आधुनिक तंत्रज्ञानाचा चमत्कार
(AI technology) 👌
स्वर्गवासी पिता मुलाच्या लग्नात हजेरी लावून खाऊन पिऊन गेला 😊
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा चमत्कार
(AI technology) 👌
स्वर्गवासी पिता मुलाच्या लग्नात हजेरी लावून खाऊन पिऊन गेला 😊
*👉*👉पाणी पिणे वाढवा*
पाण्याचे महत्व -----
१) शरीराचा ७०% भाग पाण्याने बनलेला आहे.
२) दिवसभरात ३ ते ३.५० लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.
३) कोमट पाणी पिणे फायद्याचे आहे.
४) सकाळी अनोशापोटी एक ते दोन ग्लास कोमट पाणी पिणे अमृता समान आहे.
५) रक्ताभिसरण व्यवस्थित होते.
६) B. P. संतुलित राहतो.
७) बद्धकोष्ठता नष्ट होते.
८) आळसपणा कमी होतो.
९) डोक्यावरील केस गळत नाहीत.
१०) स्किनचे प्राँब्लेम्स होत नाहीत.
११) तारूण्य टिकून राहते.
१२) शरीर आतून स्वच्छ होते.
१३) किडनी स्टोन होत नाहीत.
१४) अन्नपचन चांगले होते.
१५) मेंदूला योग्य प्रकारे रक्त पूरवठा होतो.
१६) जेवणापूर्वी पाणी प्यायल्यास शरीर बारीक होते.
१७) जेवणानंतर लगेच पाणी जास्त प्यायल्यास शरीर जाड होते. पोट सुद्धा वाढते.
१८) जेवणामध्ये एक ते दोन घोट पाणी प्यायल्यास शरीर मध्यम राहते.
१९) जेवणानंतर ३० ते ४५ मिनिटांनी आवश्य तेवढे पाणी प्यावे.
२०) आपण गरम / मध्यम गरम जेवण घेतो. म्हणून जेवतेवेळी कोमटच पाणी पिणे आवश्यक आहे. अन्यथा पचनशक्ती कमजोर होईल. फ्रिजचे पाणी / बर्फाचे थंड पाणी केव्हाच पिऊ नका. तर माठातील प्या.
२१) तहान लागली की पाणी प्यावेच.
२२) जास्तच तहान लागली की मात्र गुळ पाणी प्यावे.
२३) क्षारयुक्त पाणी शरीराला घातक आहे. ते चेक करून घ्या. अन्यथा आजार होतील.
२४) आजारपणात गरम पाणी प्यावे.
२५) रात्री जास्त पाणी पिऊ नये.
२६) पाणी नेहमी बसूनच प्यावे. अन्यथा उतार वयात गुढघे दुखीचा त्रास नक्कीच होईल.
२७) पाणी चवीचवीने म्हणजेच तोंडात जास्तवेळ फिरवून पिणे. त्यामुळे पाण्यात लाळ मिसळून ती पोटात जाते आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
२८) जेव्हढी तहान तेव्हढेच पाणी प्यावे. जास्त प्रमाणात पाणी प्यायल्यास पचनशक्ती कमजोर होते. अधिक ऊर्जा खर्च होते. तसेच किडनीलासुद्धा त्रास होऊ शकतो.
# *आरोग्य संदेश* #
पाणी म्हणजेच आपले जीवन.
करा आरोग्यासाठी भरपूर सेवन.
