Thursday, 20 February 2025

धर्मादायसंस्थेअंतर्गत नोंदणीकृत रुग्णालयांनी प्रभावीपणे काम करावे

 धर्मादायसंस्थेअंतर्गत नोंदणीकृत रुग्णालयांनी प्रभावीपणे काम करावे

-         सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

 

मुंबईदि. १८ :- धर्मादाय रुग्णालयांनी निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांसाठी प्रत्येकी १० टक्के याप्रमाणे एकूण २० टक्के खाटा आरक्षित करणे बंधनकारक असून त्याअनुषंगाने धर्मादाय संस्थाच्या कायद्यांअंतर्गत नोंदणीकृत रुग्णालयांनी प्रभावीपणे काम करावेअसे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

मंत्रालयात झालेल्या बैठकीत राज्यातील धर्मादाय ट्रस्ट ॲक्ट खालील नोंदणीकृत रुग्णालयांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वालविधी व न्याय विभागाचे उपसचिव विलास खांडबहालेअवर सचिव (विधी) रा.द. कस्तुरेमुख्यमंत्री सहायता कक्षाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामेश्वर नाईक उपस्थित होते.

सार्वजनिक आरोग्य मंत्री आबिटकर म्हणालेधर्मादाय संस्थेच्या अंतर्गत समाविष्ट असलेल्या रुग्णालयांनी निर्धन व दुर्बल रुग्णांना आरक्षित खाटा पारदर्शी पद्धतीने उपलब्ध करून द्याव्यात. तसेच जास्तीत जास्त निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन द्यावीअसेही श्री.आबिटकर यांनी यावेळी नमूद केले.

राज्यमंत्री आशिष जयस्वाल म्हणालेनिर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना या आरक्षणाचा लाभ होण्यासाठी इतरही रुग्णालयांना या योजनेच्या कार्यकक्षेत आणण्यासाठी प्रयत्न करावे.

तंबाखू नियंत्रण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यशाळा

 तंबाखू नियंत्रण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यशाळा

 

मुंबईदि. १८ : महाराष्ट्रात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या नियंत्रणासाठी आरोग्य विभागानी ३ ऑक्टोबर २०२४ रोजी WHO FCTC Artical ५.३ अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तंबाखू विक्री साठी परवाना देण्यासाठी नियमावली यासंदर्भात सार्वजनिक आरोग्य विभाग, मराठवाडा ग्रामीण विकास संस्था (MGVS) व टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राज्यस्तरीय कार्यशाळा झाली.

 राज्यात तंबाखू नियंत्रण कायदा 2003 व FCTC (Framwork convention on Tobaco control) article ५.३ ची प्रभावी अंमलबजावणी होण्याकरिता संबंधित विभाग व यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेमध्ये सहायक पोलिस महानिरिक्षक राजतिलक रोशन यांनी तंबाखू नियंत्रण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस विभागाचे पूर्णपणे सहकार्य राहील असे सांगितले. टोबॅको कंट्रोलसाऊथ एशीयावाइटल स्टृटॅजी डॉ.राणा जे.सिंग यांनी १८ वर्षाखालील मुलांना तंबाखुच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी उपाययोजनातसेच तंबाखु नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रत्येक विभागाची असल्याचे सांगितले.

डॉ.अर्जुन सिंग यांनी लहान वयात व्यसनास बळी पडल्यामुळे निर्माण होणारा कॅन्सरचा धोका याबाबत मार्गदर्शन केले. मराठवाडा ग्रामीण विकास संस्थाचे सचिव अप्पासाहेब उगले यांनी महाराष्ट्रात ‘कोटपा’ (सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादन कायदा) कायद्याची प्रभावी अंमलबजावणीयाबाबत सविस्तर माहिती दिली. कायदेशीर तरतुदीनुसार तंबाखू क्षेत्रातील उद्योग आरोग्य संस्था व त्यांच्या धोरणांमध्ये हस्तक्षेप करत असतील तर संबंधित विभागाने जिल्हाधिकारी यांच्याकडे संपर्क साधून कळवावे, असेही यावेळी सूचित करण्यात आले.

