Wednesday, 12 February 2025

नाशिक शहरातील मराठा समाजाने आज एक चांगला निर्णय, सर्वांनीच अनुपालन करावा असा

 नाशिक शहरातील मराठा समाजाने आज एक चांगला निर्णय घेतला मराठा समाजातील कोणाच्याही लग्नात ६ पदार्थांपेक्षा जास्त पदार्थ असतील तर त्या लग्नात वधू वरांना फक्त  आशिर्वाद द्यायचे परंतु जेवण करायचे नाही, आणि मग याचे अनुकरण करत ईतर काही समाजानेही वरील निर्णय राबवायचे ठरवले आहे. याबरोबरचं लग्न पत्रिका  छपायची नाही तर फक्त whatsapp व फोन द्वारे निमंत्रण द्यायचे*

*खास निर्णय म्हणजे  प्रि- वेडींग व संगीत संध्या कार्यक्रमावर बंदी घातली आहे*

       *वरील  समाज आर्थिक दृष्ट्या भक्कम असून देखील त्यांनी वरील निर्णय घेतले, त्या बद्दल त्या सर्व समाजाचे अभिनंदन*


      *आपण कधी बदलणार, आपण साखरपुड्याचा खर्च लग्नाएवढा करायला लागलो आहोत, वेळ प्रसंगी कर्ज काढून लग्नाचा बडेजाव करतो, आता आपण बदलेले पाहिजे हे नक्की.*

*नोट :- आदर्श व अनुकरणीय निर्णयाचे मनापासून स्वागत करा . आणि सर्व जाती धर्म पंथ यांनी या निर्णयाचे सर्वांनी पालन करा* .


*समाजाने विवाह समारंभाचे रुपांतर विवाह संस्कारा मध्ये केले पाहिजे.*


 *काही दिवसांपूर्वी करोनामुळे गर्दी नको म्हणून शासनाने विवाह, कार्यक्रमातील उपस्थितीला मर्यादा घातल्याने त्यावेळी ही बाब प्रकर्षाने  लक्षात आली होती,परंतु लोक परत ते सगळं विसरून गेले आणि लाखो करोडो रु उधळू लागले.*

 *आपण विनाकारण लाखो रूपयांची उधळपट्टी करून कर्जबाजारी होत आहोत .आतातरी आपण बदलले पाहिजे. नाही तर काळ आपणांस माफ करणार नाही.*


*१)दिवसेंदिवस शेतीचे उत्पन्न कमी होत आहे.*

*२) शेती मालाला भाव नाही.*

*३) सरकारी नोकऱ्या राहिल्या नाहीत.*

*४) खाजगी नोकरीत शाश्वती नाही.*

*५) मुलीच्या लग्नाला १००००००/- रु खर्च येत असेल तर मुलालाही ८००००००/- रु खर्च येतो.*

*६) कर्जात जन्मलो, कर्जात वाढलो व कर्जात मरतो आमच्या काही पिढ्या गेल्या.आता तरी डोळे उघडले पाहिजेत.*

*७) विवाह हा सोहळा नाही तर तो ' संस्कार ' आहे .१६ संस्कारातील एक संस्कार समजला पाहिजे.*

*८)  कितीही मोठं लग्न केलं तरी लोक विसरून जातात.आजवर मोठं लग्न केले म्हणून कोणाला अवॉर्ड मिळाला नाही*

*९) आपण शेती विकून गुंठ्यावर आलो, तर व्यापारी एका दुकानाचे चार दुकाने करत आहे. व्यापारीवर्गाला नाव ठेवण्यापेक्षा त्यांचे अर्थशास्त्र समजून घेतले पाहिजे.*

*१० ) इर्षा नको तर सुदृढ स्पर्धा असली पाहिजे.*

*११) भाऊ बंदकीतील जीवघेणी स्पर्धा कुठंच नको. विवाह प्रसंगी तर नकोच नको.*

*१२ ) वर-वधू यांना नेहमीच उपयोगी पडणारा पोशाख घेतला पाहिजे.*

*१३) वरमाईने सुध्दा रुसवे फुगवे करू नयेत. आपल्यालाही मुलगी आहे. सून उद्याची आपली काळजी घेणारी आपली मुलगीच आहे. ही भावना रुजली पाहिजे.*

