Tuesday, 11 February 2025

प्रदर्शन दि. ११ ते २३ फेब्रुवारी दरम्यान

 प्रदर्शन   दि. ११ ते २३ फेब्रुवारी दरम्यान

सरस महालक्ष्मी या प्रदर्शनाला दि. ११ ते २३ फेब्रुवारी,  या कालावधीत भेट देता येणार आहे.

या प्रदर्शनात अनेक प्रकारच्या कलाकुसरीच्या वस्तूहातमागावर तयार केलेले कपडेवुडन क्राफ्टबंजारा आर्टवारली आर्ट च्या वस्तू याशिवाय अनेक प्रकारच्या ज्वेलरीलहान मुलांसाठी लाकडी खेळणी व इतर राज्यातील दुर्मिळ वस्तूंची रेलचेल असणार आहे. या ठिकाणी  प्रमाणित असे सेंद्रिय पदार्थ प्रदर्शनात उपलब्ध होणार आहेत. ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे  यांच्या नेतृत्वात  ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिवएकनाथ डवले यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रदर्शनाचे  भव्य आयोजन करण्यात येत  आहे.

उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान pl share

 उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान

उमेद  हे राज्यातील ग्रामीण भागातील महिलांना स्वयंसहाय्यता समूहाच्या माध्यमातून संघटित करून त्यांना वैयक्तिकसामाजिक व आर्थिकदृष्ट्या विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अभियानामार्फत या महिलांना अनेक प्रकारची कौशल्ये व उद्योगाभिमुख प्रशिक्षणे दिली जातात. आज अभियानाच्या माध्यमातून लाखो महिला सक्षम उद्योजिका म्हणून अनेक उत्पादनांची निर्मिती करत आहेत.  त्यांनी तयार केलेली ही विविध उत्पादने देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचून त्यांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून दरवषी महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन आयोजित केले जाते. आतापर्यंत मुंबईनवी मुंबईनागपूर या ठिकाणी महालक्ष्मी सरस चे आयोजन करण्यात आले असून नागरिकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळालेला आहे.

****

करंजा - उरण येथील जेट्टीचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावे

 करंजा - उरण येथील जेट्टीचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावे

-  मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे

मुंबईदि. 10 – रायगड जिल्ह्यातील करंजा – उरण येथील मच्छिमार बंदराचे काम वेळेत पूर्ण करत असतानाच दर्जेदारही असावे असे आदेश मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिले.

            मंत्रालयात आज उरण जेट्टीच्या कामाविषयी झालेल्या बैठकीवेळी ते बोलत होते. यावेळी आमदार महेश बालदीमत्स्य आयुक्त  किशोर तावडेमहाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अनिता मेश्राम यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

उरण येथील जेट्टीचे काम करत असताना करण्यात येणाऱ्या कामांची प्राथमिकता ठरवावी, असे आदेश देऊन मंत्री श्री. राणे म्हणाले कीसर्वात प्रथम पाणीवीजरस्ते आणि लिलाव शेडचे काम करावे. तसेच एकूण राहिलेल्या कामांचे नियोजन करावे. यासाठी एक वेळापत्रक तयार करून त्यानुसार कामे करण्यात यावीत. एकूण 151 कोटी रुपयांचा हा प्रकल्प असला तरी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देऊन आणखी काही कामे घ्यावयाची असल्यास त्याचा समावेश करावा आणि सविस्तर सुधारित आराखडा सादर करावा. बंदरातील गाळ काढण्याच्या कामास प्राधान्य द्यावे आणि पुन्हा गाळ भरू नये यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा आराखडा सादर करावा. या कामाच्या प्राशाकीय मान्यतेसाठी पाठपुरवा करावा.

या जेट्टीच्या ठिकाणी एकूण 20 कामे हाती घेण्यात आली आहेत. 151 कोटी रुपयांच्या या कामांमध्ये क्यू वॉलजोड कालवापार्किंगमच्छी लिलाव हॉलप्रशासकीय कार्यालय, 2 फिशिंग गिअर शेड, 2 जाळी विणण्याची शेडमच्छिमारांसाठी निवारा शेडरेस्टॉरंटरेडिओ कम्युनिकेशन स्टेशनगार्ड हाऊससंरक्षक भिंतसुशोभिकरण, 1 एमएलडीचा सेवेज ट्रिटमेंड प्लांट, 200 टन क्षमतेचा आईस प्लांट, 100 टन क्षमतेचे फिश कोल्ड स्टोरेजआरओ प्लांटविुद्युतीकरणपिण्याच्या पाण्याची सोयअग्निसुरक्षा आणि फ्युएल पंप यांचा समावेश आहे.