तंबाखू नियंत्रणावरील FCTC article 5.3 च्या मार्गदर्शक सूचना अधोरेखित करण्यात आल्या. या धोरणानुसार किरकोळ तंबाखू विक्रेत्यांची संख्या आणि तंबाखू उत्पादनाचे प्रकार मर्यादित करते. विशेषत: तरुणांना तंबाखूजन्य पदार्थांपासून रोखणे हा मुख्य उद्देश आहे.

कार्यशाळेसाठी आरोग्यशिक्षणअन्न व औषध प्रशासन आणि पोलीस विभागमहानगरपालिकामहसूल विभागाचे तसेच जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते.

आरोग्य सेवा संचालक डॉ.नितीन अंबाडेकरहेलीस सेक्शेरीया इन्स्टिटय़ूट फॉर पब्लिक हेल्थचे संचालक, डॉ.प्रकाश गुप्ता टोबॅको कंट्रोलसाऊथ इस्टएशियावाइटल स्टृटॅजीस संचालक, डॉ.राणा जे.सिंग यांच्यासह टाटा मेमोरियल सेंटर मुंबई, Tobacco control, vital strategies चे तांत्रिक सल्लागार डॉ.शिवम कपुर, oral public health department चे उपसंचालक डॉ.उमेश शिरोडकरआरोग्य विभाग महाराष्ट्र शासन,टाटा मेमोरियल सेंटरचे प्रोजेक्ट अधिकारी डॉ..राहुल सोनवणे, NTCP चे कार्यक्रम अधिकारी किशोर गांगुर्डेअध्यक्ष मनसुख झांबडमराठवाडा ग्रामीण विकास संस्थाचे सचिव अप्पासाहेब उगलेडॉ.निकिता गायकवाड यांनी सूत्र संचालन केले व अन्नपूर्णा ढोरे यांनी आभार मानले.

00000

त्रिपुराच्या धर्तीवर महाराष्ट्रातही बांबू लागवड मिशन प्रभावीपणे राबवू

 त्रिपुराच्या धर्तीवर महाराष्ट्रातही बांबू लागवड मिशन प्रभावीपणे राबवू

- पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

·         पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे त्रिपुराच्या दौऱ्यावर;

·         बांबू हस्तकला प्रदर्शनाला भेट

 

मुंबईदि. १८ - महाराष्ट्राच्या हवामान व भौगोलिक परिस्थितीचा विचार करून, शास्त्रीय दृष्टीची सांगड घालून महाराष्ट्र राज्यात बांबू मिशन अमलबजावणी प्रभावीपणे राबवूअसे पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या त्रिपुरा राज्याच्या दौऱ्यावर आहेत. राज्यमंत्री माधुरी मिसाळपर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंघल यावेळी त्यांच्यासमवेत उपस्थित होत्या.

आगरताळा येथील बांबू लागवड प्रदर्शनाला भेट देऊन मंत्री पर्यावरण श्रीमती पंकजा मुंडे यांनी महिलांच्या हस्तकला कौशल्याचे भरभरून कौतुक केले. तसेच विविध जातीच्या बांबू लागवडीची यावेळी पाहणी केली.

त्रिपुरातील बांबू हस्तकला देशातील सर्वोत्तम हस्तकलेपैकी एक आहे. तसेच अगरबत्ती बनवण्यासाठी बांबूच्या काड्यांसाठी संपूर्ण देशाच्या गरजांपैकी बहुतांशी गरज या राज्यातून पूर्ण केली जाते. बांबू क्षेत्राच्या एकात्मिक विकासासाठीपीपीपी फ्रेमवर्क अंतर्गत२००७ मध्ये त्रिपुरा बांबू मिशन (टीबीएम) सुरू करण्यात आले होते.

त्रिपुरा बांबू हस्तकला उत्कृष्ट डिझाइनविस्तृत श्रेणीतील उत्पादनांसाठी आणि कलात्मक आकर्षणासाठी देशातील सर्वोत्तम मानल्या जातात. या प्रदर्शनात विविध जातीच्या बांबूच्या लागवडीचे आणि हस्तकला कौशल्याची पाहणी केल्यानंतर मंत्री पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्राच्या हवामान व भौगोलिक परिस्थितीचा विचार करून राज्यात बांबू मिशनची अमलबजावणीचा करण्यात येईल, असे सांगितले.

