Thursday, 25 July 2024

हैदराबाद गॅझेटमधील कागदपत्र उपलब्ध करून मराठा-कुणबी नोंदी तपासणी तातडीने पूर्ण करावी

 हैदराबाद गॅझेटमधील कागदपत्र उपलब्ध करून

मराठा-कुणबी नोंदी तपासणी तातडीने पूर्ण करावी

मंत्री शंभूराज देसाई

            मुंबईदि. 24 :राज्यात मराठा – कुणबी नोंदीबाबत केलेल्या सर्वेक्षणात नोंदी न आढळलेल्या समाज बांधवांसाठी शासनाने अधिकच्या नोंदी मिळविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हैदराबाद गॅझेटमधील नोंदी मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांचे पथक हैदराबाद येथे पाठविले. या पथकाने तपासलेल्या कागदपत्रांची मागणी शासनाने विहीत शुल्क भरून केली आहे. या कागदपत्रांच्या सत्यप्रती तातडीने उपलब्ध करून कागदपत्रांची पडताळणी गतीने पूर्ण करावीअसे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्री उपसमितीचे सदस्य शंभूराज देसाई यांनी आज दिले.

            मंत्रालयातील समिती कक्षात मराठा समाज आरक्षण व संबंधीत विषयांबाबत बैठकीचे आयोजन मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले हाते. या बैठकीला गृह विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार सिंगसामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगेविधी व न्याय विभागाच्या सहसचिव  सुवर्णा केवल आदी उपस्थित होते.     

            मंत्री श्री. देसाई पुढे म्हणाले कीराज्यात मागील काळात शासनाने मराठा – कुणबी नोंदी पडताळणी साठी युद्धपातळीवर सर्वेक्षण पूर्ण केले. यामध्ये आढळलेल्या नोंदीनुसार मराठा – कुणबी प्रमाणपत्र मराठा समाज बांधवांना देण्यात आले. मात्र, या सर्वेक्षणात नोंदी न आढळल्यामुळे प्रमाणपत्र देण्यास अडचण आली. हैदराबाद गॅझेटमधील जास्तीच्या नोंदी तपासून प्रमाणपत्र न मिळालेल्या मराठा समाज बांधवांना प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात यावी. हे कामही युद्धपातळीवर पूर्ण करावे. सगे- सोयरे बाबत कागदपत्रांची तपासणी करण्यात यावी. या छाननीचे कामही अंतिमस्तरापर्यंत नेण्यात यावे. न्या. शिंदे समितीला पुन्हा मुदतवाढ देण्याची कार्यवाही करण्यात यावीअशाही सूचना मंत्री श्री. देसाई यांनी आज दिल्या.

            मराठा आरक्षण मागणीच्या आंदोलनादरम्यान दाखल झालेले विविध गुन्हे मागे घेण्याबाबतची कार्यवाही करावी. यामध्ये 31 जानेवारी 2024 पूर्वी दाखल गुन्ह्यावर दोषारोपपत्र झालेल्या प्रकरणांमध्ये गुन्हे मागे घेण्याची कार्यवाही गतीने पूर्ण करावी. तसेच 31 जानेवारी 2024 नंतर दाखल असलेल्या गुन्ह्यांबाबत नवीन शासन निर्णय काढण्याची कारवाई करावीअसे निर्देशही मंत्री श्री. देसाई यांनी दिले.

0000

पुणेकरांची वाहतुकीच्या कोंडीतून सुटका करण्यासाठी; सर्व विभागांनी योग्य समन्वयाने, काम करा विलंबामुळे प्रकल्पाच्या किंमती वाढतात; नियोजित वेळेत विकासकामे मार्गी लावा

 पुणेकरांची वाहतुकीच्या कोंडीतून सुटका करण्यासाठी;

सर्व विभागांनी योग्य समन्वयानेकाम करा

विलंबामुळे प्रकल्पाच्या किंमती वाढतात;

नियोजित वेळेत विकासकामे मार्गी लावा

- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

 

            मुंबईदि. 24 :- विकासकामांची गती राखण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. विलंबामुळे प्रकल्पांच्या किंमतीत भरमसाठ वाढ होऊन राज्याचे दीर्घकालीन नुकसान होतेते टाळण्यासाठी नियोजित वेळेत विकास प्रकल्प मार्गी लावण्यावर भर द्यावाअशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. तसेच पुणे शहरात वाहतुक कोंडीची समस्या गंभीर असून सर्व विभागांनी योग्य समन्वय राखत पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी आज दिले.

            उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयातउपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती.   उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले कीमाण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका क्रमांक तीनच्या कामाला गती द्या. तसेच हडपसर ते लोणीकाळभोरहडपसर ते सासवडस्वारगेट ते कात्रजवनाज ते चांदणी चौकरामवाडी ते वाघोली या वाढीव मेट्रो मार्गांच्या परवानगीसाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करा. नागरिकांच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या पुणे शहर आणि उपनगरांची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुणे रिंग रोडचे काम वेगाने मार्गी लावा. त्याचबरोबर पुणे शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे तातडीने बुजविण्यात यावेत. पुणे शहरात दर वर्षी लाखो नवीन वाहने रस्त्यावर येत आहेतत्यामुळे शहरातील वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे शहर आणि उपनगरातील वाहतुक सुरळीत करण्यासाठी मेट्रोउड्डाणपूलरिंग रोड तसेच सुरु असणाऱ्या सर्व पायाभूत सुविधांच्या कामांचा वेग वाढविण्यात यावा. यासाठी या प्रकल्पांशी संबंधित सर्व विभागाने योग्य समन्वय आणि ताळमेळ राखत पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करावी.

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालयसैनिक स्कुलअलिबागच्या उसर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयरेवस ते रेड्डी सागरी महामार्गपुणे बाह्यवळण रस्तावडाळा येथील जीएसटी भवनपुणे नाशिक हायस्पीड रेल्वे, ‘सारथीसंस्थेचे पुण्यातील मुख्यालयऔंधनाशिककोल्हापूरनागपूरअमरावतीतील सारथीच्या विभागीय उपकेंद्रांचे बांधकामपुणे येथील कृषीभवनशिक्षण आयुक्तालयकामगार कल्याण भवनसहकार भवननोंदणीभवन आदी प्रकल्पांच्या प्रगतीचा देखील आढावा घेतला. 

            या बैठकीला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफमहिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरेराज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिकमहसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमारनियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव व विकास आयुक्त डॉ. राजगोपाल देवरावित्त व क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्तासार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकरपरिवहन आणि बंदरेगृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठीउपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा राज्यकर आयुक्त आशिष शर्माकृषी विभागाच्या प्रधान सचिव व्ही. राधामहसूल आणि वने विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डीउच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगीवैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारेपर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोजपुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार (व्ही.सी.द्वारे)क्रीडा आयुक्त डॉ. राजेश देशमुखमहारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जयस्वालमहामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकरवैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकरतर व्ही.सी.व्दारे पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसेपी.एम.आर.डी.ए.चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसेसहकार आयुक्त दीपक तावरेशिक्षण आयुक्त सुरज मांढरेसारथीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडेसातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीनाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्माअहमदनगरचे जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठरायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळेरत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम देवेंद्रसिहउपमुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव गजानन पाटील उपस्थित होते. तर पुणे मेट्रोपीएमआरडीएसंबंधित जिल्ह्यांचे वरिष्ठ अधिकारी व्हिसीद्वारे उपस्थित होते.

 

००००


Wednesday, 24 July 2024

बुलडाणा जिल्ह्यातील लोकहिताची विविध कामे तातडीने मार्गी लावावीत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंचन, औद्योगिक, रस्ते, पर्यटनांच्या कामांना गती देण्याचे निर्देश

 बुलडाणा जिल्ह्यातील लोकहिताची विविध कामे तातडीने मार्गी लावावीत

                                               - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सिंचनऔद्योगिकरस्तेपर्यटनांच्या कामांना गती देण्याचे निर्देश

 

            मुंबईदि. 24 : बुलडाणा जिल्ह्यातील सिंचन,  रस्ते आदी लोकहिताची विविध कामे तातडीने मार्गी लावावीतअसे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मोताळा औद्योगिक क्षेत्र जाहीर करण्यासाठी आणि त्याअंतर्गत कामाला गती देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत बुलडाणा जिल्हा तसेच बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील विविध विषयांचा आढावा घेण्यात आला.

            सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस सहकार मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे -पाटीलमृद व जलसंधारण मंत्री संजय राठोडआमदार संजय गायकवाडआमदार श्वेता महालेमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगेसहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुपकुमारजलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूरनगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराजउच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगीपर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोजमृद व जलसंधारण विभागाचे सचिव गणेश पाटील आदी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीलोकांना दिलासा देणारी छोटे-छोटे प्रकल्पकामे वेळेत मार्गी लावण्यासाठी सर्वच यंत्रणांनी समन्वयाने प्रयत्न करावेत. छोट्या प्रकल्पामुळे  सिंचन क्षमता निर्माण होतेत्यातून शेतकऱ्यांना फायदा होतो. अशा कामांना प्राधान्य देण्यात यावे. पर्यटन हे मोठे क्षमता असलेले क्षेत्र आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्रातील प्रकल्पांना आणि सुविधा वाढविण्यावर भर देण्यात यावाअसेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            या बैठकीत हरमोड सिंचन तलावाची उंची वाढविणेपलढग धरणाचे वाहून जाणारे पाणी नळगंगा धरणात वळविणे,  गिरडा साठवण तलावाची क्षमता वाढविणेकिन्होळा शिवारामध्ये साठवण धरणबुलडाणा नगरपरिषदेला सामाजिक सभागृह तसेच उद्यान व चौपाटीसाठी जागा हस्तांतरण येळगांव पर्यटन प्रकल्पबुलडाणा -चिखली- मलकापूर रस्त्याचे कामबुलडाणा जिल्ह्यातील चार ते पाच तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल असा फूडपार्क उभारणे अशी अनेक विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

