Tuesday, 14 January 2025

महापारेषणच्या राज्य भार प्रेषण केंद्राला सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल दोन राष्ट्रीय पुरस्कार

 महापारेषणच्या राज्य भार प्रेषण केंद्राला

सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल दोन राष्ट्रीय पुरस्कार

 

मुंबईदि. 14 : विजेच्या उपलब्धतेनुसार पुरवठा व त्याचे नियंत्रण करण्यासाठी नावीन्यपूर्ण योजनांची यशस्वी अंमलबजावणी केल्याबद्दल महापारेषणच्या महाराष्ट्र राज्य भार प्रेषण केंद्रऐरोलीला देशातील सर्वोत्कृष्ट भार प्रेषण केंद्र व ओपन ऍक्सेस (एसएलडीसी) या दोन राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्काराबद्दल महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांनी अभिनंदन केले आहे.

इंडिपेंडेन्ट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन ऑफ इंडिया (आयपीपीएआय) या राष्ट्रीय संस्थेने बेळगावमध्ये हा पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. देशभरातील विद्युत कंपन्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करून हे पुरस्कार दिले.

याप्रसंगी केंद्रीय विद्युत प्राधिकरणचे अध्यक्ष घनश्याम प्रसादमहाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाचे माजी अध्यक्ष व्ही. राजाकेंद्रीय विद्युत प्राधिकरणचे माजी अध्यक्ष राकेशनाथग्रीड इंडियाचे माजी व्यवस्थापकीय संचालक एस के. सोनी यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण झाले. या वेळी महाराष्ट्र राज्य भार प्रेषण केंद्रऐरोलीचे अधीक्षक अभियंता मिलिंद देवळेउमेश भगतउपमहाव्यवस्थापक नितीन पौनीकरसहाय्यक महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) आनंद दळवीकार्यकारी अभियंता दिनेश पाटीलव्यवस्थापक (मानव संसाधन) योगेश अघोरसहाय्यक अभियंता विजय कांबळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 

या पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्य भार प्रेषण केंद्राचे कार्यकारी संचालक शशांक जेवळीकरमुख्य अभियंता गिरीश पंतोजी यांचे मार्गदर्शन लाभले.

आनंदवन येथील संस्थेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून 3 कोटी 8 लाखांचा निधी

 आनंदवन येथील संस्थेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून

3 कोटी 8 लाखांचा निधी

 

मुंबईदि. 14 :- चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा येथील आनंदवन महारोगी सेवा समिती संस्थेला कुष्ठरुग्णांचे उपचार आणि पुनर्वसनासाठी 1 कोटी 86 लाख रुपये तरआनंद अंधमुकबधीर आणि संधीनिकेतन दिव्यांग कार्यशाळेसाठी  1 कोटी 22 लाख रुपये असे एकूण 3 कोटी 8 लाख रुपयांचा निधी तातडीने वितरीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिले असून उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर निधी वितरीत करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने दखल घेऊन केलेल्या या कार्यवाहीमुळे थोर समाजसेवक दिवंगत बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांनी 75 वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीसमोरील आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.

बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांनी कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी 75 वर्षांपूर्वी 1949 मध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यातील आनंदवन येथे महारोगी सेवा समितीची स्थापना केली आहे. संस्थेचं यंदा अमृतमहोत्सवी वर्ष असून संस्था आर्थिक अडचणीत असल्याची बाब संस्थेचे सचिव डॉ. विकास आमटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लक्षात आणून दिली. डॉ. विकास आमटे यांच्या मागणीची तातडीने दखल घेत  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संस्थेस 3 कोटी 8 लाख रुपयांचा निधी तातडीने वितरीत करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. त्यानुसार तातडीने कार्यवाही करीत हा निधी संस्थेस वितरीत करण्यात आला.