*१४) जेवणावळी, मानपान ही पद्धत बंद करून खर्च कमी करून वधू वरांच्या भावी प्रगतीला हातभार लावावा.*

*१५) संसारात कधीच उपयोगी न पडणारी भांडी / फर्नीचर तर नकोच.*

*१६) मेहंदी, वैदिक पध्दत, हळदीच्या कार्यक्रमात होणारी गर्दी टाळावी.स्वागत समारंभात साधेपणा आणावा.*

*१७) क्रिकेट ५ दिवसाचा, वन-डे वरुन २० - २० वर आला.तर आपण विवाह छोटेखानी / आटोपशीर करायला काय हरकत आहे ?*

*१८) मोजक्याच लोकांत सगळ्या पाहुण्यांशी निवांत संवाद साधता येतो.*

*१९) लग्न पत्रिकेचा खर्च वाचून लग्नपत्रिका व्हाट्सअप वरून पाठवावी व संबंधित व्यक्ती पत्रिका पाठवल्यानंतर फोन करून आग्रहाचे निमंत्रण द्यावे पुन्हा आठवणीसाठी फोन परत लग्नाच्या अगोदर दोन दिवस करावा*

*२०) कोणत्याही जातीधर्मांतील चांगल्या गोष्टींचा स्विकार केला पाहिजे*


*फक्त वाचू नका....!*

*विचारही करा....!*

*(समाजातील प्रत्येक व्यक्ती पर्यंत हा मेसेज पोहचवा.)*

        *🙏🏻ही नम्र विनंती.*

       *💯हि काळाची गरज आहे.

- *श्री सूभाष बाळासाहेब पाटील सर*

ज्येष्ठ नागरिकांसाठी 'एल्डर लाईन १४५६७' हेल्पलाइन · मदतीसाठी टोल फ्री सेवा उपलब्ध

 ज्येष्ठ नागरिकांसाठी 'एल्डर लाईन १४५६७हेल्पलाइन

·         मदतीसाठी टोल फ्री सेवा उपलब्ध

 

मुंबईदि. ११ : केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींचे निवारण करण्यासाठी 'एल्डरलाईन - १४५६७ही राष्ट्रीय टोल फ्री हेल्पलाइन सुरू केली आहे.

राज्यात राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान (एनआयएसडी)सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागमहाराष्ट्र शासनसमाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र शासन आणि जनसेवा फाउंडेशनपुणे यांच्या संयुक्त विद्यमाने चालविण्यात येते.

    या हेल्पलाइन चे काम २६ जानेवारी१५ ऑगस्ट व २ ऑक्टोबर वगळता वर्षातील ३६२ दिवस आणि आठवड्याचे सर्व दिवस सकाळी ८ ते संध्याकाळी ८ पर्यंत चालते. याद्वारे आरोग्यविषयक जागरूकतावृद्धाश्रमडे केअर सेंटरपोषणसांस्कृतिककलाज्येष्ठांसंबंधी अनुकूल उत्पादनेआणि मनोरंजनाशी संबंधित माहिती पुरविण्यात येते.

   वैयक्तिक आणि कौटुंबिक स्तरावर कायदेविषयकमालमत्ताशेजारी आदींच्या अनुषंगाने वाद निराकरणआर्थिकनिवृत्तीवेतन संबंधित सल्ला आणि सरकारी योजनांच्या माहितीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात येते. चिंता निराकरणनातेसंबंध व्यवस्थापनमृत्यूशी संबंधित भीती निवारणवेळताणराग आदीच्या अनुषंगाने जीवन व्यवस्थापनमृत्युपत्र बनवण्याचे महत्त्व आदी मृत्यूपूर्वीचे दस्तऐवजीकरण आदी अनुषंगाने ही मदत करण्यात येते.

 यासंदर्भात राज्यभरातून जेष्ठ नागरिकांसाठी चार लाखाहून अधिक मदतीचे दूरध्वनी आले आहेत. त्यामध्ये जेष्ठ नागरिकांना प्रत्यक्षअप्रत्यक्षरित्या मदत हेल्पलाइनने केली आहे. तसेच तीस हजाराहून अधिक प्रकरणे क्षेत्रीय पातळीवर यशस्वीरित्या हाताळली आहेत.

0000

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मे. ग्लोबल मीटर मॅन्युफॅक्चरींग कंपनी, पुणे कडून उत्पादित केलेल्या ऑटोरिक्षा, टॅक्सीमीटर ग्राहकांनी खरेदी न करण्याचे वैधमापनशास्त्र, मुंबई यांचे आवाहन

 उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मे. ग्लोबल मीटर मॅन्युफॅक्चरींग कंपनीपुणे कडून उत्पादित  केलेल्या ऑटोरिक्षाटॅक्सीमीटर ग्राहकांनी खरेदी न करण्याचे वैधमापनशास्त्र, मुंबई यांचे आवाहन

 

            मुंबई, दि. ११ : मे.ग्लोबल मीटर मॅन्युफॅक्चरींग कंपनीपुणे यांनी उत्पादीत केलेल्या ऑटोरिक्षा/टॅक्सी मीटर त्यांना केंद्र शासनाने मंजूर केलेल्या नमुन्यामध्ये (मॉडेल अप्रुव्हल) ग्राहकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने काही फेरबदल केल्याची याचिका मुंबई उच्च न्यायालय येथे दाखल होती. या याचिकेवर दि.३१/०१/२०२५ रोजी सुनावणी होऊन मे. ग्लोबल मीटर मॅन्युफॅक्चरींग कंपनीपुणे यांनी उत्पादीत केलेल्या ऑटोरिक्षा/टॅक्सी मीटर (Model Approval No.-IND/०९/०६/१६३) ची विक्री व वितरण पुढील आदेशापर्यंत तात्काळ थांबविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत.

            उच्च न्यायालयाचे आदेश विचारात घेऊन वैधमापन शास्त्र यंत्रणेकडून सर्व ऑटोरिक्षा/टॅक्सी चालक/मालक यांना मे. ग्लोबल मीटर मॅन्युफॅक्चरींग कंपनीपुणे यांनी Model Approval No.-IND/०९/०६/१६३ अन्वये उत्पादित केलेल्या मीटरची पुढील आदेशापर्यंत खरेदी करु नये तसेच आपल्या वाहनावर मीटर न बसविण्याची दक्षता घेण्याबाबत आवाहन नियंत्रक वैधमापनशास्त्र मुंबई यांच्याकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात येत आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मे. ग्लोबल मीटर मॅन्युफॅक्चरींग कंपनीपुणे कंपनीकडून उत्पादित केलेल्या ऑटोरिक्षा, टॅक्सीमीटर ग्राहकांनी उच्च न्यायालयाकडून पुढील आदेश होईपर्यंत खरेदी न करण्याचे आवाहन वैधमापनशास्त्र मुंबई यांनी केले आहे.

सुरक्षित इंटरनेट दिनानिमित्त राज्यभर जनजागृती मोहीम

 सुरक्षित इंटरनेट दिनानिमित्त राज्यभर जनजागृती मोहीम

 

मुंबईदि. 11 :- माहिती तंत्रज्ञान विभाग आणि राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र(NIC), महाराष्ट्रच्या च्या वतीनेइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) यांच्या ISEA प्रकल्पाच्या माध्यमातून 11 फेब्रुवारी 2025 रोजी, "सुरक्षित इंटरनेट दिन" (Safer Internet Day) निमित्त राज्यभर जनजागृती मोहीम राबविण्यात आली.

