Monday, 17 June 2024

My लेक कसे हुंडतातात छोटू co ला शेअर कारा



*निवृत्ती वेतन धारकांना* *सूचना*📣📣 *इन्कम टॅक्स रिटर्न भरा*, sav

 *निवृत्ती वेतन धारकांना*

*सूचना*📣📣

*इन्कम टॅक्स रिटर्न भरा*


अनेक निवृत्ती वेतनधारक बँकेत फॉर्म 16 वर स्वाक्षरी करून ज्येष्ठ नागरिकत्व सवलतीचा दावा करणारे आयटी रिटर्न भरत नाहीत. 🙏

परंतु त्यांना सा mmकळत नाही ते म्हणजे आयटी शून्य टॅक्स रिटर्न न भरल्याने ते एका मोठ्या सुविधेपासून वंचिंत   होतात  हे त्यांना माहिती नसते    पेन्शनधारक याना हे माहिती पाहिजे जेणेकरून ते या लाभापासून वंचित राहणार नाहीत.

 म्हैसूरचे श्री एन व्ही नागराज वकील यांच्याकडून. त्यांच्या या माहितीबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.

 *पेन्शनरचा अपघाती मृत्यू*

 बहुतेक निवृत्तीवेतनधारक रिटर्न भरण्यास कचरतात, परंतु, येथे एक महत्त्वाची माहिती आहे जी दर्शवते की पेन्शनधारकाच्या अपघाती मृत्यूच्या वेळी आयटी रिटर्न भरल्याने पेन्शनधारकांच्या कुटुंबाला मोठा फायदा होतो.

 मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 166 नुसार (2013 च्या दिवाणी अपील क्रमांक 9858 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, 2008 च्या SLP (C) क्रमांक 1056 वरून उद्भवलेला 31 ऑक्टोबर 2013),

 अपघातात मृत्युमुखी पडलेल्या निवृत्तीवेतनधारकाच्या कुटुंबाला मागील तीन वर्षांच्या सरासरी उत्पन्नाच्या 10 पट मिळण्याचा हक्क आहे, जर त्याने किंवा तिने मागील तीन वर्षांचे आयटी रिटर्न भरले असेल.

 उदाहरणार्थ, पेन्शनधारकाची मासिक पेन्शन २५०००/- असल्यास त्याचे वार्षिक उत्पन्न ३,००,००० आहे.  तीन वर्षांसाठी त्याचे सरासरी उत्पन्न सुद्धा सांगा, सोप्या हिशोबासाठी 3,00,000 आहे, तर त्याच्या कुटुंबाला सरकारकडून 3 लाखांच्या 10 पट - 30, 00, 000 रुपये मिळतील.  आयटी रिटर्न्स व्यतिरिक्त इतर कोणताही पुरावा कोर्टाद्वारे मान्य केला जाणार नाही.  त्यामुळे, पेन्शनधारकाने नियमितपणे आयटी रिटर्न भरणे, निवृत्तीवेतनधारकाच्या अपघाती मृत्यूनंतर त्याच्या शोकग्रस्त कुटुंबाला मोठा आर्थिक दिलासा देण्यास मदत करेल.

 या फायद्याची माहिती नसल्यामुळे आयटी रिटर्न भरण्यात अयशस्वी झाल्यामुळे पेन्शनधारकाच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबाचे मोठे नुकसान होते.

 

 *Vipin khobragade*

*CA ,Nashik*

*8087537482*

Sunday, 16 June 2024

कापूस,सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकास योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

  कापूस,सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ

व मूल्यसाखळी विकास योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 

            मुंबई, दि. 16 : कापूससोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पद्धतीस चालना देवून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्यसाखळीस चालना देण्यासाठी राज्य शासन तीन वर्षासाठी विशेष कृती योजना राबविण्यात येत आहे.   राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडिबीटी पोर्टलवर mahadbt.maharashtra.gov.in अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने कळविले आहे.

      ही विशेष कृती योजना सन 2022-23 ते 2024-25 या तीन वर्षात राबविण्यात येत आहे. सन 2024-25 मध्ये योजनेंतर्गत चालू खरिप हंगाममध्ये पुढील निविष्ठा पुरविण्यात येणार आहेत. नॅनो युरिया सोयाबीन, नॅनो डीएपी सोयाबीन, नॅनो युरिया कापूस, नॅनो डीएपी कापूस यासाठी 30 जूनपर्यंत अर्ज करावेत तर मेटाल्डीहाइड सोयाबीनसाठी 23 जून, 2024 पर्यंत महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करावेत.