गळून पडलेली फुले'_* 🌸 🏵️🥀🌹🌷🍁

 *_'गळून पडलेली फुले'_* 

🌸 🏵️🥀🌹🌷🍁

➖➖➖➖➖➖➖


चालणे ही एक सामान्य क्रिया आहे.  पण चालण्याचं सौंदर्य हे आहे की आपल्या आजूबाजूला घडत असलेले जीवन पाहता येते.


 मी रोज सकाळी फिरायला जातो, तेव्हा मला एक वृद्ध गृहस्थ झाडाखाली पडलेली फुले उचलून मंदिरात दर्शनासाठी टोपलीत ठेवताना दिसतात.  त्यांचा हा उपक्रम माझ्यात कुतूहल निर्माण करत होता.

 

 एका सकाळी, मी त्यांना पुन्हा तेच करताना पाहिले आणि मी माझी उत्सुकता शांत करण्याचा निर्णय घेतला.  मी त्यांना गळून पडलेल्या फुलांच्या ध्यासाबद्दल विचारले की इतर वृद्ध लोक तर ताजी फुले तोडतात.


 मी त्याला विचारले, "सर, मी तुम्हाला नेहमी जमिनीवरून ही ताजी पडलेली फुले उचलताना पाहतो. तुम्ही त्यांचे काय करता?"


 "मी ही फुले माझ्या पूजेच्या खोलीत देवतांच्या चरणी अर्पण करतो," त्याने अतिशय शांतपणे उत्तर दिले.


 मी पहिल्यांदाच असं काही ऐकलं होतं.  म्हणून, मी त्याला पुन्हा विचारले, "तुमची काही हरकत नसेल, तर मी तुम्हांला विचारू का की, झाडावर सहज तोडता येणारी फुले असताना तूम्ही ही पडलेली फुले देवाला का अर्पण करता ?"


 त्याच्या उत्तराने मी थक्क झालो, "मी फुलांना त्यांचा उद्देश पूर्ण करण्यास मदत करतो - त्यांच्या शेवटच्या दिवसात देवासोबत राहण्याचा. त्यांनाही जीवन आहे; आमच्याप्रमाणे त्यांनाही त्यांच्या शेवटच्या दिवसात देवासोबत राहायचे आहे, नाही का?  "  त्याने मला विचारले.  मी सहमती दर्शविली.


 मग तो म्हणाला, "काही लोक ज्या कळ्या अजून फुलल्या नाहीत अशा कळ्या खुडतात आणि काही फक्त नुकत्याच फुललेल्या कळ्या काढतात, त्यांना त्यांचा सुगंधही सोडू देत नाहीत किंवा त्यांचे जीवन जगू देत नाहीत. प्रत्येकजण जे सुंदर आहे ते ओरबाडतो आणि त्यातून वनस्पतीचे सौंदर्य काढून घेतो.  मग पहा, ही झाडे कशी दिसतात - रंगहीन आणि निर्जन."


तो पुढे म्हणाला, "प्रत्येक फुलाचा एक उद्देश असतो, देवासोबत राहण्याचा. प्रत्येकजण झाडांवर असलेली फुले घेतो, पण मी ती निवडत नाही. ती गळून पडणे हा फुलांचा दोष नाही.  या म्हातारपणात मी कुणालाही साथ देऊ शकत नाही, पण किमान या फुलांना त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी मदत करू शकतो."


 मी फक्त होकार दिला, हसलो त्यांना शुभेच्छा दिल्या आणि चालू लागलो. मी चालत होतो तेव्हा माझे मन धावत होते.  या नव्या प्रेरणेने आणि कल्पनेने मी निश्चय केला की यापुढे पूजेसाठी फक्त पडलेली फुले गोळा करावयाची. 


दुसऱ्या दिवशी  सकाळी फिरण्यासाठी गेलो असता एका झाडाखाली पडलेली फुलं  मी फुलं उचलून तळहातावर ठेवली.   फुले तळहातावर फुले ठेवताच, मला अंगावर रोमांच आले आणि माझे हृदय धडधडू लागले.  माझ्या शरीरासाठी या फुलांबद्दल मला वाटणारा तो एक वेगळाच अनुभव होता.  मी ती फुले घरी आणली, धुऊन ती कुठे असावीत तिथे म्हणजे परमेश्वराच्या चरणी ठेवली!


