Tuesday, 11 February 2025

डाव्या कुशीवर झोपण्याचे फायदे*

 *डाव्या कुशीवर झोपण्याचे फायदे*_


☑ डाव्या कुशीवर झोपल्यामुळे आपल्या हृदयावर दबाव जाणवत नसल्याने हृदय योग्य पद्धतीने काम करतं. यामुळे हृदयाचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.


☑ डाव्या कुशीवर झोपल्यामुळे शरीरातील विभिन्न अंग आणि मेंदूपर्यंत रक्तात ऑक्सिजनचा प्रवाह सुरळीत होतो. याने शरीराचे सर्व अंग निरोगी राहतात आणि चांगल्या प्रकारे कार्य करतात.


☑ डाव्या कुशीवर झोपल्यामुळे गर्भवती स्त्रियांसाठी डाव्या कुशीवर झोपणे योग्य आहे कारण याने गर्भात वाढत असलेल्या बाळाच्या प्रकृतीवर विपरित परिणाम होत नाही. याव्यतिरिक्त टाचा, हाता आणि पायांमध्ये सूज येण्याची समस्या दूर होते.


☑ डाव्या कुशीवर झोपल्यामुळे रक्त प्रवाह सुरळीत होत असल्याने झोप पूर्ण होते. या स्थितीत झोपून उठल्यावर थकवा जाणवत नाही आणि पोटासंबंधी समस्याही दूर होतात.


☑ पचन क्रिया सुरळीत होते आणि पाचक प्रणालीवर अतिरिक्त दबाव येत नाही. डाव्या बाजूकडे झोपल्याने शरीरात जमा होत असलेले टॉक्सिन लसिका वाहिनी तंत्राद्वारे बाहेर पडतात.


☑ बद्धकोष्ठतेची तक्रार असलेल्यांनी डाव्या कुशीवर झोपायला हवे. आराम मिळेल. गुरुत्वाकर्षणामुळे अन्न लहान आतड्यातून मोठ्या आतड्यात पद्धतशीर ढकलले जाते आणि सकाळी सहजपणे पोट स्वच्छ होतं.


☑ पोटातील ॲसिड वर न जाता खाली येतं, ज्याने ॲसिडिटी आणि छातीत जळजळणे अश्या समस्या दूर होतात.


*संकलन-* 

डॉ. प्रमोद ढेरे,


*माहिती आवडली असेल तर इतर ग्रुपवर शेअर करा 📲*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺




प्रदर्शन दि. ११ ते २३ फेब्रुवारी 2025





 प्रदर्शन   दि. ११ ते २३ फेब्रुवारी दरम्यान

सरस महालक्ष्मी या प्रदर्शनाला ११ ते २३ फेब्रुवारी,  या कालावधीत भेट देता येईल. या प्रदर्शनात अनेक प्रकारच्या कलाकुसरीच्या वस्तूहातमागावर तयार केलेले कपडेवुडन क्राफ्टबंजारा आर्टवारली आर्ट च्या वस्तू याशिवाय अनेक प्रकारच्या ज्वेलरीलहान मुलांसाठी लाकडी खेळणी व इतर राज्यातील दुर्मिळ वस्तूंची रेलचेल  आहे. या प्रदर्शनात एकूण ५०० पेक्षा जास्त स्टॉल लागले आहेतत्यापैकी ९० फुड स्टॉल आहेत.

ज्येष्ठ नागरिकांसाठी 'एल्डर लाईन १४५६७' हेल्पलाइन · मदतीसाठी टोल फ्री सेवा उपलब्ध pl शेअर जास्तीत जास्त लोकांना

 ज्येष्ठ नागरिकांसाठी 'एल्डर लाईन १४५६७हेल्पलाइन

·         मदतीसाठी टोल फ्री सेवा उपलब्ध

 

मुंबईदि. ११ : केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींचे निवारण करण्यासाठी 'एल्डरलाईन - १४५६७ही राष्ट्रीय टोल फ्री हेल्पलाइन सुरू केली आहे.

राज्यात राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान (एनआयएसडी)सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागमहाराष्ट्र शासनसमाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र शासन आणि जनसेवा फाउंडेशनपुणे यांच्या संयुक्त विद्यमाने चालविण्यात येते.

    या हेल्पलाइन चे काम २६ जानेवारी१५ ऑगस्ट व २ ऑक्टोबर वगळता वर्षातील ३६२ दिवस आणि आठवड्याचे सर्व दिवस सकाळी ८ ते संध्याकाळी ८ पर्यंत चालते. याद्वारे आरोग्यविषयक जागरूकतावृद्धाश्रमडे केअर सेंटरपोषणसांस्कृतिककलाज्येष्ठांसंबंधी अनुकूल उत्पादनेआणि मनोरंजनाशी संबंधित माहिती पुरविण्यात येते.