दरम्यान मंत्री श्री. राणे यांनी रेवस ते रेड्डी या किनारी महामार्गाच्या कामाचाही आढावा घेतला. विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर येथील कामाचा यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला. या कामाचे भूसंपादन योग्यरित्या करण्याच्या सूचना देऊन मंत्री श्री. राणे म्हणालेहे काम तीन वर्षांच्या कालावधीत पूर्ण करावे. या कामाविषयी स्थानिकांना माहिती देण्यासाठी येत्या 12 फेब्रुवारी रोजी अधिकारी यांनी कुणकेश्वर येथे जाऊन ग्रामस्थांशी आणि जिल्हा प्रशासनाशी चर्चा करावी व कामाची सविस्तर माहिती संबंधितांना द्यावी. तसेच संबंधित विभागांच्या परवानग्या घेण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, अशा सूचना दिल्या.

कुणकेश्वर येथील हा पूल केबल स्टड प्रकारातील असणार आहे. एकूण 181 कोटी रुपयांचा हा पूल असणार आहे. त्याची लांबी 330 मीटर असून रुंदी 1.8 मीटर असणार आहे. तर जोड रस्तामिळून या संपूर्ण कामाची लांबी 1.580 कि.मी. इतकी आहे. या कामामुळे कुणकेश्वर आणि देवगड परिसरातील पर्यटनाला चालना मिळणार आहे.

00000

आयुष्मान भारत योजना कार्ड वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे pl share

 आयुष्मान भारत योजना कार्ड वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे

- सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

 

मुंबई, दि. 10 : आयुष्यमान भारत योजनेंतर्गत लाभार्थ्यांना मोफत आरोग्य सेवा मिळण्यासाठी आयुष्मान कार्ड वाटप करण्यात येते. जास्तीत जास्त नागरिकांना आरोग्य सुविधेचा लाभ होण्यासाठी आयुष्मान भारत योजनेच्या कार्ड वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावेअसे निर्देश सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले.

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना यांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर बोलत होत्या. यावेळी राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाणउपमुख्य कार्यकारी अधिकारी विनोद बोंदरेवित्तीय सल्लागार प्रमोद पेटकरमहाव्यवस्थापक (प्रशासन) सुनील सोवितकरमहा व्यवस्थापक (ऑपरेशन) रामेश्वर कुंभार उपस्थित होते.

राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या कीमोफत आरोग्य सुविधेपासून कोणीही वंचित राहू नये यासाठी आयुष्मान भारत योजना कार्ड वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात यावे. यासाठी प्रभावी जनजागृतीआशा कार्यकर्त्याअंगणवाडी सेविकाआणि ग्रामसेवक यांच्या मदतीने घरगुती सर्वेक्षण व लाभार्थी सर्वेक्षण प्रक्रिया पूर्ण करण्यात यावीअशा सूचना राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी दिल्या.

प्रधाननमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ  जास्तीत जास्त रुग्णांना होण्यासाठी व तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने अंगीकृत रुग्णालयांची संख्या वाढवण्यात यावीअसेही राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी सांगितले.

राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी यावेळी आरोग्य सुविधामनुष्यबळ आदीबाबींचा आढावा घेतला.

0000

हायमाऊंट राज्य अतिथीगृहाचे काम नियोजित वेळेत आणि दर्जेदार करावे

 हायमाऊंट राज्य अतिथीगृहाचे काम

नियोजित वेळेत आणि दर्जेदार करावे

- राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

 

मुंबईदि. 10 : राज्य शासनाच्या पुनर्विकसित करण्यात येत असलेल्या हायमाउंट राज्य अतिथीगृहाचे काम नियोजित वेळेत आणि दर्जेदाररित्या पूर्ण करावेअसे निर्देश राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.

देशातील विविध महत्त्वाच्या आणि अति महत्त्वाच्या पदांवरील व्यक्ती यांच्या बैठक आणि निवासस्थानाच्या व्यवस्थेसाठी मुंबईमध्ये असलेल्या अतिथीगृहांपैकी एक असलेल्या हायमाउंट अतिथीगृहाच्या पुनर्विकासाचे काम पूर्णत्वास आले असून राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्याची पाहणी केली. त्यानंतर सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत त्यांनी हायमाऊंट येथे महत्त्वाच्या आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे वास्तव्य असणार असल्याने या इमारतीचे सुरू असलेले काम मुंबई आणि महाराष्ट्राच्या लौकिकाला साजेसे असे व दर्जेदाररित्या पूर्ण करण्याचे निर्देश दिले. या बैठकीस राजशिष्टाचार विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकरउपसचिव हेमंत डांगे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र राहणेमुख्य वास्तूशास्त्रज्ञ चेतन आकेवरिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ मि.दी.जाधवबृहन्मुंबई महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता सुनील तावडेसार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता वि.अ. पाटसकरडॉ. प्रसन्ना कुलकर्णी उपस्थित होते.

