Thursday, 20 March 2025

नियमबाह्य भाडे आकारणाऱ्या रिक्षा/ टॅक्सी चालकांच्या तक्रारीसाठी लवकर व्हाट्सअप क्रमांक

 नियमबाह्य भाडे आकारणाऱ्या रिक्षा/ टॅक्सी चालकांच्या

तक्रारीसाठी लवकर व्हाट्सअप क्रमांक

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 

मुंबईदि. २० : प्रवाशांना नियमबाह्य भाडे आकारणेभाडे नाकारणे तसेच गैरवर्तन करणाऱ्या रिक्षा - टॅक्सी तसेच ओला -उबर चालकांच्या तक्रारीसाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रामध्ये एकच व्हाट्सअप क्रमांक प्रदर्शित करण्यात येणार आहे. प्रवाशांनी आपल्या गैरसोय बाबत या क्रमांकावर प्रवाशांनी तक्रार नोंदवावी, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. ते वांद्रे पूर्व मतदारसंघातील बांद्रा, खार व इतर रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा व टॅक्सी चालकांच्या अरेरावी संदर्भात बोलावलेल्या बैठकीत बोलत होते. यावेळी आमदार वरुण सरदेसाई व मोटार परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 वांद्रे पूर्वचे आमदार वरुण सरदेसाई यांनी बांद्रा, खार अंधेरी या रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांना रिक्षा व टॅक्सी चालकांची अरेरावी सहन करावी लागते. हे चालक नियमबाह्य पद्धतीने भाडे आकारतात, गैरवर्तन करताततसेच अनेक प्रवाशांना इच्छित स्थळी सोडण्यास नकार देतात. या संदर्भात परिवहन विभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली. या वेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले कीमोटार परिवहन विभाग व वाहतूक पोलीस यांनी मिळून एक संयुक्त पथक नेमावे ज्या भागात अशाप्रकारे प्रवाशांना रिक्षा चालकाकडून त्रास होतो तेथे वारंवार ग्रस्त घालावी. तसेच  प्रादेशिक विभाग निहाय हेल्पलाईन क्रमांक प्रदर्शित न करता पूर्ण मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रामध्ये एकच व्हाट्सअप क्रमांक प्रदर्शित करावा व त्याला व्यापक प्रसिद्धी द्यावी. जेणेकरून प्रवासी आपल्या तक्रारी संबंधित व्हाट्सअप क्रमांकावर करतील.

तक्रार असलेल्या रिक्षा अथवा टॅक्सी चालकाला परिवहन विभागाने नोटीस पाठवणे आवश्यक असून तक्रारीची गंभीरता लक्षात घेऊन गरज पडल्यास त्याचा परवाना देखील रद्द करण्याची कारवाई करावी, असे निर्देश परिवहन विभागाला मंत्री श्री. सरनाईक यांनी दिले.

अंतराळवीर सुनीता विल्यम yanc m यांचा थरार प्रवास

 *सुनीता विल्यम्ससह चारही अंतराळवीर परतले पृथ्वीवर; कसा होता परतीच्या प्रवासाचा थरार?*


भारतीय वंशांच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोघेही परतीच्या प्रवासासंदर्भातील सर्व प्रकारचे अडथळे दूर करत आता पृथ्वीवर परतले आहेत.


हे दोघेही तब्बल 9 महिने अंतराळात अडकून पडले होते.


'ड्रॅगन' या स्पेसएक्सच्या अंतराळयानामधून आणखी दोन अंतराळवीर त्यांना परत आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेपावले होते.


खरंतर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर या दोन अंतराळवीरांनी 5 जून 2024 रोजी परीक्षणयान असलेल्या स्टारलायनरमधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेप घेतली होती.


तिथे आठ दिवस घालवल्यानंतर ते परतणार होते; मात्र, त्यांच्या अंतराळयानामध्ये बिघाड झाल्यामुळे हे दोघेही तिथेच अडकून पडले होते.


सरतेशेवटी, आज म्हणजेच भारतीय वेळेनुसार 19 मार्चच्या पहाटे सर्व अंतराळवीर सुखरुपपणे परतले आहेत.


