Monday, 10 February 2025

मत्स्य उत्पादन वाढीच्या दृष्टीने तलावांच्या ‘डीजिटलायझेशन’ची प्रक्रिया तातडीने सुरू करावी

 मत्स्य उत्पादन वाढीच्या दृष्टीने तलावांच्या

डीजिटलायझेशनची प्रक्रिया तातडीने सुरू करावी

-         मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

मुंबईदि. 10 – राज्यातील गोड्या पाण्याची मासळीचे उत्पादन वाढवणे आणि मच्छिमारांचा आर्थिकस्तर उंचावणे महत्वाचे आहे. त्यासाठी राज्यातील मासेमारी तलावांचे डीजिटलायझेशन’ महत्वाचे आहे. ही प्रक्रिया तातडीने सुरू करावी असे आदेश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिले. 

मंत्रालयात राज्यातील तलावांचे ठेके आणि मत्स्य उत्पादन वाढीबाबत झालेल्या बैठकीमध्ये मंत्री श्री. राणे यांनी या सूचना दिल्या. यावेळी मत्स्य आयुक्त किशोर तावडेमत्स्य उद्योग विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अनिता मेश्राममत्स्य व्यवसाय विभागाचे सह आयुक्त अभय देशपांडेसंदीप दफ्तरदारउप आयुक्त ऋता दीक्षित आदी उपस्थित होते.

   राज्यातील गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढीसाठी या व्यवसायामध्ये सुसूत्रता आणणे गरजेचे असल्याचे सांगून मंत्री श्री. राणे म्हणाले की,  या व्यवसायमध्ये सध्या कोणत्याही प्रकारची माहिती विभागाकडे उपलब्ध होत नाही. व्यवसायामध्ये पारदर्शकता आणणेही महत्वाचे आहे. यासाठी या व्यवसायाचे डीजिटललायझेशन’ होणे गरजेचे आहे. तलावाचा ठेका कोणाला दिलाकिती कालावधीसाठी दिलाकशा स्वरुपाचा होताउत्पादन किती तसेच मासेमारी व्यवसाय कराणारेमासळी विक्रेतेमासळी वाहतूकदार यांची माहितीया सर्व बाबींची माहिती एका क्लिकवर उपलब्ध असली पाहीजे. यासाठी राज्यभर मोहिम स्वरुपात डीजिटललायझेशन’ करण्याची प्रक्रिया राबवावी. हे डीजिटललायझेशन’ कशा प्रकारे करता येईल यासाठी विभागाने आराखडा तयार करावा. त्यासाठी एक एजन्सी नेमावी.नेमण्यात येणाऱ्या एजन्सीला या कामातील चांगला अनुभव असावा. तसेच गुगल मॅपिंगच्या धर्तीवर नकाशे मागवावेतत्यांचे वर्गीकरण करावेअसे आदेशही मंत्री श्री. राणे यांनी दिले.

मंत्री श्री. राणे म्हणाले कीतलावांमधील गाळ काढणे आणि तलावांवर असलेले अतिक्रमण यांचीही माहिती विभागाने तयार करावी. ही माहिती तयार करताना टप्प्या टप्प्याने अतिक्रमण काढणे आणि राज्यभर मत्स्य व्यवसायाचे अधुनिकीकरण कशा प्रकारे करता येईल याचाही कृती आराखडा तातडीने तयार करावा. विभागाला सक्षम करण्यासाठी डीजिटललायझेशन’ सोबतच अधुनिकीकरण आणि व्यवसायामध्ये पारदर्शकता आणणे गरजेचे आहे.  अधुनिकीकरणासाठी संस्थातज्ज्ञअभ्यासक यांच्याकडून अभिप्राय मागवावेत. सध्या सुरू असलेली प्रक्रिया सुरळीत सुरू ठेवावी. तलावांमधील गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी जलसंपदा विभागाशी चर्चा करून कार्यवाही सुरू करावी. गाळ  काढणे आणि अतिक्रमण हटवणे यासाठी विभागवार कृती आराखडा तयार करावा. तसेच तलाव ठेक्यातील अटींचे पालन होत आहे किंवा नाही याची माहिती घेण्यासाठी एक सक्षम यंत्रणा विभागाने उभी करावी.

