आणि 'मेरे देश की धरतीसारखे गीत आजही प्रत्येक स्वातंत्र्यदिनाला त्याच अभिमानाने ऐकले जाते. त्यांच्या 'पुरब और पश्चिमसारख्या चित्रपटांनी तर जागतिक पातळीवर अनेक विक्रम प्रस्थापित केले. 'रोटी कपडा और मकानसारख्या चित्रपटांनी त्यांनी सामाजिक विषयांना हात घातला. उपकारक्रांती असे अनेक चित्रपट त्यांनी गाजवले. त्यांनी आपल्या प्रत्येक कलाकृतीतून देशप्रेमाची आणि राष्ट्रीयत्वाची भावना रुजवण्यासाठी प्रयत्न केले. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी दिलेले योगदान अमूल्य असून त्यांची जागा कधीही भरून निघणार नाही. मनोजकुमार यांनी दिग्दर्शनपटकथा-गीत लेखनसंकलन या क्षेत्रातही काम केले. त्यांनी अनेक नवोदित कलाकारांना संधी दिली. त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री आणि दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यांच्या निधनाने हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार हरपला आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि कोट्यवधी चाहत्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास सद्गती प्राप्त होवोअशी मी प्रार्थना करतोअसेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

Featured post

Lakshvedhi