Saturday, 4 January 2025

धान-भरडधान्य खरेदीसाठी शासकीय पोर्टलवर नोंदणी करण्यास 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

 धान-भरडधान्य खरेदीसाठी शासकीय पोर्टलवर

नोंदणी करण्यास 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

 

मुंबई, दि. 1 शासकीय खरेदी केंद्रावर धान/भरडधान्य विक्रीसाठी शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्याकरिता 31 डिसेंबरपर्यंतची मुदत होती. मात्र अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित असल्याने विविध लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार शासनाने नोंदणीसाठी 15 जानेवारी 2025 पर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री  धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी महाराष्ट्र राज्य को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून धान/ भरडधान्य खरेदी केले जाते. त्यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे.

खरीप पणन हंगाम 2024-25 मध्ये शेतकरी नोंदणीकरिता 31 डिसेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत होती. मात्र अनेक भागातील शेतकरी नोंदणीपासून वंचित असल्याने शासनाने नोंदणीसाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी अर्थ व नियोजन विभागाचे राज्यमंत्री ड. आशिष जयस्वालमाजी मंत्री सुधीर मुनगंटीवारमदार राजू कारेमोरे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींनी केली होती. या मागणीस अनुसरून शेतकरी नोंदणीची मुदत 15 जानेवारी 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. याबाबत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या उपसचिव राजश्री सारंग यांनी महाराष्ट्र राज्य कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन आणि महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळासह संबंधित एजन्सी यांना याबाबत कळवले आहे.

ही मुदतवाढ अंतिम असून विहित मुदतीत शेतकऱ्यांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावीअसे आवाहन श्री. मुंडे यांनी केले आहे.

संतांनी जनतेमध्ये निरपेक्षपणे जनजागृती केल्यामुळे भारतीय संस्कृती जिवंत राहीली

 संतांनी जनतेमध्ये निरपेक्षपणे जनजागृती केल्यामुळे

 भारतीय संस्कृती जिवंत राहीली

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संत कृतज्ञता संवाद कार्यक्रमात उपस्थित राहून संतधर्माचार्य आणि

कीर्तनकारांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले आशीर्वाद

पुणे,दि.03 :- भारतीय संस्कृती जगातील सर्वात प्राचीन संस्कृती असून संतांनी जनतेमध्ये निरपेक्षपणे जनजागृती केल्यामुळे भारतीय संस्कृती जिवंत राहीली आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

            श्रीक्षेत्र आळंदी येथे वेदश्री तपोवन परिसरात आयोजित करण्यात आलेल्या संत कृतज्ञता संवाद कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहून संतधर्माचार्य आणि कीर्तनकारांचे आशीर्वाद घेतले. त्यावेळी ते बोलत होते. विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदेपर्यावरणीय व वातावरणीय बदल,  पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेआ.उमा खापरेआ.महेश लांडगेआ.शंकर जगतापआ.अमीत गोरखेआचार्य स्वामी गोविन्ददेव गिरी महाराजहभप ब्रम्हगीरी मारोती महाराज कुसेकरभास्करगिरी महाराजजगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरेश्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकरमारुती महाराज कुरेकर  यावेळी उपस्थित होते.

            श्री.फडणवीस म्हणालेभारतीय सभ्यता ही जगातली सर्वात प्राचीन सभ्यता आहे. पाच हजार वर्षापूर्वीच्या सिंधू संस्कृतीमधील आजही सापडत असलेले अवशेष पूर्णपणे विकसीत आहेत. संतांनी आणि धर्माचार्यानी जनतेमध्ये निरपेक्षपणे जनजागृती केल्यामुळे ही संस्कृती जिवंत राहीली. पथभ्रष्ट झालेल्या राजसत्तेला संतांच्या विचारांनी हटविल्यामुळे आपल्या संस्कृतीला कुणीही संपवू शकले नाही. 