       या निविष्ठांचा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जातून करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर सदर बाबींच्या टाईल्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. बियाणेऔषधे व खते या टाईल्स अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येतील.

       तरी जास्तीत- जास्त शेतकरी बांधवांनी mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

000

बकरी ईद निमित्त राज्यपाल बैस यांच्या शुभेच्छा

 बकरी ईद निमित्त राज्यपाल बैस यांच्या शुभेच्छा

 

            मुंबई, दि.16: राज्यपाल रमेश बैस यांनी ईद अल - अधा (बकरी ईद) निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

            राज्यातील सर्वांनाविशेषतः मुस्लिम बंधू-भगिनींना ईद मुबारक ! ईद  अल - अधा हा सण त्यागकरुणा व गोरगरीब तसेच उपेक्षितांच्या कल्याणासाठी परोपकाराचा संदेश देतो. या उदात्त मूल्यांच्या जपणुकीसाठी प्रयत्न करुन एक उत्तम व सर्वसमावेशक समाज निर्माण करण्याचा संकल्प करु या’, असे राज्यपाल बैस यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

00000

 

Maharashtra Governor greets people on Bakri Eid

 

            Mumbai, Date 16: The Governor of Maharashtra Ramesh Bais has greeted the people on the occasion of Eid al- Adha, which is also known as Bakri Id.

            In his message, the Governor has said: "Eid Mubarak to all, especially to Muslim brothers & sisters. The festival of Eid al - Adha gives the message of sacrifice, compassion and charity for the welfare of the poor and the less fortunate. Let us commit ourselves to these noble values to create a caring and harmonious society."

00000

 

 

 


एकात्मिक कापूस,सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकास योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 एकात्मिक कापूस,सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ

व मूल्यसाखळी विकास योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 

               मुंबई दि. 16 : कापूससोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पद्धतीस चालना देवून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्यसाखळीस चालना देण्यासाठी राज्य शासन तीन वर्षासाठी विशेष कृती योजना राबविण्यात येत आहे.   राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडिबीटी पोर्टलवर mahadbt.maharashtra.gov.in अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने कळविले आहे.

       ही विशेष कृती योजना सन २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षात राबविण्यात येत आहे. सन २०२४-२५ मध्ये योजनेंतर्गत चालू खरिप हंगाममध्ये पुढील निविष्ठा पुरविण्यात येणार आहेत. नॅनो युरिया सोयाबीन, नॅनो डीएपी सोयाबीन, नॅनो युरिया कापूस, नॅनो डीएपी कापूस यासाठी 30 जूनपर्यंत अर्ज करावेत तर मेटाल्डीहाइड सोयाबीनसाठी 23 जून, २०२४ पर्यंत महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करावेत.

       या निविष्ठांचा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जातून करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर सदर बाबींच्या टाईल्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. बियाणेऔषधे व खते या टाईल्स अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येतील.

        तरी जास्तीत- जास्त शेतकरी बांधवांनी mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

0000

Saturday, 15 June 2024

सर्व बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध, खते, बियाणे वाढीव दराने विकणाऱ्यांवर कडक कारवाई

 सर्व बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध,

खतेबियाणे वाढीव दराने विकणाऱ्यांवर कडक कारवाई

कृषी मंत्री धनंजय मुंडे

 

जून अखेरपर्यंत 75 टक्के पीक कर्ज वाटपाचे निर्देश

 

            मुंबई दि.15 – राज्यात बी बियाणे, खते मुबलक प्रमाणात उपलब्ध असून, खतांची अतिरिक्त मागणी येत्या आठवडाभरात पूर्ण होईल. बी- बियाणांची चढ्या भावाने विक्री, बोगस बियाण्यांची विक्री, लिंकिंग यासारख्या गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. तसेच जून अखेरपर्यंत 75 टक्के पीक कर्जाचे वितरण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज त्यांच्या शासकीय निवास्थानी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे बी बियाणे, खते उपलब्धतेबाबत राज्यस्तरीय आढावा घेतला. यामध्ये जिल्ह्यातील खरीप पिके, त्यांच्या बि-बियानांची व आवश्यक खतांची उपलब्धता, आतापर्यंत झालेला पाऊस, पेरणी, त्याचबरोबर बी - बियाणांची आतापर्यंत झालेली विक्री,  जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाची आकडेवारीतसेच मागील काळात वितरित करण्यात आलेला किंवा प्रलंबित असलेला पिक विमा या सर्व विषयांचा समग्र आढावा घेतला. या बैठकीसाठी सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, महाबीजचे अधिकारी, कृषी संचालक, कृषी आयुक्त, विभागीय कृषी सहाय्यक संचालक, तसेच सर्व जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी व गुण नियंत्रण विभागाचे संचालक व अन्य अधिकारी आदी दुरदृश्य प्रणालीद्वारे  उपस्थित होते. 