*वरील माहिती आपण पूर्ण वाचल्याबद्दल धन्यवाद.....🙏 ह्या माहितीचा फायदा आपल्याबरोबर इतरांनाही होणं गरजेचे आहे त्यासाठी आपल्या मोबाईल मध्ये असणाऱ्या सर्व ग्रुप वर हि माहिती पाठवा.*
*ह्या व अशा निशुल्क माहीती साठी आरोग्य मधुमेह मुक्ती हा ग्रुप जॉईन करा*
=================
*------------------------------*
*दवा ना खाना*
*सही समय पर सही खाना, खाना.....*
*🌺🌺🌺🌺🌺
*(कॉपी पेस्ट)*
*आरोग्य आणि समर्थ social foundation च्या मधुमेह मुक्ति व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला🙂*
*join होण्यासाठी 9130328672 ह्या नंबर वर Join Me असा what's up मेसेज करा*
*किंवा लिंकला टच करा व join व्हा*
*-------------------------*
https://chat.whatsapp.com/J1wjhGKNuZt39QeDrLk6bv
*------------------------*
*आरोग्य दृष्ट्या कोणीही हा मेसेज शेअर करू शकता*
पाण्याचे महत्व -----
१) शरीराचा ७०% भाग पाण्याने बनलेला आहे.
२) दिवसभरात ३ ते ३.५० लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.
३) कोमट पाणी पिणे फायद्याचे आहे.
४) सकाळी अनोशापोटी एक ते दोन ग्लास कोमट पाणी पिणे अमृता समान आहे.
५) रक्ताभिसरण व्यवस्थित होते.
६) B. P. संतुलित राहतो.
७) बद्धकोष्ठता नष्ट होते.
८) आळसपणा कमी होतो.
९) डोक्यावरील केस गळत नाहीत.
१०) स्किनचे प्राँब्लेम्स होत नाहीत.
११) तारूण्य टिकून राहते.
१२) शरीर आतून स्वच्छ होते.
१३) किडनी स्टोन होत नाहीत.
१४) अन्नपचन चांगले होते.
१५) मेंदूला योग्य प्रकारे रक्त पूरवठा होतो.
१६) जेवणापूर्वी पाणी प्यायल्यास शरीर बारीक होते.
१७) जेवणानंतर लगेच पाणी जास्त प्यायल्यास शरीर जाड होते. पोट सुद्धा वाढते.
१८) जेवणामध्ये एक ते दोन घोट पाणी प्यायल्यास शरीर मध्यम राहते.
१९) जेवणानंतर ३० ते ४५ मिनिटांनी आवश्य तेवढे पाणी प्यावे.
२०) आपण गरम / मध्यम गरम जेवण घेतो. म्हणून जेवतेवेळी कोमटच पाणी पिणे आवश्यक आहे. अन्यथा पचनशक्ती कमजोर होईल. फ्रिजचे पाणी / बर्फाचे थंड पाणी केव्हाच पिऊ नका. तर माठातील प्या.
२१) तहान लागली की पाणी प्यावेच.
२२) जास्तच तहान लागली की मात्र गुळ पाणी प्यावे.
२३) क्षारयुक्त पाणी शरीराला घातक आहे. ते चेक करून घ्या. अन्यथा आजार होतील.
२४) आजारपणात गरम पाणी प्यावे.
२५) रात्री जास्त पाणी पिऊ नये.
२६) पाणी नेहमी बसूनच प्यावे. अन्यथा उतार वयात गुढघे दुखीचा त्रास नक्कीच होईल.
२७) पाणी चवीचवीने म्हणजेच तोंडात जास्तवेळ फिरवून पिणे. त्यामुळे पाण्यात लाळ मिसळून ती पोटात जाते आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
२८) जेव्हढी तहान तेव्हढेच पाणी प्यावे. जास्त प्रमाणात पाणी प्यायल्यास पचनशक्ती कमजोर होते. अधिक ऊर्जा खर्च होते. तसेच किडनीलासुद्धा त्रास होऊ शकतो.
# *आरोग्य संदेश* #
पाणी म्हणजेच आपले जीवन.
करा आरोग्यासाठी भरपूर सेवन.