            श्रीमती मुंडे यांचे आगरतळा विमानतळावर शासकीय वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी यांनी स्वागत केले.

राज्यातील रोप-वेची कामे करण्यास मान्यता

 राज्यातील रोप-वेची कामे करण्यास मान्यता

 

राज्यातील रोपवेची कामे कार्यान्वित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

आजच्या बैठकीत राज्य शासनामार्फत १६ व राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लि. – एनएचएलएमएल (NHLML) मार्फत २९ अशी एकूण ४५ रोपवे ची कामे हाती घेण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली. ही रोपवे ची कामे करण्याकरिता एनएचएलएमएल या यंत्रणेला ला आवश्यक जागा ३० वर्षाच्या भाडेपट्टीवर उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली.

या योजने अंतर्गत काही प्रकल्पांस राज्य शासनाने एनएचएलएमएल ला समभाग हिस्सा उपलब्ध करून दिल्यास या प्रकल्पातून मिळणाऱ्या उत्पन्नात राज्य शासनाचाही हिस्सा राहीलअशा या महसूली प्रारूपासही मान्यता देण्यात आली. यातील प्रकल्पनिहाय स्वतंत्र करार केला जाणार आहे. त्यापूर्वी या प्रत्येक प्रकल्पाचा सविस्तर प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीपुढे सादर करण्यात येणार आहे.

--००--

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त

 दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त

मंत्रालयात अभिवादन

 

मुंबई, दि. २० : मराठी वृत्तपत्राचे जनकदर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव सचिन कावळे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

      सामान्य प्रशासन विभागाचे सहाय्यक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छावनितीन राणेसार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक कक्ष अधिकारी विजय शिंदे यांनीही बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून यावेळी अभिवादन केले.

 

0000



 

वृत्त क्र. 754

 

राजधानीत बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी

 

नवी दिल्ली, 20 : बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती महाराष्ट्र सदनात आज साजरी करण्यात आली.

 

कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महाराष्ट्र सदनातील उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

 

महाराष्ट्र परिचय केंद्रात बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी

 

महाराष्ट्र परिचय केंद्रात आज बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती) (प्रशासन) हेमराज बागुल यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

 

यावेळी कार्यालयातील उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

0000

उष्णता वाढतेय काळजी घ्या - - - - -*

 *उष्णता वाढतेय  काळजी  घ्या  - - - - -*


शरीरातील  पाणी  वाढवा  - उष्णतेमुळे  शरीरातील पाणी झपाट्याने कमी  होते.म्हणून काळजी घ्या. नाहीतर  उष्णतेचे अनेक विकार  सुरू होतील.


उपाय   ---

१)  नियमित  प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही.

२)  अनुलोम विलोम जास्तच  करा. शरीराचे तापमान  स्थीर  राहिल.

३)  उजवी  नाकपुडी  बंद  करून डावी नाकपुडी जास्तच वेळ चालू ठेवा.  कारण ती चंद्रनाडी  आहे. त्यामुळे  शरीरात  गारवा  तयार  होईल.

४)  उजव्याच  कुशीवर  जास्तवेळ  झोपा. त्यामुळे  डावी  नाकपुडी  आपोआप  जास्त  वेळ  चालू  राहील.

५)  हलकाच  आहार  घ्या. पोट  साफ  ठेवा. पित्त  वाढवू  नका.

६)  माठातीलच  थंड  पाणी  अगर  कोमट  पाणी  बसून  सावकाश  चवीचवीने  प्या.  घटाघटा नाही.

७)  पेयामध्ये  बर्फ  वापरू  नका. बर्फ  गरम  आहे.

८)  आवळा / कोकम / लिंबू / मठ्ठा / ताक  इ. सरबत जरूर प्या.

९)  सकाळी  ऊठल्यावर  लगेच १ ते २ ग्लास  कोमट  पाणी  प्या.

१०)  प्रत्येक  काम  सावकाशच  करा. 

११)  जेवतेवेळी  मधे  मधे  १/२  वेळा  थोडे  पाणी  प्यावे.

१२)  ऊन्हातून  आल्यावर  गुळ  पाणी  पिणे.