*कसा झाला परतीचा प्रवास?*

खरं तर कोणतीही अंतराळ मोहिम ही जोखमीची असते. त्यात अंतराळात अडकून पडल्यानंतर या दोन अंतराळवीरांबद्दल काळजी वाटणं अगदीच स्वाभाविक होतं. संपूर्ण जगाचं लक्ष या मोहिमेकडे लागलेलं होतं.


सर्व प्रकारचे अडथळे दूर करत तब्बल नऊ महिन्यांनंतर त्यांना परत आणण्यासाठी स्पेसएक्स 'ड्रॅगन फ्रीडम'च्या लँडिंगसाठी समुद्रातल्या 8 लँडिग साईट्स ठरवण्यात आल्या होत्या.


फ्लोरिडाच्या समुद्रात होणारा अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवरचा हा शेवटचा स्प्लॅश डाऊन होता. 6 वर्षं फ्लोरिडाच्या समुद्रात स्प्लॅश डाऊन - रिकव्हरी केल्यानंतर पुढच्या मोहीम अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरच्या समुद्रात स्प्लॅश झाला. टॅलाहासी हा निवडलेला लँडिंग झोन होता, कारण इथलं हवामान रिकव्हरीसाठी योग्य होतं.


पृथ्वीच्या वातावरणात शिरल्यानंतर कॅप्सूल भोवतीचं बाहेरचं तापमान वाढत असताना PICA 3.0 हीटशील्डने ड्रॅगन फ्रीडमला संरक्षण दिलं.


दरम्यानच्या काळात अंतराळवीरांनी घातलेल्या स्पेससूट्समधून थंड हवा खेळवली गेली, जेणेकरून त्यांच्या शरीराचं तापमान कमी राहायला मदत होते. ड्रॅगन फ्रीडमला सोसावं लागणारं सर्वोच्च तापमान 1926.667 सेल्शियस म्हणजे 3500 फॅरनहाईट् इतकं होतं.

फ्रीडम कॅप्सूल पृथ्वीच्या वातावरणातून जमिनीच्या दिशेने येत असताना मधला काही काळ कॅप्सूलसोबतचा संपर्क काही मिनिटांसाठी तुटला. हा सामान्य प्रक्रियेचा भाग असतो. काही काळाने हा संपर्क पुन्हा प्रस्थापित झाला.


वातावरणात शिरण्यापूर्वी क्रू ने खिडकीच्या झडपा बंद केल्या, त्यांच्या हातातले टॅब्लेट्स आणि इतर गोष्टी ठेवून दिल्या आणि हार्नेस घट्ट केली.


ड्रॅगन हे ऑटॉमॅटिक मोडवर प्रवास करत होतं. म्हणजे ते स्वतःचा मार्ग स्वतः ठरवतं. क्रू यावर फक्त लक्ष ठेवून होता.


WB57 हाय अल्टिट्यूड विमानाद्वारे ड्रॅगन फ्रीडमच्या पृथ्वी प्रवासाची दृश्यं दिसत होती.


ड्रॅगन फ्रीडम पृथ्वीच्या वातावरणात शिरल्यानंतर आपोआपच वेगवेगळ्या वेळी पॅराशूट्स उघडली. याने कॅप्सूलचा भाग वेगळा झाला. पॅराशूट्सची पहिली जोडी कॅप्सूल 18000 फुटांवर आल्यावर उघडलं. तर दुसरी मुख्य जोडी 6500 फुटांवर उघडली. यानंतर चार पॅराशूट्सच्या मदतीने ड्रॅगन फ्रीडम कॅप्सूल तरंगत खाली आलं.


भारतीय वेळेनुसार 19 मार्चच्या पहाटे 3 वाजून 27 मिनिटांनी स्प्लॅश डाऊन झाला.


*क्रू नाईन बॅक ऑन अर्थ... वेलकम होम'*

अंतराळवीरांचा स्पेस स्टेशन ते पृथ्वीवरचा प्रवास हा सुमारे 17 तासांचा होता.


"क्रू नाईन बॅक ऑन अर्थ... वेलकम होम" अशी घोषणा ग्राऊंड कंट्रोलने करत अंतराळवीरांचं स्वागत केलं.


ड्रॅगन कॅप्सूल समुद्रात कोसळल्यानंतर पॅराशूट्स ऑटोमॅटिकली कॅप्सूलपासून वेगळी झाली. असं केल्याने पॅराशूट्सोबत कॅप्सूल प्रवाहात ओढली जात नाही.


रिकव्हरी क्रू ड्रॅगन फ्रीडम पर्यंत पोहोचे पर्यंत ग्राऊंड कंट्रोल आणि कॅप्सूलमधल्या अंतराळवीरांमध्ये संवाद सुरू होता. मुख्य रिकव्हरी टीम्सना इथे पोहोचेपर्यंत 30 मिनिटांचा काळ लागला.


त्याआधी फास्ट बोट्स इथे पोहोचल्या त्यांनी समुद्रात पडलेली पॅराशूट्स गोळा केली. शिवाय समुद्रात तरंगणाऱ्या कॅप्सूलचे काही सेफ्टी चेक्सही करण्यात आले. पुढच्या रिकव्हरी टीमला स्पेसक्राफ्टपर्यंत येणं सोपं आहे का, हे तपासण्यात आलं.


त्यानंतर स्पेसएक्सच्या फ्लाईट सर्जननी कॅप्सूलमधल्या अंतराळवीरांशी संवाद साधला. अंतराळवीरांच्या तब्येतीबद्दल जाणून घेण्यात आलं.


मुख्य रिकव्हरी टीम येईपर्यंत आधी पोहोचलेल्या टीमने समुद्रातल्या तरंगणाऱ्या कॅप्सूलला उघडण्यासाठीची आणि ही कॅप्सूल उचलण्यासाठीची तयारी केली.


या तरंगणाऱ्या कॅप्सूलच्या आजूबाजूला डॉल्फिन्सही दरम्यानच्या काळात पहायला मिळाले.


मेगन नावाच्या रिकव्हरी जहाजाला ही कॅप्सूल जोडण्यात आली. नासाच्या अंतराळवीर मेगन आर्थर यांच्यावरून या जहाजाला हे नाव देण्यात आलंय. जवळ ओढल्यानंतर ही कॅप्सूल उचलून जहाजाच्या प्लॅटफॉर्मवर ठेवण्यात आली.


स्पेसक्राफ्टच्या बाहेरच्या बाजूला समुद्राचं खारं पाणी लागल्याने या पत्र्याची झीज होते. म्हणूनच कॅप्सूलवर गोडं पाणी मारून समुद्राचं पाणी काढलं जातं.


यानंतर ड्रॅगन कॅप्सूलच्या एका बाजूला असणारा दरवाजा 'साईड हॅच' उघडण्यात आला. पृथ्वीवरून उड्डाण करताना आत शिरण्यासाठी आणि पृथ्वीवर परतल्यानंतर अंतराळवीरांना बाहेर काढण्यासाठी या हॅचचा वापर केला जातो.


हॅच उघडल्यानंतर वैदयकीय टीमपैकी एकजण कॅप्सूलमध्ये गेला. तर रिकव्हरी टीमने अंतराळवीरांना बाहेर काढण्यासाठी कॅप्सूलमधून बाहेर येणारा रॅम्प बसवला.


ड्रॅगन फ्रीडम कॅप्सूलमध्ये मधल्या दोन सीट्सवर बसलेल्या अंतराळवीरांना आधी बाहेर काढण्यात आलं. सगळ्यात आधी नासाचे अंतराळवीर निक हेग यांना बाहेर काढलं गेलं. त्यानंतर रशियन कॉस्मोनॉट अलेक्झांडर गोर्बोनॉव्ह, नासा अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना कॅप्सूल बाहेर काढण्यात आलं.


क्रूला कॅप्सूलमधून बाहेर काढल्यानंतर अंतराळवीरांना स्ट्रेचरवर ठेवलं गेलं. हा नेहमीच्या प्रक्रियेचा भाग आहे. रिकव्हरी टीम्समध्ये डॉक्टर्सचाही समावेश असतो. हे डॉक्टर्स पृथ्वीवर परतलेल्या अंतराळवीराच्या तब्येतीची प्राथमिक तपासणी करतात. दीर्घकाळ अंतराळात घालवून पृथ्वीवर परतणाऱ्या अंतराळवीरांना बाहेर काढण्यासाठीची आणि त्यानंतरची प्रक्रिया ठरलेली असते.