   वैयक्तिक आणि कौटुंबिक स्तरावर कायदेविषयकमालमत्ताशेजारी आदींच्या अनुषंगाने वाद निराकरणआर्थिकनिवृत्तीवेतन संबंधित सल्ला आणि सरकारी योजनांच्या माहितीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात येते. चिंता निराकरणनातेसंबंध व्यवस्थापनमृत्यूशी संबंधित भीती निवारणवेळताणराग आदीच्या अनुषंगाने जीवन व्यवस्थापनमृत्युपत्र बनवण्याचे महत्त्व आदी मृत्यूपूर्वीचे दस्तऐवजीकरण आदी अनुषंगाने ही मदत करण्यात येते.

 यासंदर्भात राज्यभरातून जेष्ठ नागरिकांसाठी चार लाखाहून अधिक मदतीचे दूरध्वनी आले आहेत. त्यामध्ये जेष्ठ नागरिकांना प्रत्यक्षअप्रत्यक्षरित्या मदत हेल्पलाइनने केली आहे. तसेच तीस हजाराहून अधिक प्रकरणे क्षेत्रीय पातळीवर यशस्वीरित्या हाताळली आहेत.

स्मार्ट प्रकल्पाच्या प्रदर्शनीस मार्टिन मेअर यांची

 स्मार्ट प्रकल्पाच्या प्रदर्शनीस मार्टिन मेअर यांची भेट

मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाच्या सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनास स्वित्झर्लंडचे महावाणिज्य दूत मार्टिन मेअर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी मूल्यसाखळी विकास आधारित कृषी विस्ताराबाबत सविस्तर माहिती घेतली. प्रदर्शनामध्ये मांडण्यात आलेल्या ताज्या फळांबाबत औत्सुक्याने चौकशी करुन त्यांनी समाधान व्यक्त केले.

अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीसाठी स्वित्झर्लंडच्या उद्योजकांचे महाराष्ट्रात स्वागत

 अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीसाठी

स्वित्झर्लंडच्या उद्योजकांचे महाराष्ट्रात स्वागत

- राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

 

मुंबईदि. 11 : महाराष्ट्र हे देशातील मोठ्या प्रमाणावरील कृषी माल उत्पादक राज्य आहे. येथे अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रासह विविध क्षेत्रात गुंतवणुकीस मोठी संधी असून स्वित्झर्लंड सोबत परस्पर व्यापार वाढविण्यास महाराष्ट्र उत्सुक आहे. स्वित्झर्लंडच्या उद्योजकांनी गुंतवणुकीसाठी पुढे यावेमहाराष्ट्र त्यांचे स्वागत करेलअसे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

स्वित्झर्लंडचे महावाणिज्य दूत आणि कौन्सुलेट कॉर्प्स चे डीन मार्टिन मेअर यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्राचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.

मंत्री श्री. रावल यांनी महाराष्ट्रातील विविधतेबाबत श्री.मेअर यांना माहिती दिली. राज्यात हापूस आंबासह्याद्रीच्या रांगांमधील चवदार तांदूळमिलेट्सताजी फळेभाजीपाला मुबलक प्रमाणात आहे. येथे अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रात मोठी संधी आहे. राज्यात नुकतीच सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आली आहे. गाईंचे पालन ही दोन्ही देशांमधील साम्य असलेली बाब असून स्वित्झर्लंड सोयाबीनची खरेदी करण्यास इच्छुक असल्यास महाराष्ट्रातून निर्यात करता येईलअसे त्यांनी सांगितले.

राज्यात विविध प्रकारची पर्यटनस्थळे असून स्वित्झर्लंडमधील पर्यटकांनी येथे भेट द्यावीअसे आवाहन मंत्री श्री.रावल यांनी श्री.मेअर यांच्याकडे केले. यासाठी विविध देशांच्या महावाणिज्य दूतांना येथील पर्यटन स्थळांची ओळख करुन देण्यात येईलअसेही त्यांनी सांगितले.

श्री.मेअर यांनी स्वित्झर्लंडच्या महावाणिज्य दूतावासाच्या कार्यपद्धतीबाबत माहिती देऊन आमचा वर्षभर चालणाऱ्या पर्यटनवाढीवर भर असल्याचे सांगितले. महाराष्ट्र हे उद्योग आणि व्यापाराच्या दृष्टीने सर्वाधिक चांगले राज्य असल्याची प्रशंसा त्यांनी केली

मुंबई-पुणे मिसिंग लिंक लवकरात लवकर पूर्ण करा

 मुंबई-पुणे मिसिंग लिंक लवकरात लवकर पूर्ण करा

-        राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

 

मुंबईदि. ११ :  सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री  मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील महत्वाकांक्षी मिसिंग लिंक प्रकल्पाची नुकतीच पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला तसेच प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी प्रकल्पाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले आणि ऑगस्ट २०२५ अखेर प्रकल्प पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेचप्रकल्प दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावा यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील बोरघाटात वाहतूक कोंडी आणि अपघात होतात. तसेचपावसाळ्यात येथे दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे वाहतुकीला अडथळे येतात. हे लक्षात घेऊनहा नवीन मार्गिका प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण झाल्यास मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवास अधिक वेगवानसुरक्षित आणि सोयीस्कर होईलअसा विश्वास राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी व्यक्त केला.