पहिल्या टप्प्यात तलावांचे डीजिटललायझेशन’ करून त्यानंतर अधुनिकीकरण करायचे आहे. तसेच तलाव ठेक्यांसाठी किमान शुल्क आकारणीस्पर्धात्मकता आणणे अशा पद्धतीने काम करावयाचे असल्याचे मंत्री श्री. राणे यांनी सांगितले.

राज्यात सध्या 500 हेक्टर पेक्षा कमी आकाराचे 2 हजार 410 तलाव आहेत. तर 500 ते 1000 हेक्टरचे 41 आणि 1000 हेक्टर पेक्षा मोठ्या आकाराचे 47 तलाव आहेत. तलावांचे अब आणि क वर्ग असे वर्गीकरण करण्यात येत आहे. मासळीचा किमान दर ठरवण्याची प्रक्रिया नव्याने करण्यात येत असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय आयुक्त श्री. तावडे यांनी दिली. तसेच संगणकीकरणअधुनिकीकरण या माध्यमातून गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढीसाठी घ्यावयाच्या निर्णयांची माहिती विभागाने दिली.

मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्पाची कामे गतीने पूर्ण करावी

 मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्पाची कामे गतीने पूर्ण करावी

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्प आढावा बैठक

 

मुंबईदि. 10: रत्नागिरी जिल्ह्यात मिरकवाडा मत्स्यबंदर प्रकल्प रोजगारनिर्मिती वाढविण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर मासेमारीसाठी पायाभूत सोयी सुविधांचा विकास होवून मत्स्यउत्पादन वाढणार आहे. मिरकरवाडा रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड’ ठरणारा आहे. या प्रकल्पाचे काम विहीत कालावधीत गतीने पूर्ण करण्यात यावेअसे निर्देश मत्सव्यवसायबंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.

मंत्रालयात आयोजित बैठकीत मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्पाचा आढावा मंत्री राणे यांनी घेतला. बैठकीला मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडेसहआयुक्त महेश देवरेमिरकरवाडा प्रकल्पाचे मत्स्य विकास अधिकारी श्रीमती अक्षया मयेकर,  कोकण प्रादेशिक मत्स्य उप आयुक्त नागनाथ भादुले आदी उपस्थित होते.

प्रकल्पाच्या टप्पा क्रमांक दोनमधील कामांचा प्राधान्यक्रम ठरविण्याच्या सूचना देत मंत्री राणे म्हणालेप्रकल्पाअंतर्गत संरक्षक भिंतीचे काम हाती घेण्यात यावे. निविदा स्तरावरील कामे कशाप्रकारे लवकर सुरू होतीलयाबाबत नियोजन करावे. पावसाळ्यापूर्वी प्रकल्पाची कामे पूर्ण झाली पाहिजेत. कुठल्याही परिस्थितीत विलंब होता कामा नये. पावसाळ्यात कामे करता येणार नाही. त्यामुळे सूक्ष्म नियोजन करून कामे सुरू करावीत. या कामांना आवश्यक असणाऱ्या परवानग्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात यावा. परवानग्या मिळविण्याची कार्यवाही पुढील 15 दिवसांत पूर्ण करावी.

मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्पातील टप्पा दोनमधील पश्चिमेकडील लाटरोधक भिंतीची लांबी वाढविणेउत्तरेकडे लाटरोधक भिंत बांधणेनौकानयन मार्गातील गाळ काढणेभराव व सपाटीकरणलिलावगृहजाळी विणण्यासाठी दोन शेडसांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणेमच्छिमारांसाठी दोन निवारा शेड बांधणेपुर्वेकडील ब्रेकवॉटर निष्कासित करणेअस्तित्वातील धक्का व जेट्टीदुरूस्ती आदी कामे प्रस्तावित आहेत. टप्पा दोन अंतर्गत एकूण कामे 22 असून कामे पूर्ण झाली आहेतअशी माहिती बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

