Saturday, 22 March 2025

शांतता भंग करणाऱ्या* *दंगलखोरांविरुद्ध कडक कारवाई करा*,संचारबंदी टप्प्याटप्याने हटवणार आक्षेपार्ह पोस्ट संदर्भात सहआरोपी करणार Ø नुकसानीचे पंचनामे

 शांतता भंग करणाऱ्या* *दंगलखोरांविरुद्ध कडक कारवाई करा*

-- *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

 

Ø संचारबंदी टप्प्याटप्याने हटवणार

आक्षेपार्ह पोस्ट संदर्भात सहआरोपी करणार

Ø नुकसानीचे पंचनामेतीन दिवसात मदत

Ø नागपूरची शांतता भंग होणार नाहीदक्षता घेणार

Ø दंगेखोरांकडून नुकसान भरपाई वसूल करणार

 

*नागपूरदि. 22* *: नागपूर हे धार्मिकसामाजिक व सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जातेया शहराची वेगळी संस्कृती आहेकायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईलअशा प्रकारच्या घटना बरेच वर्षानंतर पहिल्यांदाच घडली आहेभविष्यात अशा प्रकारच्या घटना घडणार नाही यादृष्टीने शांतता भंग करणाऱ्या दंगलखोरांविरुद्ध अत्यंत कठोर कारवाई कराअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिलेत

नागपूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारीजिल्हाधिकारीमहानगरपालिका आयुक्त तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत शहरात घडलेल्या घटनेसंदर्भात आढावा घेतलात्यानंतर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

पोलीस आयुक्तालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीस राज्याचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेपोलीस आयुक्त डॉ.रविंद्र सिंगलनागपूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक दिलीप पाटील-भुजबळजिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकरमहानगरपालिका आयुक्त डॉअभिजित चौधरीसहपोलीस आयुक्त निसार कांबळीअतिरिक्त पोलीस आयुक्त संजय पाटीलप्रमोद शेवाळेशिवाजी राठोडपोलीस अधीक्षक हर्ष पोद्दारपोलीस उपायुक्त लोहीत मतानीराहुल मदनेमहेक स्वामीविशेष शाखेचा पोलीस उपायुक्त श्वेता खेडकरअश्विनी पाटील आदी उपस्थित होते.

शांतताप्रिय शहर म्हणून नागपूरची ओळख आहेया शहराला अशांत करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगताना मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले कीऔरंगजेबासंदर्भात दुपारी आंदोलन करणाऱ्यांविरुद्ध पोलीसांनी कारवाई केल्यानंतरही समाजकटंकांकडून सायंकाळी दंगा भडकविण्यात आलादंगलखोरांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस विभागाने तत्काळ कारवाई करुन दंगल आटोक्यात आणलीपरंतु या दंगलीमध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांची जाळपोळ व संपत्तीचे नुकसान झाले आहेपोलिसांवरही दगडफेक केल्यामुळे 34 पोलीस जखमी झाले आहेतअशा प्रकारच्या घटना शहराच्या कुठल्याही भागात घडणार नाही यादृष्टीने पोलीस विभागाने सतर्क राहून कठोर कारवाई करावीअसे निर्देश यावेळी दिले.

शहराच्या अकरा पोलीस स्टेशनच्या परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेया संदर्भात 13 गुन्हे दाखल झाले असून 104 आरोपींना अटक करण्यात आली आहेत्यापैकी 12 विधी संघर्ष बालक आहेतशहरातील सीसीटीव्ही कॅमेरे तसेच जनतेकडून प्राप्त झालेल्या कव्हरेज (व्हिडीओ क्लीपच्या आधारे दंगलखोरांना शोधून त्यांच्याविरुद्ध कडक कारवाईचा सूचना देण्यात आल्या असून एकही दंगलखोर यामधून सुटणार नाहीअशी सूचना करताना मुख्यमंत्री म्हणाले कीदंगल भडकविण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या विविध समाज माध्यमांवरील पोस्टची तपासणी करुन अशा प्रकारच्या 250 पोस्ट शोधण्यात आल्या आहेतया पोस्ट टाकणाऱ्या 62 लोकांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहेतर दोन लोकांना अटक करण्यात आली आहेअशा पोस्ट टाकणारे व शेअर करणाऱ्यांविरुद्ध दंगल भडकविल्याबद्दल सहआरोपी करण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले

झालेल्या नुकसानीची दंगलखोरांकडून भरपाई

दंगलीमध्ये मालमत्तेचे तसेच वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेतनुकसानीसंदर्भात पंचनामे करुन येत्या तीन ते चार दिवसात नुकसान भरपाई देण्याच्या सूचना करताना मुख्यमंत्री म्हणाले कीसंपूर्ण नुकसानीची भरपाई दंगलखोरांकडून करण्यात येईलनुकसान भरपाई करताना दंगलखोरांच्या मालमत्तेची विक्री करुन संपूर्ण भरपाई वसूल करण्यात येईलयासाठी महानगरपालिकाजिल्हा प्रशासन व पोलीस विभागातर्फे संयुक्त कारवाई करण्याचे निर्देश यावेळी दिले

दंगलीमध्ये 71 वाहनांचे तसेच विविध मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेनुकसानी संदर्भात जिल्हा प्रशासनाने पंचनामे सुरु केले आहेवाहनांच्या नुकसानी संदर्भात विमा कंपन्यांना आवश्यक असलेले दस्ताऐवज उपलब्ध करुन देण्यासबंधी तत्काळ कारवाई करावीअशी सूचना यावेळी केली.

शांतता राखण्यासाठी सहकार्य करा मुख्यमंत्र्यांचे आवाहन

शहरात आगामी काळात विविध समुदयांकडून सण व उत्सव आयोजित करण्यात येतातअशा उत्सवाच्या प्रसंगी कुठलाही अनूचित प्रकार घडणार नाही याची प्रशासनाने दक्षता घ्यावीतसेच सण व उत्सवाच्या काळात शांतता भंग होणार नाही यादृष्टीने जनतेनेही प्रशासनाला सहकार्य करावेअसे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला केले आहेशांतता भंग करणाऱ्यांविरुद्ध पोलिस विभागाने तात्काळ दखल घेऊन कठोर कारवाई करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले.

प्रारंभी पोलिस आयुक्त डॉ.रविंद्र सिंगल यांनी शहराच्या काही भागात भरलेल्या घटनेसंदर्भातील माहिती सादरीकरणाद्वारे दिलीया घटनेतील दोषी असणाऱ्या सर्वांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईलअशी ग्वाही दिली.

 

******

 

 

 

 

 

 

 

 

 

आरोग्य सेवेतील गट - ड च्या 680 पदांची सरळसेवेने भरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले नियुक्ती आदेश

 आरोग्य सेवेतील गट -  च्या 680 पदांची सरळसेवेने भरती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले नियुक्ती आदेश

 

 नागपूर,दि.22 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयदंत तसेच आयुर्वेद महाविद्यालयासह संलग्न नऊ रुग्णालयातील गट  संवर्गातील 680  पदांची सरळसेवेने भरती करण्यात आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत् देण्यात आलेनियुक्त झालेल्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्यातरुग्णालयातील रुग्णांना उत्तम सेवा देण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.

 जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात गट -   संवर्गातील मंजूर पदापैकी बऱ्या वर्षापासून 680 पदे रिक्त होतीरिक्त असलेल्या पदावर सरळसेवा रतीची प्रक्रिया तात्काळ सुरु रण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्रीफडणवीस यांनी दिल्या होत्यात्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती स्थापन करण्यात आली होतीया समितीतर्फे पदभरतीची एकत्र प्रक्रिया राबविण्यात आली होतीशासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना या समितीचे सदस्य सचिव म्हणून नेमण्यात आले होते.

 रामगिरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निवड झालेल्या 13 उमेदवारांना प्रातिनिधीक स्वरुपात नियुक्तीचे आदेश देण्यात आलेयावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉराज गजभिये उपस्थित होते.

 जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय हाविद्यालयमेयोदंतआयुर्वेद महाविद्यालय  सलग्नित रुग्णालयातील गट  सवर्गातील रळसेवेचे रिक्त पदे भरण्याकरिता मागणीपत्र सामाजिक  समांतर आरक्षणासह मागविण्यात आले होतेजिल्ह्यातील नऊ संस्थांकडून 680 रिक्त पदाची जाहिरात प्रसिद्ध रण्यात आली होतीयामध्ये ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होतेप्राप्त झालेल्या अर्जामधून 680 उमेदवारांची निवड करण्यात आलीयामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी 66 पदेशासकीय वैद्यकीय महाविद्यालय  रुग्णालये 344 पदेशासकीय वैद्यकीय महाविद्यालय  अतिविशेषोउपचार रुग्णालयासाठी 19 पदेग्रामीण आरोग्य केंद्र सावनेर 11 पदेइंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय हाविद्यालय 57 पदेइंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय हाविद्यालय  रुग्णालयासाठी 135 पदेशासकीय दंत महाविद्यालय  रुग्णालयासाठी 22 पदेशासकीय आयुर्वेद महाविद्यालय 3 पदे तर शासकीय आयुर्वेद रुग्णालयासाठी 23 पदांचा समावेश आहे.

रुग्णसेवेला बळकटी

 जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय हाविद्यालय  विविध सलग्नित रुग्णालयात एकत्र 680 रिक्त पदांची भरती होत असल्यामुळे रुग्णसेवेला बळकटी मिळणार आहेरुग्णसेवेसाठी गट  मधील भरती त्यंत आवश्यक होतीअशी प्रतिक्रिया शासकीय वैद्यकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता  निवड समितीचे सदस्य सचिव डॉ.राज जभिये यांनी यावेळी दिली.

सोलापूर जिल्ह्यातील अवैध मार्गाने आलेल्या बांगलादेशी नागरिकांविरोधात कारवा

 सोलापूर जिल्ह्यातील अवैध मार्गाने आलेल्या बांगलादेशी नागरिकांविरोधात कारवाई

-         गृह राज्यमंत्री योगेश कदम

मुंबईदि. २१ : सोलापूर जिल्ह्यातील एमआयडीसी नई जिंदगी भागातविमानतळ शेजारी आणि कणबस (दक्षिण सोलापूर) येथे अवैध मार्गाने आलेल्या बांगलादेशी नागरिकांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. श्री जगदंबा महिला रेडीमेड ड्रेसेस या ठिकाणी १२ बांगलादेशी नागरिक आढळून आले. त्यांनी भारतात वैध परवाना किंवा कागदपत्रांशिवाय प्रवेश केला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य सुभाष देशमुख यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

गृह राज्यमंत्री कदम म्हणाले कीदहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि एमआयडीसी पोलीस ठाणेसोलापूर यांनी संयुक्त कारवाई करत या कारखान्यात पाहणी केली असतातेथे १२ बांगलादेशी नागरिक सापडले. त्यानंतर तपास पथके बंगळूर आणि मुंबई येथे पाठवण्यात आली. या कारवाईत आणखी दोन जणांना ताब्यात घेतले असूनएकूण १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

            गृहराज्यमंत्री श्री.कदम म्हणाले की, सुरक्षा यंत्रणांकडून संशयित बांगलादेशी नागरिकांची तपासणी नियमितपणे केली जाते. संशयास्पद नागरिकांची माहिती वेळोवेळी मिळावी यासाठी नागरिकांनी आणि व्यवसायिकांनी सतर्क राहावे. घर भाड्याने देताना किंवा कामगार नियुक्त करताना त्यांची माहिती पोलिसांना देणे आवश्यक आहे. बांगलादेशी नागरिक अवैध मार्गाने कामावर रुजू झाले असल्याससंबंधित कंपन्यांवरही गुन्हे दाखल करण्यात येतील असेही गृहराज्यमंत्री श्री. कदम यांनी सभागृहात सांगितले.

०००</sp


गडचिरोलीतील मानवावरील वाघांचे हल्ले रोखण्यासाठी तीन महिन्यात आराखडा तयार करा

 गडचिरोलीतील मानवावरील वाघांचे हल्ले रोखण्यासाठी तीन महिन्यात आराखडा तयार करा

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. 22 : गडचिरोली जिल्ह्यात व्याघ्र हल्ल्यातील मनुष्यहानी टाळण्यासाठी परिस्थितीचा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करून तातडीने विशेष उपाय योजना राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेतयामध्ये गेल्या पाच वर्षात वाघ्र हल्ल्यातील मृत्यूमुखींच्या कुटुंबियांना विशेष नुकसान भरपाई देणेअतिरिक्त वाघांचे स्थलांतर आदींचा समावेश असून त्याचा अहवाल तीन महिन्यात देण्याचे निर्देश मुख्यमंत्री महोदयांनी दिले आहेत