*वरील माहिती आपण पूर्ण वाचल्याबद्दल धन्यवाद.....🙏 ह्या माहितीचा फायदा आपल्याबरोबर इतरांनाही होणं गरजेचे आहे त्यासाठी आपल्या मोबाईल मध्ये असणाऱ्या सर्व ग्रुप वर हि माहिती पाठवा.*
*ह्या व अशा निशुल्क माहीती साठी आरोग्य मधुमेह मुक्ती हा ग्रुप जॉईन करा*
=================
*------------------------------*
*दवा ना खाना*
*सही समय पर सही खाना, खाना.....*
*🌺🌺🌺🌺🌺
*(कॉपी पेस्ट)*
*आरोग्य आणि समर्थ social foundation च्या मधुमेह मुक्ति व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला🙂*
*join होण्यासाठी 9130328672 ह्या नंबर वर Join Me असा what's up मेसेज करा*
*किंवा लिंकला टच करा व join व्हा*
*-------------------------*
https://chat.whatsapp.com/J1wjhGKNuZt39QeDrLk6bv
*------------------------*
*आरोग्य दृष्ट्या कोणीही हा मेसेज शेअर करू शकता*
🔥🔥🔥🔥🔥🌐🔥🔥🔥🔥🔥
*🌹🍀🔥शास्त्र असे सांगते 🔥🍀🌹*
*🏵भारतातील प्रचंड संख्येने असलेल्या देवदेवता व साधुपुरुष पाहून नेमकी कोणती देवता उपासनेला घ्यावी वा कोणत्या संताचा मार्ग अनुसरावा हे काही कळेनासे होते. त्याबाबतीत नेमकी भूमिका कोणती असावी ?(भाग-१)*
*वरील प्रश्न बहुतेक सर्वांनाच भेडसावून राहिला आहे. ज्ञानेश्वरांनी "भावार्थदीपिकेत (अध्याय १४ ओवी ८१४ ते ८२१) अशा अज्ञानी भक्ताचे सुरेख वर्णन केले आहे.' माझी मूर्ती निपजवी। ते घराचे कोनीं बैसवी। आपण देवो देवी। यात्रे जाय ॥ ८१४॥ नीच आराधन, माझें। काजीं कुळदेवता भजे। पर्वविशेषे कीजे। पूजा आना ।।८१५॥ माझे अधिष्ठान घरीं। आणि बोबसे आनाचे करी। पितृकार्यावसरी। पितरांचा होय ॥८१६॥ एकादशींचा दिवशी । जेतुला पाडु आम्हांसी । तेतुलाचि नागांसी। पंचमीचां दिवशी ॥८१७॥ चौथा मोटकी पाहे। आणि गणेशाचाचि होये। चावदसी म्हणे माये। तुझाच वो दुर्गे ॥८१८॥ नित्य नैमित्तिकें कर्मे सांडी। मग बैसे नवचंडी । आदित्यवारी वाढी। भैरवांपात्रों ॥ ८१९॥ पाठी सोमवार पावे। आणि बेलेंसी लिंगा धांवे। ऐसा एकलाचि आघवे । जोगावी जो ॥८२०॥ ऐसा अखंड भजन करी। उगा नसे क्षणभरी। आघवेनि गांवद्वारी। अहेव जैसी ॥ ८२१॥*
*वरील अनवस्था बोकाळण्याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे श्रद्धेचा अभाव व दुसरे म्हणजे "नानात्व आणि एकत्व" या तत्त्वाविषयीचे अज्ञान होय. यापैकी पहिले कारण म्हणजे श्रद्धेचा अभाव अगदी सर्रास दिसून येतो. हातात पैसे घेऊन वैद्यांकडे जाणारे रुग्ण, खिशात पैसे ठेवून केशकर्तनालयात जाणारे लोक, भाजी खरेदी करणारे गिऱ्हाईक आणि सत्यनारायणाची किंमत देऊन धंद्यात बरकत आणू पहाणारे भक्त हे एकाच पंक्तीत असतात. सर्वांची भावना एकच की पैसे दिले की काम होते. व्यवहारातील पैशाच्या देवघेवीचा नियम देवापाशीही वापरण्याचा विनोद करून हे अज्ञानी भक्त आपल्या पायावर धोंडा पाडून घेतात.....*