१३)  खडीसाखर  सोबतच  ठेवून  थोडी  थोडी  खाणे.

१४)  जिरेपूड १ चमचा  +  खडीसाखर १ चमचा  व १ ग्लास  ताकातून  रोज पिणे. उष्णता  वाढणार  नाही.

१५)  दुपारच्या  जेवणात  रोज  पांढरा  कांदा  जरूर  खाणे.

१६)  रात्री  झोपण्यापूर्वी  खोबरेल  तेल  तळपायांना  चोळणे  व  बेंबीत  घालणे. तसेच  देशी  गाईचे  तुप  नाकात  लावणे.

१७) उन्हापासून शरीराचे रक्षण करा. कॅप, छत्री, गाॅगल  वापरा.


 #  आरोग्य   संदेश  #


पाणी    प्यावे   आवडीने,

आजार  पळवा  सवडीने.

: *उन्हाळ्यात तब्येत सांभाळा..!!*


❄ *उष्ण व थंड पदार्थ* ❄


कलिंगड             - थंड

सफरचंद             - थंड

चिकू                     - थंड 

संत्री                     - उष्ण

आंबा                    - उष्ण            

लिंबू                    - थंड

कांदा                    - थंड

आलं/लसूण          - उष्ण

काकडी                 - थंड

बटाटा                   - उष्ण

पालक                   - थंड 

टॉमेटो कच्चा         -  थंड

कारले                   - उष्ण

कोबी                    - थंड 

गाजर                   - थंड 

मुळा                     - थंड

मिरची                   - उष्ण

मका                     - उष्ण

मेथी                     - उष्ण

कोथिंबीर/पुदिना    - थंड

वांगे                      - उष्ण

गवार                  - उष्ण

भेंडी साधी भाजी    -  थंड

बीट                     - थंड 

बडीशेप                 - थंड 

वेलची                   - थंड 

पपई                     - उष्ण

अननस                 - उष्ण 

डाळींब                 - थंड 

ऊसाचा रस बर्फ न घालता               - थंड

नारळ(शहाळ) पाणी - थंड

मध                  - उष्ण

पंचामृत (दही, दूध, तूप, मध, साखर)             - थंड

मीठ                     - थंड 

मूग डाळ               - थंड 

तूर डाळ               - उष्ण

चणा डाळ             - उष्ण 

गुळ                     - उष्ण 

तिळ                    - उष्ण 

शेंगदाणे,बदाम,काजू,अक्रोड,खजूर - उष्ण 

हळद                 - उष्ण 

चहा                  - उष्ण

कॉफी                - थंड

पनीर                - उष्ण

शेवगा उकडलेला - थंड

ज्वारी                - थंड

बाजरी/नाचणी      -उष्ण

आईस्क्रीम          - उष्ण

श्रीखंड/आम्रखंड  - उष्ण

दूध,दहही,तूप,ताक (फ्रिज मधले नाही)  - थंड 

फ्रिज मधले सगळे पदार्थ -उष्ण

फ्रिज मधिल पाणी - उष्ण

माठातील पाणी   -   थंड

एरंडेल तेल      - अती थंड

तुळस         - थंड

तुळशीचे बी - उत्तम थंड

सब्जा बी  -  उत्तम थंड

नीरा           - थंड

मनुका      - थंड 

पाव/खारी/ बिस्कीट -उष्ण

हॉट ड्रिंक सर्व    - उष्ण

कोल्डरिंग सर्व    - उष्ण 

मास/चिकन/मटण- उष्ण

अंडी (फक्त उकडलेल पांढरे) - थंड


*उन्हाळ्यात नैसर्गिक रित्या थंड पदार्थ जास्त खाल्ल्यास गरमीपासून शरीरास होणारा त्रास कमी होतो .*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


*(

स्ट्रेपसिल्स गोळी खाल्यावर ट्राफिक पोलीस ड्रिंक अँड ड्राईव्ह ची केस नक्की करणार.. कसे ते पहा..🫢😩🥹pl share

 स्ट्रेपसिल्स गोळी खाल्यावर ट्राफिक पोलीस ड्रिंक अँड ड्राईव्ह ची केस नक्की करणार.. कसे ते पहा..🫢😩🥹


Featured post

Lakshvedhi