आपला देश प्रगती करतानाच बलशाली होतोयहे सहन न झाल्यामुळे देशातील आणि विदेशातील विघातक शक्तींनी एकत्र येऊन एक प्रकारचे षडयंत्र रचून देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र संतांनी समाजामध्ये जागरुकता निर्माण करुन हे प्रयत्न हाणून पाडले. भारताची संस्कृती आणि विचार जेव्हा कमकूवत झाले त्या-त्यावेळी आपण गुलामगिरीत गेलो. येथील संतानी समाज जागृत केला आणि एकसंघ समाज निर्माण केला आणि दिग्वीजयी भारत आपल्याला पाहायला मिळाला.

            हिंदू जीवन पध्दतीमध्ये निर्गुण निराकार आहेसगुण साकार आहे. प्रत्येकाची जीवन पध्दती वेगळी असूनही या जीवन पध्दतीमुळे भारत एकसंघ आहे.  पूज्य गोविन्ददेव गिरी महाराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी समाज जनजागृतीचे मोठे कार्य केले आहे. सर्व समाज एक आहेदेश एक आहे पासून ते वसुधैव कुटुंबकम विचार त्यांनी मांडला. त्यामुळे समाजामध्ये जागृती निर्माण झाली असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            गोमातेची सेवा ही केवळ धर्मकार्य नसून राष्ट्रकार्य आहे. गोसेवा आणि नदी स्वच्छतेसाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. शेतीतील अडचणी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी गोसेवेचे महत्व वाढले पाहिजे. तसेच ज्या प्रकारे गंगानदी स्वच्छ केली जात आहेत्याचप्रमाणे इंद्रायणीगोदावरीचंद्रभागा स्वच्छ वाहणाऱ्या नद्या बनवण्यासाठी येत्या काळात संपूर्ण क्षमतेने प्रयत्न केले जाईल. फेसाळलेल्या इंद्रायणीच्या पुनरुज्जीवनाचा संकल्प आम्ही पूर्ण करु असा विश्वास त्यांनी यावेळी व्यकत् केला.

 कार्यक्रमाला राज्याच्या विविध भागातून आलेले संतकिर्तनकारनागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

०००

गृहनिर्माण धोरणामध्ये परवडणाऱ्या, टिकाऊ व पर्यावरणपूरक घरांवर भर दिला जाणार गिरणी कामगारांसाठी 1 लाख घर बांधण्यात येणार ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्माण धोरण राबविणारे महाराष्ट्र पहिले राज्य म्हाडा, गृहनिर्माण विभागाच्या योजनांचा नागरिकांना सुलभपणे लाभ मिळावा

 गृहनिर्माण धोरणामध्ये परवडणाऱ्याटिकाऊ व पर्यावरणपूरक घरांवर भर दिला जाणार

गिरणी कामगारांसाठी 1 लाख घर बांधण्यात येणार

 

ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्माण धोरण राबविणारे महाराष्ट्र पहिले राज्य

 

म्हाडागृहनिर्माण विभागाच्या योजनांचा नागरिकांना सुलभपणे लाभ मिळावा

मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती द्यावी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

 

          मुंबईदि.३ : 'सर्वांसाठी घरेही महत्वाकांक्षी योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये परवडणाऱ्याटिकाऊ व पर्यावरणपूरक घरांवर भर द्यावा. याबाबत सविस्तर धोरण महिन्याभरात तयार करून नागरिकांना म्हाडा तसेच गृहनिर्माण विभागाच्या योजनांचा सहज सुलभपणे लाभ घेता यावा. त्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करावा. मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

राज्य शासनाच्या माध्यमातून गिरणी कामगारांसाठी सुमारे एक लाख घरे बांधण्यात येणार आहेत. मुंबईच्या विकासासाठी लवकरच क्लस्टरची योजना सुरू करण्यात येणार असून या योजनेच्या माध्यमातून मुंबईत लक्षावधी घरे उपलब्ध होतीलअसा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गृहनिर्माण विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी विविध योजनांचा आणि प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला.

या बैठकीस गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह,धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस्.व्ही.आर्. श्रीनिवासनगर विकास विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ताम्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वालमुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकरमुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकरमुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर तसेच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणालेज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्माण धोरण राबविणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरणार आहे. या धोरणानुसार विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहेनोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृहेकामगारांसाठी घरेभाडेतत्त्वावर घरकुलेपुनर्विकासइको फ्रेंडली घरकुलेनाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घरकुलांची निर्मिती करण्यात येणार आहे. राज्यात विविध गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून घरकुलांचे अनेक प्रकल्प राबवण्यात येत आहेत. मुंबईतील या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना गती द्यावी.

गिरणी कामगारांसाठी एक लाख घर बांधण्यात येणार असून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जे गिरणी कामगार त्यांच्या मूळ गावी स्थलांतरित झाले आहेत त्यांना त्यांच्या गावी घर देता येईल का याबाबत तपासणी करावी. तसेच गिरणी कामगार युनियन सोबत बैठकीचे आयोजन करावेअसे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.

            मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन व इतर पुनर्वसन रखडलेले प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला चालना देण्यात आली असून हे प्रकल्प पूर्ण करून झोपडपट्टीमुक्त मुंबई करण्याचे उद्दिष्ट आहे. एमएमआरडीए आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्या मार्फत माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर या झोपड्यांचा पुनर्विकास केला जात आहे. गृहनिर्माण विषयक माहितीसाठी केंद्रिकृतपारदर्शक आणि वेब आधारित राज्य गृहनिर्माण बाबत माहिती पोर्टल तयार करण्यात यावेधोकादायक इमारतीतील रहिवाशांसाठी ट्रान्झिट कॅम्प तयार करण्यात यावे त्याबाबत सविस्तर धोरण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.

यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पपत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पमोतीलाल नगर १,,व ३ वसाहतींचा पुनर्विकासकामाठीपुरा क्षेत्राचा म्हाडामार्फत पुनर्विकासपोलिसांसाठी घरेगिरणी कामगारांसाठी घरकुल योजनाजीटीबी नगर सोयम येथील पुनर्वसन प्रकल्पप्रधानमंत्री आवास योजना आदीबाबत आढावा घेतला.

या बैठकीत गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह यांनी सादरीकरणाद्वारे विभागाची माहिती दिली.

००००


 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘नो युवर आर्मी’ मेळाव्याचे उद्धाटन राष्ट्रीय सुरक्षिततेबाबत भारतीय सैन्यदल सक्षम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नो युवर आर्मी मेळाव्याचे उद्धाटन

राष्ट्रीय सुरक्षिततेबाबत भारतीय सैन्यदल सक्षम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

पुणेदि.  3 : भारत राष्ट्रीय सुरक्षिततेच्या अनुषंगाने अंतर्गत आणि बाह्यबाजूने मजबूत आहे;  भारतीय सेना जगातील उत्तम सेनेपैकी एक असून भूजल व वायू अशा कोणत्याही मार्गाने होणाऱ्या हल्ल्यास प्रतिकार करण्यास सैन्यदल सक्षम आहेअसे गौरवोउद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

 

'समर्थ भारत सक्षम सेनाया प्रेरक संकल्पनेअंतर्गत दक्षिण कमांडच्यावतीने रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब येथे आयोजित 'नो युवर आर्मीमेळाव्याच्या उद्धाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार प्रा. मेधा कुलकर्णीआमदार सुनील  कांबळेदक्षिण कमांडचे  आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल धीरज सेठपोलीस आयुक्त अमितेश कुमारपुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसलेजिल्हाधिकारी जितेंद्र डूडीराज्य राखीव पोलीस दलाच्या समादेशक आंचल दलालजिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले.कर्नल सतीश हंगेमाजी राज्य मंत्री दिलीप कांबळेमाजी आमदार विलास लांडे,आदी उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेया मेळाव्यात भारतीय सैन्यदलाच्या क्षमता आणि संरक्षण क्षेत्रात चाललेल्या स्टार्टअप आणि नवोन्मेषाचे सुरू असलेले प्रचंड काम पाहायला मिळत आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून नागरिकांना भारतीय सैनिकांशी संवाद साधता येणार आहेशिवाय युवकांना भारतीय सैन्यदलात भरती होण्याच्यादृष्टीने प्रेरणा मिळणार आहे. भारतात संरक्षण क्षेत्रात सुरक्षितेतच्यादृष्टीने निर्माण केलेल्या विविध अत्याधुनिक उपकरणांची माहिती देणारे प्रदर्शन आयोजित केल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी भारतीय सैन्यदलाचे यांनी अभिनंदन केले.