हा संपूर्ण अनुभव फक्त अप्रतिम होता.  मला आतून खूप छान वाटलं.  मला असे वाटले की मी कोणाचा तरी जीव वाचवला आहे किंवा एखाद्याला त्याच्या दुःखातून बाहेर येण्यास मदत केली आहे.  फुलांचे असे समाधान मला यापूर्वी कधीच जाणवले नव्हते.  आणि मला वाटते की मी असेच करत रहावं.


जे अकाली पडले आहेत त्यांना उचलून योग्य जागी ठेवा.

आयुष्यात आपल्याला नेहमी चांगल्या आणि सुंदर लोकांच्या आसपास राहायचे असते.  आपल्या उंचीच्या लोकांबरोबर आपल्याला स्वतःला पहायचे असते आणि जे आपल्या उंचीच्या खाली आहेत, त्यांना आपल्यापेक्षा खाली बघायचे असते.  पण, खरे समाधान तेव्हा मिळते जेव्हा आपण एखाद्याला मदत करतो, त्यांचे जीवन चांगले बनवतो आणि त्यांना आनंद आणि आनंद साजरा करण्यास मदत करतो. - मग तो माणूस, प्राणी, पक्षी किंवा इतर कोणत्याही प्रकारचे जीवन असो. मग फुले का नाहीत? जे पडले आहेत पदभ्रष्ट  आहेत त्यांना उचला मार्गी लावा" आणि पहा तुम्हाला स्वतःला उंचावल्यासारखे वाटेल.


👩🏻 🥹 👨🏻 👨🏻‍🦰 👱🏻 👱🏻‍♂️

 


_ओळखीच्या सर्व लोकांना आणि इतर सर्व ग्रुप मध्ये शेअर करा जेणेकरून आपला हा ज्ञानयज्ञ सर्वत्र पोहोचेल_

➖➖➖➖➖➖➖

महत्वाची माहिती, कोथींबीरीची पाने आणि पार्सनीयम वनस्पतीची पाने यातला फरक लक्षात घ्या.

 महत्वाची माहिती, 

कोथींबीरीची पाने आणि पार्सनीयम वनस्पतीची पाने यातला फरक लक्षात घ्या.


पहिला फोटो ज्याच्यावर 1 लिहलं आहे. ती कोथिंबीर आहे. दुसरा फोटो, ज्या वर 2 अस लिहल आहे. ती विषारी पार्सनीयम या वनस्पतीची पानं आहेत. जेव्हा आपण कोथिंबीर विकत घेतो तेव्हा त्यात खूप वेळा पार्सनीयम ची पानं असतात, तेव्हा आपल्या परिवारातील सदस्यांना या बाबतीत जागरूक करा कोथिंबिरीतून या पार्सनीयम च्या पानांना वेगळे करा. जर आपल्या अन्नातून ही पानं जास्त प्रमाणात शरीरात गेली तर तुम्हाला दमा, त्वचारोग, किडनीचे विकार, होऊ शकतात. 👇🏻


जनहित, सावधान,रहे


 

राजे यशवंतराव होळकर महामेष योजना पुढे सुरू ठेवणार मेंढपाळ लाभार्थींना रक्कम थेट खात्यात जमा

 राजे यशवंतराव होळकर महामेष योजना पुढे सुरू ठेवणार

मेंढपाळ लाभार्थींना रक्कम थेट खात्यात जमा

 

            राज्यातील मेंढपाळांसाठी असलेली राजे यशवंतराव होळकर महामेष योजना पुढे सुरू ठेवण्याचा आणि मेंढपाळ लाभार्थींना रक्कम थेट खात्यात जमा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            राज्यातील धनगर समाजातील मागासलेपण दूर करण्याच्या उद्देशाने ही योजना 2017 वर्षापासून सुरु होती.  या योजनेत अधिकाधिक लाभार्थींना फायदा व्हावा म्हणून काही बदलासह त्यास मान्यता देण्यात आली.  या वर्षासाठी महामंडळाकडे असलेल्या 29 कोटी 55 लाख इतका निधी चालू वित्तीय वर्षात खर्च करण्यास आणि त्यानंतर ही योजना दरवर्षी अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार पुढे चालू ठेवण्यात येईल.  पशुधन खरेदीच्याबाबतीत 75 टक्के अनुदानाची रक्कम 7 दिवसात थेट लाभ हस्तांतरण प्रक्रीयेतून (डीबीटी) लाभार्थीना देण्यात येईल.  तसेच चारा बियाणे व बहुवार्षिक गवत प्रजातीचे ठोंबे व बियाणे यासाठीचे अनुदान वगळता उर्वरित सर्व लाभ डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थींना देण्यात येतील.

Featured post

Lakshvedhi