एकूण सुधारित मार्ग: खालापूर ते खोपोली इंटरचेंज आणि खोपोली एक्झिट ते कुसगाव (सिंहगड संस्था) दरम्यानचा भाग आहे.

यामध्ये सध्याचे १९ किमीचे अंतर ६ किमीने कमी होऊन १३.३ किमी इतके होणार आहे.प्रवासाच्या वेळेत २०-२५ मिनिटांची बचत,इंधन बचत आणि वायू प्रदूषणात घट,घाट रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि अपघातांची शक्यता कमी होण्यास मदत होणार आहे.

या दौऱ्यादरम्यान महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) पुणे विभागातील अधिक्षक अभियंता  राहुल वसईकरकार्यकारी अभियंता राकेश सोनवणे तसेच प्रकल्प सल्लागारकंत्राटदार आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

००००

जपानची कार्य संस्कृती जगात सर्वोत्तम - राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

 जपानची कार्य संस्कृती जगात सर्वोत्तम - राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

        



 मुंबई  दि.११ :  जपानचे लोक परिश्रमीप्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ असून जपानची कार्य संस्कृती जगात सर्वोत्तम आहे. हिरोशिमा व नागासाकी शहरे बेचिराख झाल्यानंतर ज्या निर्धाराने जपान नव्या उमेदीने उभा ठाकलाते अतिशय कौतुकास्पद आहेअसे गौरवोद्गार राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी  काढले.

जपानचे सम्राट नारुहितो यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील जपानच्या वाणिज्य दूतावासातर्फे सोमवारी (दि.१०) हॉटेल ताजमहालमुंबई येथे एका स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होतेत्यावेळी राज्यपाल बोलत होते.

कारचा शोध अमेरिकेत लागला असला तरी जपानमध्ये तयार झालेल्या कार गुणवत्तेच्या बाबतीत जगात सर्वोत्कृष्ट व आरामदायी असतात. जपान देशात निर्माण झालेले प्रत्येक उत्पादन गुणवत्तेच्या कसोटीवर पूर्णपणे खरे उतरल्याशिवाय जपान ती वस्तू बाजारात आणत नाहीही गोष्ट शिकण्यासारखी आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

राज्यातील अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पविशेषतः अटल सेतू मुंबई मेट्रो लाईनबुलेट ट्रेन यांना अर्थसहाय्य करीत असल्याबद्दल राज्यपालांनी जपान सरकारप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

भारत आणि जपानमध्ये अनेक शतकांपासून सांस्कृतिकअध्यात्मिक व तत्वज्ञान विषयक संबंध दृढ असून उभय देशांमध्ये पर्यटन विशेषतः अध्यात्मिक पर्यटन तसेच वैद्यकीय पर्यटन पर्यटनाला चालना देणे आवश्यक असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

भारत आणि जपान मधील संबंध स्वाभाविक आणि राजनीतिक दृष्टीने महत्त्वाचे असून आज उभय देशांमध्ये आर्थिकव्यापार विषयक तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहकार्य नव्या उंचीवर गेले आहे. महाराष्ट्राने पायाभूत सुविधा क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली असून जपान तर्फे दिल्या जाणाऱ्या मदतीचा सर्वात मोठा लाभार्थी महाराष्ट्र असल्याचे जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत यागी कोजी यांनी यावेळी सांगितले.भारतातून गेल्यावर्षी २.३० लाख पर्यटक जपानला गेले असून ही पर्यटक संख्या वाढवण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात भारत व जपानच्या राष्ट्रगीताने करण्यात आले. जपानचे सम्राट नारुहितो यांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभावे या  शुभेच्छा देण्यात आल्या.

या प्रसंगी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरराजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावलकौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढामुंबईतील जपानचे वाणिज्यदूत यागी कोजीमुख्य सचिव सुजाता सौनिकउद्योगक्षेत्रातील प्रमुख व्यक्ती तसेच विविध देशांचे वाणिज्यदूत उपस्थित होते.

०००००

 

Governor attends the 65th birthday celebrations

of His Majesty the Emperor of Japan Naruhito

            Mumbai, 11th :Maharashtra Governor C.P. Radhakrishnan attended the 65th birthday celebrations of His Majesty the Emperor of Japan Naruhito organised by the Consulate General of Japan in Mumbai.

Speaker of Maharashtra Legislative Assembly Rahul Narwekar, Minister of Protocol Jayakumar Rawal, Minister of Skill Dev. Mangal Prabhat Lodha, Consul General of Japan in Mumbai Yagi Koji, Chief Secretary Sujata Saunik, Captains of Industry and Consuls of various countries were present.

00000

 

Featured post

Lakshvedhi