०००

प्रदूषित पाण्याचा पुर्नवापर करण्यासाठी सर्व समावेशक आराखडा बनवणार

 प्रदूषित पाण्याचा पुर्नवापर करण्यासाठी सर्व समावेशक आराखडा बनवणार

-         पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

नगरपालिका आणि महानगरपालिकामध्ये सांडपाण्याचे व्यवस्थापन व

शाश्वत उपाययोजना विषयक कार्यशाळा संपन्न

 

मुंबईदि.१० : नद्यातलाव यांच्या प्रवाहात सांडपाणी मिसळू नयेसांडपाण्याचा पुर्नवापर करण्यासाठी पर्यावरण विभाग सर्व समावेशक आराखडा बनवणार असून. नद्यांच्या काठावरील ग्रामपंचायतीनगरपालिकामहानगरपालिका यांच्या कार्य क्षेत्रात प्रदूषण नियंत्रण  नियंत्रणासाठीप्रदूषित पाण्याचा पुर्नवापर नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या मदतीने करण्यासाठी तांत्रिक कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे, अशी घोषणा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केली.

आय. आय. टी.पवई येथे पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व आय. आय. टी.पवई यांच्या संयुक्त वि‌द्यमानाने स्थानिक स्वराज्य संस्थां प्रामुख्याने नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रात सांड पाण्याचे व्यवस्थापन  व शाश्वत उपाययोजना  (मुन्सिपल वेस्ट वॉटर मॅनेजमेंट गॅप्स,  सस्टेनबिलिटी अँड वे फॉरवर्ड) या विषयावर एक दिवसाची परिषद आयोजित करण्यात आली होतीया कार्यक्रमात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे बोलत होत्या.

यावेळी नगर विकास (२) विभागाचे प्रधान सचिव के.एच. गोविंदराज,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव  डॉ. अविनाश ढाकणेआय. आय. टी.पवई च्या पर्यावरण विभाग व इंजिनिअरिंगचे प्रोफेसर मुनेश कुमार चंदेलप्रोफेसर अनिल कुमार दीक्षितराज्यातील महानगरपालिका,नगरपालिका या क्षेत्रातील प्रदूषण नियंत्रण अधिकारी तथा तंत्रज्ञ या कार्य शाळेला उपस्थित होते.

            पर्यावरण  मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या कीग्रामपंचायती,नगरपालिका महानगरपालिका या क्षेत्रातून वाहणाऱ्या नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्या त्या स्थानिक भागातील प्रदूषित पाणी या नद्यांमध्ये थेट मिसळले जाते. प्रदूषित पाणी मिसळल्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. प्रदूषित पाणी थेट पाण्याच्या प्रवाहामध्ये मिसळू नये यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. नद्या व तलावांचे संवर्धनही भविष्याची गरज ओळखून त्याचा सुनियोजित तांत्रिक आराखडा पर्यावरण विभागाकडून बनवला जाणार आहे. तसेच या क्षेत्रामध्ये लोकांना नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान माहिती होण्यासाठी पर्यावरण विभाग एक तांत्रिक कक्ष देखील स्थापन करून करून त्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रशिक्षण देणार आहे. जेणेकरून प्रदूषणाच्या उपाययोजना काटेकोरपणे राबवता येतील असेही मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या.

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या कीशेतीमध्ये पिकांवर फवारणी करण्यात  येणारी  कीटकनाशके यामुळे देखील पाणी प्रदूषित होत आहे. जल,वायू,मृदा प्रदूषण रोखण्यासाठी परस्पर संबंधित शासनाच्या विभागांच्या समन्वयाने प्रदूषण टाळण्यासाठी काटेकोरपणे उपायोजना  करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्वांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. आवश्यक तिथे जनजागृती करणे.जिथे कायद्याची गरज भासल्यास कायदेशीर दृष्ट्या कारवाई करणे. त्याचप्रमाणे कायदा व नियमांची माहिती लोकांना करून देणे यासाठी देखील पर्यावरण विभाग भर देणार आहे. पर्यावरणावर प्रेम करणारी आपली संस्कृती आहे. ही संस्कृती जपण्याचे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.प्रत्येकाने हे प्रदूषण रोखण्यासाठी काळाची गरज ओळखून आत्तापासूनच काम केले तर आपण पुढील पिढीला आपण चांगले वातावरण आणि चांगले आरोग्य देऊ शकतो.पर्यावरणासाठी काम करून आपण सर्वांचे जीवन सुसह्य करणार आहोत त्यामुळे या कार्यशाळेचा नक्कीच सर्वांना लाभ होईल असेही त्या म्हणाल्या.