*देवाकडे जाताना पैशापेक्षा श्रद्धेचा उपयोग होतो... किंबहुना भक्तीचे मनोरथ पूर्ण होण्यामागे ईश्वरापेक्षा ईश्वरावरील श्रद्धाच कारणीभूत असते, होमिओपॅथिशास्त्रातील "प्लॅसिबो" थिअरी येथेही लागू पडते. डॉक्टराने औषध म्हणून नुसती साखरेची गोळी दिली तरी ती श्रद्धेन घेणारे रोगी बरे होतात. अर्थात ते त्या औषधामुळे नव्हेत तर औषधावरील व डॉक्टाराविषयी असलेल्या श्रद्धेनेच. दररोज नवनवीन देव व सद्गुरु शोधणारे भक्त हताश होतात. कारण देव व सद्गुरु हे परमसाक्षात्कारी असूनही भक्तांमध्ये व त्यांच्यामध्ये संपर्क घडवून आणणारी श्रद्धा त्यांच्यात नसते.....*
*एखाद्या जागृत क्षेत्रात मूर्तीपाशी बारा महिने चोवीस तास राहणारे पुजारी लोक संतपदवीस पावलेले पहाण्यात येत नाहीत... कारण इतक्या जवळ कैवल्याचा खजिना असूनही श्रद्धा नसल्यामुळे त्या कैवल्याचा लेशही त्यांच्यामार्फत येत नाही. उलट उभ्या आयुष्यात मूर्तीचे तोंड न पहाणारे संत मोक्षपदवी प्राप्त करतात कारण त्याच्यात पूर्ण श्रद्धेचा वास असतो. चोखामेळ्यास विठ्ठलमंदिरात कधीही प्रवेश मिळाला नाही पण तो महान संत झाला.....(क्रमश:)*
*🔸संदर्भ : वेदवाणी प्रकाशन...*
🔥🔥🔥🔥🔥🌐🔥🔥🔥🔥🔥
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक;
२७ मार्चला मतदान
मुंबई, दि. ३ :- भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक जाहीर केली आहे. महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे निवडून दिल्या जाणाऱ्या विधानपरिषदेच्या ५ जागा सदस्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झाल्या आहेत.
आमदार सर्वश्री आमश्या फुलाजी पाडवी यांचा विधानपरिषद सदस्य म्हणून ७ जुलै २०२८ पर्यंत कालावधी, प्रविण प्रभाकरराव दटके (१३ मे २०२६), राजेश उत्तमराव विटेकर – (२७ जुलै २०३०), रमेश काशिराम कराड – (१३ मे २०२६) आणि गोपीचंद कुंडलिक पडळकर यांचा कार्यकाळ समाप्ती १३ मे २०२६ असा आहे. मात्र या सदस्यांची दि. २३ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र विधानसभा सदस्य म्हणून निवड झाल्याने भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेकरिता द्वैवार्षिक निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे.
या निवडणुकीसाठी सोमवार, १० मार्च २०२५ रोजी अधिसूचना जारी केली जाईल. सोमवार, १७ मार्च, २०२५ पर्यंत उमेदवारांना नामांकन अर्ज दाखल करता येईल. उमेदवारांनी दाखल केलेल्या नामांकन अर्जांची छाननी मंगळवार, १८ मार्च, २०२५ रोजी केली जाईल, तर नामांकन अर्ज मागे घेण्याची मुदत गुरूवार, २० मार्च, २०२५ अशी आहे. गुरूवार, २७ मार्च, २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत या निवडणुकीसाठी मतदान होईल. तर त्याच दिवशी ५ वाजेनंतर मतमोजणी करण्यात येईल. ही संपूर्ण प्रक्रिया दिनांक २९ मार्च, २०२५ पर्यंत पूर्ण होईल, असे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
000
मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली
महाराष्ट्र सागर मंडळाची कामकाज आढावा बैठक
मुंबई, दि. ३ : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या कामकाजासंदर्भात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली.
