Tuesday, 14 January 2025

राष्ट्रीय स्टार्टअप दिवसाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १६ जानेवारीला उद्घाटन देशभरातून एक हजार स्टार्टअप्सचा सहभाग

 राष्ट्रीय स्टार्टअप दिवसाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते


१६ जानेवारीला उद्घाटन


देशभरातून एक हजार स्टार्टअप्सचा सहभाग


- कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा


  मुंबई, दि. 14 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत राज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने एम्पॉवरींग इनोव्हेशन, एलिव्हेटिंग महाराष्ट्र (Empowering Innovation, Elevating Maharashtra) या संकल्पनेवर आधारित ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये १६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे. महाराष्ट्रासह देशभरातील तंत्रज्ञान, कृषी, सेवा क्षेत्र, औषधनिर्माण तसेच पर्यटन अशा विविध क्षेत्रांतील १००० स्टार्टअप या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.


         या कार्यक्रमास मेरीको लिमिटेडचे अध्यक्ष हर्ष मारीवाला, अपग्रेड अँड स्वदेस फाउंडेशनचे सह संस्थापक रॉनी स्क्रूवाला, नायकाच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी फाल्गुनी नायर,व्हेंचर कॅपिटल अँड स्टार्ट अप्स गुगलचे जागतिक प्रमुख अपूर्वा चमरिया, स्थानिक सरकार आणि शिक्षण AWS चे प्रमुख, राज्य अजय कौल, ईव्ही कॅप वेंचर्सचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय पार्टनर विक्रम गुप्ता,अवेंडसचे सह-संस्थापक आणि कार्यकारी उपाध्यक्ष राणू वोहरा, इनक्युबेशन MGB इनोव्हेशन फाउंडेशन पार्टनर अध्यक्ष JITO जिनेंद्र भंडारी,व्हेंचर कॅटालिस्ट अँड नाईन युनिकॉर्नचे सह-संस्थापक अपूर्व रंजन शर्मा, ब्लू स्मार्टचे सह-संस्थापक पुनीत गोयल,रेनट्री फाउंडेशनच्या संस्थापक आणि संचालिका लीना दांडेकर, ओपन सीक्रेटच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अहाना गौतम, चलो मोबिलिटीच्या सह संस्थापक आणि संचालक प्रिया सिंग, जिओ जेन नेक्स्टच्या प्रमुख अमेय माशेलकर, सुपर बॉटम्सच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी उतगी, अस्थिरोग तज्ज्ञ आणि कलाकार सलोनी पटवर्धन इ. मान्यवर उपस्थित राहुन आपल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण करणार आहेत.

मकर संक्रांती हा एक महत्त्वाचा

 *✨🌟मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा✨🌟*


*मकर संक्रांती हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे, जो प्रत्येक वर्षी १४ जानेवारीला साजरा केला जातो. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या सणाला मकर संक्रांती असे म्हणतात. मकर संक्रांती सूर्याचा उत्तरायणात प्रवेश होणारा दिवस आहे, जे दर्शवते की सूर्य दक्षिणायणातून उत्तरायणात जात आहे, जे एक शुभ संकेत मानले जाते.*


*मकर संक्रांतीच्या महत्त्वपूर्ण पैलूंवर नजर:*


*1. धार्मिक महत्त्व:*:मकर संक्रांतीला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व दिले जाते. हे उत्तरायण सुरू होण्याचा दिवस असतो, जो हिंदू मान्यतेनुसार शुभ आणि पवित्र मानला जातो. या दिवशी भक्त सूर्य देवतेची पूजा करतात.



*2. खाद्यपदार्थ:* या दिवशी तिळगुळ किंवा तिळाचे पदार्थ खाल्ले जातात, कारण तिळ गोड आणि उबदार असतो, जो थंड हवेतील थोड्या गरमीसाठी लाभकारी मानला जातो. तसेच तिळ गुड असं म्हणून गोड पदार्थांचा आदानप्रदान केला जातो.



*3. कृषी महत्त्व:* मकर संक्रांती कृषी सण म्हणूनही ओळखला जातो. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना हंगामाची सुरूवात होते आणि त्यांना त्यांच्या शेतमालाचे यशस्वी उत्पादन मिळावे म्हणून या दिवशी पूजा केली जाते.



*4. सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व:* मकर संक्रांती समाजातील एकजुटीचा आणि प्रेमाचा संदेश देणारा सण आहे. लोक एकमेकांना तिळगुळ देतात आणि "तिळगुळ घ्या, गोड गोड बोला" असे सांगतात.



