Tuesday, 16 July 2024

जलजीवन मिशन’च्या कामांना गती द्यावी नांदेड जिल्ह्यात सुरु असणाऱ्या कामांच्या सद्यस्थितीचा अहवाल सादर करावा

 जलजीवन मिशन’च्या कामांना गती द्यावी

नांदेड जिल्ह्यात सुरु असणाऱ्या कामांच्या सद्यस्थितीचा अहवाल सादर करावा

-उपमुख्यमंत्री अजित पवार

            मुंबई दि. 16 :- नांदेड जिल्ह्यातील भोकरअर्धापूरमुदखेड तालुक्यासह जिल्ह्यातील जल जीवन मिशन अंतर्गत सुरु असणाऱ्या पाणीपुरवठा योजनांची कामे कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी या कामांना गती द्यावी. तसेच जलजीवन मिशन अंतर्गत नांदेड जिल्ह्यात सुरु असणाऱ्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांचा सद्यस्थितीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. 

            उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात आज नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील जलजीवन मिशनच्या व वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला.त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला खासदार अशोक चव्हाण (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे)नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरावित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्तापाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारेमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव अभिषेक कृष्णादूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नांदेडचे जिल्हाधिकारी  अभिजित राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवालउपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीनांदेड जिल्ह्यात जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत 1234 कामे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तर 28 पाणी पुरवठा योजनांची कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मार्फत राबविण्यात येत आहेत. यामध्ये भोकर विधानसभा मतदारसंघातील भोकरअर्धापूर व मुदखेड तालुक्यात 122 जिल्हा परिषदेच्या दोन योजनांची कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मार्फत सुरु आहेत. ही सुरु असणारी कामे विहित कालमर्यादेत पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी या कामांना गती द्यावी. त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यात सुरु असणाऱ्या कामांच्या सद्यस्थितीचा अहवाल तातडीने सादर करावेत.

शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमीन सुधारणा प्रस्ताव तातडीने सादर करावा

 शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमीन सुधारणा

प्रस्ताव तातडीने सादर करावा

-उपमुख्यमंत्री अजित पवार

            मुंबईदि. १६ :- शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमिनींचा पोत सुधारून त्या लागवडी योग्य बनविणे गरजेचे आहे. क्षारपड जमिनी सुधारणा निचरा तंत्रज्ञान उपयुक्त ठरत असल्याने यासाठीचा आवश्यक प्रस्ताव तयार करून तो शासन मान्यतेसाठी तातडीने पाठवावा. या आराखड्यास प्रशासकीय मान्यतेसह आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईलअशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

            शिरोळ (जि. कोल्हापूर) तालुक्यातील  क्षारपड व पाणथळ क्षेत्र सुधारण्यासाठी प्रस्तावित योजनेच्या अंमलबजावणीसाठी उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकरनियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरावित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्तालाभक्षेत्र विकास सचिव डॉ. संजय बेलसरेकोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे)पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय पुणेच्या अधीक्षक अभियंता तथा संचालक वैशाली नारकर आदी उपस्थित होते.

             उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले कीक्षारपड जमीन सुधारणा काम लोकोपयोगी व शेतकरी हिताचे आहे. या कामातून नापिक जमीन लागवडीखाली येणार असल्याने शेतकऱ्यांना त्याचा निश्चित लाभ होणार आहे. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमीन सुधारणेचा प्रस्ताव सादर करताना तो परिपूर्ण सादर करावा. यामध्ये सबंधित शेतकरी हिस्सा १० टक्केसबंधित सहकारी साखर कारखाना १० टक्के हिस्सा याबाबतची संमतीपत्र यांचा समावेश असावा.

            या बैठकीत उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पर्जन्यमाननद्यांची पाणी पातळीधरणांमधील पाणी साठा याबाबतचा आढावा कोल्हापूरचे जिल्हाधिकारी श्री.येडगे यांच्याकडून घेतला.

 

व्यवसायाभिमुख कौशल्य काळाची गरज

 व्यवसायाभिमुख कौशल्य काळाची गरज

- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

 

            मुंबईदि. १५ : कौशल्य ही आजच्या काळाची गरज आहे. प्रत्येकाकडे आपल्या व्यवसायातील कौशल्य असणे आवश्यक आहे.आपल्या व्यवसाय वृध्दी अथवा जीवन जगताना देखील कौशल्य आवश्यक आहे, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी संगितले.

               एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय परिसरातील राज्य नाविन्यता सोसायटी येथे जागतिक कौशल्य दिनाचे औचित्य साधून  महाराष्ट्र राज्य कौशल्य,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाद्वारे प्रशिक्षणार्थींनी विविध क्षेत्रात केलेल्या यशाबद्दल व उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी पारितोषिक वितरण सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री श्री.आठवले बोलत होते. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, विभागाचे सचिव गणेश पाटील,आयुक्त निधी चौधरी, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.अपूर्वा पालकर, व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण मंडळाचे संचालक दिगंबर दळवी यांच्यासह औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य, कौशल्य विकास विभागातील अधिकारी यावेळी उपस्थित होते.

            मंत्री श्री.आठवले म्हणाले कीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील युवकांमध्ये कौशल्य वृध्दीसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत.त्याच धर्तीवर राज्याचे कौशल्य विकास मंत्री यांनीही राज्याच्या कौशल्य विकासाला गती दिली आहे.उद्योजकांना त्यांच्या क्षेत्रातील कार्यकुशल मनुष्यबळ तयार केले जावे यासाठी राज्य शासन चांगला प्रयत्न करत आहे.

                        अधिकाधिक रोजगार निर्माण करणार - मंत्री मंगलप्रभात लोढा

      मंत्री श्री.लोढा म्हणाले की,राज्यात रोजगार निर्माण करण्यासाठी कौशल्य विकास विभाग काम करत आहे. कौशल्य विकास विभाग,उद्योजक यांच्या समन्वयातून सर्वाधिक रोजगार निर्माण केले जातील. यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.कौशल्य विकास विभागाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबविणे आणि विभागाला यशाकडे नेण्यासाठी  सर्वांनी या कामात  उत्स्फुर्त सहभाग घ्यावा.

            कौशल्य विकास विभागाचे सचिव श्री. पाटीलआयुक्त श्रीमती चौधरीमहाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. पालकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कौशल्य विकास विभाग आणि औद्योगिक आस्थापनांमध्ये  मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबाबत सामंजस्य करार झाला. जागतिक कौशल्य दिनाचे औचित्य साधून  महाराष्ट्र राज्य कौशल्य,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाव्दारे प्रशिक्षणार्थींनी विविध क्षेत्रात केलेल्या यशाबद्दल यशस्वी उमेदवारांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला.यावेळी महाराष्ट्र राज्य शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनांचे (MAPS) पोर्टलचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

            उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्पर्धेतील विजेत्या संस्थांमध्ये राज्यस्तरीय पुरस्कारामध्ये  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांनी चांदूरबाजारजिल्हा - अमरावती या संस्थेला प्रथम क्रमांकशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थानांदेडजिल्हा- नांदेड संस्थेला व्दितीय क्रमांक तर  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाऔंध. पुणे (मुलींची)जिल्हा-पुणे या संस्थेचा तृतीय क्रमांक आला.

            विभागीय उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये मुंबई विभागात फादर अॅग्नेल खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थावाशी, जिल्हा- ठाणेपुणे विभागात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था शिरुरजिल्हा-पुणे,नाशिक विभागात औद्योगिक प्रशिक्षण संस्थाकळवणजिल्हा नाशिक, छत्रपती संभाजीनगर मध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंबड जिल्हा जालना विभाग,अमरावती विभागात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थानांदगाव खंडेश्वरजिल्हा अमरावती,नागपूर विभागात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थावर्धाजिल्हा वर्धा यांना पारितोषिक देवून गौरविण्यात आले.

                                                            ००००

संध्या गरवारे/विसंअ


पीक विमा भरण्यासाठी ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ

 पीक विमा भरण्यासाठी ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ

कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना यश

 

            मुंबई, दि.१५ : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची आज दि. १५ जुलै ही अंतिम मुदत होती. मात्र, राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही पीक विमा भरण्यापासून वंचित असल्याने त्यांना संधी मिळावी, यासाठी पीक विमा भरण्यास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्यांच्या मागणीनंतर ही मुदत 31 जुलै पर्यंत वाढवण्यात आली.

            सध्या राज्यात विविध योजनांसाठी लाभार्थींची सामूहिक सुविधा (CSC) केंद्रांवर गर्दी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज करताना व लागणारे कागदपत्रे जोडताना सर्व्हरची गती मंद झाली आहे. अद्यापही अनेक शेतकरी विमा योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे पीक विम्याचे अर्ज करण्यास मुदतवाढ मिळावी यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने पत्र व्यवहार करण्यात आला होता. याबाबत मंत्री श्री. मुंडे स्वतः  पाठपुरावा करत होते.

            त्यानुसार आज सायंकाळी एक रुपयात पीक विमा भरण्याची मुदत 31 जुलै पर्यंत वाढवण्यात आली. याबद्दल कृषी मंत्री श्री. मुंडे यांनी एक्स या मायक्रो ब्लॉगवरुन केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे आभार मानले आहेत. दरम्यान या पीक विमा याजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी मंत्री श्री.मुंडे यांनी केले आहे.

