Saturday, 13 July 2024

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित

 विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित

 

            मुंबईदि. १२ : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. याबाबतची घोषणा  विधानसभेत अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केली.

विधानसभेत प्रत्यक्षात ९१ तास २ मिनिटे कामकाज

            विधानसभेत प्रत्यक्षात ९१ तास  २ मिनिटे कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज ७ तास झाले. या अधिवेशनात विधानसभेत सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती ८८.४८  टक्के होतीतर एकूण सरासरी उपस्थिती ही ६७.७८ टक्के इतकी होती.

            विधानसभेत पुर्न:स्थापित १० शासकीय विधेयके मांडण्यात आली. त्यापैकी ८ विधेयके संमत झाली.  तसेच सभागृहात नियम २९३ अन्वये एकूण प्राप्त सूचना ४ असून ४ सूचना मान्य करण्यात आल्या. त्यापैकी मान्य केलेल्या  दोन सूचनांवर चर्चा झाली. या अधिवेशनात सहकार्य केल्याबद्दल अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी सर्वांचे आभार मानले.

००००

विधान परिषदेचे कामकाज राष्ट्रगीताने संस्थगित

 विधान परिषदेचे कामकाज राष्ट्रगीताने संस्थगित


            मुंबईदि. १२ : विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनचे कामकाज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले.ही घोषणा उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी विधान परिषदेत केली.

            यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विधान परिषदेचे सदस्य उपस्थित होते.

            दि. २७ जून ते दि. १२ जुलै२०२४ या दरम्यान अधिवेशनाच्या  कामकाजात एकूण बैठकींची संख्या १३, प्रत्यक्षात झालेले कामकाज ६० तास, २६ मिनिटे, रोजचे सरासरी कामकाज ४ तास ३८ मिनिटे, अन्य कारणांमुळे वाया गेलेला वेळ.

६ तास १० मिनिटेनवनिर्वाचित सदस्यांचा परिचय  ०४ सदस्य,  अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले ०२शोक प्रस्ताव ५, अभिनंदनपर प्रस्ताव १,

            तारांकित प्रश्न प्राप्त झालेल्या प्रश्नांची संख्या १४९४स्वीकृत झालेल्या प्रश्नांची संख्या ४२८उत्तरीत झालेल्या प्रश्नांची संख्या ५५ अशी होती.

            अतारांकित प्रश्न प्राप्त झालेल्या प्रश्नांची संख्या २तारांकित प्रश्नांतून अतारांकित झालेल्या प्रश्नांची संख्या  ३५६,  प्राप्त झालेल्या उत्तरित प्रश्नांची संख्या (मागील सत्रातील स्वीकृत प्रश्नांसह) १८०, अल्पसूचना प्रश्न प्राप्त झालेली संख्या निरंक,स्वीकृत झालेली संख्या निरंक, उत्तरित झालेली संख्या निरंक            सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीसंबंधी अर्धा तास चर्चेच्या सूचना प्रश्नांच्या उत्तरातून उद्भवलेल्या - प्राप्त झालेली संख्या २४, स्वीकृत झालेली संख्या १३चर्चा झालेली संख्या ०१, इतर बाबीतील (सर्वसाधारण) प्राप्त झालेली संख्या ४१, स्वीकृत झालेली संख्या ३३, चर्चा झालेली संख्या ०४ 

            म.वि.प. नियम ९३ अन्वयेच्या सूचना : प्राप्त सूचना ५२स्वीकृत सूचनांची संख्या १३सभागृहात निवेदने झालेल्या सूचनांची संख्या १३, सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आलेली एकूण निवेदने ९म.वि.प.नियम २६० अन्वये प्रस्ताव प्राप्त झालेल्या प्रस्तावांची संख्या ०४, चर्चा झालेल्या प्रस्तावांची संख्या ०४,

            म.वि.प.नियम २८९ अन्वये प्रस्ताव प्राप्त झालेल्या प्रस्तावांची संख्या ३३, मान्य झालेल्या प्रस्तावांची संख्या निरंक, चर्चा झालेल्या प्रस्तावांची संख्या निरंक.

            शासकीय ठराव, सूचनांची संख्या १, लक्षवेधी सूचना प्राप्त झालेल्या सूचनांची संख्या ५४९, मान्य झालेल्या सूचनांची संख्या १२८,चर्चा झालेल्या सूचनांची संख्या ३३विशेष उल्लेखाच्या सूचना प्राप्त सूचनांची संख्या  १९०, मांडण्यात आलेल्या व पटलावर ठेवलेल्या सूचनांची संख्या : १५७.

औचित्याचे मुद्दे : प्राप्त झालेले औचित्याचे मुद्दे १०९मांडण्यात व पटलावर ठेवण्यात आलेले औचित्याचे मुद्दे  ८३, नियम ४६ अन्वये मंत्री महोदयांनी केलेली निवेदने  ०२,  नियम ४७ अन्वये केलेली निवेदने निरंक.

            अल्पकालीन चर्चा (म.वि.प.नियम ९७ अन्वये )प्राप्त सूचनांची संख्या ०८,  मान्य झालेल्या सूचनांची संख्या ०८, चर्चा झालेल्या सूचना निरंक.             

            शासकीय विधेयके – विधानपरिषद ०३, विधानपरिषद विधेयके पुरःस्थापित करण्यात आली ०३,संमत करण्यात आलेली विधेयके.

विधानसभा विधानसभा विधेयके पारित करण्यात आली ०६, विधानसभेकडे शिफारशीशिवाय परत पाठविण्यात आलेली विधेयके (धन विधेयक) ०३संयुक्त समितीकडे पाठविलेले विधेयकअशासकीय विधेयकेप्राप्त झालेल्या सूचना ०६स्वीकृत सूचना ०३, पुरःस्थापना ०३विचारार्थ ०३,

        अशासकीय ठराव : एकूण प्राप्त झालेल्या सूचनांची संख्या ९०, स्वीकृत झालेल्या सूचनांची संख्या ७५,चर्चा झालेल्या सूचनांची संख्या निरंकअंतिम आठवडा प्रस्तावाची संख्या ०१सन्माननीय सदस्यांची उपस्थिती जास्तीत जास्त उपस्थिती ९० टक्के, कमीत कमी उपस्थिती ४४ टक्के, एकूण सरासरी उपस्थिती ७७.०८ टक्के

विधानपरिषदेच्या 11 जागांचे निकाल जाहीर

 विधानपरिषदेच्या 11 जागांचे निकाल जाहीर

 

      मुंबईदि. 12 : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक जाहीर केली होती. महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे निवडून दिल्या जाणाऱ्या विधानपरिषदेच्या 11 सदस्यांच्या रिक्त होणाऱ्या जागांकरिता आज 12 जुलै 2024 रोजी मतदान व मतमोजणी करण्यात आली.

            या निवडणुकीत श्रीमती पंकजा गोपीनाथराव मुंडेयोगेश कुंडलिक टिळेकर,डॉ.परिणय रमेश फुके,अमित गणपत गोरखेडॉ. प्रज्ञा राजीव सातवकृपाल हिराबाई बालाजी तुमानेभावना पुंडलिकराव गवळीशिवाजीराव यशवंत गर्जेराजेश उत्तमराव विटेकरसदाभाऊ रामचंद्र खोत आणि मिलिंद केशव नार्वेकर हे11 सदस्य विजयी झाले आहेतअशी घोषणा विधानमंडळ सचिवालयाचे सचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.जितेंद्र भोळे यांनी केली.

            विधानपरिषद सदस्य डॉ. मनीषा श्यामसुंदर कायंदेविजय विठ्ठल गिरकरअब्दुल्ला खान अ.लतीफ खान दुर्राणीनीलय मधुकर नाईकॲड. अनिल दत्तात्रय परब,रमेश नारायण पाटीलरामराव बालाजीराव पाटीलडॉ. वजाहत मिर्झा अथेर मिर्झाडॉ. प्रज्ञा राजीव सातवमहादेव जगन्नाथ जानकर आणि जयंत प्रभाकर पाटील हे 27 जुलै 2024 रोजी विधान परिषदेतून निवृत्त होत आहेत. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाकडून ही निवडणूक घेण्यात आली होती.

000

महाराष्ट्र हेच माझे कुटुंब: अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्र्यांची ग्वाही प्रत्येक तालुक्यात 'संविधान भवन' उभारणार

 महाराष्ट्र हेच माझे कुटुंब: अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्र्यांची ग्वाही

प्रत्येक तालुक्यात 'संविधान भवनउभारणार

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबईदि. १२: महाराष्ट्र हे एक कुटुंब मानून सातत्याने अनेक कल्याणकारी योजना आखल्या. शासनाने गेल्या दोन वर्षात सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा विचार केला आहे. लोकोपयोगी योजनांमध्ये शेतकरीकामगारमहिला-भगिनीयुवाज्येष्ठ नागरिक या प्रत्येक घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला असून जनतेचे दुःख हलकं करू शकलो याचे समाधान असल्याचे सांगत राज्यातल्या प्रत्येक तालुक्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनच्या धर्तीवर संविधान भवन’ उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. विरोधी पक्षाने मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जाहीर केलेल्या घोषणा अशा :

•           राज्यात वीरशैव कक्कय्या आर्थिक विकास महामंडळमहाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणार

•           चंद्रपूर येथील श्री माता महाकाली मंदिर यात्रा परिसर विकास आराखड्यासाठी २५० कोटी देणार

•           मुंबई महानगरपालिका सफाई कामगारांच्या सेवा निवासस्थानांचा पुनर्विकास. सफाई कामगारांच्या विस्थापन भत्त्यामध्ये वाढ

•           १५ वर्षाच्या आतील परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्यास प्रतिदिन ५० रुपये विलंब शुल्क आकारण्यास स्थगिती देण्याचा निर्णय

•           पालघरला विमानतळ करणार

विरोध पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले कीआम्ही गेली दोन वर्ष सुखाचा आणि समृध्दीचा मंत्र घेऊन राज्याचा गाडा रुळावर आणला. आम्ही जनतेच्या दारात जाऊन काम केलं. त्यांच्या समस्या सोडवितानाच हे राज्य सर्व आघाड्यांवर देशात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न केले. आज महाराष्ट्र देशात अनेक पातळ्यांवर अव्वल आहेही सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

सुखी कुटुंबाचा विचार..

            मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत वर्षाला १८ हजार रुपयांचा माहेरचा आहेर आम्ही देतोय.अन्नपूर्णा योजनेंतर्गत वर्षाला तीन मोफत गॅस सिलिंडरमहिलांना ५० टक्के तिकीट दरात आणि ज्येष्ठांना मोफत एसटी प्रवासाचा लाभशेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठामुलींच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च आता सरकार घेणार आहेयुवा अप्रेंटिंसशीप योजनेतंर्गत १० लाख सुशिक्षित तरुणांना १० हजार रुपयांपर्यंतचा स्टायपेंडमहात्मा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती दीड लाखांवरून ५ लाखांपर्यंत वाढविलीज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थस्थळ दर्शन योजनाही आणली एका सुखी कुटुंबासाठी काय हवं काय नको याचा विचार करून सरकारने योजना आखल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

नियम अटी बाजूला सारत शेतकऱ्यांना मदत

            नियम अटीं बाजूला सारत आम्ही शेतकऱ्यांना मदत केली. शेतकऱ्यांना १ रुपयांत पीक विमाकिसान सन्मान निधीतून केंद्र आणि राज्याचे ३६ हजार कोटी रुपये दिले. ४४ हजार कोटींच्या योजना शेतकऱ्यांच्या समृध्दीसाठी राबवतोयशासनाने १२३ सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली आहे. त्यामुळे १६ लाख ५७ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आम्ही दोन वर्षांत २८४ कोटींची मदत दिली आहे. आमच्या काळात २ लाख ३९ हजार कोटींची थेट परकीय गुंतवणुक आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीशासनाने शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या संपूर्ण योजनांचा विचार केला, तर गेल्या दोन वर्षांत शेतकऱ्यांना ७५ हजार ७१० कोटींचा लाभ दिला आहे. अन्नदात्याच्या पाठिशी उभं राहता आल्याचे आम्हाला समाधान आहे. कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेत नुकतेच राज्य सरकारला कृषी नेतृत्व समितीचा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कारही मिळाला आहेअसेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पुन्हा मिळवली उद्योग स्नेही राज्याची ओळख

            आमच्या काळात गुंतवणूक आलीउद्योग आले आणि त्यातून रोजगारही निर्माण होत आहे. उद्योग स्नेही राज्य ही महाराष्ट्राची ओळख आम्ही पुन्हा मिळवली. राज्यात उद्योग येऊ लागल्याने त्याचा परिणाम परकीय गुंतवणुकीत दिसत आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत प्रथम आहे. जुलै २०२२ ते आजतागायत १९१ उद्योगांना देकारपत्र दिले आहेत. राज्यात १ लाख ७१ हजार कोटी गुंतवणूक आणि १ लाख २० हजार रोजगार निर्माण होणार आहेत. राज्यात मेगा लेदर फूटवेअर क्लस्टर डेव्हलपमेंटपीएम मित्रामल्टी मोडल लॉजिस्टिक्स पार्क करण्यात येत आहे. राज्याचे आयटी धोरण तयार केले असून नवे वस्त्रोद्योग धोरणातून अनेकांच्या हाताला काम मिळणार आहे. रत्नागिरीमध्ये आंबा-काजू पार्क करण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मराठवाडा वॉटर ग्रीड योजना गेम चेंजर ठरणार

