Sunday, 30 June 2024

सत्संग आणि आई ....*

 *सत्संग आणि आई ....*


दुपारच्या निवांत क्षणी फोन वाजला. स्क्रीनवर "आई" नाव वाचून मी सुखावले. आईबरोबर गप्पा म्हणजे वैचारिक मेजवानी. हा आनंदाचा ठेवा लुटायला मी नेहमी अधीर असते. 


माहेर दूर असल्याने प्रत्यक्ष भेटीचे योग दुर्लभच, त्यामुळे ह्या शब्दभेटीवर आम्ही मायलेकी समाधान मानतो.

        

ख्याली खुशालीची जुजबी चौकशी झाल्यावर आईने सांगितले, अगं, नुकतंच *गुरुचरित्राचे कथाप्रवचन* ऐकण्याचा योग आला. त्यातील सगळ्याच कथा अद्भभूत. ऐकताना तुझी आठवण झाली, म्हणून फोन केला.

        

आईकडून गोष्ट ऐकायला मिळणार म्हणून मी खुश.

 

*गुरुभक्ती, नामसाधना, सत्संग*


असे अनेक विषय तिच्या रसाळ गप्पांतून मला प्रसन्न बनवत होते. आई सांगत होती, 


समोरच्या 'श्रावणधारा' हौसिंग सोसायटीत हा प्रवचन सोहळा संपन्न झाला. रोज होणाऱ्या कथांतून गुरूभक्ती - श्रद्धा यांचे दाखले देत किर्तनकार श्री. विवेकबुवा गोखले ( नृसिंहवाडी - जि. कोल्हापूर ) अवीट प्रवचन करीत होते. त्यांनी सांगितलेली घटना,

        

श्री. गोखलेबुवांचे एक मित्र, उभयतां पती-पत्नी वेंगुर्ल्याला आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. त्या डॉ. सौ. कडे आलेली ही केस.

        

साधारण चाळीशीच्या घरात वय असणारी एक अपटूडेट स्त्री त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेण्यासाठी आली. तिला एका विचित्र समस्येला सामोरं जावं लागत होतं. गेल्या सहा महिन्यांपासून त्या स्त्रीला पुरूषां प्रमाणे दाढी - मिशा येत होत्या. दाट दाढी आणि मिशा.

       

ही महिला उच्चशिक्षित, मोठ्या कंपनीत उच्च पदस्थ अधिकारी. कंपनीत तिच्या हाताखाली अनेक सुशिक्षित, तज्ज्ञ स्टाफ. माहेरही तसेच वेल एज्यूकेटेड. दहा लाख रुपये पगार घेणारी ही स्त्री ह्या विचित्र प्रकाराने गोंधळली. 


अनेक डॉक्टर्स केले, परदेशात जाऊन विविध प्रकारच्या टेस्ट केल्या, निदान अनुत्तरित. उपाय दिशाहीन. 

       

पुरूषांच्या चेहऱ्यावर वाढणाऱ्या दाढी-मिशी सारखी ही दाढीमिशी रोज शेव्हिंग करून ह्या महिलेला आँफिसला जावे लागे. कोणी तरी तिला वेंगुर्ल्याच्या ह्या डॉक्टरांची माहिती दिली,आणि त्या वेंगुर्ल्याला आल्या. 


ह्या उच्चपदस्थ ,स्त्रीची अनोखी समस्या डॉ. सौ. नी लक्षपूर्वक ऐकली. तिला विश्वासात घेत तिची केसहिस्टरी जाणून घेतली. तिचं शिक्षण, बालपण, ध्येय, तिचा स्वभाव, आवडनिवड सारं बारकाईने जाणून घेतलं. नाडी परिक्षा केली आणि संध्याकाळी पुन्हा यायला सांगितले.

        

सांगितलेल्या वेळी ती महिला अधिकारी हजर झाली. यावेळी डॉ. सौ. तिच्याशी मन मोकळेपणाने बोलल्या. त्या म्हणाल्या, "हे पहा मॅडम, तुम्ही सांगितलेल्या माहितीचा मी सखोल अभ्यास केला, 


त्यावरून मला जाणवलं, ते असं की, तुम्ही उच्चशिक्षित, नोकरी करणाऱ्या, अनेक अधिकारी व्यक्तींची बॉस ही तुमची प्रतिमा. कंपनीत जबाबदारीच्या पदावर काम करताना कंपनीचा उत्कर्ष व्हावा, ह्या भूमिकेतून तुम्हाला सदैव ठाम रहावं लागत असणार. कठोर निर्णय शिस्त आणि जोखमीने अंमलात आणावे लागत असतील. तो ताणतणाव, बॉसचा एटिट्युड हे सारं तुमच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलंय, इतका तो बाणा तुमच्या नसानसात भिनलाय.

