Tuesday, 10 December 2024

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या गट-अ, गट-ब संवर्गाचा निकाल जाहीर

 वैद्यकीय शिक्षण विभागाच्या गट-अगट-ब संवर्गाचा निकाल जाहीर

 

मुंबई, दि. 10 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवावैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागगट-अ व गट-ब अशा एकूण सहा संवर्गाच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या त्यांचा निकाल प्रसिद्ध करण्यात आला असल्याचे आयोगाने कळविले आहे.

प्राध्यापकमनोविकृतीशास्त्र (Psychiatry), शासकीय वैद्यकीय महाविद्यालयवैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवागट-अ (धाराशिव), सहयोगी प्राध्यापकन्यायवैद्यकशास्त्र (Forensic Medicine), शासकीय वैद्यकीय महाविद्यालयवैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवागट-अ., सहयोगी प्राध्यापकन्यायवैद्यकशास्त्र (Forensic Medicine), शासकीय वैद्यकीय महाविद्यालयवैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवागट-अ (धाराशिव), सहयोगी प्राध्यापकनेत्रशल्यचिकित्साशास्त्र (Opthalmology), शासकीय वैद्यकीय महाविद्यालयवैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवागट-अ (नंदुरबार), सहयोगी प्राध्यापकप्रसुती शास्त्र व स्त्रीरोगशास्त्र (Obstetrics & Gynecology), शासकीय वैद्यकीय महाविद्यालयवैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवागट-अ (परभणी), सहायक प्राध्यापकआय.सी.सी.यु. औषधवैद्यकशास्त्र (I.C.C.U. General Medicine), शासकीय वैद्यकीय महाविद्यालयवैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट-ब (सातारा) या परिक्षांचा निकाल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

सहयोगी प्राध्यापक, शरीररचनाशास्त्र (Anatomy), वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव, गट-अ चार निकाल जाहीर

 सहयोगी प्राध्यापकशरीररचनाशास्त्र (Anatomy), वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा,

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयधाराशिवगट-अ चार निकाल जाहीर

सहयोगी प्राध्यापकशारीररचनाशास्त्र (Anatomy), वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवाशासकीय वैद्यकीय महाविद्यालयधाराशिवगट-अ  या पदाच्या मुलाखती दिनांक ०८ नोव्हेंबर२०२४ रोजी घेण्यात आल्या होत्या. प्रस्तुत संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०२२ च्या प्रतिक्षायादीच्या निकाल जाहीर

 महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०२२ च्या

प्रतिक्षायादीच्या निकाल जाहीर

महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०२२ चा अंतिम निकाल १० ऑक्टोबर२०२३ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. परीक्षेच्या अंतिम निकालानुसार प्रतिक्षायादीतून उमेदवार उपलब्ध करुन देण्याची शासनाने मागणी केली आहे. त्यानुसार अर्जातील दाव्यांच्या अनुषंगाने पदासाठीची पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून प्रतिक्षायादीतून गुणवत्तेनुसार उमेदवारांच्या शिफारशी शासनाकडे करण्यात येत आहेत.

प्रतिक्षायादीनुसार शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आला असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.


प्राध्यापक, क्षयरोगशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ चे निकाल जाहीर

 प्राध्यापकक्षयरोगशास्त्रशासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवागट-अ चे निकाल जाहीर

प्राध्यापकक्षयरोगशास्त्रशासकीय वैद्यकीय महाविद्यालयवैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवागट-अ  या पदाच्या मुलाखती दिनांक २७ नोव्हेंबर२०२४ रोजी घेण्यात आल्या होत्या. या संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

प्रत्येकाच्या हक्कांच्या रक्षणामुळे लोकशाही बळकट

 प्रत्येकाच्या हक्कांच्या रक्षणामुळे लोकशाही बळकट

 - राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

राजभवन येथे आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनानिमित्त कार्यक्रम

 

मुंबई, दि. 10 : लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या हक्कांचे रक्षण होणे गरजेचे आहे. आपण या तत्वाचे पालन करित असल्यानेच आपली लोकशाही बळकट असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले. शाळा आणि महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमांमध्ये मानवी हक्कांबाबतचे शिक्षण समाविष्ट करून युवकांमध्ये सहानुभूती आणि न्यायाची संस्कृती निर्माण करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे राज्य मानवी हक्क आयोगामार्फत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश नरेश पाटीलआयोगाचे अध्यक्ष न्या. के.के. तातेडआयोगाचे सदस्य एम. ए. सईदसंजय कुमार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन म्हणालेअल्पसंख्याकअनुसूचित जातीजमातीमहिलामुलेतृतीयपंथी आणि दिव्यांग व्यक्तींचे हक्क हे आपल्या मानवाधिकार अजेंड्याच्या अग्रस्थानी राहिले पाहिजेत. प्रत्येक गट समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान देतो आणि त्यांना समानतेचे आणि आदराचे वातावरण मिळणे आवश्यक आहे.

हवामान बदल व अन्य नैसर्गिक घटक हेदेखील शेतकऱ्यांसमोरील आव्हानांचे व्यापक स्वरूप असल्याचे राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी नमूद केले. शेतकऱ्यांसाठी समुपदेशन सेवा महत्त्वाचा टप्पा ठरू शकतोअसे त्यांनी सांगितले. मानवी हक्क आयोगाचे कार्य दुर्बल घटकांपर्यंत न्याय पोहोचविण्यात उपयुक्त ठरले असल्याचेही ते म्हणाले.

मानवी हक्क दिनाचा यावर्षीचा आपले हक्कआपले भविष्यआत्ता’ हा विषय अत्यंत दूरदृष्टीपूर्ण असून मानवाधिकारांच्या आव्हानांवर तज्ज्ञांच्या व्याख्यानांचे आयोजन केल्याबद्दल राज्यपालांनी आयोगाचे कौतुक केले. राज्य मानवी आयोग स्थापन झाल्यापासूनअशा असंख्य व्यक्ती आणि गटांसाठी तो आशेचा किरण ठरला असल्याचे सांगून राज्यभरातील व्यक्तींच्या सन्मान आणि हक्कांचे रक्षण करण्याचे राज्य मानवाधिकार आयोगाचे प्रयत्न प्रशंसनीय असल्याचेही राज्यपालांनी सांगितले.

प्रत्येक नागरिकाला आत्मसन्मानाने जगता येईल अशा संधी निर्माण करणेपर्यावरणाचे रक्षण करणेजागतिक हवामान बदलांना सामोरे जाणे याला आपण सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेलअसेही राज्यपाल राधाकृष्णन यांनी यावेळी नमूद केले.

मान्यवरांच्या हस्ते यावेळी आयोगाच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. न्या.तातेड यांनी प्रारंभी आयोगाच्या कार्याची माहिती दिली. तरन्या. पाटील यांनी प्रत्येकाने आपल्या हक्कांचे जतन करतानाच इतरांच्या हक्कांचीही जाणीव ठेवण्याचे आवाहन केले.

यावेळी बांधावरील प्रयोगशाळाआहार हेच औषधमहिला आणि मुलांची देह विक्रीबाबत जनजागृतीदिव्यांग आणि ज्येष्ठ नागरीक यांच्यासाठी कार्य करणाऱ्या संस्थांच्या माहितीवर तसेच आदिवासी भागातील समस्या आणि त्यांच्या हक्काबाबत जनजागृती करणारी दालने उभारण्यात आली होती, त्यांची राज्यपाल राधाकृष्णन यांनी पाहणी केली.

००००

एस एम कृष्णा यांच्या निधनामुळे राजकारणातील सुसंस्कृत, अभिरुचीसंपन्न व्यक्तिमत्व गमावले

  

राजकारणातून समाजहित जपणारा नेता गमावला

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांना

मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली

 

मुंबई, १० : ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सोमनहल्ली मैल्लया कृष्णा तथा एस.एम.कृष्णा यांच्या निधनानेआपल्या राजकारणातून समाजहित जपणारा आणि देशाच्या सेवेसाठी समर्पित भावनेने कार्यरत असलेले नेतृत्व आपण गमावले आहेअशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतातश्री. एस. एम. कृष्णा यांनी लोकहिताच्या कामासाठी पदे असतात हे ओळखून त्यांनी लोकांचे जीवन उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून काम करताना त्यांनी राज्याला मार्गदर्शन करण्याचे काम केले. विधानसभाविधानपरिषदलोकसभाराज्यसभा अशा सर्व सभागृहात काम करताना त्यांनीविधानसभा अध्यक्षमंत्रीउपमुख्यमंत्रीमुख्यमंत्रीकेंद्रीय मंत्रीराज्यपाल अशी सर्व पदे भूषविली. विद्यापीठ सुधारणा हे त्यांचे आवडीचे क्षेत्र होते. विशेषतः बंगळुरूचे माहिती आणि तंत्रज्ञान शहरात रूपांतर करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन 2023 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचे हे कार्य कायम स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना लाभोही ईश्वरचरणी प्रार्थना !