            या मोहिमेचा उद्देश बालकमहिला आणि युवकांना इंटरनेटचा सुरक्षित आणि जबाबदारीने वापर करण्यास प्रवृत्त करणे हा आहे. "Together for a Better Internet" या जागतिक संकल्पनेवर आधारित या उपक्रमाअंतर्गत राज्यजिल्हातालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले.

NIC च्या जिल्हा सूचना विज्ञान अधिकाऱ्यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळांमध्ये सायबर सुरक्षितताऑनलाईन फसवणूक टाळण्याचे मार्गडेटा गोपनीयता आणि सोशल मीडियाच्या जबाबदारीने वापराबाबत मार्गदर्शन केले. या उपक्रमात माहिती तंत्रज्ञान विभागजिल्हा प्रशासनपोलिस सायबर सेलशैक्षणिक संस्था तसेच स्वयंसेवी संघटनांचे सहकार्य लाभले.

राज्यभर राबविलेल्या या मोहिमेद्वारे सुरक्षित आणि जबाबदारीपूर्वक इंटरनेट वापरण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. विशेषत: सायबर गुन्हेगारीपासून बचावऑनलाईन व्यवहारातील सावधगिरी आणि वैयक्तिक माहितीच्या गोपनीयतेबाबत जनजागृती करण्यात आली.

माहिती तंत्रज्ञान विभागाने नागरिकांना सुरक्षित इंटरनेटचा वापर करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि सायबर सुरक्षेविषयी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

प्रोजेक्ट सक्षम उपक्रमाअंतर्गत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते गरजु महिलांना उद्योगपूरक उपक्रमांचे वाटप

 प्रोजेक्ट सक्षम उपक्रमाअंतर्गत

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते

गरजु महिलांना उद्योगपूरक उपक्रमांचे वाटप

 

मुंबई, दि. ११ : युनायटेड वे मुंबई या सामाजिक संस्थेच्या प्रोजेक्ट सक्षम या मुख्य उपक्रमाअंतर्गत महिलांना व्यावसायिक कौशल्ये व उद्योजकीय संधी उपलब्ध करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बविण्यात येते. या उपक्रमाअंतर्गत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते गरजु महिलांना उद्योगपूरक संसाधनांचे वाटप करण्यात येणार आहे. 

बँक ऑफ बडोदाच्या औद्योगिक सामाजिक बांधिलकी अंतर्गत युनायटेड वे मुंबई सोबत करार करण्यात आला आहे. या अंतर्गत १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.०० वाजता वालचंद हिराचंद हॉलचर्चगेट येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती बॉबकार्डचे व्यवस्थापकीय संचालक रविंद्र राय यांनी दिली आहे.

सामाजिक समस्यांवर काम करताना आर्थिक दुर्बल घटकांना सशक्त करण्यासाठी हे उपक्रम राबविण्यात येतात. प्रोजेक्ट सक्षम हा उपक्रम महिलांना व्यावहारिक कौशल्येव्यवसाय प्रशिक्षण आणि आवश्यक संसाधने उपलब्ध करून त्यांचे जीवनमान उंचावण्यावर लक्ष केंद्रीत करतो. शिक्षणआरोग्यउत्पन्ननिर्मितीपर्यावरणीय शाश्वतता आणि सार्वजनिक सुरक्षा यांसारख्या क्षेत्रांत हे कार्यरत आहेत.

आंब्यावरील फुलकीड नियंत्रणासाठी ठोस पावले उचलावीत

 आंब्यावरील फुलकीड नियंत्रणासाठी ठोस पावले उचलावीत

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे

 

मुंबईदि. 11 : कोकणात आंबा पिकावर फुलकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभाग आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने ठोस उपाययोजना कराव्यात अशा सूचना मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.

            फुलकिड नियंत्रणाबाबत कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या दालनात बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या.

 फुलकिडीमुळे होत असलेल्या नुकसानीविषयी परिस्थिती कृषी मंत्री श्री. कोकाटे यांच्या निदर्शनास आणून देत मत्स्यव्यवसाय मंत्री श्री. राणे म्हणाले कीया किडीमुळे कोकणातील आंबा बागायतदारांचे अतोनात नुकसान होत आहे. बागायतदारांनी बाजारातील उपलब्ध किटकनाशकांचा वापर केला आहे. तरीही ही कीड नियंत्रणात आलेली नाही. कीड नियंत्रणात आणण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सच्या माध्यमातून कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहाय्यक यांच्यासाठी प्रादेशिक फळ संशोधन केंद्रवेंगुर्ला येथे प्रशिक्षणाचे आयोजन करावे, असे निर्देश श्री. राणे यांनी दिले.

मत्स्यव्यवसाय मंत्री श्री. राणे यांच्या या सूचनांना कृषी मंत्री कोकाटे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अशा प्रकारचे प्रशिक्षण आयोजन करण्याचे आदेश डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ  प्रशासनास दिले आहेत. तसेच याविषयी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनही यावेळी देण्यात आल्या.

मुंबईत होणार जागतिक मनोरंजन क्षेत्राचे ‘वेव्ज 2025’ संमेलन ‘वेव्ज’ संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य

 मुंबईत होणार जागतिक मनोरंजन क्षेत्राचे वेव्ज 2025’ संमेलन

वेव्ज’ संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. 11 : केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्यावतीने मुंबईमध्ये ऑडीओ व्हिज्युअल एंटरटेंटमेंट समिट (वेव्ज) 2025 या मनोरंजन क्षेत्रातील जागतिक संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे.  1 ते 4 मे 2025 दरम्यान जिओ कन्व्हेक्शन सेंटर’ येथे हे संमेलन होईल. जगाला भारताच्या मनोरंजन विश्वातील कला गुणसृजनशीलता दाखविण्याची ही नामी संधी आहे. या संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासन संपूर्ण सहकार्य करेलअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑडीओ व्हिज्युअल एंटरटेंटमेंट समिट (वेव्ज) बाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत सांगितले.

 

             पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात’ कार्यक्रमात या संमेलनाचा उल्लेख केला आहे. कलाचित्रपटमाध्यमेमनोरंजन क्षेत्रातील भारताची सृजनशीलता खूप मोठी आहे. भारताची ही नवी ओळख जगाला करून देण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी संकल्पना आहे. ती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी या संमेलनाच्या आयोजनाचा मान महाराष्ट्राला दिल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्र सरकारचे आभारही मानले.

 

            मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.  बैठकीस सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलारमुख्य सचिव सुजाता सौनिककेंद्रीय माहिती व प्रसारण सचिव संजय जाजूप्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हितेश जैनगृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बाल सिंह चहलराजशिष्टाचार विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकरमुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगेमुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणीनगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ताविशेष पोलीस देवेन भारती आदी उपस्थित होते.

 

            संमेलनाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी राज्य शासनाकडून समन्वयासाठी एक आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडून एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल. केंद्रीय प्रसारण मंत्रालयाच्या सेाहळा आयोजनाच्या अनुषंगाने असणाऱ्या आवश्यकताअडचणीराज्य शासनाकडून असणाऱ्या अपेक्षा यासाठी नियमित संवादासाठी यंत्रणा तयार करावीअशा सूचनाही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.

 

            'वेव्ज संमेलनात प्रदर्शन असणार आहे. यामध्ये महाराष्ट्रासाठी विशेष दालनाची व्यवस्था करावी. या दालनातून महाराष्ट्राचे कलाविश्व जगाला दाखवावे. परिषदेसाठी जगातून येणाऱ्या मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीमत्वाचे स्वागत महाराष्ट्र करेलअशी ग्वाहीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली. केंद्रीय सचिव जाजू यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून परिषदेची माहिती दिली. बैठकीस सांस्कृतिक कार्यराजशिष्टाचारपर्यटन व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi