Tuesday, 29 October 2024

महानगरपालिकेचे अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचारी निवडणूक कामात नाही

  

महानगरपालिकेचे अत्यावश्यक सेवेतील

अधिकारी, कर्मचारी निवडणूक कामात नाही

 

मुंबई, दि. 29 :- विधानसभा निवडणूक 2024 साठी विविध यंत्रणांकडील मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्यात आले असून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी यांचा त्यामध्ये समावेश नसल्याचे मुंबई उपनगर जिल्ह्याच्या निवडणूक शाखेने स्पष्ट केले आहे.

मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत येणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 15 प्रभागातील मनुष्यबळ मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी उपलब्ध करून घेण्यात आले असून यामधील बहुतेक कर्मचारी हे मतदान किंवा मतमोजणी दिवशीच कार्यरत असणार आहेत, असेही निवडणूक शाखेने कळविले आहे.

-----000-------


 

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ पुढे सरसावले सदिच्छादूत करणार मतदान करण्याचे आवाहन

 मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ पुढे सरसावले

सदिच्छादूत करणार मतदान करण्याचे आवाहन

            मुंबई दि. 29 : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावामतदान हक्काचे महत्व सांगण्यासाठी निवडणूक आयोगाच्यावतीने मतदारजागृतीचे विविध उपक्रम राबविले जात आहेत. मतदार जागृतीच्या या उपक्रमांना कलाक्रीडासाहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची सदिच्छादूत’ म्हणून साथ लाभली आहे. हे सदिच्छादूत मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन करणार आहेत.

            समाज माध्यमेमुद्रित माध्यमे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच जाहिरात फलकभित्तीपत्रकाद्वारे हे सदिच्छादूत लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. राज्यस्तरीय सदिच्छादूतांमध्ये पद्मभूषण अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकरसाहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिकअभिनेते प्रशांत दामलेअभिनेत्री मृणाल कुलकर्णीअभिनेत्री डॉ. निशिगंधा वाडअभिनेत्री उषा जाधवमहिला क्रिकेटपटू स्मृती मनधनासुवर्णपदक विजेती नेमबाज राही सरनोबतअर्जुन पुरस्कार सन्मानित महिला धावपटू ललिता बाबरअर्जुन पुरस्कार सन्मानित जलतरणपटू वीरधवल खाडेतृतीयपंथी कार्यकर्त्या श्रीगौरी सावंततृतीयपंथी प्रणीत हाटेतृतीयपंथी झैनब पटेलदिव्यांग कार्यकर्ता निलेश सिंगीतदिव्यांग कार्यकर्ती व साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखिका सोनाली नवांगुळ यांचा समावेश आहे.

००००

भारतीय जनता पार्टी विधानसभा उमेदवारांची यादी








 

श्री बालाजी मंदिर, अलिबाग. दीपोत्सव 🙏🏻🌹

 श्री बालाजी मंदिर, अलिबाग. दीपोत्सव 🙏🏻🌹


चुनाव के दौरान एक्झिट पोल घोषित करने पर प्रतिबंध

 चुनाव के दौरान एक्झिट पोल घोषित करने पर प्रतिबंध

 

मुंबईदि. 24 : राज्य के विधानसभा चुनाव के मद्देनजर मतदान अवधि में किसी भी प्रकार की एक्झिट पोल घोषित करने पर भारत चुनाव आयोग ने प्रतिबंध लगाया है। इसके अलावा मतदान समाप्ति के पहले यानि अडतालीस घंटे की अवधि में किसी भी प्रकार का ओपिनियन पोल घोषित करने पर भी प्रतिबंध लगाया है।   

     राज्य में 20 नवंबर 2024 को विधानसभा आम चुनाव एवं नांदेड लोकसभा निर्वाचन क्षेत्रों का उपचुनाव का भी मतदान हो रहा है। इसी के मद्देनजर भारत चुनाव आयोग द्वारा अधिसूचना के अनुसार 13 नवंबर 2024 को सुबह रोजी 7.00 से तारीख 20 नवंबर 2024 को श्याम 6.30 बजे तक विधानसभा के आम चुनाव और नांदेड लोकसभा निर्वाचन क्षेत्रों के उपचुनाव के संदर्भ में किसी भी प्रकार के एक्झिट पोल का परिणाम अखबारइलेक्ट्रॉनिक मीडिया अथवा अन्य किसी भी तरह से उसके अनुमान आयोजित करने और प्रकाशित करने तथा किंवा प्रसारित करने (एक्झिट पोल) पर प्रतिबंध लगाया गया है।       

साथ ही जनप्रतिनिधित्व कानून 1951 के तहत विधानसभा आम चुनाव और नांदेड लोकसभा निर्वाचन क्षेत्रों उपचुनाव के संदर्भ में मतदान की समाप्ति के लिए निश्चित की गई अवधि के 48 घंटों की अवधि में चुनाव से संबंधित विवरण दिखाने और किसी भी इलेक्ट्रॉनिक मीडिया में कोई भी ओपिनियन पोल अथवा चुनाव सर्वेक्षण अनुमान प्रदर्शित करने पर प्रतिबंध होगायह भारत चुनाव आयोग के जरिए स्पष्ट किया गया है।