 

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केंद्रीय संचार ब्युरोच्यावतीने भारतीय सैन्याचे साहसशौर्याच्या क्षमतेचे दर्शन घडविणाऱ्या  छायाचित्रांचे बहुमाध्यम प्रदर्शनास भेट देवून माहिती जाणून घेतली. तसेच परिसरातील विविध संरक्षण विषयक अत्याधुनिक शस्त्रेरणगाडेउपकरणाची पाहणी करुन माहिती घेतली.

परिवहन महामंडळ नफ्यात आणण्यासाठी बृहत कृती आराखडा तयार करावा

 परिवहन महामंडळ नफ्यात आणण्यासाठी

बृहत कृती आराखडा तयार करावा

- परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ

 

मुंबईदि. ३ : राज्यातील बस स्थानकांवर प्रवाशांना दर्जेदार सुविधा देवून स्वच्छतेची कोटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी. महिला प्रवाशांसाठी प्रत्येक बसस्थानकावर स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात यावी. एस. टी महामंडळ नफ्यात राहण्यासाठी महामंडळाने बृहत कृती आराखडा तयार करावा. यासाठी परिवहन क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थावाहतूकदार यांच्या सूचना व अभिप्रायांचा अभ्यास करावाअशा सूचना परिवहनवैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिल्या. मंत्रालयात समिती सभागृहात आयोजित बैठकीत परिवहन विभागाचा आढावा राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी घेतला.

स्क्रॅपिंग धोरणानुसार जुन्या बसेस निकाली काढाव्यात. चालकांनी मद्यप्राशन करून बस चालविण्याच्या तक्रारी निर्दशनास आल्या. या पार्श्वभूमीवर वाहनचालकांची सातत्याने मद्य प्राशनासंदर्भात तपासणी करण्यात यावी. जेणेकरून प्रवाशांना सुरक्षित सेवा मिळेलअसेही राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यावेळी म्हणाल्या. 

राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्याराज्यातील परिवहन विभागाच्या कार्यालयांमध्ये परिवहन कार्यालयांमध्ये जप्त केलेल्या वाहनांची संख्या मोठी आहे. ही वाहने ठेवण्यासाठी स्वंतत्र जागातपासणी नाके असलेल्या जिल्ह्यांमध्ये तपासणी नाक्यांच्या जागा यासाठी उपयोगात आणण्याबाबत कार्यवाही करावी. रस्ता सुरक्षा सध्याचा ज्वलंत विषय आहे. अपघातांचे प्रमाण कमी करून यामध्ये होणारी जीवितहानी टाळण्यासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी.   

            बैठकीस परिवहन विभागाचे प्रधान सचिव संजय सेठीआयुक्त विवेक भिमनवारराज्य परिवहन महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माधव कुसेकरसहसचिव श्री. होळकरपरिवहन उपायुक्त श्री. कळसकरमहामंडळाचे वित्तीय सल्लागार व व्यवस्थापक गिरीश देशमुख आदी उपस्थित होते.

खाजगी बसेसना परवानगी देताना त्यामध्ये शहरातील प्रवासी चढ उतारबाबत अटी व शर्ती टाकण्याबाबत पडताळणी करावी. मोठ्या शहरांमध्ये बऱ्याच प्रमाणात खाजगी बसेस येतात. या बसेसच्या प्रवासी चढ उतार करणाऱ्या जागा बऱ्यापैकी शहरात असल्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. अनेक वेळा यामुळे अपघात होवून जीवित हानीच्या घटना घडतात. शहरात अशाप्रकारच्या खाजगी बसेस  प्रवासी चढ उतार करण्यासाठी धोरण तयार करावेअशा सूचनाही त्यांनी दिल्या.