 

मंत्री श्री. मुंडे म्हणाले कीबी-बियाणेखत, पुरवठा वितरण सुरळितरित्या पार पाडण्यासाठी विभागाने व संचालक गुणनियंत्रण यांनी सतर्क रहावे. राज्यात सर्वच जिल्ह्यात मुबलक बी बीयाणे आणि खतांचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे कृषी विभाग आणि जिल्हा कार्यालयाने संयुक्तिकरित्या कार्यवाही करून अधिक किमतीने बी-बियाणे अथवा खतांची विक्री करत असल्यास संबंधितांवर कारवाई करून अहवाल सादर करावा. प्रत्येक तालुक्यात किमान तीन भरारी पथके नेमावेत आणि त्यांनी दररोज किमान 25 दुकानांना रँडम पद्धतीने भेटी द्याव्यात.  परभणी आणि यवतमाळ येथे खतांच्या बाबतीत तुटवडा असेल तर त्यावर उपाययोजना करून तात्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना मंत्री मुंडे यांनी दिल्या.

राज्य शासनाने जारी केल्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्याने आपला स्वतःचा एक इमर्जन्सी हेल्पलाईन व व्हाट्सप नंबर स्थानिक स्तरावर जाहीर करावा, जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी त्यावरील तक्रारीची स्वतः दखल घ्यावी तसेच एक तासात शहानिशा करून त्या तक्रारींचे निरसन करावे, असे निर्देश धनंजय मुंडे यांनी यावेळी दिले आहेत. 

 

प्रत्येक जिल्ह्यात पोलीस दलामार्फत किमान एक उपविभागीय पोलीस अधिकारी कृषी विभागासाठी समन्वयक म्हणून नेमावेत व त्यांनी पूर्णवेळ या कामाचे पोलीस सहाय्य उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही सांभाळावी, अशा सूचना जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांना केल्या. 

सोयाबीनच्या उगवण क्षमतेबाबत आतापासूनच जनजागृती करुन शेतकऱ्यांना घरच्या घरी उगवण क्षमता तपासणी करण्याबाबत मोहिम राबवावी तसेच खतांचे नमूने वेळोवेळी तपासले जावेत अशा सुचना श्री.मुंडे यांनी यावेळी दिल्या.

 

            या सर्व कार्यवाहीची अंमलबजावणी येत्या दोन दिवसात करणे अनिवार्य आहे. आवश्यक तिथे महसूल व ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांचीही मदत घ्यावी, याबाबत वरिष्ठ स्तरावर निर्णय घेण्यात येईल. काही जिल्ह्यात अद्याप पावसाचे प्रमाण कमी असल्याने पेरण्याही उशिरा होतील. या दृष्टीने व अन्य कारणांनी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट राज्यात सरासरी 35 ते 40 टक्क्यांच्या घरात सध्या पोहोचले आहेमात्र दरवर्षीचा अनुभव पाहता पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट जून महिने अखेर 75 टक्के च्या पुढे गेलेच पाहिजे. तसेच या बाबीचा प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावर दर आठवड्याला आढावा घ्यावाअशाही सूचना मंत्री श्री. मुंडे यांनी केले आहेत. 

 

००००

 

 

 

 

 

मुंबई पदवीधर विधानपरिषद मतदारसंघात 89928 मतदार; 139 मतदान केंद्र 765 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती

 मुंबई पदवीधर विधानपरिषद मतदारसंघात 89928 मतदार139 मतदान केंद्र

765 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती

            मुंबई दि 15:- भारत निवडणूक आयोगाने  अधिसूचनेद्वारे मुंबई पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा द्विवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात मुंबई पदवीधर विधानपरिषद मतदारसंघात पुरुष मतदार- 53041महिला मतदार -36882 5- तृतीयपंथी असे एकूण 89928 मतदार आहेत.

            मुंबई पदवीधर विधानपरिषद मतदारसंघासाठी सहा. मतदान केंद्रासह 139 मतदान केंद्र आहेत. मुंबई पदवीधर विधानपरिषद मतदारसंघासाठी 153- मतदान केंद्राध्यक्ष153- प्रथम मतदान अधिकारी (PRO), 306- इतर मतदान अधिकारी,153- शिपाई असे एकूण 765 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


Featured post

Lakshvedhi