0000

बी. जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धेचे आयोजन

 बी. जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धेचे आयोजन

 

मुंबईदि. २८ : भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र विभागीय शाखातर्फे आयोजित बी. जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सन २०२४- २०२५ या वर्षात निबंधस्पर्धेसाठी विकसित भारत- 'सन २०४७',(Viksit Bharat-India in 2047उपेक्षितांसाठी सार्वजनिक धोरण (Public Policy for the Marginalized)आणि शासन सेवेत कृत्रिम बुद्विमत्तेचा (AI) उपयोग(Use of Artificial Intelligence in Government) या विषयांवर निबंध सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

निबंध कोणत्याही एका विषयावर इंग्रजी किंवा मराठीतून सादर करावयाचा आहे. निबंध ३ हजार शब्दांपेक्षा कमी आणि ५ हजार शब्दांपेक्षा जास्त नसावानिबंध हा विषयाच्या अनुषंगाने विश्लेषणात्मकसंशोधनपर व पदव्युत्तर दर्जाचा असणे अपेक्षित आहे. निबंध कागदाच्या एकाच पृष्ठभागावर टंकलिखित करुन त्यावर केवळ टोपणनांव लिहून चार प्रतीत २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत सादर करावा.

स्पर्धकाने निबंधावर आपले नाव किंवा कोणत्याही प्रकारची ओळख नमूद करु नयेनिबंधाच्या प्रती व त्या सोबत वेगळ्या लिफाफ्यात स्पर्धकाचे नाव (मराठी व इंग्रजीतून)टोपणनावपत्तासंपर्क क्रमांक व ई-मेल अॅड्रेस नमूद करुन निबंधासोबत पाठवावे.

या स्पर्धेसाठी पहिले बक्षिस १० हजार रुपयेदुसरे बक्षिस ७ हजार ५०० रुपयेतिसरे बक्षीस ५ हजार रुपये, उत्तेजनार्थ बक्षिस दोन हजार रुपये देण्यात येणार आहेत.

संस्थेस प्राप्त झालेल्या निबंधाच्या प्रती परत करण्यात येणार नाहीत. निबंधाचे मूल्यमापन हे संस्थेच्या प्रादेशिक शाखेच्या परीक्षक मंडळाकडून करण्यात येईल. योग्य त्या गुणवत्तेचा निबंध नसल्यास स्पर्धकास बक्षीस न देण्याचा किंवा बक्षिसाची रक्कम कमी करण्याचा अधिकार संस्था राखून ठेवीत आहे. बक्षीस देण्याबाबत संस्थेचा निर्णय अंतिम राहील. संस्थेच्यावतीने यापूर्वी घेतलेल्या स्पर्धेत विजेता ठरलेला किंवा उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त स्पर्धक हा लगतची तीन वर्षे या स्पर्धेत भाग घेण्यास पात्र ठरणार नाही.

टोपणनांव लिहिलेल्या निबंधाच्या चार प्रती व त्यासोबत वेगळ्या लिफाफ्यात स्पर्धकाचे संपूर्ण नाव (इंग्रजी व मराठी)टोपणनावपत्ता व संपर्क क्रमांक व ई-मेल अॅड्रेस लिहिलेली माहिती एकत्रित एका मोठ्या लिफाफ्यामध्ये बंद करुन त्यावर 'बी. जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धा२०२४-२०२५असे नमूद करावे. हा लिफाफा 'मानद अध्यक्षभारतीय लोक प्रशासन संस्थामहाराष्ट्र विभागीय शाखातळ मजलाबँक ऑफ महाराष्ट्राच्या बाजूला, मादम कामा मार्गमंत्रालय, मुंबई- ४०००३२या पत्त्यावर दिनांक २८/२/२०२५ पर्यंत पाठवावा. माहितीसाठी कृपया दूरध्वनी क्रमांक (०२२) २२७९ ३४३० किंवा ईमेल: js.mrb-iipa@gov.in द्वारे संपर्क साधावा.

0000

२८८ मतदारसंघासाठी राज्यातून आजपर्यंत ३२५९ उमेदवारांचे

 २८८ मतदारसंघासाठी राज्यातून आजपर्यंत ३२५९ उमेदवारांचे

४४२६ नामनिर्देशन पत्र दाखल

मुंबईदि. २८ : महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ मतदारसंघासाठी निवडणुकीकरिता २८ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ३ हजार २५९ उमेदवारांचे ४ हजार ४२६ नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत अशी माहितीमुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता १५ ऑक्टोबर २०२४ पासून लागू झाली असून २२ ऑक्टोबर २०२४ रोजी निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली.  नामनिर्देशन पत्र भरणे सुरु असून मंगळवार, दि. २९ ऑक्टोबर ही नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. या अर्जांची ३० ऑक्टोबरला छाननी करण्यात येऊन ४ नोव्हेंबर २०२४ रोजी अर्ज मागे घेता येईल. मतदान २० नोव्हेंबरला होत असून २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.

Featured post

Lakshvedhi