सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Monday, 9 September 2024
Sunday, 8 September 2024
अष्टविनायक गणपती आणि त्यांची वैशिष्ट्ये -
-:♦:- अष्टविनायक गणपती आणि त्यांची वैशिष्ट्ये -:♦:-
|| गणपती म्हटलं की आपल्यासमोर अष्टविनायक उभा
|| राहतात. त्यातच सध्या गणेशोत्सवाचा काळ सुरु आहे.
|| आपल्याकडे मोठ्या भक्ती भावाने श्री ची पूजा केली जाते.
|| महाराष्ट्रात श्रीगणेशाची विविध प्राचीन मंदिरे असून
|| आपल्याकडे अष्टविनायक दर्शन मोठे भाग्याचे मानले
|| जाते. कोठे आहेत हे अष्टविनायक गणपती ? त्यांची
|| वैशिष्ट्ये काय आहेत ? त्याविषयी आज जाणून घेऊयात.
-:♦ मोरगावचा मयुरेश्वर :------------
|| अष्टविनायकातील पहिला गणपती म्हणून मोरगावचा
|| मयुरेश्वरचा उल्लेख होतो. डाव्या सोंडेची ही मूर्ती असून
|| उत्तराभिमूख आहे. उजवा गुडघा छातीजवळ घेऊन
|| बसलेल्या या श्रींच्या डाव्या हातात मोदक आहे. श्रींच्या
|| भालप्रदेशावर आणि नाभीमध्ये रत्न जडविलेले आहेत.
|| मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला रिद्धी-सिद्धी आहेत.
-:♦ सिद्धटेकचा सिद्धीविनायक :------------
|| भीमा नदीच्या काठावर श्रीसिद्धिविनायकाचे मंदिर
|| टेकडीवर उत्तराभिमूख असून त्यावर सुंदर कलाकूसर
|| केलेली आहे. मंदिराचा गाभारा बराच मोठा आहे.
|| श्रीसिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू असून ३ फूट उंच
|| व २.५ फूट लांबची आहे. मूर्ती उत्तराभिमूखी गजमुखी
|| आहे. अष्टविनायकातील उजवीकडे सोंड असलेली ही
|| मूर्ती आहे.
-:♦ पालीचा श्री बल्लाळेश्वर :------------
|| श्री बल्लाळेश्वर गणपती भक्ताच्या नावाने प्रसिद्ध आहे.
|| श्री बल्लाळेश्वराच्या अंगावर उपरणे व अंगरखा अशी वस्त्रे
|| आहेत. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे.
|| मंदिराची रचना देखील वैशिष्ट्यपूर्ण आहे.
|| मंदिर पूर्वाभिमुख आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून
|| डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे.
-:♦ महाडचा श्री वरदविनायक :------------
|| श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला
|| घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर
|| नागाची नक्षी आहे. दगडी महिरप मंदिरात सिंहासनारूढ
|| झालेल्या श्री वरदविनायकाची मूर्ती उजव्या सोंडेची आहे.
|| इ. स. १७७५ मध्ये पेशवाई काळात हे मंदिर बांधण्यात
|| आले आहे.
-:♦ थेऊरचा श्री चिंतामणी :------------
|| थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणेशाचे ठिकाण आहे.
|| भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी
|| म्हणतात. अतिशय प्राचिन क्षेत्र म्हणून हे प्रसिद्ध आहे.
-:♦ लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक :------------
|| जुन्नर लेण्यांच्या सहवासात कुकडी नदीच्या परिसरातील
|| डोंगरावर श्री गिरिजात्मक गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे.
|| श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली
|| आहे. मंदिर परिसरातील खडकामध्ये कोरीवकाम,
|| खोदकाम केलेले आहे. मंदिरात दगडी खांब आहेत व
|| त्यावर वाघ, सिंह, हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहे.
-:♦ ओझरचा विघ्नेश्र्वर :------------
|| अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री
|| विघ्नेश्र्वराची ओळख आहे. श्रींच्या डोळ्यात माणिक
|| असून, कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती
|| असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या
|| गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात.
-:♦ रांजणगावचा महागणपती :------------
|| पुणे-अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे
|| महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. महाराष्ट्रातील
|| अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे
|| "महागणपती" चे रूप आहे. श्री महागणपतीला कमळाचे
|| आसन आहे.
Saturday, 7 September 2024
वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना
राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
मुंबई, दि. 7 : गणेशोत्सवानिमित्त आज ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक श्री गणरायाची विधिवत पूजा करुन प्रतिष्ठापना केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला सुख समृद्धी मिळू दे अशी प्रार्थना केली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या पत्नी सौ. लता शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्नुषा सौ. वृषाली शिंदे, नातू कु. रुद्रांश यावेळी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, गणरायाचं आगमन झालंय. आपल्या आयुष्यात पण आनंद, समाधान, समृद्धी येवो, सर्वांना सुबुद्धी मिळो हीच प्रार्थना. प्रत्येक गणोशोत्सव एक नवी ऊर्जा, प्रेरणा आणि उत्साह घेऊन येतो. सगळीकडे मंगलमय आणि पवित्र वातावरण निर्माण होतं. गणेशोत्सवातून महाराष्ट्राच्या महान संस्कृतीचं दर्शन घडतं. सगळ्या जगाचं महाराष्ट्राकडे लक्ष लागलेले असते. या काळात महाराष्ट्राच्याच नाही तर देशात आणि विदेशातही मराठी माणसांत उत्साह-जोश दिसतो.
हे शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे सरकार आहे. यंदा राज्यात सगळीकडे खूप चांगला पाऊसही झाला आहे, त्यामुळं शेतकरी बांधवामध्येही उत्साह आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतीभातीचं नुकसान झालं आहे. या कालावधीत शेतकऱ्यांना धिर देण्यासाठी सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांना सर्वोतपरी मदत केली जाईल.
माझं आपणास आवाहन आहे की, श्री गणेशाची मनोभावे सेवा करतानाच, आपण सामाजिक बांधिलकची जाणीव ठेवूया. गरजू लोकांपर्यंत पोहचा. त्यांना मदतीचा हात द्या. त्यांच्यापर्यंत शिक्षण, आरोग्य तसेच अशा विविध प्रकारच्या सेवा, मदत पोहचवण्याचा प्रयत्न करूया. आपण पर्यावरणाची काळजी घेणं पण गरजेचं आहे. आपले सणवार हे निसर्गाला पूरक असे असतात. त्यामुळे निसर्गाचं जतन-संवर्धन होईल ही बाब लक्षात घेऊन सण साजरे करावेत असेही आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.
राज्य शासनाने अनेक चांगल्या लोककल्याणकारी योजना सुरु केल्या आहेत, देशपातळीवर त्याचं कौतुक होत आहे. शेतकरी, युवक, महिला या सर्वचस्तरातील घटकांचा विचार करून शासन सगळ्यांना सक्षम करण्यासाठी पाठबळ देत आहे. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना म्हणजे राज्यातल्या भगिनींच्या आयुष्यात क्रांती आणणारी योजना ठरत आहे. या बहिणींचे आशीर्वादही आम्हाला मिळत आहेत. परदेशी गुंतवणूक राज्यात मोठ्या प्रमाणावर येत आहे. देशाच्या पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचा एक ट्रिलियन डॉलर्सचा वाटा असणार आहे.
श्रीगणेशाच्या कृपेनं आम्ही राज्यातल्या गोरगरीब, दुर्बल आणि गरजू लोकांसाठी आणखीही चांगल्या योजना आणून त्यांची अंमलबजावणी करू असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
श्रीगुरूचरित्राध्याय एकोणतिसावा कथासार ॥ ब्रह्मराक्षसाचा उद्धार, भस्ममहात्म्य ॥
श्रीगुरूचरित्राध्याय एकोणतिसावा कथासार
॥ ब्रह्मराक्षसाचा उद्धार, भस्ममहात्म्य ॥
श्रीगणेशाय नमः ॥
श्रीगुरू नृसिंहसरस्वती त्रिविक्रमभारतीस म्हणाले, वत्सा, कृतयुगात वामदेव नावाचा एक ब्रह्मज्ञानी योगी भूलोकी संचार करीत असे. एकदा तो क्रौंचारण्यातून जात होता. तेथे एक नरभक्षक ब्रह्मराक्षस राहत असे. याने धावत येऊन वामदेवावर झडप घातली. तेव्हा त्याच्या अंगावरचे भस्म ब्रह्मराक्षसाच्या अंगाला लागताच त्याची सर्व पापे जळून गेली. त्याची क्षुधा, तृष्णा, उद्विग्नता, तगमग नाहीशी झाली. त्याला पूर्वजन्माचे स्मरण झाले. त्याने वामदेवाचे पाय धरले व म्हणाला, “हे मुनीश्वर, तू ईश्वर आहेस, तुझ्या अंगस्पर्शाने मी पावन झालो माझा उद्धार कर.” वामदेवाने विचारले, “तू कोण आहेस?” ब्रह्मराक्षस म्हणाला, “हे तपोनिधी, या क्षणी मला पूर्वीचे पंचवीस जन्म आठवत आहेत. प्रथम जन्मात मी यवन राजा होतो. उन्मत्त होऊन मी प्रजेला छळले, पतिव्रतांना भ्रष्ट केले. पुढे मला क्षयरोग झाला. शत्रूंनी माझे राज्य बळकावले. मृत्यूनंतर मी नरकात पडलो. त्यानंतर मी प्रेतयोनीत जन्मलो. मग मी क्रमाने वाघ, अजगर, लांडगा, डुक्कर, सरडा, कुत्रा, कोल्हा, हरीण, ससा, माकड, मुंगूस, कावळा, अस्वल, रानकोंबडा, गाढव, मांजर, बेडूक, कासव, मासा, उंदीर, घुबड, हत्ती व आता ब्रह्मराक्षस असे जन्म घेतले. हे प्रभु! आज तुमच्या अंगस्पर्शाने मला पूर्वजन्म आठवले, मन शांत झाले. तुमच्या अंगी एवढे सामर्थ्य कसे आले?”