यावेळी महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी, मुख्य अभियंता राजाराम गोसावी, वित्त नियंत्रक व मुख्य लेखाधिकारी सारंगकर, उपजिल्हाधिकारी अंजली भोसले , महाव्यवस्थापक रोहित पुरी, उपसंचालक (आशियाई विकास बँक) डॉ.महेश चंदूरकर उपस्थित होते.
मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे म्हणाले की, महाराष्ट्राला व मुबंईला भव्य व निसर्गसंपन्न समुद्रकिनारा लाभलेला आहे. या जागेचा व्यावसायिक उपयोग करून शासनाचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात. या जागांच्या योग्य नियोजनातून महाराष्ट्र सागरी मंडळाला महसूल उपलब्ध होईल. अशा दृष्टीने नियोजन करावे, असेही श्री. राणे यांनी सांगितले.
कोची मेट्रो यांच्यावतीने केरळमध्ये बॅक वॉटरचा वापर करून मेट्रोचे जाळे निर्माण करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर मुंबई व ठाणे या परिसरातील नद्यांच्या पाण्यात वॉटर मेट्रोसेवा सुरू केल्यास वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होईल. असा प्रस्ताव कोची मेट्रोच्या प्रतिनिधींनी मांडला. क्रिसील संस्थेच्या वतीने राज्यात नौका निर्मिती करण्याबाबत चर्चा करण्यात आली. अशा प्रकल्पांद्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असे मत संस्थेच्या प्रतिनिधींनी यावेळी व्यक्त केले.
0000
वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी रोखण्यासाठी
'एचएसआरपी'अनिवार्य
‘एचएसआरपी’ प्लेट बसविण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे आवाहन
मुंबई, दि. ३: वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) बसविणे अनिवार्य आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार ०१.०४.२०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या नियमानुसार ०१.०४.२०१९ पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याची तरतूद करण्यात आली आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून वाहनांना बसविण्याचे महत्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने दि. ०१ एप्रिल २०१९ पूर्वी उत्पादित झालेल्या जुन्या नोंदणीकृत वाहनांना ही नंबर प्लेट बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व वाहन धारकांना त्यांच्या वाहनांना ही नंबर प्लेट बसविण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयाच्या कार्यक्षेत्राकरिता मे. रिअल मेझोन इंडिया प्रा. ली. ही एजेंसी निश्चित करण्यात आलेली असून एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याकरिता बुकींग पोर्टल https://hsrpmhzone2.in कार्यान्वित करण्यात आले आहे.
वाहनधारकांनी वरील पोर्टलवर बुकींग करुन त्यांच्या सोईप्रमाणे अपॉईंटमेंट घेवून नंबर प्लेट बसवून घेण्यात यावी. वाहनधारक प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील नोंदणीधारक नसला तरी काही कामानिमित्त या कार्यक्षेत्रामध्ये वाहन वापरत असेल तरी देखील वाहनास नंबर प्लेट बसविणे आवश्यक आहे.
वाहनधारकांना त्यांच्या वाहनांकर ही नंबर प्लेट बसविण्यासंदर्भात काही तक्रार असल्यास संबंधीत सेवापुरवठा धारकांच्या पोर्टलवर तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयात दाखल करु शकतात.
प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील वाहनधारक व नागरिकांनी त्यांच्या वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट न बसविल्यास वाहनाचे मालकी हस्तांतरण, पत्ता बदल, वित्त बोजा उतरविणे/ चढविणे, दुय्यम आरसी/ विमा अद्ययावत करणे इत्यादी कामकाज थांबविण्यात येणार आहे.
ही नंबर प्लेट नसलेली वाहने, बनावट एचएसआरपी नंबर प्लेट असलेली वाहने आदी वाहनांवर सबंधित कार्यालयाकडून भविष्यात दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय मुंबई (मध्य) यांनी कळविले आहे.
००००