*5. विशेष सण:* विविध राज्यांमध्ये मकर संक्रांती विविध प्रकारे साजरी केली जाते:


महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये तिळगुळ आणि पतंग उडवणे ही प्रमुख परंपरा आहे.


उत्तर भारतात, विशेषत: पंजाबमध्ये, लोहडी सण साजरा केला जातो.


दक्षिण भारतात, खासकरून तमिळनाडूमध्ये, पोंगल हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.


मकर संक्रांती हा एक आनंदाचा सण आहे जो फक्त धार्मिकदृष्ट्या नाही, तर सामाजिक आणि सांस्कृतिक दृषटिकोनातूनही खूप महत्त्वाचा आहे.


*माहिती आवडली तर इतर ग्रुप वर शेअर करा📲आणि आरोग्य विषयक नवनवीन माहिती साठी ग्रुप जॉइन करा*


🌹🌺🌺🌺🙏🌺🌺🌺🌺🌹

*✨🌟मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा✨🌟*


*मकर संक्रांती हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे, जो प्रत्येक वर्षी १४ जानेवारीला साजरा केला जातो. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या सणाला मकर संक्रांती असे म्हणतात. मकर संक्रांती सूर्याचा उत्तरायणात प्रवेश होणारा दिवस आहे, जे दर्शवते की सूर्य दक्षिणायणातून उत्तरायणात जात आहे, जे एक शुभ संकेत मानले जाते.*


*मकर संक्रांतीच्या महत्त्वपूर्ण पैलूंवर नजर:*


*1. धार्मिक महत्त्व:*:मकर संक्रांतीला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व दिले जाते. हे उत्तरायण सुरू होण्याचा दिवस असतो, जो हिंदू मान्यतेनुसार शुभ आणि पवित्र मानला जातो. या दिवशी भक्त सूर्य देवतेची पूजा करतात.



*2. खाद्यपदार्थ:* या दिवशी तिळगुळ किंवा तिळाचे पदार्थ खाल्ले जातात, कारण तिळ गोड आणि उबदार असतो, जो थंड हवेतील थोड्या गरमीसाठी लाभकारी मानला जातो. तसेच तिळ गुड असं म्हणून गोड पदार्थांचा आदानप्रदान केला जातो.



*3. कृषी महत्त्व:* मकर संक्रांती कृषी सण म्हणूनही ओळखला जातो. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना हंगामाची सुरूवात होते आणि त्यांना त्यांच्या शेतमालाचे यशस्वी उत्पादन मिळावे म्हणून या दिवशी पूजा केली जाते.



*4. सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व:* मकर संक्रांती समाजातील एकजुटीचा आणि प्रेमाचा संदेश देणारा सण आहे. लोक एकमेकांना तिळगुळ देतात आणि "तिळगुळ घ्या, गोड गोड बोला" असे सांगतात.



*5. विशेष सण:* विविध राज्यांमध्ये मकर संक्रांती विविध प्रकारे साजरी केली जाते:


महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये तिळगुळ आणि पतंग उडवणे ही प्रमुख परंपरा आहे.


उत्तर भारतात, विशेषत: पंजाबमध्ये, लोहडी सण साजरा केला जातो.


दक्षिण भारतात, खासकरून तमिळनाडूमध्ये, पोंगल हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.


मकर संक्रांती हा एक आनंदाचा सण आहे जो फक्त धार्मिकदृष्ट्या नाही, तर सामाजिक आणि सांस्कृतिक दृषटिकोनातूनही खूप महत्त्वाचा आहे.

 हिंदू एज्युकेशन सोसायटी व भोसला मिलिटरी स्कूल संचलीत  ओंकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे


रक्त तपासणी (लिपिड प्रोफाइलअनोख्या पद्धतीने समजावून सांगणारी एक सुंदर गोष्ट येथे आहे.

 *रक्त तपासणी (लिपिड प्रोफाइल)*


रक्त तपासणी केल्यानंतर जी लिपिड प्रोफाइल रिपोर्ट येते, तिचा अर्थ एका अनोख्या पद्धतीने समजावून सांगणारी एक सुंदर गोष्ट येथे आहे.


रक्त तपासणीमध्ये जे कोलेस्ट्रॉल (Cholesterol), ट्रायग्लिसराइड (Triglycerides), HDL, आणि LDL असतात, ते काय आहेत?