वामदेव म्हणाला, “अरे, हा सर्व माझ्या अंगावरील भस्माचा प्रभाव आहे. त्याच्या स्पर्शामुळेच तुझ्या ठायी ज्ञान प्रकट झाले. मी तुला एक कथा सांगतो. यावरून भस्माचा प्रभाव किती श्रेष्ठ आहे हे तुझ्या लक्षात येईल. द्रविड देशात एका कर्मभ्रष्ट ब्राह्मणाचे शुद्र स्त्रीशी संबंध होते. त्याच्या कुटुंबीयांनी व ज्ञातिबांधवांनी त्याच्यावर बहिष्कार टाकला. चरितार्थाचे साधन नसल्याने तो चोऱ्या करू लागला. एकदा चोरी करत असताना एका शूद्राने त्याचा वध केला आणि त्याचे प्रेत गावाबाहेरील स्मशानापाशी टाकले. तेथे एक कुत्रा भस्मावर बसला होता. तो प्रेत खाण्यासाठी आला, तेंव्हा त्याच्या पोटाचे भस्म प्रेताच्या कपाळाला व अंगाला लागले. इकडे यमदूत त्या ब्राह्मणाच्या सूक्ष्म देहाला पीडा देत यमलोकी जात होते. शिवदूतांनी त्याच्या प्रेताला भस्म लागलेले पाहिले आणि यमदूतांना गाठले. ब्राह्मणाचा सूक्ष्म देह त्यांच्याकडून हिसकावून घेतला आणि पळवून लावले. हे वृत्त कळताच यम संतापाने शिवदूतांपाशी आला व म्हणाला, “तुम्ही माझ्या दूतांना का मारलेत? हा ब्राह्मण पापी आहे. याला तुम्ही शिवलोकी कसे नेता?” शिवदूत म्हणाले, “या ब्राह्मणाच्या सर्वांगावर भस्म लागले होते, त्यामुळे तो पावन झाला आहे. भस्मचर्चित देह असलेल्या प्रत्येकाला कैलासलोकीच आणले पाहिजे अशी आमच्या स्वामींची आज्ञा आहे.” ते ऐकून यमाचा राग शांत झाला, त्याने आपल्या दूतांना भस्म, त्रिपुंड्र व रुद्राक्ष धारण करणाऱ्या कोणालाही यमलोकी आणू नये असे बजावले, म्हणूनच मी भावभक्तीने भस्म धारण करतो.”
वामदेवाचे बोलणे ऐकून ब्रह्मराक्षस म्हणाला, “मी राजा असताना पांथस्थांची सोय व्हावी म्हणून रानात तळे बांधले होते, चरितार्थ चालण्यासाठी ब्राह्मणांना शेतजमिनी दान दिल्या होत्या. त्या पुण्याईनेच मला तुमची भेट झाली. आता मला भस्मधारणविधी समजावून सांगा.” वामदेव म्हणाला, “पूर्वी मंदार पर्वतावर देवसभा चालली असताना सनत्कुमारांनी शंकराला विनंती केली “प्रभू, पापक्षय होऊन मोक्षप्राप्ती साध्य होईल असे एखादे साधन मानवांच्या कल्याणासाठी सांगा.” शिव म्हणाले, “सुकलेले गोमय जाळून जी राख मिळते तेच भस्म होय. ‘सद्योजात’ मंत्राने ते तळहातावर घ्यावे. ‘अग्निरीति’ मंत्राने अभिमंत्रित करावे. ‘मानस्तोके मंत्राने अंगठ्याने मळावे. ‘त्र्यंबक’ मंत्राने भाळी लावावे. ‘त्र्यायूषे’ मंत्राने कपाळास, भुजांस व शरीरावर अन्य स्थानी लावावे. मध्यमा, अनामिका व अंगुली या तीन बोटांनी त्याच मंत्रोच्चारात भुवयांना समांतर तीन आडव्या रेषा काढून अंगठ्याने मध्यरेषा काढावी. यालाच त्रिपुंड्रक म्हणतात. सर्व आश्रमधर्माच्या व वर्णांच्या लोकांनी भस्मत्रिपुंड्र लावावा. त्यायोगे पूर्वपापांचे निरसन होऊन तो पुण्यात्मा होतो. त्याला सर्व तीर्थस्नानांचे, यात्रांचे व जपानुष्ठानांचे पुण्य मिळते, आयुरारोग्य, यश, कीर्ती, ज्ञान व सौख्य लाभते, कुळांचा उद्धार होतो, त्याला चारी पुरुषार्थ साध्य होतात. तो स्वर्ग, ब्रह्म आणि वैकुंठलोकी दीर्घकाळ वास्तव्य करून शिवसायुज्यता प्राप्त करतो. ज्याला मंत्रोच्चार येत नाहीत त्याने ‘ॐ नमः शिवाय’ असे म्हणून भस्म भक्तिभावाने धारण करावे. त्यालाही तेच पुण्यफल मिळते.” ते ऐकून सनत्कुमार, देव आणि ऋषींना मोठे समाधान वाटले.”
भस्ममहात्म्य श्रवण केल्यावर ब्रह्मराक्षसाने वामदेवाला उद्धार करण्याची काकुळतीने प्रार्थना केली. वामदेवाने त्याला अभिमंत्रित भस्म दिले. त्याने त्या भस्माने स्वतःच्या भाळी त्रिपुंड्रक लावला. त्याच्या प्रभावाने त्याला दिव्य देह प्राप्त झाला. वामदेवाच्या कृपाप्रसादाने त्याला दिव्यलोकी परमगती मिळाली. त्रिविक्रमा, वामदेव हे शिवावतार होते, योगियांचे ईश्वर होते, जगत्कल्याणासाठी संचार करायचे, त्यांनी ब्रह्मराक्षसाचा उद्धार केला. गुरुसेवेची आवड हेच सर्व साधनामागचे सार आहे.” ते ऐकून त्रिविक्रमाला परमानंद झाला. श्रीगुरुंना वंदन करून तो कुमसी ग्रामी परतला.
इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे भस्ममहिमावर्णन नाम एकोनत्रिंशोऽध्यायः ॥
॥ श्रीगुरुदेव दत्त ॥
॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रम के लिए आवेदन करने की अपील
मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रम के लिए आवेदन करने की अपील
मुंबई दि. ६ : सरकार की विभिन्न योजनाओं की जानकारी आम लोगों तक पहुँचाने के लिए ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रम शुरू किया गया है. इस उपक्रम में शामिल होनेवाले उम्मीद्वारों से आवेदन आमंत्रित किये जाते है. उम्मीद्वारों से www.mahayojanadoot.org इस वेबसाईट पर पंजीयन करने की अपील की गई है.
महाराष्ट्र सरकार के सूचना एवं जनसंपर्क महानिदेशालय के जरिये ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रम चलाया जा रहा है. प्रत्येक ग्रामपंचायत स्तर पर एक, वहीँ शहरी क्षेत्र में प्रत्येक पांच हजार जनसंख्या के पीछे एक, इस तरह से राज्य में कुल 50 हजार योजनादूतों का छह महीने के लिए चयन किया जाएगा. इन योजनादूतों को प्रतिमाह 10 हजार रूपये मानधन दिया जाएगा. यह योजनादूत सरकार के जनकल्याणकारी योजनाओं की जानकारी जनता तक पहुंचाएंगे.
इस योजना में शामिल होने के लिए इच्छुक उम्मीदवार 18 से 35 आयुगुट का हों, उम्मीद्वार किसी भी शाखा का स्नातक होना आवश्यक है. उम्मीद्वार के पास महाराष्ट्र का अधिवास प्रमाणपत्र होना आवश्यक है. उम्मीदवार को संगणक का ज्ञान होना चाहिए. साथ ही उसके पास अद्ययावत मोबाइल (स्मार्ट फोन) और आधार संलग्न बैंक खाता होना आवश्यक है.
‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रम के लिए किया गया ऑनलाइन आवेदन, आधार कार्ड, स्नातक उत्तीर्ण प्रमाण हेतु दस्तावेज, प्रमाणपत्र इ., अधिवास का प्रमाण. (सक्षम प्राधिकारी द्वारा जारी), उम्मीदवारों के पास आधार संलग्न बैंक खाते का प्रमाण, पासपोर्ट साईज फोटो, हमीपत्र (ऑनलाईन आवेदन के साथ संलग्न प्रपत्र में) नियुक्ति के समय प्रस्तुत करना आवश्यक है. इच्छुक उम्मीद्वार १३ सितंबर २०२४ तक www.mahayojanadoot.org इस वेबसाईट पर पंजीकरण कर सकते है
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...



