Monday, 9 September 2024

महानिर्मिती, महापारेषण, महावितरणमधील कंत्राटी कामगारांच्या वेतनामध्ये 19 टक्के वाढ उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

  

महानिर्मिती, महापारेषण, महावितरणमधील कंत्राटी कामगारांच्या वेतनामध्ये 19 टक्के वाढ

उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

 

मुंबई, दि. 9 : राज्याच्या विविध भागातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या मूळ वेतनामध्ये 19 टक्के वाढ करण्यात येत असल्याची घोषणा ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्यादी अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत केली. ही वाढ मार्च 2024 पासून लागू करण्यात आली आहे.

राज्यातील ऊर्जासंबंधी कार्यरत या तीनही कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत वने, सांस्कृतिक कार्य, मत्सव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे), आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार किशोर जोरगेवार, माजी आमदार आशिष देशमुख, उपमुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव डॉ.श्रीकर परदेशी, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, महावितरण व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी.अन्बलगन, ऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी, तसेच विविध कंत्राटी कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, कंत्राटी कामगारांच्या मूळ वेतनात वाढ केल्यामुळे आता राज्यातील ऊर्जा विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचे वेतन हे अन्य राज्यातील कंत्राटी कामगारांपेक्षा सर्वांत जास्त आहे. महानिर्मिती कंपनीतील कामगारांनी ई.एस.आय.सी.ची वेतन मर्यादा ओलांडली असल्याने आता ऊर्जा विभागाच्या सर्व कंपन्यातील कंत्राटी कामगारांना 5 लाखापर्यंत आरोग्य विमा सुविधा लागू करण्यात येत असल्याचेही उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री श्री.फडणवीस यांनी जाहीर केले. कंत्राटी कामगार संघटनेने उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांचे अभिनंदन केले.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले की, लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा सर्वांचा अधिकार आहे. तथापि, खापरखेडा पॉवर  स्टेशनमध्ये झालेल्या आंदोलनात मारामारी, पॉवर स्टेशन बंद पाडणे आदी बाबी शासनास मान्य नाहीत. यामुळे ज्या कंत्राटी कामगारांवर आंदोलनासंदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशा कंत्राटी कामगारांबाबत विचारपूर्वक चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

नागपूर मिहान प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यास शासनाचे प्राधान्य तातडीने पाऊले उचलण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश

 नागपूर मिहान प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यास शासनाचे प्राधान्य

तातडीने पाऊले उचलण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश

 

मुंबई दि.९ : नागपूर येथील महत्वाकांक्षी अशा मिहान प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्यास शासनाचे प्राधान्य असून मिहान प्रशासनाने तातडीने पाऊले उचलावित, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

नागपूर येथील मिहान प्रकल्पाबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला मृद व  जलसंधारण मंत्री संजय राठोड, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आशिष जैस्वाल, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वल्सा नायर-सिंग, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, की मिहान प्रकल्पांतर्गत विकसित भूखंडासाठी आकारण्यात येणारे विकास शुल्क हे जनतेला परवडेल असे करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. मिहान प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्धता होण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीसमोर सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. मिहान परिसरातील ग्रामपंचायत क्षेत्रात बांधण्यात आलेले व्यापारी संकुले ही त्या ग्रामपंचायतींना हस्तांतरीत करावी, यामुळे संबधित ग्रामपंचायतींना उत्पन्नाचे साधन उपलब्ध होईल. तसेच पुनर्वसन काळातील मिहान भागातील ग्रामपंचायतींना पाठवलेले पिण्याच्या पाण्याचे बिल संबधित यंत्रणांनी कमी करावेत,असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले, की मिहान परिसरात असणाऱ्या म्हाडा वसाहतीतील रहिवाश्यांना त्या परिसराच्या बाहेर जागा उपलब्ध करुन देत त्यांचे स्थलांतर करावे. तसेच मिहान प्रकल्पबाधित कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी विकसित भूखंड वाटप लवकरात लवकर करावे. मिहान परिसरातील ग्रामपंचायतींना करवसुलीचे अधिकार नसल्याने उत्पन्नाचे साधन राहिलेले नाही, या ग्रामपंचायतींना उत्पन्नाचे साधन मिळण्यासाठी एमआयडीसीकडून वापरण्यात येणारे सूत्र वापरण्यात यावे, अशा सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.

ज्ञानेश्वरीत वर्णन केलेला सहा हातांचा गणपती..!

 ज्ञानेश्वरीत वर्णन केलेला सहा हातांचा गणपती..!



हिमालयाच्या पहिल्या चढावाच्या टप्प्यातील कांगडा जिल्ह्यांत बैजनाथ गावीं महादेवाचे प्राचीन मंदिर आहे.!


१९०५ साली झालेल्या भूकंपात हे एकमेव मंदिर ह्या जिल्ह्यांत वाचलें, ही मोठी ईश्वराची कृपा होय.!