0000

 

वृत्त क्र. 267


एस एम कृष्णा यांच्या निधनामुळे राजकारणातील

सुसंस्कृतअभिरुचीसंपन्न व्यक्तिमत्व गमावले

- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

 

मुंबई, दि.10 : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी दुःख व्यक्त केले आहे.

एस एम कृष्णा हे कर्नाटक व देशाच्या राजकारणातील एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व होते. उच्च विद्याविभूषित असलेले एस एम कृष्णा एक अनुभवी संसदपटू होते. बॅरिस्टर नाथ पै यांच्या प्रजा समाजवादी पक्षातर्फे ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले होते. आपल्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत त्यांनी कर्नाटक विधानसभेचे अध्यक्षकर्नाटकचे मुख्यमंत्रीमहाराष्ट्राचे राज्यपाल व केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून उल्लेखनीय काम केले.

साहित्यटेनिस व शास्त्रीय संगीताची आवड असणाऱ्या एस. एम. कृष्णा यांनी राजभवन येथे शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांचे आयोजन केले. त्यांनी आपल्या कार्यकाळात राज्यपाल पदाची गरिमा जपली. त्यांच्या निधनामुळे राजकारणातील एक सुसंकृत व अभिरुचीसंपन्न व्यक्तिमत्व गमावले आहे.

या दुःखद प्रसंगी एस. एम. कृष्णा यांना श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना कळवतोअसे राज्यपाल राधाकृष्णन यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. 

०००००

 

"S M Krishna was a man of higher tastes": Governor C P Radhakrishnan

 

Mumbai 10 :  Maharashtra Governor C P Radhakrishnan has expressed grief over the demise of former Governor of Maharashtra and former Karnataka Chief Minister S. M. Krishna.

In a condolence message, Governor Radhakrishnan wrote:

"Former Governor of Maharashtra S M Krishna was a popular figure in the politics of Karnataka and the country. Starting his career as a Professor of Law, S M Krishna got elected to Parliament from the Praja Socialist Party of Barrister Nath Pai.

In his long political journey, Krishna held various positions such as the Speaker of Karnataka Legislative Assembly, Chief Minister of Karnataka, Governor of Maharashtra and Union Minister of External Affairs.  S M Krishna was a man of higher tastes who took keen interest in literature, tennis and classical music. He had organized classical music programs in Maharashtra Raj Bhavan. He upheld the dignity of the post of Governor. In his demise, we have lost an erudite and cultured leader. I pay homage to the memory of late S M Krishna and convey my heartfelt condolences to the members of the bereaved family."

0000

 



सीमा भागातील मराठी भाषिकांवरील अन्यायाचा मुख्यमंत्र्यांकडून निषेध सीमा भागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी राज्य शासन ठाम उभे

 सीमा भागातील मराठी भाषिकांवरील अन्यायाचा मुख्यमंत्र्यांकडून निषेध

सीमा भागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी राज्य शासन ठाम उभे

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. 9 :- कर्नाटक सरकारकडून बेळगावसह सीमा भागातील मराठी भाषिक जनतेवर सुरु असलेल्या अन्यायाचा आम्ही निषेध करतो. मराठी माणसांनी मेळावे घेऊ नयेतअशी कर्नाटक सरकारने घेतलेली भूमिका घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन करणारी आहे. तसेच कर्नाटक सरकारमधील एका मंत्र्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कर्नाटक विधानसभेतील प्रतिमा काढणार असल्याचे वक्तव्य केले, हे गंभीर असून या घटनेचा राज्य शासन निषेध करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केले. तसेच महाराष्ट्र विधानमंडळ सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी  ठामपणे उभे असून बेळगाव, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र होत नाही तोवर आमचा लढा सुरूच राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

            मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, राज्यातील 12 कोटी जनता आणि जगभरातील मराठी माणूस कर्नाटक सीमाभागातील मराठी माणसाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. सीमा भागातील मराठी भाषिकांसाठी  आम्ही शिक्षणआरोग्य सेवा उपलब्ध केल्या आहेत. यापुढे देखील सीमा भागातील मराठी भाषिकांचे  प्रश्न सोडवण्यासाठी आमचे सरकार तत्पर राहील.


Featured post

Lakshvedhi