कल्पना करा की आपले शरीर हे एक छोटेसे शहर (City) आहे. या शहरातील मुख्य गुन्हेगार म्हणजे कोलेस्ट्रॉल (Cholesterol) आहे.


त्याचे काही साथीदारही आहेत, जे गुन्हेगारीत भाग घेतात. यातील मुख्य साथीदार म्हणजे ट्रायग्लिसराइड (Triglycerides). त्यांचे काम म्हणजे रस्त्यावर फिरणे, गोंधळ निर्माण करणे, आणि रस्ते अडवणे (Block).


आपले ❤️हृदय हे या शहराचे “सिटी सेंटर” आहे. सगळे रस्ते “हृदय” पर्यंत जातात. जेव्हा गुन्हेगार (कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड) यांची संख्या वाढते, तेव्हा काय होते? ते हृदयाच्या कामकाजात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतात.


पण आपल्या शरीररूपी शहरात एक पोलिस दलसुद्धा आहे, ज्याला HDL म्हणतात. HDL हा एक चांगला पोलीस आहे, जो गुन्हेगारांना पकडतो आणि त्यांना तुरुंगात म्हणजेच यकृतात (Liver) पाठवतो. यकृत नंतर त्या गुन्हेगारांना पेशींच्या माध्यमातून शरीराबाहेर टाकतो.


मात्र, एक वाईट पोलीसही आहे, ज्याला LDL म्हणतात. तो सत्तेचा हव्यास धरून उलट गुन्हेगारांना तुरुंगातून सोडवतो आणि त्यांना परत रस्त्यावर आणतो.


जेव्हा चांगल्या पोलीस “HDL” ची संख्या कमी होते, तेव्हा गुन्हेगार कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड, आणि LDL मोकाट सुटतात, ज्यामुळे आपले “हृदयाचे शहर” अस्थिर होते. अशा शहरात राहायला कोणाला आवडेल?


❓गुन्हेगारांना कमी करायचे आहे आणि चांगले पोलीस (HDL) वाढवायचे आहेत का?


   *🚶🏼‍♀️चालणे सुरू करा*  

        *🚶🏻‍♂️खूप चालावे*  

  *🚶🏻जितके शक्य आहे तितके चालावे*  


प्रत्येक पावलाबरोबर, चांगल्या पोलिसांची (HDL) संख्या वाढेल, आणि समस्या निर्माण करणारे (कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड आणि LDL) कमी होतील.

चालण्याने तुमचे शरीररूपी शहर नवचैतन्य प्राप्त करेल. तुमच्या हृदयाचे सिटी सेंटर गुन्हेगारांपासून (हार्ट ब्लॉक) सुरक्षित राहील. आणि तुमचे हृदय निरोगी राहील तर तुम्हीही निरोगी रहाल.


म्हणून, जेव्हा शक्य होईल तेव्हा चालायला सुरुवात करा! 

*चला तर चाला ….*

आपल्याकडे जे आहे त्याबद्दल आभार मानण्याची सवय लावा. धन्यवाद दिल्याने केवळ समाधानच नव्हे तर जीवनातील प्रत्येक चांगल्या गोष्टींना वाढवते.


माझ्या सर्व मित्र-परिवाराने सुखी रहावे, निरोगी रहावे आणि दीर्घायुष्य लाभावे.

ह्या दुकानाचे अस्तित्व मला देखिल......

 ह्या दुकानाचे अस्तित्व मला देखिल माहित नव्हते . आता पुढील ट्रिपला भेट देऊ ! पण एक गोष्ट मात्र नक्कीच की ह्याची प्रसिध्दी झाली पाहिजे .


Monday, 13 January 2025

आर्टीच्या प्रशिक्षणाला तरुणाईचा उत्स्फुर्त प्रतिसाद उमेदवारांची नोंदणी प्रक्रिया सुरळीत होणार

 आर्टीच्या प्रशिक्षणाला तरुणाईचा उत्स्फुर्त प्रतिसाद

उमेदवारांची नोंदणी प्रक्रिया सुरळीत होणार

- व्यवस्थापकीय संचालक सुनिल वारे

 

मुंबईदि. १३ : मातंग आणि त्यातील तत्सम जातींच्या उन्नतीकरिता आर्टीकडून कौशल्य प्रशिक्षणस्पर्धा पूर्व प्रशिक्षणविविध योजना राबवण्यात येत आहेत. त्याकरिता इच्छुक उमेदवारांनी आपल्या आवडीनुसार स्पर्धा परीक्षाकौशल्य प्रशिक्षणाचे गुगल फॉर्म भरण्याचे आवाहन आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनिल वारे यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला तरूणाईने उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे.