भवताल

 भवताल मासिक : जून २०२४ अंक प्रसिद्ध !


नमस्कार.
"भवताल मासिका"चा जून २०२४ चा अंक प्रसिद्ध झाला असून, त्यात पुढील विषयांचा समावेश आहे.

• भूजलाच्या नव्या वाटा
(डॉ. हिमांशू कुलकर्णी)
आपण भूजलाचा वारेमाप उपसा करीत आहोत. मात्र, उपशाच्या प्रमाणात जलपुनर्भरण होत नाही. शाश्वत पाणी मिळण्यासाठी भविष्यात आपल्याला वैज्ञानिक मार्गांनी पराकाष्ठा करावी लागणार आहे. भूजलाच्या नव्या वाटांचा शोध घ्यावा लागणार आहे. अन्यथा ‘तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होईल’ हा अंदाज खरा ठरेल... याबाबत वस्तुस्थिती मांडणारा लेख.

• पाऊस... तेव्हाचा आणि आताचा !
(प्रा. डॉ. एस. आर. यादव)
पावसाळा... सृष्टीचे जीवनचक्र अव्याहतपणे चालवणारा सर्जनाचा ऋतू! पाऊस वर्षानुवर्षे पडतोय. तो अनुभवण्याची पद्धत मात्र बदलतेय. लहानपणी थय-थय नाचत येणारा
तुफान पाऊस मी अनुभवलाय अन् काळानुसार पावसाळ्यातील विलोभनीय दृष्य दृष्टीआड होताना, अवतीभवतीची जैवविविधता नष्ट होतानाही मी पाहतोय. गेल्या ३० वर्षांत बदललेल्या पावसाच्या अनेक रूपांचा मी साक्षीदार आहे! सांगताहेत, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वनस्पतीशास्त्रज्ञ प्रा. डॉ. एस. आर. यादव.

• निसर्गातील भन्नाट शाळा
(ओवी थोरात)
निसर्ग शिक्षण आणि शाळेत शिकवले जाणारे पर्यावरणशास्त्र यांच्यामध्ये फरक मुख्यतः शिकवण्याच्या आणि शिकण्याच्या पद्धतीत असतो. शाळेत पुस्तक हेच महत्त्वाचे साधन असते. मग परीक्षाही असते. निसर्ग शिक्षण मात्र निरीक्षण आणि अनुभव यांचा जास्त वापर करून घेते. अशाच एका भन्नाट निसर्गशाळेची आगळी-वेगळी गोष्ट! 

• भिजणे आणि पाऊस मोजणे
(अभिजीत कुलकर्णी)
या पावसाळ्यात तुम्हाला आनंद अन् ज्ञान देणारं काहीतरी भन्नाट करायचंय का? तर मग तुम्ही 'भवताल'च्या भिजूया आणि 'भिजूया आणि मोजूया' या उपक्रमात नक्की सहभागी व्हा. त्या अंतर्गत महाराष्ट्राच्या सर्व भागांतील लोक मिळून दररोज पाऊस मोजत आहोत, वेगवेगळी निरीक्षणे घेत आहेत. या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाविषयी...

• इको अपडेट्स
अवतीभवतीच्या पर्यावरणीय घटनांचा आढावा.

• भवताल बुलेटीन
'भवताल'चे विविध उपक्रम व घडामोडींची माहिती देणारे सदर...
...
सोबत अंकाची पीडीएफ प्रत, कव्हर आणि नावनोंदणी करण्यासाठीची लिंक शेअर करत आहोत. कव्हर व नावनोंदणीची लिंक आपल्या संपर्कात शेअर करावी आणि नावनोंदणी करण्याचे आवाहन करावे.

नावनोंदणीसाठी लिंक:

(आपण २०२४ या वर्षाची वर्गणी भरली नसल्यास रु. ५९० इतकी वार्षिक वर्गणी भरावी, जेणेकरून आम्हाला "भवताल"चा दर्जा यापुढेही टिकवण्यास मदत होईल.)

वर्गणी भरण्यासाठी,
G-pay: 9822840436
UPI: abhighorpade@okhdfcbank

- संपादक


Monday, 15 July 2024

व्यवसायाभिमुख कौशल्य काळाची गरज

 व्यवसायाभिमुख कौशल्य काळाची गरज

- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

 

            मुंबईदि. १५ : कौशल्य ही आजच्या काळाची गरज आहे. प्रत्येकाकडे आपल्या व्यवसायातील कौशल्य असणे आवश्यक आहे.आपल्या व्यवसाय वृध्दी अथवा जीवन जगताना देखील कौशल्य आवश्यक आहे, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी संगितले.

               एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय परिसरातील राज्य नाविन्यता सोसायटी येथे जागतिक कौशल्य दिनाचे औचित्य साधून  महाराष्ट्र राज्य कौशल्य,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाद्वारे प्रशिक्षणार्थींनी विविध क्षेत्रात केलेल्या यशाबद्दल व उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी पारितोषिक वितरण सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री श्री.आठवले बोलत होते. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, विभागाचे सचिव गणेश पाटील,आयुक्त निधी चौधरी, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.अपूर्वा पालकर, व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण मंडळाचे संचालक दिगंबर दळवी यांच्यासह औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य, कौशल्य विकास विभागातील अधिकारी यावेळी उपस्थित होते.

            मंत्री श्री.आठवले म्हणाले कीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील युवकांमध्ये कौशल्य वृध्दीसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत.त्याच धर्तीवर राज्याचे कौशल्य विकास मंत्री यांनीही राज्याच्या कौशल्य विकासाला गती दिली आहे.उद्योजकांना त्यांच्या क्षेत्रातील कार्यकुशल मनुष्यबळ तयार केले जावे यासाठी राज्य शासन चांगला प्रयत्न करत आहे.

                        अधिकाधिक रोजगार निर्माण करणार - मंत्री मंगलप्रभात लोढा

      मंत्री श्री.लोढा म्हणाले की,राज्यात रोजगार निर्माण करण्यासाठी कौशल्य विकास विभाग काम करत आहे. कौशल्य विकास विभाग,उद्योजक यांच्या समन्वयातून सर्वाधिक रोजगार निर्माण केले जातील. यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.कौशल्य विकास विभागाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबविणे आणि विभागाला यशाकडे नेण्यासाठी  सर्वांनी या कामात  उत्स्फुर्त सहभाग घ्यावा.

            कौशल्य विकास विभागाचे सचिव श्री. पाटीलआयुक्त श्रीमती चौधरीमहाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. पालकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कौशल्य विकास विभाग आणि औद्योगिक आस्थापनांमध्ये  मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबाबत सामंजस्य करार झाला. जागतिक कौशल्य दिनाचे औचित्य साधून  महाराष्ट्र राज्य कौशल्य,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाव्दारे प्रशिक्षणार्थींनी विविध क्षेत्रात केलेल्या यशाबद्दल यशस्वी उमेदवारांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला.यावेळी महाराष्ट्र राज्य शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनांचे (MAPS) पोर्टलचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

            उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्पर्धेतील विजेत्या संस्थांमध्ये राज्यस्तरीय पुरस्कारामध्ये  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांनी चांदूरबाजारजिल्हा - अमरावती या संस्थेला प्रथम क्रमांकशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थानांदेडजिल्हा- नांदेड संस्थेला व्दितीय क्रमांक तर  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाऔंध. पुणे (मुलींची)जिल्हा-पुणे या संस्थेचा तृतीय क्रमांक आला.

            विभागीय उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये मुंबई विभागात फादर अॅग्नेल खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थावाशी, जिल्हा- ठाणेपुणे विभागात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था शिरुरजिल्हा-पुणे,नाशिक विभागात औद्योगिक प्रशिक्षण संस्थाकळवणजिल्हा नाशिक, छत्रपती संभाजीनगर मध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंबड जिल्हा जालना विभाग,अमरावती विभागात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थानांदगाव खंडेश्वरजिल्हा अमरावती,नागपूर विभागात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थावर्धाजिल्हा वर्धा यांना पारितोषिक देवून गौरविण्यात आले.

                                                            ००००

अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार रिक्त पदे लवकरच भरणार

 अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार रिक्त पदे लवकरच भरणार

-  महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

  

            मुंबई, दि. १५  : राज्यातील अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार ६९० रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

            मंत्री कु.तटकरे म्हणाल्या कीएकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण/ आदिवासी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रांमध्ये अंगणवाडी मदतनीसांची १३ हजार ९०७ रिक्त पदे आहेत. शहरी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रांमध्ये ७८३ अंगणवाडी मदतनीसांची रिक्त पदे आहेत. त्यानुसार ३१ ऑगस्ट २०२४ अखेरपर्यंत राज्यातील १४ हजार ६९० मदतनीसांची रिक्त पदे भरण्यात यावीतअशा सूचना सर्व जिल्हा व प्रकल्पस्तरावर देण्यात आल्या आहेत.

            याबाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. इच्छुक महिलांनी अर्ज सादर करावेतअसे आवाहन मंत्री कु. तटकरे यांनी केले आहे.


Featured post

Lakshvedhi