थोर समाजसेवक बाबा आमटे आणि  साधनाताई यांनी स्थापन केलेली ही संस्था गेली 75 वर्षे सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून कुष्ठरुग्णांचे उपचारपुनर्वसनाच्या माध्यमातून त्यांची सेवा करत आहे. संस्थेतर्फे ग्रामीण भागांतील प्रकल्पांत पुनर्वसित दीड हजार कुष्ठरोग मुक्त दिव्यांग-निराधार ,वृद्धअनाथपरित्यक्तामानसिकदृष्ट्या अपंग बांधवांची आणि त्यांच्या मुलांची काळजी घेतली जाते. विशेष शाळा आणि व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रात निवासी तीनशे दिव्यांग विद्यार्थी-प्रशिक्षणार्थींना शिक्षण-प्रशिक्षण दिले जाते.  आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अनिवासी विज्ञानकलावाणिज्य शाखेच्या साडेतीन हजार  विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या शिक्षणाची सोयही संस्थेमार्फत केली जात आहे. संस्थेच्या या सामाजिक बांधलकी आणि सेवाकार्याची दखल घेत उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी राज्य शासनाकडून देय  3 कोटी 8 लाख रुपयांचा निधी संस्थेस तत्काळ वितरीत केला आहे.

-----०००००-----

दिलखुलास' कार्यक्रमात मृदा शास्त्रज्ञ डॉ संग्राम काळे यांची मुलाखत

 दिलखुलासकार्यक्रमात मृदा शास्त्रज्ञ डॉ संग्राम काळे यांची मुलाखत

 

मुंबईदि. 14 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासकार्यक्रमात 'मृदेचे जतन आणि संवर्धनया विषयावर सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथील कृषी संशोधन केंद्राचे मृदा शास्त्रज्ञ डॉ. संग्राम काळे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

            जमीन हा मर्यादित स्वरुपाचा नैसर्गिक स्त्रोत असून जमिनीचे आरोग्य सुस्थितीत ठेवणे ही काळाची गरज आहे. मातीच्या आरोग्याचा दर्जामातीच्या संरक्षणासाठी उपयुक्त असणारी सेंद्रिय शेतीएकात्मिक शेतीसंवर्धित शेतीमाती परीक्षणआधुनिक शेतीचा मातीच्या गुणवत्तेवर होणारा परिणाममातीतील सेंद्रिय घटकांचे महत्त्व आणि ते टिकवण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने मातीची धूपकाँक्रीटीकरणमृदा संवर्धनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहनमृदेचं आरोग्य टिकविण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची भूमिकामातीतल्या सूक्ष्मजीवांची भूमिकाहवामान बदलाचा मृदा गुणवत्तेवर होणारा परिणामखतांचे व्यवस्थापन अशा महत्वपूर्ण विषयांवर मृदा शास्त्रज्ञ डॉ. काळे यांनी 'दिलखुलासकार्यक्रमात माहिती दिली आहे.

दिलखुलास कार्यक्रमातून ही मुलाखत बुधवार दि.15गुरूवार दि.16शुक्रवार दि. 17 आणि शनिवार दि.18 जानेवारी 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. कोल्हापूरच्या माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

0000

वाई, खंडाळा महाबळेश्वर मधील प्रलंबित कामे मार्गी लावा

 वाई, खंडाळा महाबळेश्वर मधील प्रलंबित कामे मार्गी लावा


- मंत्री मकरंद जाधव-पाटील


 


मुंबई, दि. १४ :- वाई, खंडाळा, महाबळेश्वर मधील जलसंपदा विभागाकडील प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना मदत व पूनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिल्या. पुणे येथे कृष्णा खोरे विकास महामंडळ, कार्यालयात झालेल्या बैठकीत मदत व पूनर्वसन मंत्री श्री. पाटील यांनी सूचना दिल्या.


या बैठकीस कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता ह. वि. गुणाले व ह. तु. धुमाळ, उपविभागीय अधिकारी श्री. कचरे यांच्यासह जलसंपदा विभागाचे सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.


मदत व पुनर्वसन मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कवठे-केंजळ उपसा सिंचन योजना, जांभळी बंधाऱ्याची उंची वाढविणे, जललक्ष्मी योजना-आकोशी पाणी पुरवठा योजना, देवघर उपसा सिंचन योजना, बळकवडी-देवघर योजनेतून खंडाळा तालुक्यातील वंचित १४ गावांना पाणी उपलब्ध करुन देणे आणि नागेवाडी धरणामध्ये भूसंपादन झालेल्या जमिनीचा मोबदला याबाबत सविस्तर आढावा घेण्यात

 आला.


एसटी कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘एसटी’च्या जागेवर २५ तर बोरिवलीत १०० खाटांचे रूग्णालय उभारणार

 एसटी कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘एसटी’च्या जागेवर २५ तर

बोरिवलीत १०० खाटांचे रूग्णालय उभारणार

राज्यातील अनेक बसस्थानके बांधावापरा आणि हस्तांतरित कराया तत्वावर विकसित करण्यात येत आहेत. एस. टी. कर्मचाऱ्यांसाठी या ‘एस. टी.’च्या प्रकल्पात प्रत्येक जिल्ह्यात २५ तर मुंबईतील बोरिवली येथील जागेवर १०० खाटांचे रूग्णालय सुरू करण्यात येणार आहे. या रूग्णालयात एस. टी. कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार करण्यात येतीलतसेच पाच लाखांपर्यंतच्या शस्त्रक्रियांचा खर्च राज्यशासन करेलअसेही परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांनी सांगितले.

सध्या राज्यभरात विविध ठिकाणी बांधा - वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर ‘एसटी’च्या जागांचा विकास केला जात आहे. भविष्यात या रुग्णालयांमध्ये ‘एसटी’ कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा पुरवण्यात येतील. पुणेकोल्हापूरपुसदवाशिम येथे रूग्णालय उभारण्यासंदर्भातील सादरीकरण करण्यात आले. 


खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना एकाच नियमावलीअंतर्गत आणणार

 खागी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना

एकाच नियमावलीअंतर्गत आणणार

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 

मुंबई दि. १४ ओलाउबेर व रॅपिडो सारख्या खागी प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व कंपन्यांना एकाच नियमावलीअंतर्गत आणणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. प्रवासी सुरक्षाकार पुलींगलायसन्सट्रॅफिक समस्या यासंदर्भातील पारदर्शक तक्रार यंत्रणा तातडीने तयार करण्याचे निर्देश परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांनी दिले.

राज्यातील खागी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना एकाच शासकीय नियमावलीअंतर्गत आणण्यासंदर्भात आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी परिवहनचे अपर मुख्य सचिव संजय सेठीपरिवहन आयुक्त विवेक भीमनवारएसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह प्रवासी वाहतूक पुरवठादार कंपनीचे प्रतिनिधी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

विविध पॅनेल चर्चा : कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढाजानेवारीला राष्ट्रीय स्टार्टअप दिन घोषित केला आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाज माध्यमांवरही

 दिवसभरात होणार विविध पॅनेल चर्चा : कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

         कौशल्य विकास मंत्री श्री. मंगल प्रभात लोढा म्हणाले कीदिवसभरात होणाऱ्या पॅनेल चर्चांमध्ये गुंतवणूकदारांच्या गरजा आणि युवा उद्योजकांच्या यशकथा यावर विशेष सत्रे आयोजित केली जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 जानेवारीला राष्ट्रीय स्टार्टअप दिन घोषित केला आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाज माध्यमांवरही कार्यक्रम थेट प्रक्षेपित केला जाणार आहे.

एक दिवसीय कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील, कौशल्य विकास आयुक्त प्रदीपकुमार डांगे यांनी केले आहे.               

Featured post

Lakshvedhi