        

खरं तर एखादी जोखीम अंगावर घेणं, हे पुरूषी स्वभावाचे लक्षण आहे. *स्त्री ही प्रकृती आणि पुरुष निवृत्तीदर्शक आहे. लज्जा, सौजन्य, मार्दव हे स्त्रीचे अंगभूत गुणधर्म* तुमच्या नोकरीमुळे तुम्ही नकळतपणे दडपले आणि ऑफिस-रूटीनचे पुरूषी गुणधर्म इतके रोमरोमी भिनवले; 


की २०-२२ वर्षांच्या नोकरीत वावरताना या स्वभावाने तुमचे *हार्मोन्स* बदलले. 'स्त्रीत्व' संपून ते 'पुरुषी' बनू लागले. त्याचं मूर्तरुप म्हणजे चेहऱ्यावरील दाढी-मिशा.


बाई दचकल्या. हे निदान अनपेक्षित होतं तरीही वास्तव होतं. डॉक्टर मॅडम बोलत होत्या, "यावर उपाय आहे, 


तुमचा अँटिट्युड बदला. कपाळावर लाल रंगाची टिकली लावा, हातात एकेक तरी बांगडी घाला. एकपदरी का असेना, पण गळ्यात सोन्याचे मंगळसूत्र घाला, त्यात चार मणी, दोन वाट्या काळ्या मण्यासह दिसून येऊ देत. पायात जोडवी घाला. 'स्त्री' सारख्या दिसा.


केस मोकळे ठेेवू नका. आपल्याला जाणवत नाही, पण वाईट शक्ती मोकळ्या केेसांकडे चटकन् आकर्षित होतात. इतके करून पहा अन् ही गोळ्या औषधे घ्या. दीड महिन्याच्या अखेरीस दाखवून जा.


बाई स्तंभित. डॉक्टरांनी सुचवलेले उपाय अनुसरले आणि दिड महिन्यात फरक जाणवला. दाढी वाढण्याचे प्रमाण बरेच कमी झाले. दर दोन दिवसांनी करावी लागणारी शेव्हिंग आता आठवड्याने होत होती, तीही विरळ.

         

डॉक्टर मॅडमनी हीच वर्तणूक सदैव ठेवण्याचा सल्ला दिला. स्त्रीचे सौभाग्य अलंकार फक्त शोभेसाठी नाहीत तर स्त्रीत्वाच्या संरक्षणासाठी आहेत, हे पटवून दिले. तीन चार महिन्यांत ह्या पेशंट पूर्णपणे रिकव्हर, नाँर्मल झाल्या.

         

आई थांबली, म्हणाली, घटना ऐकताना मला तुझी आठवण आली. तिने तिच्या नातींना आवर्जून ही घटना ऐकवली.

         

शहरीकरण आणि औद्योगिकीकरणाच्या लेबलखाली आपली संस्कृती कुठे गहाण टाकतोय आपण ? मग उद्भवतात, नको ते आजार, मानसिक त्रास. आणि दवाखान्याची वारी.

         

*सत्संगाचं महात्म्य सांगणाऱ्या आईला* धन्यवाद देत मी फोन ठेवला.

मनावर विजय प्राप्त करण्याची ऊर्जा म्हणजे पंढरीची वारी

 मनावर विजय प्राप्त करण्याची ऊर्जा म्हणजे पंढरीची वारी

- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

 

            मुंबई, दि. २९ : हेचि दान देगा देवा...तुझा विसर न व्हावा....विठ्ठलाचा विसर होऊ नये यासाठी निरंतर वारी सुरू आहे. मनावर विजय प्राप्त करण्याची ऊर्जा म्हणजे वारी होय. राज्याच्या जनतेची सेवा करून त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्याचे बळ मिळावे. अशा शब्दांत  सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भावना व्यक्त केल्या.

            वारकऱ्यांचे प्रबोधन करावे आणि शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी सांस्कृतिक विभागामार्फत दोन चित्ररथ आषाढी वारीत सहभागी होणार आहेत. या चित्ररथाचा प्रारंभ आज मंत्रालय प्रांगणातून सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला. वारीत आस्थाअस्मिता आणि परंपरा घेऊन जाण्याचे काम आपले कलापथक करीत असल्याचा आनंद व्यक्त करीत वारीत जाणाऱ्या कलाकारांना मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी शुभेच्छा दिल्या.

            यावेळी प्रधान सचिव विकास खारगेसांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरेविभागाच्या उपसचिव नंदा राऊत यासह मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले कीइतरांनी हेवा करावा अशी राज्याची परंपरा आहे. वारकऱ्यांचे भाव पाहिले की कळते जगात सर्वात सुखी वारकरी आहेत. आस्था आणि अस्मितेचे प्रतिक असलेल्या पंढरपूरच्या वारीला वैशिष्ट्यपूर्ण अध्यात्मिक वारी म्हणून जागतिक नामांकन मिळावे यासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठविणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

            महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभव म्हणजे पंढरपूरची वारी होय. पंढरपूरची वारी अनुभवण्यासाठी देशातून आणि परदेशातून भक्त येत असतात. या चित्ररथांद्वारे संत सखूसंत निर्मलासंत कान्होपात्रासंत जनाबाईसंत मुक्ताबाईसंत महदंबा या स्त्री संतांची महती त्यांच्या अभंगांद्वारे भक्तांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. पोवाडापथनाट्य आणि भारूड या कलाप्रकारांच्या माध्यमातून भक्तगणांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. तसेच पुणे येथून आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात उपाययोजनाआपत्ती आल्यास घ्यावयाची काळजीशासकीय मदत यासंदर्भातील माहिती चित्ररथामार्फत देण्यात येणार आहे.

            कौल घेतला लिहून शंभर वर्षे जाण...नांगर धरिला सत्वाचा बैल मन पवनाचा....या विठूचा गजर हरीनामाचा झेंडा रोविला या संत केशवदास यांच्या रचनांवर कलापथकाने सादरीकरण केले. 'ज्ञानेश्वर महाराज की जयतुकाराम महाराज की जयया गजरात मंत्रालय परिसर दुमदुमला होता. पृथ्वी थिएटरच्या कला पथकातील २४ कलाकारांनी यावेळी सादरीकरण केले. शाहीर यशवंत जाधव यांनी अभंग सादर केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा तिथीनुसार सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विधानसभेत निवेदन

 छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा तिथीनुसार

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विधानसभेत निवेदन

 

            मुंबईदि.२९ छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा दरवर्षी तिथीनुसार करण्याची घोषणा रायगड येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आली आहे. शासनाकडून रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक सोहळा दरवर्षी साजरा करण्याचे ठरवले असून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी घोषणा अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे.

            ही बाब केवळ छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्यापुरतीच मर्यादित आहे. किल्ले रायगड येथे असलेल्या शिलालेखावर राज्याभिषेकाची तारीख नसून तिथी ज्येष्ठ शुध्द त्रयोदशी असा उल्लेख करण्यात आलेला आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत निवेदनातून दिली.

             याबाबत विधानसभा सदस्य  जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला

जाहिरात फलकाच्या कायद्यांत सुधारणा करण्यासाठी समिती गठीत करणार

 जाहिरात फलकाच्या कायद्यांत सुधारणा करण्यासाठी समिती गठीत करणार

- उद्योग मंत्री उदय सामंत

            मुंबई, दि. २९ : सार्वजनिक रस्ते व पदपथावरुन दृष्यमान होणाऱ्या जाहिरात फलकांचे ऑडीट करण्याचे निर्देश देण्यात आलेले असून जाहिरात फलकांच्या कायद्यासंदर्भात सुधारणा करण्यासाठी समिती गठीत करण्यात येणार आहे. याबाबत तज्ञांची नावेकाही सूचना आल्यास त्याचा स्वीकार करण्यात येईलअसे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितले.

            घाटकोपरमुंबई येथे १३ मे २०२४ रोजी महाकाय जाहिरात फलक पेट्रोलपंपावर कोसळून झालेल्या अपघाताबाबत उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री श्री.सामंत बोलत होते.

            मंत्री श्री.सामंत यांनी सांगितले कीभविष्यात अशी घटना घडू नये यासाठी शासन प्रयत्नशील असून डिजीटल होर्डींग्ज संदर्भातही सर्वेक्षण केले जाईल. अनधिकृत असलेल्या होर्डिंग्जवर नियमानुसार कारवाई केली जाईल. या अपघातात जखमी व्यक्तींपैकी ज्या १३ व्यक्तिंनी ७ दिवसापेक्षा जास्त उपचार घेतले त्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून रु.१६ हजार प्रमाणे व पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधी अंतर्गत प्रत्येकी एकूण रु.२ लक्ष १६ हजार इतके अर्थसहाय्य करण्यात आले आहे. जखमी व्यक्तींपैकी १३ व्यक्तिंनी ७ दिवसापेक्षा कमी उपचार घेतले त्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून रु.५ हजार ४०० प्रमाणे व पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधी अंतर्गत प्रत्येकी रु.२ लक्ष इतके अर्थसहाय्य करण्यात आले आहे. या अपघात ग्रस्तांपैकी १७ मृत व्यक्तिंच्या वारसांना राज्य शासनाद्वारे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी रु.५ लाख या प्रमाणे एकूण रु.८५ लाखराज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून प्रत्येकी रु. ४ लाख याप्रमाणे एकूण रु.६८ लाख व पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधी अंतर्गत प्रत्येकी रु.२ लक्ष इतके अर्थसहाय्य करण्यात आले आहे. यानुसार मृत व्यक्तिंच्या वारसांना प्रत्येकी रु.११ लाख इतके अर्थसहाय्य करण्यात आले आहे.

            या अपघाताच्या अनुषंगाने राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडून प्राप्त अहवालातील निष्कर्षांच्या आधारे शासनाने या घटनेची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे. समितीद्वारे पुढील चौकशीची कार्यवाही सुरु आहे तसेचतत्कालीन पोलीस आयुक्तलोहमार्ग मुंबई यांच्याकडून प्रथमदर्शनी अनियमितता झाल्याचे निर्दशनास आल्याने त्यांना शासनाने निलंबित केले आहे. संबंधित घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक करण्यात आली असून त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती मंत्री श्री. सामंत यांनी दिली.

            बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिनियमानुसार सार्वजनिक रस्ते व पदपथावरुन दृश्यमान होणाऱ्या जाहिरात फलकास परवानगी घेणे अनिवार्य आहे. शासनाने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आकाशचिन्हे जाहिरात प्रदर्शित करण्याकरिता नियमन व नियंत्रण करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे निश्चित केली आहेत. यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे उचित कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती, श्री.सामंत यांनी यावेळी दिली.

            या चर्चेत सदस्य सुनील शिंदेजयंत पाटीलशशिकांत शिंदेअनिल परबभाई जगतापअभिजित वंजारीसचिन अहिरआदी सदस्यांनी सहभाग घेतला.

००००

श्रीमती वंदना थोरात/विसंअ/


महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाचे काम शेतकऱ्यांचे समाधान केल्यावरच

 महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाचे काम

शेतकऱ्यांचे समाधान केल्यावरच

-   सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे 

 

            मुंबई, दि. २९ : महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील पवनार ते  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी या दरम्यान होणा-या शक्तीपीठ महामार्गाचे काम संबंधित शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्याचसोबत स्थानिक नागरिकांच्या अपेक्षा समजून घेऊन त्यानंतरच पुढे न्यावेअसे मुख्यमंत्री यांचे निर्देश असून जनभावनेचा आदर करुनच कार्यवाही करण्यात येईलअसे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत  सांगितले.

            राज्यात नव्याने शक्तीपीठ महामार्ग बांधण्यात येणार आहेयासंदर्भात सदस्य सतेज पाटील यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री श्री.भुसे बोलत होते.

            श्री. भुसे यांनी सांगितले की हा महामार्ग महत्वपूर्ण असून लोकप्रतिनिधी तसेच स्थानिकांना विश्वासात घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल. महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांमधून जात असून पुढे गोवा राज्यामध्ये प्रवेश करणार आहे. १२ जिल्ह्यांमधील विविध देवस्थानेसंताची कर्मभूमी असलेले मराठीचे आद्यकवी अंबाजोगाई स्थित मुकुंदराज स्वामीजोगाई देवी तसेच औंढ नागनाथ व परळी वैद्यनाथ येथील २ ज्योर्तिलिंग व महाराष्ट्राचे आराध्यदैवत पंढरपुर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरही जोडले जाणार आहेत. तसेच कारंजा (लाड)माहूरअक्कलकोटगाणगापुरनरसोबाची वाडीऔदुंबर ही दत्त गुरुची धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत. या महामार्गामुळे शेतकऱ्यांचा शेतीमाल व इतर सर्व दळण-वळण कमी वेळेत होईल. वर्धा ते सिंधूदुर्ग हा प्रवास सध्या १८ तासांत होतो तो या महामार्गामुळे अवघ्या आठ तासात शक्य होणार आहे.यातुन वेळेचीइंधनाची बचत होईल व महामार्ग परिसराचा विकास होण्यास मदत होईलअशी माहिती मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी दिली.

            उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पुढील आठवड्यात याबाबत सदस्यांसोबत  सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी बैठक घ्यावीअसे सूचित केले.

            या लक्षवेधीत सदस्य  शशिकांत शिंदे,भाई जगताप आदी सदस्यांनी सहभाग घेतला.

 

0000

आळंदी येथे तुळशी वृंदावन वास्तुशिल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

 आळंदी येथे तुळशी वृंदावन वास्तुशिल्पाचे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

 

            पुणेदि. : २९: आळंदी नगरपालिका निधीतून उभारण्यात आलेल्या तुळशी वृंदावन वास्तुशिल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

            यावेळी खासदार श्रीरंग बारणेमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटेनगर परिषदचे मुख्याधिकारी कैलास केंद्रेआळंदी संस्थानचे पदाधिकारीनगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

            यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी अंतर्गत वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबीराचे उद्घाटनही करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्यावतीने वारकऱ्यांना  छत्र्यांचे वितरण करण्यात आले.

            मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून रुग्णांना अर्थसहाय्य मिळवण्याची प्रक्रिया निःशुल्क असून गेल्या २ वर्षात २७५ कोटींची वैद्यकीय मदत गरजूंना देण्यात आली आहे. त्यामुळे ३५ हजार रुग्णांचे प्राण वाचले आहेत.मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कोणत्या आजारांसाठी देण्यात येतो व निधी  मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहितीही यावेळी देण्यात आली.

000


 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ज्ञानोबा माऊलींच्या पादुकांचे दर्शन 'ज्ञानोबा माऊली'च्या जयघोषात श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ज्ञानोबा माऊलींच्या पादुकांचे दर्शन

'ज्ञानोबा माऊली'च्या जयघोषात श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान








 

            पुणेदि.२९ :  टाळ-मृदुंगाच्या तालावर भक्तिरसात चिंब झालेले वारकरी....  'ज्ञानोबा माऊली', 'माऊलीमाऊलीचा गजर.... डोक्यावर तुळशी वृंदावनहाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी...अशा भक्तिमय वातावरणात आळंदी येथून आषाढी वारीसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.

            आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले. यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळखासदार श्रीरंग बारणेप्रधान सचिव प्रवीण दराडेविभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवारजिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसेजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटीलप्रमुख जिल्हा  व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजननगर परिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रेश्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड. राजेंद्र उमापविश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथविश्वस्त डॉ.भावार्थ देखणेगुरु हैबतबाबा यांचे वंशज बाळासाहेब पवार - आरफळकरह.भ.प राणा महाराज वासकरह.भ.प संग्राम बापू भंडारे महाराज आदी उपस्थित होते.

            मानाच्या पालखी प्रदक्षिणेनंतर आळंदी संस्थान येथील गांधीवाडा देवस्थानाकडे पालखी सोहळ्याचे मुक्कामासाठी प्रस्थान झाले. प्रस्थान सोहळा 'याचि देही याचि डोळाअनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत.

            अर्थसंकल्पीय अधिवेशनात वारकरी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिकसांस्कृतिक परंपरा असलेल्या  पंढरपूर वारीचे जागतिक नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्याची घोषणावारीतल्या मुख्य पालख्यांतील दिंड्यांना प्रतिदिंडी २० हजार रुपयांचे अर्थसाह्य आदी महत्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल वारकरी संत महंत पाईक संघटना मधील प्रमुख महाराज यांच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वारकरी संप्रदायातील  मान्यवरांसोबत संवाद साधला. वारकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईलअसे मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत २१ ते ६० वर्ष वयोगटातील पात्र महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपये लाभ देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल येथील महिलांच्यावतीने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.

*वारकऱ्यांसाठी शासनातर्फे सुविधा

            आषाढी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासनमंदिर संस्थानपुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने तयारी केली आहे. आळंदीत पाण्याची सोयविजेची सोयवैद्यकीय पथकेपालखी मार्गाचे वेळापत्रकमंदिराच्या प्रवेशद्वारावर धातूशोधक यंत्रणासुलभ शौचालयपोलीस मदत केंद्रअग्निशमन यंत्रणारुग्णवाहिकानदी पात्रात बोटीची व्यवस्थासूचना फलक अशी व्यवस्था करण्यात आली असून जागोजागी सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आलेल्या आहेत. तसेच ध्वनिक्षेपणाद्वारे  सूचनाही देण्यात येत आहे.

0000

Featured post

Lakshvedhi