ड्रॅगन स्पेसक्राफ्ट उचलून क्रूला बाहेर करण्यासाठी साधारण तासाभराचा काळ लागला. मेडिकल चेकअप नंतर चार तासांत क्रू जमिनीवर परतेल. आणि अधिकची वैद्यकीय मदत लागली नाही तर क्रू नासाच्या विमानाने ह्यूस्टनला जाईल आणि हे अंतराळवीर कुटुंबीयांना - मित्रमंडळींना भेटतील.



*समुद्रभाजी पुराण*

 *समुद्रभाजी पुराण*


मोदका पेक्षा *मोदकं* (एक लहान मासा) आवडणारे काही लोक असतात.


आंबटपणा नसून देखील कैरी, चिंच किंवा आवळ्याप्रमाणेच तोंडाला पाणी सुटवण्याची ताकद माशांमध्ये असते.


मांदेली, मोदकं या सारखे मासे मोजून खाल्ले तर गणित हमखास चुकतं.


कुठला काटा काढायचा, कुठला खाऊन टाकायचा आणि कुठल्या काट्याच्या वाट्याला जाऊ नये ही आयुष्यातील गणितं मासेच शिकवतात.


बोंबील वाढल्यावर जरा काटा काढून दे असं म्हणणारा ओरिजिनल फिशलव्हर नसतो.


पेग भरलेला असताना पेगकडे दुर्लक्ष करायला लावण्याची ताकद छोट्या छोट्या तळलेल्या कोलंबी मध्ये असते.


कितीही मासे खाल्ले तरी, आज खूप जेवण झालं, अंगावर आलंय वगैरे प्रकार होत नाहीत. 


'चार दिवस तेच खातोय, आता किमान आठवडा भर तरी नको' हे वाक्य मटण, चिकन, अंडी किंवा अगदी कडधान्यं, भाज्या खाऊन सुद्धा बोललं तरी चालतं, पण मासे खाऊन.......केवळ अशक्य. 


सुरमई ताजी नाही, आज रावस घेऊन जा असं सांगणाऱ्या व्यक्तीबरोबर घनिष्ठ मैत्री करावी.


आम्ही फक्त सुरमई, पापलेट, कोलंबी आणि हलवा खातो... हे आम्ही फिरायला फक्त लंडनलाच जातो म्हणण्यासारखं आहे.


टूरवर गेले असताना जेवण्याच्या वेळी ‘इथे मासे कुठे चांगले मिळतात हो?’ हा प्रश्न (कोणत्याही भाषेत) विचारणारे हे उत्तम सहप्रवासी असतात असा माझा अनुभव आहे. 


मासे शिजवायच्या आमटी, कालवण, रस्सा, तिखलं, करी किंवा भाजी अशा अनेक रेसिपी असतात. फक्त एकाच प्रकारची रेसिपी सगळ्या माशांना नाही चालत.


वांग्याच्या भाजीत जवळा, करंदी, सोडे घातले  तर चव सुधारते. पण जवळा, करंदी किंवा सोड्याच्या भाजीत वांगी मिक्स केली तर मजा कमी होते.


मोरी (शार्क) मटनासारखी बनवायची नसते. मोरी ही मोरी सारखीच बनवायची असते.


बोंबलाचा बदकाशी काही संबंध नाही. त्याला बॉम्बे डक हे नाव मुंबई वरून पोस्ट किंवा डाक ज्या ट्रेनने जायची त्या ट्रेन मधून नेले गेल्यामुळे पडले. बॉम्बे डक. दिल्ली, इंदोर, लखनौ सारख्या काही प्रदेशातल्या जेवणाला सर्वोत्तम समजणाऱ्या लोकांचा बहुदा जलचरांबरोबर परिचय झालेला नसतो. 


देशातल्या कुपोषणासारख्या भीषण समस्या फक्त माशांच्या आहारातल्या समावेशाने नियंत्रणात आणल्याच्या घटना नोंदल्या गेल्या आहेत. 


सुक्या माशांचं एक स्वतंत्र विश्व आहे. त्यांना 'तेच ते' म्हणणाऱ्यांनी फक्त हराभरा कबाब खावा.