            बैठकीत नवीन बस स्थानकांचे बांधकामप्रवासी करप्रवासी सवलतीआकृतीबंधनवीन बस खरेदी आदींचा आढावाही घेण्यात आला.

००००

खारफुटीचे शेत जमिनीवर होणारे अतिक्रमण थोपविण्यासाठी उपाय योजना शोधावी

 खारफुटीचे शेत जमिनीवर होणारे अतिक्रमण थोपविण्यासाठी उपाय योजना शोधावी

- खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले

 

मुंबईदि. ३ : खारफुटी जंगलांच्या जमीनीवर अतिक्रमण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होत आहे. हे अतिक्रमण थोपविण्यासाठी उपाययोजना शोधाव्यात अशा सूचना खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी दिल्या. मंत्रालयात आयोजित खारभूमी विकास विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

खारभूमी विकास मंत्री श्री गोगावले म्हणाले कीकोकणात जमीन धारण क्षेत्र कमी आहे. त्यातच या जमिनीवर खारफुटी जंगलांचे अतिक्रमण होत आहे. ही गंभीर समस्या आहे. हे अतिक्रमण थोपवले नाही तर भविष्यात कोकणातील शेतकरी मोठ्या अडचणीत येऊ शकतो. तसेच किनारपट्टीची शेत जमीन नाहीशी होण्याचा धोका आहे. सध्या पर्यावरण कायद्यामुळे खारफुटीची तोड होऊ शकत नाही. त्यामुळे पर्यावरण विभागाच्या समन्वयाने या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावाअशा सूचना मंत्री श्री. गोगावले यांनी दिल्या.

 बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरखारभूमी विकास मंडळाचे मुख्य अभियंता मिलिंद नाईकअधीक्षक अभियंता प्रशांत बोरसे यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

०००००

राज्य मध्यवर्ती ग्रंथालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम

  

राज्य मध्यवर्ती ग्रंथालयात

वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम

 

मुंबईदि.3 : उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने "वाचन संकल्प महाराष्ट्राचा" हा उपक्रम राज्यात दि.  1 ते 15 जानेवारी या कालावधीत विद्यार्थी आणि वाचकांसाठी राबविण्यात येत आहे. 

            या उपक्रमाचा शुभारंभ राज्याचे शिखर ग्रंथालय असलेल्या राज्य मध्यवर्ती ग्रंथालयमुंबई येथे  ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटनाने करण्यात आला. 

दि. 01 जानेवारी2025 रोजी नवीन वर्षाची सुरूवात राज्य मध्यवर्ती ग्रंथालयमुंबई येथील भव्य दिव्य वाचन कक्षात तसेच ग्रंथालयाच्या बाहेरील ऐतिहासिक पायऱ्यांवर बसून आपल्या आवडीच्या पुस्तकाच्या सामूहिक वाचनाने करण्यात आली.  

 या सामुहिक वाचन कार्यक्रमात ग्रंथालय संचालक अशोक गाडेकरग्रंथपाल शालिनी इंगोले,‍  लेखाधिकारी योगेश पिंपळे,  ग्रंथालय संचालनालय व राज्य मध्यवर्ती ग्रंथालयातील कर्मचारीविद्यार्थीआणि वाचक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

 संचालक श्री.गाडेकर यांनी  'मानवी जीवनाच्या विकासात वाचनाचे महत्वअधोरेखित करून  वाचन संस्‍कृती वाढविण्यास व बळकट करण्यास नवनवीन संकल्पना मांडल्या. विद्यार्थीकर्मचारी आणि वाचक यांना पुस्तक परिक्षण व कथन स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहनही केले.

 समूह वाचनाच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांना ग्रंथभेट देऊन प्रोत्साहन दिले. 

प्रास्ताविक शालिनी इंगोले यांनी तर सूत्रसंचालन सुजाता माहुलकर यांनी केले.

0000

Featured post

Lakshvedhi