पूजारी सांगत होते की, १०-१५ मिनिटें शिखरापासून काठीसारखें दोन-चारदा देऊळ डोललें पण अखेरीस सरळ जसेच्या तसेंच उभे राहिलें.!


या देवळावर एक लेख असून ते दोन सावकारांनी कोंगडयाच्या एका कडोच राजाच्या कारकीर्दीत बांधलें, असें त्यांत म्हटलें आहे.!


मंदिराच्या बाहेरील भागाच्या दगडांवर शिखरापर्यंत देवतांच्या निरनिराळया मूर्ती अलंकारांसह व वाहनादि परिवारासह इतक्या सुन्दर कोरल्या आहेत की, त्या डोळ्यात साठवून ठेवाव्याशा वाटतात.!


मंदिराच्या आवारांत शिरतांना दरवाजांत शिरल्याबरोबर दोन्ही बाजूस मूर्ती आहेत एक

मारुतीरायाची व एक गणरायाची.!


दोन्ही मूर्तींचे स्वरूप अलिकडच्या मुर्तींपेक्षा भिन्न असून मननीय आहेत.!


यांत गणरायाची मुर्ती फारच मनोहर असून त्यास सहा हात आहेत.!


ते पाहतांच मला ज्ञानेश्वरीच्या प्रारंभी सहा हातांचा वर्णन केलेल्या गणरायाची मुर्ती कशी असेल, हे पुष्कळ दिवस न उलगडलेले कोडें मात्र येथे उलगडलें.!


ज्ञानेश्वरीच्या प्रारंभीच्या गणेशनमनाच्या ओव्यांत " षड्दर्शनें म्हणिपती । तेच भुजांची आकृति" इथपासून पहिल्या अध्यायातील १० ते १३ क्रमांकाच्या ओव्यांत जे वर्णन आहे ते  खालील प्रमाणे,


" देखा षड्दर्शने म्हणिपति। तेचि भुजांची आकृति

म्हणऊनि विसंवादें धरिती। आयुधे हातीं ॥१०॥

तरी तर्कु तोचि परशु । नितिभेदु अंकुश ॥

वेदान्त तो महारसु । मोदक मिरवे ॥११॥

एके होतीं दन्तु। जो स्वभावता खण्डितु ॥

तो बौद्धमतसंकेतु । वार्तिकांचा ॥१२॥

मग सहजे सत्कारवादु । तो पद्मकरू वरदु॥

धर्मप्रतिष्ठा तो । अभयहस्तु॥ १३॥"


पहिल्या दोन्हीं बाजूंच्या दोन हातांत परशु व अंकुश हीं शस्त्रे वणिली आहेत व तीं तर्क व नीतिभेद हीं सांगितली आहेत.!


तिसऱ्या हातांत वेदांतरूपी मोदक आहे आणि चौथ्यांत खण्डित दन्त आहे. हाच वार्तिकांचा बौद्धमत संकेतु' आहे. चार हात झाले.!


पांचव्यात पद्म म्हणजे कमल आहे, तो सत्कारवाद आणि सहाव्यांत अभय असून तेंच धर्मप्रतिष्ठा असें म्हटलें आहे.!


या सहा हातांना प्रारंभींच्या ओवीत षड्दर्शनें म्हणून याच कारणाने विसंवादरूपी किंवा

विसंवादाने आयूधें हातांत घेतली आहेत, असें म्हटलें आहे.!


या सर्व वर्णनावरून हात सहा आणि दर्शनें सहा हे निश्चित होतें; पण तीं दर्शनें कोणती आणि आयुधे कोणती येथेच थोडासा घोटाळा होतो.!


पण आश्चर्याची गोष्ट की, या बैजनाथाच्या ११ व्या शतकातील मंदिरातील गणरायाची मुर्ती सहा हातांची असून त्यांत हींच आयुधे दिली आहेत.!


मागील बाजूच्या दोन हातांत खरी आयुधे म्हणजे परशु आणि अंकुश आहेत.! नंतर डावीकडच्या दोन हातांपैकी खाली केलेल्यांत तुटलेला दन्त आणि मांडीवर ठेवलेल्या सोंडेच्या तोंडाजवळ नेलेल्या हातांत, जणू काय वेदान्त- मोदकाचा रस गजानन सोंडीने चाचपून पहात आहे.!


उजवीकडच्या दोन हातांपैकी खाली केलेल्या हातांत कमळ आहे आणि मांडीवर उभा ठेवलेला हात अभयरूपी कल्याण दाखवीत आहे.!


तात्पर्य १३०० च्या सुमारास ज्ञानेश्वर माऊलींनी दक्षिणेंत वर्णिलेल्या षड्भुज गणपतीची मुर्ती १२ व्या शतकाच्या आरंभींच्या कांगडा दरींत असलेल्या हिमालयाच्या पायथ्याशी आपल्यास पहावयास मिळते.!

समुर्द मंथान

 


भगवंत पाहिले

 


सोंड नसलेला जगातील एकमेव गणपती !

 सोंड नसलेला जगातील एकमेव गणपती !


जगभरातील गणपतीच्या प्रत्येक मूर्तीमध्ये गणेशाचे शीर हे गजमुख - हत्ती मुखी असलेले आपल्याला पाहण्यास मिळते.

अर्थात प्रस्थापित सांस्कृतिक वर्चस्ववादाच्या या संघर्षात

गणपतीच्या अन्य रुपाची कोणी कल्पनाही करू शकत नाही एवढा सांस्कृतिक गुलामी आणि सांस्कृतिक अंधकाराने समाजाचा मेंदू गुलाम करून ठेवला आहे. 

मात्र दक्षिण भारतात गणपतीला गजाचे शीर लावण्यापूर्वी म्हणजे,मानवी मस्तक असलेल्या रूपात गणपतीची मूर्ती असलेले मंदिर आहे.


मनुष्याचे मस्तक असलेली ही जगातील एकमेव गणेश मूर्ती असल्याचे मानले जाते. हे प्राचीन शिल्प आपल्याला सत्यापर्यंत घेऊन जाण्यास पुरेसे आहे. 


तामिळनाडूमध्ये कुथनूरपासून जवळ तिलतर्पणपुरी जवळ हे मंदिर आहे. 

"आदी विनायक" असे या मंदिराचे नाव आहे. 

गजमुखी अवतारापूर्वी मानवी रुपात असलेल्या गणपतीच्या मूर्तीमुळे याला आदी गणपती असे संबोधले जाते.


|| जन गण मन अधिनायक जय हे ||


आपणा सर्वांना गण अधिनायक असलेल्या अशा गणव्यवस्थेच्या शिल्पकार असलेल्या गणपती   ( लोकप्रमुख ) सोहळ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा-सदिच्छा 💐


-निरज धुमाळ


राजस्थानी गणेश मंडळ ची मूर्ति स्थापना प.पु स्वामी अनंतविभूषित शिवगिरीजी महाराज यांच्या हस्ते संपन्न

   राजस्थानी गणेश मंडळ ची मूर्ति स्थापना प.पु  स्वामी अनंतविभूषित शिवगिरीजी महाराज यांच्या हस्ते संपन्न


परळी /प्रतिनीधी
प्रति वर्ष नुसार याही वर्षी आपल्या परळी शहरात राजस्थानी गणेश मंडळ ची मूर्ति स्थापना संपन्न झाली असून मूर्ति स्थापना परमपूज्य श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी अनंतविभूषित शिवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते संपन्न झाले या वेळी मंडळ समिति सह समाज बांधव मोठ्या संख्यने उपस्थित होते.
प्रथम महाराजांच्या हस्ते मूर्ति स्थापना करण्यात आली आरती संपन्न झाल्यावर श्री शिवगिरीजी महाराज यांचे प्रवचन झाले यात महाराजांनी गणेश चतुर्थी यावर प्रवचन करत आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे इतिहास त्यातील बोध श्रीना दूर्वा का वहतात बाप्पाच्या शरीरा सह त्यांचे वाहन या वर प्रवचन दिले राजस्थानी गणेश मंडल ने चतुर्थी ते अनंत चौदस पर्यंत गणेश याग होम पूजा करने म्हणजे फार मोठे कार्य आहे असे होम हवन पूजा पाठ करणाऱ्या मंडळ ने मला आमंत्रित केले असे म्हणत आभार व्यक्त करत प्रवचनास विराम दिला
राजस्थानी गणेश मंडल ने अनेक सांस्कृतिक कार्यक्रम या वर्षीही आयोजित केले असून सुंदर असा देखावा ही करण्यात आला आहे तरी परली शहरातील भाविक भक्तानी या देखावा पहन्यास काल पासून मोठी गर्दी केली आहे शेवट च्या दिवशी भव्य दिव्य मिरवनुक शहरातून निघणार असून ही मिरवनुक राजस्थानी बालाजी मंदिर ते पोलिस स्टेशन मार्गे रानी लक्ष्मीबाई टॉवर मार्गे बाजार समिति आर्य समाज मंदिर मार्गे टॉवर गणेशपार मार्गे भव्य दिव्य मिरवनुक निघणार असल्याचे मंडळ अध्यक्ष यांनी सांगितले आहे विशेष म्हणजे लोकप्रिय असलेला फुलाची उधळन करत विशेष अनेक ढ़ोल वाध्य, संभळ या सह अद्भुत देखावा पहन्यास सर्व परळीकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन राजस्थानी गणेश मंडळा कडून करण्यात आले आहे.

Featured post

Lakshvedhi