🦈🐟🐠🦐🦞🦀


।। इति श्री मत्स्यपुराणम् समाप्तम् ।।

द्राक्ष शेतावरील देवप्लास्टिक आवरणावर अनुदान देण्यास शासन सकारात्मक

 द्राक्ष शेतावरील प्लास्टिक आवरणावर

अनुदान देण्यास शासन सकारात्मक

- मंत्री दादाजी भुसे

मुंबईदि. २० : द्राक्ष फळ पीके संवेदनशील आहे. अवकाळी पाऊसगारपीट तसेच वादळ वारा यामुळे द्राक्ष फळ पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होते. द्राक्ष फळ पिकाच्या शेतीवर प्लास्टिक आवरण असल्यास होणारे नुकसान टाळता येऊ शकते. यासाठी शासन प्लास्टिक आवरणासाठी अनुदान देण्यास सकारात्मक आहेअसे मंत्री दादाजी भुसे यांनी आज विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

द्राक्ष उत्पादकांच्या समस्या बाबत सदस्य रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेमध्ये सदस्य जयंत पाटीलदिलीप बनकरविश्वजीत कदम यांनीही सहभाग घेतला.

मंत्री भुसे म्हणालेशेतकऱ्याच्या शेतावर जाऊन काही व्यापारी द्राक्ष माल खरेदी करतात. मात्र काही प्रकरणात शेतकऱ्यांना पैसे न दिल्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यास अशा प्रकरणात पोलीस कारवाई करण्यात येते. जुलै ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे झालेल्या नुकसानीपोटी १९३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच नोव्हेंबर ते डिसेंबर २०२४ मध्ये झालेल्या नुकसानीपोटी ९६ लक्ष रुपये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातही या कालावधीत झालेल्या नुकसानीपोटी ८०५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही मदत जमा करण्याची कार्यवाही गतीने पूर्ण करण्यात येणार आहे.

शासन कोरडवाहू शेतीचे नुकसान झाल्यास प्रति हेक्टरी १३ हजार ६००बागायती २७ हजार ५०० आणि फळबाग नुकसानीपोटी ३६ हजार रुपये नुकसान भरपाई देते. या नियमानुसार फळबाग नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईलअसेही मंत्री भुसे यांनी सांगितले.


पालघर येथील ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे पूर्ण करणार

 पालघर येथील ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे पूर्ण करणार


- सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक


मुंबई, दि. २० : पालघर जिल्ह्यातील डोंगराळ आणि अतिदुर्गम भागात असलेल्या रस्त्यांची सुधारण करण्यात येऊन रस्ते चांगल्या दर्जाची करण्यात येतील. दाभेरी ते बोपदरी या राज्य मार्गावर २.९ किलोमीटर आंतराच्या रस्ता सुधारणा कामास कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. तसेच दाभेरी - राहूळ - सागपाणी या प्रमुख जिल्हा मार्गाचे काम सुरू असून दोन्ही रस्ते मे २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येतील, असे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.


पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांबाबत सदस्य राजेंद्र गावित यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेमध्ये सदस्य जयंत पाटील यांनीही सहभाग घेतला.


मंत्री नाईक म्हणाले, दाभेरी ते डाळ या रस्त्यावर राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा सुरू आहे. ज्या मार्गांवर बस सेवा बंद आहे, त्या मार्गावर बससेवा सुरू करून जनतेची गैरसोय दूर होईल.


या चर्चेदरम्यानच्या उपप्रश्नाला उत्तर देताना मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे म्हणाले, पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर होत आहे या बंदरामध्ये 26 टक्के वाटा राज्य शासनाचा आहे. बंदराच्या निर्मितीनंतर भारत जगात मोठी टर्मिनल क्षमता असलेल्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसणार आहे. त्यामुळे या भागातील पायाभूत सोयी- सुविधा निर्माण करण्यावर शासन भर देणार आहे.

राज्यात यंदाच्या वर्षी ४४ लाख क्विंटल कापसाची खरेदी

 राज्यात यंदाच्या वर्षी ४४ लाख क्विंटल कापसाची खरेदी

-         पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबईदि. २० : राज्यात यंदाच्या वर्षी १८ मार्च २०२५ रोजीपर्यंत सीसीआय म्हणजेच कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून ४४ लाख क्विंटल कापसाची खरेदी पूर्ण झाल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधानपरिषदेत दिली.

            सदस्य अभिजीत वंजारी यांनी अल्पकालीन चर्चेदरम्यान उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री रावल बोलत होते. यावेळी  सदस्य सदाभाऊ खोतअमोल मिटकरीपरिणय फुकेअरुण लाड यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.

कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून राज्यात कापूस खरेदी केंद्र उघडण्यात येतात आणि त्यांच्याकडूनच कापसाची खरेदी केली जाते असे सांगून मंत्री रावल म्हणाले कीयंदा कापसाला लांब धाग्यासाठी ७ हजार ५२१ रुपये तर मध्यम धाग्यासाठी ७ हजार १२१ रुपये हमीभाव देण्यात येत आहे.  कापूस खरेदीसाठी राज्यात १२४ खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. कापूस खरेदीनंतर त्याच्या जिनींग आणि प्रेसिंगची प्रक्रिया केली जाते. त्यासाठी सप्टेंबर ते सप्टेंबर असा करार प्रेसिंगवाल्यांसोबत केलेले असतात. त्यामुळे कापूस खरेदी बंद नसल्याचे मंत्री रावल यांनी स्पष्ट केले.

सोयाबीन संदर्भात बोलताना मंत्री रावल म्हणाले कीजवळपास ११ लाख २१ हजार टन सोयाबीन यंदा  खरेदी करण्यात आले आहे. त्याशिवाय तूरमुगउडीद, हरभरा या पिकांचीही खरेदी हमीभावाने होत आहे. या पिकांनाही चांगला हमीभाव देण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी शासन कायमच प्रयत्नशील असून राज्यात सिंचन क्षमतेत वाढ करण्यात येत आहे. सिंचनाच्या चांगल्या सोयी निर्माण झाल्या पाहिजेत. तसेच खासगी बाजार समित्यांच्या बाबत धोरण राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याची माहितीही मंत्री रावल यांनी सभागृहात दिली.

0000

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील केस गळतीचे प्रकार रेशनच्या गव्हामुळे नाहीत

 बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील

केस गळतीचे प्रकार रेशनच्या गव्हामुळे नाहीत

- राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

मुंबईदि. २० : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव  तालुक्यात अचानक केसगळतीचे प्रकार दिसून आले आहेत. हे केसगळतीचे प्रकार रेशनच्या गव्हामुळे झालेले नाहीत. तसेच पाण्यामुळेही झाल्याचे दिसून येत नसल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डिकर साकोरे यांनी दिली.

            अल्पकालीन चर्चेदरम्यान सदस्य सत्यजीत तांबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री बोर्डिकर साकोरे बोलत होत्या. यावेळी चर्चेमध्ये सदस्य किशोर दराडेविक्रम काळे यांनी सहभाग घेतला. 

            बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील केसगळतीचा प्रकार गंभीर असल्याचे सांगून राज्यमंत्री बोर्डिकर म्हणाल्या कीया केसगळतीचा प्रकार समोर आलेल्या प्रत्येक गावामध्ये घरोघरी सर्वेक्षण करण्यात आले आहे. या ठिकाणचे पाणीमातीरक्ताचे नमुने तसेच गहू यांचे नमुने गोळा करण्यात आले. त्याच्या तपासणीसाठी आय सी एम आर कडे पाठवण्यात आले आहेत. आयसीएमआरचा अहवाल आल्यानंतर हे केसगळतीचे प्रकार कशामुळे घडत आहेत हे स्पष्ट होईल आणि त्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येईल. तसेच या गावांमधील लहान मुले तसेच गर्भवती महिला यांचीही आरोग्याची तपासणी करण्यात आली आहे. तसेच राज्यात शासानामार्फत अनेक योजना राबवण्यात येत असतात. त्यामध्ये लाभार्थ्यंना धान्य वाटपापासून शिवभोजनमध्यान्न भोजन अशा योजनांचा समावेश आहे. अशा थेट अन्न धान्य आणि खाद्यांनांशी संबंधित योजनांच्या वाटपामध्ये उत्कृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचा आणि खाद्यांन्नांचे वाटप होते का नाही याची तपासणी करण्यात येते. या खाद्यांन्नांच्या तपासण्या आणखी कडक करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.  आश्रमशाळा तसेच शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या मध्यान्न भोजनाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत. जर काही ठिकाणी यामध्ये हलगर्जीपणा आढळल्यास कारवाई करण्यात येईलअसेही राज्यमंत्री बोर्डिकर साकोरे यांनी सभागृहात सांगितले.

Featured post

Lakshvedhi