समाजातील शेवटच्या घटकापर्यंत गुगल लिंक शेअर करण्यात आली. त्यामुळे मातंग समाजातील हजारो तरुणांनी एकाच वेळी फॉर्म भरण्यास सुरुवात केल्यामुळे गुगल फॉर्म लोड घेऊन हँग होत असल्याच्या अडचणी नागरीकांनी व्यक्त केल्या आहेत. भविष्यात अनेक उमेदवारांनी एकाचवेळी ऑनलाईन नोंदणी केली तरी अडचण येऊ नये यासाठी नोंदणी फॉर्मवर तांत्रिक विभागाचे काम सुरु आहे. लवकरच उमेदवारांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरळीत होईल असे आर्टी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक श्री. वारे यांनी सांगितले.

ऑनर किलिंग रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘सुरक्षागृह’या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करावी

 ऑनर किलिंग रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सुरक्षागृहया निर्णयाची

प्रभावी अंमलबजावणी करावी

- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

 

मुंबईदि. 13 : आंतरजातीय आणि आंतरधर्मीय जोडप्यांना लग्नानंतर सुरुवातीच्या काळात सुरक्षित निवारा महत्वाचा असतो. आंतरजातीयआंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अनेकदा गंभीर होत असून अशा प्रकरणात बेदम मारहाण ते खुनापर्यंतच्या घटना घडतात.  ऑनर किलिंग रोखण्यासाठी राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात सुरक्षागृह’ सुविधेचा निर्णय घेतला आहे. यांची प्रभावी अंमलबजावणी करावीअसे निर्देश विधानपरिषदेचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

आज लातूरसंभाजीनगरकोल्हापूर येथे झालेल्या ऑनर किलिंगच्या घटनाबाबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली या घटनांचा आढावा घेण्यात आला.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, "राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सुरक्षा गृह (सेफ हाऊस) निर्णयाची अंमलबजावणी करावी आणि याबाबतचा सविस्तर अहवाल दि. 30 जानेवारी 2025 पर्यंत  सादर करावा. ऑनर किलिंग च्या घटनेमधील पीडित मुलींचे समुपदेशन व्हावे तसेच मनोधैर्य योजनेतून पीडित महिलेला काही मदत म्हणून लाभ देता येईल का पहावेत्यामुळे अशा मुलींना मदत होईल. तसेचया पीडित महिलांना सक्षम करण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत त्यांना प्रशिक्षण देऊन रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी आराखडा तयार करावा, अशा सूचनाही यावेळी दिल्या.

 आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांची सामाजिक मानहानीकौटुंबिक त्रास आणि ऑनर किलिंगपासून संरक्षण कण्यासाठी अॅट्रॉसिटीच्या धर्तीवर आंतरजातीय विवाह कायद्याची निर्मिती  करण्यासाठी समिती गठीत केली होती या समितीचे पुनर्गठन करावे.

आपत्कालीन परिस्थितीत महिलांना त्वरित मदत मिळावी यासाठी सुरू करण्यात आलेल्या महिला सुरक्षेसाठीच्या हेल्पलाइन आणि विविध समित्यांची राज्यस्तरीय प्रचार प्रसिद्धी करावीज्यामुळे महिलांना सुरक्षितता आणि कायदेशीर मदत वेळेत उपलब्ध होईल आणि या महिलांना कायदेशीर संरक्षण मिळेल," असेही डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.

त्याचबरोबरआंतरजातीयआंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या काही तक्रार प्राप्त झाल्यास अप्पर पोलीस अधीक्षक दर्जाच्या आधिकाऱ्याने त्याचा तपास करून अहवाल सादर करावा. पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने तक्रार दाखल करून पुढील कार्यवाही करावी आणि अशा जोडप्यांच्या संरक्षणाकरिता विशेष कक्ष आरक्षित करावेत किंवा वसतीगृह द्यावेअशा सूचनाही उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केल्या.

यावेळीबैठकीला सामाजिक न्याय आयुक्त ओमप्रकाश बकोरियामहिला व बालविकास आयुक्त राहुल मोरेसंभाजीनगर विभागीय आयुक्त दिलीप गावडेसंभाजीनगर पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित कोल्हापूर, लातूर निवासी जिल्हाधिकारी संगीता टकलेसोमय मुंडेपोलीस आयुक्त, आयुक्तालय पुणे संबंधित अधिकारी  ऑनलाइन उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi