Wednesday, 22 January 2025

अवैध गर्भपात प्रकरणी पुढाकार घेत माहिती देणाऱ्या महिलेचे मानधन वाढविणार

 अवैध गर्भपात प्रकरणी पुढाकार घेत माहिती देणाऱ्या महिलेचे मानधन वाढविणार

-सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

गर्भ-लिंग प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश

 

मुंबईदि. 21 : अवैध गर्भपात प्रकरणी शासन गांभीर्याने कार्यवाही करत असून अशा गुन्ह्यांमध्ये आरोपींना कठोर शिक्षा करण्यात येत आहे. तरीही अवैध गर्भपात प्रकरणांमध्ये अधिकाधिक पुराव्याच्या साहाय्याने प्रकरण मजबूत करून आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी कार्यवाही करण्याची गरज आहे. अशा प्रकरणात महिला पुढे येवून माहिती देतातअशा महिलांचे मानधन वाढविण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत घेण्यात आला.   

राज्यात गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र (लिंग निर्धारण प्रतिबंधक) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून पोलीस यंत्रणेच्या समन्वयाने अशा प्रकरणावर कारवाया वाढविण्यात याव्यातअशा सूचनाही आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी दिल्या.

आरोग्य भवन येथे गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र (लिंग निर्धारण प्रतिबंधक) कायदा (पीसीपीएनडीटी) अंमलबजावणीबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस सचिव विरेंद्र सिंगआयुक्त अमगोथू श्री रंगा नायकसंचालक डॉ नितीन अंबाडेकरसहसंचालक श्रीमती कमलापुरे आदी उपस्थित होते. ऑनलाईन पद्धतीने राज्यातील जिल्हा पोलिस अधीक्षकजिल्हा शल्य चिकित्सकजिल्हा आरोग्य अधिकारीमहानगर पालिकांच्या वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

राज्यात स्त्री - पुरुष लिंग गुणोत्तर प्रमाण सुधारणेसाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. यासोबतच अवैध गर्भपात रोखण्यासाठी गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र (लिंग निर्धारण प्रतिबंधक) कायद्यानुसार कारवाई करण्यात येत आहे. गुन्हा सिद्ध करून कठोर शिक्षा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. अशा प्रकरणात गुन्हे सिद्धता वाढविण्यात येईल. आंतरराज्य जिल्ह्यामध्ये शेजारच्या राज्यातील जिल्ह्यातील प्रशासनाशी समन्वय साधून दोषींविरुद्ध प्रभावी कारवाई करण्यात यावीअसे निर्देशही मंत्री श्री. आबिटकर यांनी दिले.

सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. आबिटकर म्हणालेअवैध गर्भपात प्रकरणात दाखल केसेस  जलदगती न्यायालयात चालविण्याबाबत शासन विचार करीत आहे. तसेच गर्भपात करण्यात येणाऱ्या गोळ्या सहज उपलब्ध होवू नयेयासाठी काळजी घेण्यात यावी. ऑनलाईन विक्री होत असल्यास याबाबत पडताळणी करून दोषींविरुद्ध कारवाई करावी. जिल्हा स्तरावर असलेल्या समित्यांमध्ये सामाजिक कार्यकर्तेचळवळीतील नागरिकांचा सहभाग करण्यात यावा. या समित्या आणखी सक्षम करण्यात यावी. खबरी बक्षीस योजनेतील बक्षीस वाढविण्याबाबत कार्यवाही करावी.

०००

Tuesday, 21 January 2025

गुरूवर्य डॉ. किसन महाराज साखरे अध्यात्म, वैदिक तत्वज्ञानातील तेजोमय दीपस्तंभ

 गुरूवर्य डॉ. किसन महाराज साखरे अध्यात्म,

वैदिक तत्वज्ञानातील तेजोमय दीपस्तंभ

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ज्येष्ठ निरूपणकार ह.भ.प. डॉ. किसन महाराज साखरे यांना श्रद्धांजली

 

 

मुंबईदि. 21 :- 'अध्यात्मवैदिक ज्ञान परंपरेचा निस्सीम साधक म्हणून गुरूवर्य डॉ. किसन महाराज साखरे यांची कार्यसाधना पुढील कित्येक पिढ्यांसाठी दीपस्तंभासारखी तेजोमय राहील, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ निरूपणकारसंत साहित्य आणि अद्वैत वेदांत तत्वज्ञानाचे श्रेष्ठ अभ्यासक गुरूवर्य डॉ. किसन महाराज साखरे यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली आहे.

'गुरूवर्य डॉ. किसन महाराज यांनी साधकाश्रमाच्या माध्यमातून सुरू केलेले कार्य महत्त्वपूर्ण आहे. वेदांत तत्त्वज्ञान आणि संत विचारांची सांगड घालून त्याच्या प्रचार-प्रसारासाठी त्यांनी जीवन समर्पित केले. महाराष्ट्रातील संतांची साहित्यसंपदा जनसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांनी कीर्तन- निरुपणातून अविरत प्रयत्न केले. यासाठी आधुनिक ज्ञान-शिक्षण साधनांचा त्यांनी प्रभावी वापर केला. याच ध्यासातून त्यांच्याकडून अनेकविध मौलिक ग्रंथांची निर्मिती झाली. या सगळ्या गोष्टी भावी पीढीसाठी तेजोमय दीपस्तंभ म्हणून ज्ञानप्रकाश देत राहतील. महाराष्ट्र एका अलौकिक ज्ञानसाधकासतत्वचिंतकास मुकला आहे. त्यांचा साधक परिवारतसेच कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची ताकद मिळोअशी ईश्वरचरणी प्रार्थना. ब्रम्हलीन गुरूवर्य डॉ. किसन महाराज साखरे यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतोअसे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

000


शासकीय दंत महाविद्यालयामध्ये वृद्धांसाठी दंत चिकित्सालय

 शासकीय दंत महाविद्यालयामध्ये वृद्धांसाठी दंत चिकित्सालय

 

मुंबईदि. 21 : वृद्ध रूग्णांना एकाच ठिकाणी सर्व सेवा प्रदान करण्यासाठी शासकीय दंत महाविद्यालयाच्या तळमजल्यावर "जेरियाट्रिक डेंटल केअर युनिट"चे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण व संशोधन आयुक्त राजीव निवतकर यांच्या हस्ते करण्यात आले.

राष्ट्रीय कृत्रिम दंतशास्त्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले, सहसंचालक (दंत) डॉ. विवेक पाखमोडे, कृत्रिम दंतशास्त्र विभागाच्या डॉ. आरती गांगुर्डे, अधिष्ठाता डॉ. वसुंधरा भड - पाटीलप्राध्यापक, विभागप्रमुख उपस्थित होते. 

 आयुक्त श्री. निवतकर म्हणाले, रुग्ण जागरूकता, विद्यार्थ्यांमध्ये स्वारस्य तसेच मौखिक आरोग्यामध्ये कृत्रिम दंतशास्त्राच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी राष्ट्रीय कृत्रिम दंतशास्त्र दिवस साजरा केला जातो.

इंडियन प्रोस्टोडोन्टिक सोसायटीच्या पुढाकाराने कृत्रिम दंतशास्त्र दिन साजरा करण्याकरिता विविध कार्यक्रम राबविण्यात आले. विद्यार्थ्यांनी पारंपरिक रांगोळी स्पर्धाक्रॉसवर्ड कोडेसर्जनशीलता, स्लोगन स्पर्धा मध्ये सहभाग घेऊन त्यांचे कौशल्य प्रदर्शित केले. या कार्यक्रमांच्या माध्यमातून दंत चिकित्सामध्ये कृत्रिम दंतशास्त्रांचे महत्व अधोरेखित करण्यात आले.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रुग्ण जागरूकतेसाठी कृत्रिम दंतशास्त्र विभागातर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या विविध उपचारांबद्दल माहितीपत्रकांचे प्रकाशन करुन ज्येष्ठ नागरिकांना त्याचे वाटप करण्यात आले.


माध्यमांनी बातमीस सनसनाटी स्वरुप देणे टाळावे2023 व सन 2024 च्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण

 माध्यमांनी बातमीस सनसनाटी स्वरुप देणे टाळावे

उपमुख्यमंत्री अजित पवार

 

मुंबईदि. 21 : एखाद्या घटनेची वस्तुनिष्ठता तपासूनच माध्यमांनी बातमी द्यावी. बातमीला सनसनाटी स्वरुप देणे माध्यमांनी टाळावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सन 2023 व सन 2024 च्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते मंत्रालयातील समिती सभागृहात झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारेमाहिती व जनसंपर्कचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंहसंघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडेउपाध्यक्ष महेश पवारसरचिटणीस प्रवीण पुरोखजिनदार विनोद यादव आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीस्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात ज्या पत्रकारांनीनिर्भिड पत्रकारिता केली. पत्रकारितेचा आदर्श निर्माण केला. त्यांचा वारसापरंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न करावा. सध्या तंत्रज्ञानाच्या वाढीमुळे माध्यम क्षेत्रातही मोठे बदल झाले आहेत. आता इलेक्ट्रॉनिक मीडियाडिजिटल प्लॅटफॉर्म्सआणि सोशल मीडियाने माध्यमांचे रूप पालटले आहे. आज बातम्या केवळ वृत्तपत्रांपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. मोबाइलवरसोशल मीडियावर काही सेकंदांत बातम्या पोहोचतात. माध्यमांचा वेग झपाट्याने वाढला आहे. त्यातच आता माध्यम क्षेत्रातही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू झाला असून या क्षेत्रावर एआयचा मोठा प्रभाव पडणार आहे. एआय’ आपल्याला सहाय्यक ठरू शकतोमात्र पत्रकारितेच्या मुळाशी असलेली सत्यपारदर्शकताआणि सामाजिक बांधिलकी ही मूल्ये केवळ पत्रकारच जपू शकतातअसा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

माध्यम क्षेत्रात बदल होत असताना मीडिया ट्रायल सारखी आव्हानेही समोर येत आहेत. मीडिया ट्रायलमुळे समाजात संभ्रम निर्माण होतो आणि एखाद्या व्यक्तीचं जीवन उद्ध्वस्त होऊ शकतेएखाद्याचे करिअर संपू शकते. माध्यमांनी सत्यपारदर्शकता आणि नैतिकतेला महत्त्व द्यावेअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

चुकीच्या गोष्टीवर टीका करणेटीपणी करणे हा माध्यमांचा हक्क आहे. सगळीकडे नकारात्मक गोष्टी घडताना चांगल्यासकारात्मक गोष्टी सुद्धा समाजाच्या समोर येणे आवश्यक असल्याचे मतही श्री. पवार यांनी व्यक्त केले.

पत्रकारांच्या विविध मागण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मी स्वतः सकारात्मक आहोत. माध्यमकर्मींचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेसंदर्भात अभ्यास करुन निर्णय घेण्यात येईलअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

वार्ताहर संघाने आपल्या सदस्यांना उत्कृष्ट वार्तांकनासाठी प्रेरणा मिळण्याच्या दृष्टीने पुरस्कार देण्याची ही बाब कौतुकास्पद असून अशारितीने आपल्याच सदस्यांचा गुणगौरव करणारा आपला एकमेव संघ असावा. मंत्रालय वार्ताहर संघाकडूनमंत्रालयात दिला जाणारा हा पुरस्कार आपल्या कार्यकर्तृत्वाला अधिक प्रकाशमान करणारा ठरेलअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

श्री. चोरमारे आजच्या माध्यम क्षेत्राविषयी मत व्यक्त करताना म्हणाले कीसध्याच्या पत्रकारितेपुढे मोठे आव्हाने निर्माण झाली आहेत. गंभीरपणे व प्रामाणिकपणे पत्रकारिता करणाऱ्यास मध्यवर्ती पत्रकारितेमध्ये स्थान राहिले नाही. मात्रतरीही गंभीरपणे व प्रामाणिकपणे काम करणारे पत्रकार स्वतःची जागा निर्माण करत आहेत. पत्रकारांना समाजातील समस्या जाणून घेऊन त्याचे वार्तांकन करण्यासाठी माध्यम संस्थांनी पाठबळ देणे आवश्यक आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोवीड काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्याजोगे काम केले आहे. मात्रमाध्यमांनी याची अधिक दखल घेणे गरजेचे होते असे श्री. चोरमारे यांनी यावेळी सांगितले.

प्रास्ताविकात अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांनी शासनाने पत्रकारांचे विविध प्रश्न सोडवावे, अशी मागणी केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिताली तापसे यांनी केले तर आभार श्री. यादव यांनी मानले. निवड समिती सदस्य सर्वश्री अभय देशपांडेमंदार पारकरखंडूराज गायकवाडसुरेंद्र गांगणसंजय बापट व भगवान परब यांचा यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पुरस्कार्थींची नावे :

कै. कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्कार

जेष्ठ पत्रकार श्री. पंढरीनाथ सावंत (सन 2023) आणि श्रीमती ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी (सन 2024)

राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार सन 2023 :

मुद्रित माध्यम - लोकसत्ताचे ज्येष्ठ पत्रकार संदिप आचार्यलोकसत्ता

वृत्तवाहिनी पत्रकार विनया देशपांडेसीएनएन आयबीएन

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार वार्ताहर संघ सदस्य ज्येष्ठ पत्रकार दीपक भातुसेलोकमतमुंबई

राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार सन 2024 :

मुद्रित माध्यम ज्येष्ठ पत्रकार प्रगती पाटीललोकमत सातारा

वृत्त वाहिनी –  मंदार गोंजारीएबीपी माझापुणे

वार्ताहर संघाच्या संदस्यांमधून दिला जाणार पुरस्कार : राजन शेलारपुढारीमुंबई

००००

क्षत्रेक्य परिषद अमृत महोत्सव

 

🌸 क्षात्रैक्य परिषद 🌸
     ☘️"अमृत महोत्सव"☘️
क्षात्रैक्य परिषद आता पंचाहत्तर वर्षाची झाली आहे. छोट्याशा रोपट्याचे रुपांतर वटवृक्षात झाले आहे.    
  पं.वि.अरविंद हरी राऊत यांनी पंचाहत्तर वर्षांपूर्वी "क्षात्रैक्य  परिषद" या नावाने संस्थेची स्थापना केली.            
  क्षात्रैक्य परिषद, समाज बांधवांसाठी गेली ७५ वर्षे अनेक उपक्रम राबवित आहे.
   हा *अमृत महोत्सव * कार्यक्रम                        📅 दिनांक -९ फेब्रुवारी २०२५ रोजी                   🌴🌴मढ-मास्तर वाडी,मालाड  (पश्चिम) येथे आयोजित करण्यात आला आहे.                            🕰️ह्या कार्यक्रमाची वेळ सकाळी १०ते सायंकाळी ४•३० वा.अशी आहे.                                                                          📕हया  प्रसंगी स्मरणिकेचे प्रकाशन होणार आहे. ज्या समाज बांधवांना स्मरणिकेसाठी जाहिरात अथवा देणगी दयायची असेल त्यांनी खालील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
   सर्व समाज बांधवांना हे आग्रहाच निमंत्रण आहे, आपण या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहावे. 
 आपला धनादेश "क्षात्रैक्य परिषद " (KSHATRAIKYA PARISHAD) या नावाने द्यावा.  
श्री.जगदीश पाटील मो.9821548919

श्री. विजय पाटील-8976000289

चंद्रकांत पाटील-9821086411
🌸 क्षात्रैक्य परिषद 🌸

     ☘️"अमृत महोत्सव"☘️
क्षात्रैक्य परिषद आता पंचाहत्तर वर्षाची झाली आहे. छोट्याशा रोपट्याचे रुपांतर वटवृक्षात झाले आहे.    
  पं.वि.अरविंद हरी राऊत यांनी पंचाहत्तर वर्षांपूर्वी "क्षात्रैक्य परिषद" या नावाने संस्थेची स्थापना केली.            
  क्षात्रैक्य परिषद, समाज बांधवांसाठी गेली ७५ वर्षे अनेक उपक्रम राबवित आहे.
   हा *अमृत महोत्सव * कार्यक्रम 📅 दिनांक -९ फेब्रुवारी २०२५ रोजी 🌴🌴मढ-मास्तर वाडी,मालाड (पश्चिम) येथे आयोजित करण्यात आला आहे. 🕰️ह्या कार्यक्रमाची वेळ सकाळी १०ते सायंकाळी ४•३० वा.अशी आहे. 📕हया प्रसंगी स्मरणिकेचे प्रकाशन होणार आहे. ज्या समाज बांधवांना स्मरणिकेसाठी जाहिरात अथवा देणगी दयायची असेल त्यांनी खालील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
   सर्व समाज बांधवांना हे आग्रहाच निमंत्रण आहे, आपण या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहावे. 
 आपला धनादेश "क्षात्रैक्य परिषद " (KSHATRAIKYA PARISHAD) या नावाने द्यावा.  
श्री.जगदीश पाटील मो.9821548919

श्री. विजय पाटील-8976000289

चंद्रकांत पाटील-9821086411

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या डिसेंबर महिन्यातील मासिक व साप्ताहिक सोडतीचा निकाल जाहीर

 महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या डिसेंबर महिन्यातील

 मासिक व साप्ताहिक सोडतीचा निकाल जाहीर

 

मुंबई,दि. २० : महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात मासिक सोडती तसेच साप्ताहिक सोडती काढल्या जातात. माहे डिसेंबर-२०२४ मध्ये दि. १०/१२/२४ रोजी महाराष्ट्र सहयाद्रीदि. १४/१२/२०२४ रोजी महाराष्ट्र गणेशलक्ष्मी नाताळ विशेषदि. १८/१२/२०२४ रोजी महाराष्ट्र गौरव मासिकदि. २१/१२/२०२४ रोजी महाराष्ट्र तेजस्विनी व दि. २५/१२/२०२४ रोजी महाराष्ट्र गजराज या सोडती काढण्यात आल्या असल्याची माहिती उपसंचालक (वित्त व लेखा)महाराष्ट्र राज्य लॉटरीवाशी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

महाराष्ट्र सहयाद्री मालिका तिकीट क्रमांक MS-2412-A/39878 या लॉटरी भंडारनागपूर यांचेकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम रु. ११ लाखाचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षिस जाहीर झाले आहे.

महाराष्ट्र गणेशलक्ष्मी नाताळ विशेष मालिका तिकीट क्रमांक GS-06-4089 या श्री. गणेश एन्टरप्रायझेस दादरमुंबई यांचेकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम रू. २२ लाखाचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षिस जाहीर झाले आहे.

महाराष्ट्र गौरव तिकिट क्रमांक G562976 या महालक्ष्मी लॉटरीछत्रपती संभाजीनगर यांचेकडून विक्री झालेल्या तिकिटास रक्कम रु.३५ लाखाचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस जाहिर झाले आहे.

महाराष्ट्र तेजस्विनी तिकीट क्रमांक TJ-08/5631 या गुरुदेव दत्त लॉटरी एजन्सीपुणे यांचेकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम रू.२५ लाखाचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस जाहीर झाले आहे.

तसेच महा. सागरलक्ष्मी ते महाराष्ट्रलक्ष्मी या साप्ताहिक सोडतीमधून रक्कम रू. ७ लाखाचे प्रथम क्रमांकाचे एकूण ०५ बक्षिसे जाहीर झाली आहेत.

याशिवाय डिसेंबर - २०२४ मध्ये मासिक सोडतीतून १३९०१ तिकीटांना रू. १,२५,०९,७००/- व साप्ताहिक सोडतीतून ५८८१२ तिकीटांना रू. २,०३,६९,८००/- ची बक्षिसे जाहीर झाली आहेत.

सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या वेबसाईटवर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रक्कम रु. १०,०००/- वरील बक्षिसाची मागणी या कार्यालयाकडे सादर करावी. रक्कम रू. १०,०००/- च्या आतील बक्षिस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात यावी,असे आवाहन उपसंचालक (वित्त व लेखा)महाराष्ट्र राज्य लॉटरीवाशी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

खो-खो विश्ववषक विजेत्या महिला-पुरुष संघाचे क्रीडा मंत्री दत्ता भरणे यांनी केले अभिनंदन

 खो-खो  विश्ववषक विजेत्या महिला-पुरुष संघाचे

क्रीडा मंत्री दत्ता भरणे यांनी केले अभिनंदन !

राज्य शासनाने दिलेल्या दहा कोटींच्या निधीबद्दल खेळाडुंनी मानले आभार

 

मुंबईदि. 20 :-खो-खो चा पहिला विश्वचषक दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर खेळला गेला. या स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघांकडून ऐतिहासिक खेळ पहायला मिळाला. भारतीय संघाने नेपाळला हरवून ऐतिहासिक विजेतेपद पटकावले. या विजयानंतर क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे खेळाडूंशी नुकताच संवाद साधत अभिनंदन केले.

खो-खोसाठी क्रीडा मंत्री श्री. भरणे यांच्या निर्देशानुसार दहा कोटींचा निधी नुकताच दिला होता. हा निधी दिल्याबद्दल खेळाडूंनी क्रीडा मंत्री श्री. भरणे यांचे आभार मानले. यावेळी मंत्री श्री. भरणे खेळाडूंना म्हणालेनिधी देणे ही आमची जबाबदारी आहे. पण या जनतेच्या पैशाचे खेळाडूंनी आपल्या कर्तृत्वाने चीज केले आहे. भारतीयांच्या माना उंचावल्या आहेत. खेळाडूंच्या कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे.

महाराष्ट्राची कन्या प्रियांका इंगळे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने ऐतिहासिक यश प्राप्त केले आहे. खो-खो वर्ल्डकपवर भारतीय संघाने नाव कोरले आहे. महिला व पुरुष संघाने  नवी दिल्ली येथे अंतिम सामन्यात नेपाळचा मोठ्या फरकाने पराभव करत विजेतेपद पटकावले. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापासून प्रत्येक सामन्यात वर्चस्व राखणाऱ्या दोन्ही संघाने अंतिम फेरीतही चमक दाखवली.

0000 

Featured post

Lakshvedhi