प्रधान सचिव के. एच. गोविंदराज म्हणाले कीशहरामध्ये निर्माण होणारे सांडपाणी आपल्या पिण्याच्या पाण्याच्या स्तोत्रात मिसळले जाते.मात्र प्रदूषित झालेल्या सांड पाण्याचा जर आपण त्याच ठिकाणी पुनर्वापर केला तर प्रदूषणाची समस्या सुटण्यासाठी मदत होऊ शकेल. आपल्याला प्रदूषणाची वस्तुस्थिती माहिती आहे आणि त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम ही माहिती आहेत. शासनाच्या प्रत्येक विभागाने परस्पर सहकार्याने या समस्यावर मात करण्यासाठी जलशुद्धीकरण यंत्रणा बसवणे. स्थानिक ठिकाणी प्रदूषण कमी होण्यासाठी जनजागृती करणे यासारखे उपाय करणे गरजेचे आहे.आज झालेल्या कार्यशाळेतून मिळणारे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आपल्या क्षेत्रांमध्ये पोहोचवा असेही त्यांनी सांगितले.

यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे यांनी महाराष्ट्रातील पालिका क्षेत्रातील प्रदूषित पाण्याचे सद्यस्थिती आणि त्याचा होणारा परिणाम याविषयी सादरीकरण केले. इंदोर येथील  डॉ. राकेश कुमारआयआयटी मुंबईचे प्रोफेसर अनिल कुमार यांनी नैसर्गिक रित्या प्रदूषण आपण कसे थांबवू शकतो यावर आधारित आपले विचार मांडले.

 'प्रदूषित पाणी शुद्धीकरणासाठी पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणेया विषयावरती आय.आय.टी खरगपूरचे इंजिनिअरिंग विभागाचे विभागप्रमुख प्रोफेसर ब्रिजेश दुबेमहाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे कार्यकारी अभियंता तन्मय कांबळेइको एन्व्हायरमेंट प्रॅक्टिस चे मुख्य अधिकारी कैलास शिरोडकर, 'राज्यातील प्रदूषित पाण्यावरती राबवण्यात आलेले नाविन्यपूर्ण प्रयोग यशोगाथाची माहिती मुंबईकोकणपश्चिम महाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र,मराठवाडा नागपूरअमरावती  या भागातील पालिका अधिकाऱ्यांनी यांनी सादर केल्या. 'शाश्वत शुद्ध पाण्यासाठी उपाय योजना'  या विषयावर नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी सादरीकरण केले.

००००

उन्हाळा आला कलिंगड जपून खा. वरील व्हिडिओ अवश्य पहा.

 उन्हाळा आला कलिंगड जपून खा.

वरील व्हिडिओ अवश्य पहा.


*कर्करोग हा धोकादायक आजार नाही!* Pl share

 *कर्करोग हा धोकादायक आजार नाही!*


डॉ. गुप्ता म्हणतात, " कोणाचाही कर्करोगाने मृत्यू होऊ नये. निष्काळजीपणा पुढे 

मात्र हात टेकावे लागतात. " 

हे वाचा, दुसऱ्यांना ही सांगा. 


*ह्या पायऱ्या लक्षात घ्या.*


(1) पहिली पायरी म्हणजे साखरेचे सेवन बंद करणे. साखरेच्या अभावाने कर्करोगाच्या पेशी नैसर्गिकरित्या मरतात. 


(2) दुसरी पायरी म्हणजे एक कप कोमट पाण्यात लिंबाचा रस घालून सकाळी रिकाम्या पोटी जेवणाआधी घेत जा. 