            मराठवाड्याची दुष्काळवाडा ही ओळख पुसल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीअशी ग्वाही देताना मराठवाडा वॉटर ग्रीड योजना या भागासाठी गेम चेंजर ठरणारी आहे. अनेक वर्ष या योजनेची चर्चा आहे. परंतुआम्ही ही योजना आता राज्य सरकारच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी मित्रा’ मार्फत जागतिक संस्थांकडून आवश्यक निधी उभारण्यासाठी कार्यवाही सुरू असून बोलणी अंतिम टप्प्यात आहे. निधी प्राप्त झाल्यानंतर युद्धपातळीवर काम हाती घेण्यात येईलअसेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दोन वर्षांत मुंबईतले १०० टक्के रस्ते काँक्रिटचे

            राज्यात ८ लाख कोटींची पायाभूत सुविधांची कामे सुरू असल्याचे सांगत येत्या दोन वर्षांत मुंबईतले १०० टक्के रस्ते काँक्रिटचे होणार असून कोस्टल रोडची वरळीपर्यंतची मार्गिका आम्ही खुली केली आहे.  महिनाभरात सी लिंकलाही हा रस्ता जोडला जाईल. मुंबईचा हाच कोस्टल रोड आम्ही विरारहून पुढे डहाणूपर्यंत नेणार असून रेसकोर्सवर ३०० एकरमध्ये जागतिक दर्जाचे सेंट्रल पार्क उभारतोयअसे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मराठाओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही

            आम्ही मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे १० टक्के आरक्षण दिले. हा निर्णय घेतल्यापासून शिक्षणपद भरतीमध्ये मराठा समाजातील उमेदवारांना लाभ झाला आहे. आमच्या शासनाने ५ हजार अधिसंख्य पदांवर नियुक्ती दिली. दोन वर्षांत १ लाख सरकारी पदभरती पूर्ण करण्यात आली. दरवर्षी १० लाख तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देतानाच अन्य समाज घटकांवर अन्याय होऊ देणार नाही. आरक्षण हा राजकारणाचा विषय नाही, तर त्यातून सामाजिक सलोखा अबाधित रहावा यासाठी शासनाची प्रामाणिक भूमिका आहे.

००००


 

वृत्त क्र. 851


सन 2024 चे महाराष्ट्र विधानमंडळाचे (पावसाळी) अधिवेशन

 सन 2024 चे महाराष्ट्र विधानमंडळाचे (पावसाळी) अधिवेशन

 

दोन्ही सभागृहात संमत विधेयके  : 10

(1)       महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक2024 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

(2)       सन 2024 चे वि.प.वि.क्र.3- महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ (सुधारणा) विधेयक2024 (कौशल्यरोजगारउद्योजकता आणि नाविन्यता विभाग)

(3)       महाराष्ट्र विनियोजन  विधेयक2024 (वित्त विभाग)

(4)      महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन)

(5)       महाराष्ट्र (द्वितिय पुरवणी) विनियोजन विधेयक2024 (वित्त विभाग)

(6)       महाराष्ट्र कर  विषयक   कायदे  (सुधारणा) विधेयक2024  (वित्त

विभाग)

(7)      महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गास प्रतिबंध) विधेयक2024.

(8)       महाराष्ट्र खाजगी कौशल्य विद्यापीठे (स्थापना व विनियमन) विधेयक2024 (कौशल्य विकास व उद्योजकता विभाग)

(9)       महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना (सुधारणा) विधेयक2024 (नगर विकास विभाग)

(10)     महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था (सुधारणा) विधेयक2024 (विधि व न्याय विभाग)

 

०००००


चौदाव्या विधानसभा कार्यकाळात

चौदाव्या विधानसभा कार्यकाळात तब्बल १ हजार २९ तास १८ मिनिटे कामकाज मुंबई, दि. १२ : चौदाव्या विधानसभेच्या कार्यकाळात तब्बल १ हजार २९ तास १८ मिनिटे कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज ७ तास ३४ मिनिटे झाले. तर एकूण बैठकांची संख्या १३६ आहे.या विधानसभेच्या कार्यकाळात विधानसभेत सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती ९६.६५ टक्के होती, तर एकूण सरासरी उपस्थिती ही ८२.६७ टक्के इतकी होती. विधानसभेत पुर्न:स्थापित १९७ शासकीय विधेयके मांडण्यात आली त्यापैकी १८३ विधेयके संमत झाली. तसेच सभागृहात नियम २९३ अन्वये एकूण २८ सूचनांवर चर्चा झाली. १४ वी विधानसभा दि. २५ ऑक्टोबर २०१९ रोजी गठित झाली. तर सभागृहाची पहिली बैठक दि. २७ नोव्हेंबर २०१९ रोजी घेण्यात आली.

प्रलंबित, तडजोडपात्र प्रकरणासाठी २९ जुलै ते ३ ऑगस्ट २०२४ पर्यंत विशेष लोकअदालत सप्ताह

 प्रलंबिततडजोडपात्र प्रकरणासाठी

२९ जुलै ते  ऑगस्ट २०२४ पर्यंत विशेष लोकअदालत सप्ताह

            मुंबईदि.   : लोकअदालतीद्वारे पक्षकारांना जलद गतीने मिळणारा दिलासा लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याकडे प्रलंबित असलेली तडजोडपात्र प्रकरणे जलद गतीने निकाली काढण्यासाठी विशेष लोकअदालत सप्ताहाचे आयोजन केले आहेही विशेष लोकअदालत २९ जुलै ते  ऑगस्ट २०२४ या दरम्यान होणार आहे.

            लोकअदालतीमध्ये तडजोडीद्वारे निकाली निघालेल्या प्रकरणांमुळे प्रकरणातील पक्षकारांसोबत शासन आणि समाज या दोन्ही घटकांना मोठा लाभ प्राप्त झाला आहेलोकअदालतीमुळे न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात यश प्राप्त झाले आहेन्यायालयातील तडजोड पात्र प्रलंबित प्रकरणे सामंजस्यातून तडजोडीद्वारे निकाली काढण्याकरिता लोकअदालत हे प्रभावी माध्यम म्हणून समोर आलेले आहेयामुळे विशेष लोकअदालती मार्फत सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली तडजोडपात्र प्रकरणे लोकअदालतीच्या माध्यमातून निकाली काढण्यात येणार आहेत.

            सर्वोच्च न्यायालयाने लोकअदालतमध्ये ठेवलेल्या प्रकरणांची यादी  https://legalservices.maharashtra.gov.in/Site/Upload/Pdf/MAHARASHTRA.pdf  या  संकेतस्थळावर उपलब्ध आहेतरी ज्यांची प्रकरणे या यादीमध्ये असतील त्यांनी स्वतः अथवा किलांमार्फत महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणमुंबई किंवा संबंधि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधून याचा लाभ पक्षकारांनी घ्यावाअसे आवाहन सदस्य सचिवमहाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणमुंबई यांनी केले आहे.

            संपर्कासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे संपर्क क्रमांक (कंसातपुढीलप्रमाणे :  अकोला  (८५९१९०३९३०), बीड (८५९१९०३६२३), चंद्रपूर (८५९१९०३९३४), गोंदिया (८५९१९०३९३५), कोल्हापूर (८५९१९०३६०९), नांदेड (८५९१९०३६२६), धाराशिव (८५९१९०३६२५), रायगड (८५९१९०३६०६), सातारा (८५९१९०३६११), ठाणे (८५९१९०३६०४), यवतमाळ (८५९१९०३६२९), अहमदनगर (८५९१९०३६१६), अमरावती (८५९१९०३६२७), भंडारा (८५९१९०३९३६), धुळे (८५९१९०३६१८), जळगाव (८५९१९०३६१९), लातूर (८५९१९०३६२४), नंदरबार (८५९१९०३९३९), , परभणी (८५९१९०३६२२), रत्नागिरी (८५९१९०३६०८), सोलापूर (८५९१९०३६१३), वर्धा (८५९१९०३९३२), मुंबई (८५९१९०३६०१), छत्रपती संभाजीनगर (८५९१९०३६२०), बुलढाणा (८५९१९०३६२८), गडचिरोली  (८५९१९०३९३३), जालना (८५९१९०३६२१), नागपूर (८५९१९०३९३१), नाशिक (८५९१९०३६१५), पुणे (८५९१९०३६१२), सांगली (८५९१९०३६१०), सिंधुदूर्ग (८५९१९०३६०७), वाश (८५९१९०३९३७आणि मुंबई उपनगर (८५९१९०३६०२).

000

Featured post

Lakshvedhi