मुंबईत येणाऱ्या महत्त्वाच्या आणि अति महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींसाठी असलेले अतिथीगृह हे सर्व सुविधांनी युक्त असावे. त्यादृष्टीने हाय माउंट अतिथीगृहात एक्झिक्यूटिव्ह कक्षांसोबतच महत्त्वाच्या आणि अतिमहत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींसाठी आवश्यक सर्व सुविधा असणारे कक्ष असावेतअसेही श्री.रावल यांनी सांगितले.

हाय माउंट अतिथीगृहाचे काम पूर्ण झाल्यानंतर सध्या वापरात असलेल्या सह्याद्री अतिथीगृहाची देखभाल दुरुस्तीची कामे हाती घ्यावीतअसे निर्देशही श्री. रावल त्यांनी यावेळी दिले. त्याचप्रमाणे मुंबई विमानतळानजिकच्या नंदगिरी राज्य अतिथीगृहाच्या इमारतीचा पुनर्विकास करण्याबाबत आराखडा तयार करण्यात यावाअशी सूचनाही त्यांनी केली.

0000

लोकनाट्य कला केंद्रांसाठी नवी नियमावली करणार

 लोकनाट्य कला केंद्रांसाठी नवी नियमावली करणार

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार

 

मुंबईदि. 10 : महाराष्ट्रातील लोककला जगली पाहिजे, लोकनाट्य केंद्रांवरील सादरीकरणातील पारंपरिक बाज जपला पाहिजे. तसेच सादरीकरणात पारंपरिक वाद्यांचा वापर झाला पाहिजे. या तसेच अनुषंगिक बाबींसाठी सांस्कृतिक कार्य विभागाकडून लवकरच नियमावली तयार करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सांगितले.

लोककलावंतांच्या विविध मागण्यांसंदर्भात मंत्रालयात बैठक झाली.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार म्हणाले, लोकनाट्य केंद्रांवर डीजे तसेच साऊंड सिस्टीम सुरु असल्याच्या तक्रारी प्राप्त होतात. लोकनाट्य व पारंपरिक लावणी कला जपणे गरजेचे असून ही कला व हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी स्व.पद्मश्री श्रीमती यमुनाबाई वाईकर यांच्या नावे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येईल.

लोकनाट्य केंद्रांवर डीजे तसेच साऊंड सिस्टीम सुरु असल्याच्या तक्रारी प्राप्त होतात. यासंदर्भात नियमांचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कार्यवाही करण्यात येईल, असेही सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले.

0000

कोल्हापूर चित्रनगरीत वस्तुसंग्रहालयाची स्थापना

 कोल्हापूर चित्रनगरीत वस्तुसंग्रहालयाची स्थापना

- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार

 

मुंबईदि. 10 :  कोल्हापूर हे मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक महत्त्वाचे केंद्र आहे. या सांस्कृतिक वारशाचे जतन व्हावेयासाठी कोल्हापूर चित्रनगरीत  लवकरच एक भव्यदिव्य वस्तुसंग्रहालय बांधण्यात येत येणार आहे. या वस्तुसंग्रहालयात चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील महत्त्वाचे दस्तऐवजजुने चित्रपटचित्रपटांचे पोस्टर्सकॅमेरेवेशभूषास्क्रिप्ट्स अशा विविध स्मृतींचे जतन करण्यात येईलअसे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सांगितले.

 

कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाच्या संचालक मंडळासंदर्भात मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगेउपसचिव नंदा राऊतसांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरेपुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे आदी उपस्थित होते.

 

 कोल्हापूर चित्रनगरी येथे नवीन वस्तुसंग्रहालयात मराठी चित्रपटसृष्टीच्या समृद्ध इतिहासाचा ठेवा जपला जाणार असूनजुन्या तसेच नव्या पिढीला चित्रपटसृष्टीच्या वैभवशाली परंपरेची माहिती मिळेल असे सांगून ॲड.शेलार म्हणाले कीसांस्कृतिक पर्यटनवाढीच्या दृष्टीने चित्रफिती तयार करून त्या समाजमाध्यमांवर प्रसारित कराव्या.

 

कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाचे काम सुरळीत चालविले जावे यासाठी यंत्रणेद्वारे पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. कोल्हापूर चित्रनगरीत विविध विकासकामे सुरू असल्याने या विकासकामांकरिता चित्रपट क्षेत्राची उत्तम जाण असलेल्या वास्तुविशारद यांची बाह्य स्रोतांद्वारे नियुक्ती करावी. ही पदे भरताना ‘एम एस आय डी सी’ ची मदत घेण्याची सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार यांनी केली.


Featured post

Lakshvedhi