1 ते 3 महिन्यात कर्करोग नाहीसा होईल. मेरीलँड मेडिकल रिसर्चनुसार, कोमट लिंबू पाणी केमोथेरपीपेक्षा 1000 पट चांगले, प्रभावी आणि सुरक्षित आहे. 


(3) तिसरी पायरी म्हणजे 3 चमचे घाणीचे [नैसर्गिक] खोबरेल तेल सकाळी आणि रात्री घ्या [प्या], कॅन्सर नाहीसा होईल.


*पहिली पायरी महत्वाची आहे.* 


*इतर दोन उपचारांपैकी कोणताही एक उपचार निवडू शकता.* 

*अज्ञान ही सबब नव्हे.*


*मी [Dr Gupta] ही माहिती 5 वर्षांहून अधिक काळ शेअर करत आहे.*

*तुमच्या आजूबाजूच्या प्रत्येकाला ही माहिती सांगा. कॅन्सरने मरू नका, उपायाने तरून जा. कॅन्सरने मरणे हे कोणासाठीही लाजिरवाणे आहे. जीवाना वाचवण्यासाठी ही माहिती अनेकजणा पर्यंत पोचवा!सर्व सामान्यांना दिलासा मिळेल!*

🙏🏻 💧📌💧🙏🏻

एक९४वर्शिय म्हातारा त्यांची दयनीय अवस्था , ओळखा पाहू

 घरमालकाने भाडे न दिल्याने ९४ वर्षीय वृद्धाला भाड्याच्या घरातून हाकलून दिले.  म्हातार्‍याकडे जुना पलंग, काही अॅल्युमिनियमची भांडी, एक प्लॅस्टिकची बादली आणि घोकंपट्टी वगैरे शिवाय काहीही सामान नव्हते.  म्हाताऱ्याने मालकाला भाडे देण्यासाठी थोडा वेळ देण्याची विनंती केली.  शेजाऱ्यांनाही म्हातार्‍याची दया आली आणि त्यांनी घरमालकाला भाडे देण्यासाठी थोडा वेळ दिला.  घरमालकाने अनिच्छेने त्याला भाडे भरण्यासाठी थोडा वेळ दिला.


 म्हातार्‍याने सामान आत घेतले.


 तेथून जाणाऱ्या एका पत्रकाराने थांबून सर्व दृश्य पाहिले.  ही बाब आपल्या वृत्तपत्रात प्रसिद्ध करणे उपयुक्त ठरेल असे त्यांना वाटले.  त्याने एक मथळा देखील विचारला, "क्रूर जमीनदार पैशासाठी म्हातार्‍याला भाड्याच्या घरातून बाहेर काढतो."  मग त्याने जुन्या भाडेकरूचे काही फोटो काढले आणि भाड्याच्या घराचे काही फोटोही काढले.


 पत्रकाराने जाऊन आपल्या प्रेस मालकाला घडलेला प्रकार सांगितला.  प्रेसच्या मालकाने चित्रे पाहिली आणि त्यांना धक्काच बसला.  त्यांनी पत्रकाराला विचारले, म्हाताऱ्याला ओळखते का?  पत्रकार नाही म्हणाला.


 दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर मोठी बातमी छापून आली.  "गुलझारीलाल नंदा, भारताचे माजी पंतप्रधान, एक दयनीय जीवन जगत" असे शीर्षक होते.  या बातमीत पुढे लिहिले आहे की, माजी पंतप्रधान कसे भाडे देऊ शकले नाहीत आणि त्यांना घरातून कसे हाकलून देण्यात आले.  आजकाल फ्रेशर्सही भरपूर पैसे कमावतात, अशी टिप्पणी केली गेली.  तर दोन वेळा माजी पंतप्रधान राहिलेल्या आणि दीर्घकाळ केंद्रीय मंत्री राहिलेल्या व्यक्तीकडे स्वतःचे घरही नाही.


 वास्तविक गुलझारीलाल नंदा यांना रु.  500/- प्रति महिना भत्ता, .परंतु स्वातंत्र्यसैनिकांच्या भत्त्यासाठी आपण लढलो नाही असे सांगून त्यांनी हे पैसे नाकारले होते.  नंतरच्या मित्रांनी त्याला असे सांगून स्वीकारण्यास भाग पाडले की त्याचे मूळ दुसरे कोणतेही स्त्रोत नाही.  या पैशातून तो घरभाडे देऊन गुजराण करत असे.


 दुसऱ्या दिवशी तत्कालीन पंतप्रधानांनी मंत्री आणि अधिकाऱ्यांना वाहनांच्या ताफ्यासह त्यांच्या घरी पाठवले.  एवढ्या व्हीआयपी वाहनांचा ताफा पाहून घरमालक थक्क झाला.  तेव्हाच त्याला कळले की त्याचे भाडेकरू श्री.  गुलझारीलाल नंदा हे भारताचे माजी पंतप्रधान होते.  घरमालकाने त्यांच्या गैरवर्तनाबद्दल लगेच गुलझारीलाल नंदा यांच्या चरणी नतमस्तक झाले.


 अधिकारी आणि व्हीआयपींनी गुलझारीलाल नंदा यांना सरकारी निवास आणि इतर सुविधा स्वीकारण्याची विनंती केली.  श्री.  गुलझारीलाल नंदा यांनी या वृद्धापकाळात अशा सुविधांचा उपयोग काय, असे सांगून त्यांचा प्रस्ताव स्वीकारला नाही.  शेवटच्या श्वासापर्यंत ते सामान्य नागरिकासारखे साधे जीवन जगले.  1997 मध्ये सरकारने त्यांचा भारतरत्न देऊन गौरव केला.


 त्यांच्या आयुष्याची तुलना सध्याच्या राजकारण्यांशी करा.


  *त्यांच्या 23 व्या पुण्यतिथीनिमित्त.*🙏

Sunday, 9 February 2025

आनंदवन येथील सेवाभाव जगाच्या पातळीवर उल्लेखनीय :

 आनंदवन येथील सेवाभाव जगाच्या पातळीवर उल्लेखनीय :

उद्योगमंत्री उदय सामंत

 आनंदवन येथे दिव्यांगांसाठी कौशल्य विकास केंद्र सुरू होत असून उद्योगांशी त्याचा समन्वय करून देण्यात आला आहे. या केंद्राच्या माध्यमातून दिव्यांगांना नोकरी मिळण्यास मदत होईल. शासन म्हणून आनंदवनला पाठबळ देण्याची आमची जबाबदारी आहे. आनंदवन येथील किमान टक्के कामइतर ठिकाणी करू शकलोतर ती बाबा आमटे यांना खरी श्रद्वांजली  ठरेल. सकारात्मक पध्दतीने राज्य चालविणारे आनंदवनला कोणतीही मदत कमी पडू देणार नाही. आनंदवनची उर्जा प्रेरणादायी आहे. येथील सेवाभाव जगाच्या पातळीवर उल्लेखनीय आहेअसे उद्योगमंत्री श्री. सामंत म्हणाले.

 

विविध बाबींचे ऑनलाईन उद्घाटन :बाबा आमटे यांच्या जीवनावर मराठी आणि इंग्रजीमध्ये भाषेवर आधारीत चित्रपटाचे ऑनलाईन पध्दतीने मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याशिवाय एस्ट्याब्लिशींग एम.एम.एस. (महारोगी सेवा समिती) ॲज हेल्थ कॅपिटलसोमनाथ येथील श्रमतीर्थआनंदवनला डब्ल्यूसीएल कडून मिळालेल्या सोलर पॉवर जनरेशन प्रोजेक्टएस्ट्याब्लिशींग एम.एम.एस. ॲज स्कील डेव्हलपमेंट कॅपिटल आदींचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कौस्तुभ आमटे यांनी केले. संचालन वसुंधरा काशीकर – भागवत यांनी तर आभार डॉ. दिगंत आमटे यांनी मानले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या.

Featured post

Lakshvedhi