 

मुख्यमंत्री श्रीफडणवीस यांनी वाघांच्या हल्ल्यातील नागरिकांच्या जिवीत हानीची गंभीर दखल घेतली आहेगडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून त्यांनी तेथील नागरिकांच्या मागणीची तत्काळ दखल घेऊन यावर उपाय योजना सुचविण्याचे निर्देश दिलेतसेच यासाठी मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली आराखडा तयार करण्याचे निर्देश दिलेत्यानुसार श्रीपरदेशी यांनी नागपुरात वरिष्ठ वन अधिकाऱ्यांची बैठक घेऊन उपाय योजनांवर चर्चा केली व त्यावर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिलेया बैठकीस राज्याच्या प्रधान मुख्य वन संरक्षक (वन बल प्रमुखशोमिता बिस्वासअपर प्रधान मुख्य वन संरक्षक विवेक खांडेकरताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक डॉरामचंद्र रामगावकरगडचिरोली वन वृत्ताचे मुख्य वन संरक्षक एसरमेशकुमार आदी उपस्थित होते.

 

व्याघ्र हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना विशेष नुकसान भरपाई

 

गडचिरोली जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत व्याघ्र हल्ल्यात सुमारे 50 हून अधिक मनुष्याचा मृत्यू झाला आहेविशेषतः गडचिरोलीचार्मोशीआरमोरीवडसा आणि धानोरा क्षेत्रात वाघांच्या हल्ल्यात नागरिकांचा मृत्यू झाला आहेगडचिरोलीतील परिस्थितीचा अभ्यास करून गडचिरोलीतील अतिरिक्त वाघांचे स्थलांतर तीन महिन्यात करण्यात यावेततसेच गेल्या पाच वर्षांत व्याघ्र हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची माहिती गोळा करून त्यांच्या वारस कुटुंबियांना विशेष नुकसान भरपाई देण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्रीफडणवीस यांनी दिले होते.

यासंदर्भात परिस्थितीचे अवलोकन करून आराखडा तयार करण्यासंदर्भात मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार 'मित्रा'चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीपरदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झालीया बैठकीत विविध उपाययोजनांवर चर्चा झालीयामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील चपराळा व प्राणहिता अभयारण्यात सागवान झाडांचे विरळीकरण करणे व कुरणाचे प्रमाण वाढविण्याचा निर्णय झालाजेणेकरून तृणभक्षी प्राण्याची संख्या वाढून मांस भक्षी प्राण्यांना खाद्य मिळेलप्रत्येक गावात पोलिस पाटीलच्या धर्तीवर वन पाटील नेमण्याचेही यावेळी ठरविण्यात आलेस्थानिकांना जंगलात लाकूडसरपण गोळा करण्यासाठी जंगलात जावे लागू नये यासाठी गावामध्ये पाइपलाइनद्वारे CBG गॅस पुरवठा करण्यासाठी ग्रामस्थांच्या शेतात गवत उत्पादन करून त्याचा उपयोग सीबीजीसाठी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आलात्यासाठी सीबीजी गॅस प्लांट उभारण्याचेही ठरविण्यात आलेवन्य प्राण्यामुळे नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई लवकर देण्यासाठी ई पंचनामा करणेवाघांची वाढती संख्या लक्षात घेऊन चपराळा अभयारण्यातील 6 गावांच्या स्थलांतरासाठी तेथील स्थानिकांचे सामाजिकआर्थिक मूल्यांकन करणेपुनर्वसनासाठी नव्या जागेचा शोध घेणे आदी उपाय योजना राबविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

तसेच यासंबंधीच्या उपाय योजना करण्याबाबत या विषयावर काम करणाऱ्या वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट सारख्या संस्थांच्या तज्ञांची नेमणूक करण्यात येणार आहेधोकाग्रस्त व संवेदनशील क्षेत्राचे सौम्यीकरण (मिटीगेशनआराखडा तयार करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आलीमानव आणि वन्यजीव संघर्षात आढळणारे वाघ हे वयस्कर असल्याचे दिसून येतेअशा वाघाच्या स्थलांतर संदर्भातही धोरणात्मक निर्णय घेण्याचे आवश्यक असल्याचे मत यावेळी मांडण्यात आले

00000

Featured post

Lakshvedhi