Tuesday, 18 June 2024

खरीप-2024 साठी पीक विमा भरण्यास सुरुवात, एक रुपयात भरला जाणार पीक विमा

 खरीप-2024 साठी पीक विमा भरण्यास सुरुवात,

एक रुपयात भरला जाणार पीक विमा

- कृषीमंत्री धनंजय मुंडे

 

            मुंबई, दि. 18 : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत महाराष्ट्रात खरीप हंगाम - 2024 साठी पीक विमा भरण्याची सुरुवात आजपासून शासनाच्या https://www.pmfby.gov.in या संकेतस्थळाद्वारे करण्यात आली असूनयाही वर्षी शेतकऱ्यांना आपल्या अधिसूचित पिकांचा विमा भरण्यासाठी केवळ एक रुपया भरावा लागणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

            प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून मागील वर्षी विक्रमी 1 कोटी 70 लक्ष पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आपला पीकविमा भरून या योजनेत सहभाग घेतला होता.

शेतकऱ्यांनी आपला खरीपाचा पीकविमा 15 जुलै पूर्वी भरून घ्यावा

            खरीप 2024 साठी भातज्वारीसोयाबीनकापूसतूरमूगउडीदमकाबाजरीनाचणीभुईमूगतीळकारळेकांदा ही 14 पिके विमा योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत. तर या पिकांचा विमा भरण्याची अंतिम मुदत 15 जुलै असूनत्यापूर्वी शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा भरून घ्यावाअसे आवाहन कृषीमंत्री श्री. मुंडे यांनी केले आहे.

            योजनेतील वैशिष्ट : विमा योजनेत समाविष्ट  पिके भात(धान)खरीप ज्वारीबाजरीनाचणी(रागी)मकातूरमुगउडीदसोयाबीनभुईमुगतीळकारळेकापूस व कांदा  या  १४   पिकांसाठी ,अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांना भाग घेता येईल. अधिसूचित क्षेत्रातअधिसूचित पिके घेणारे (कूळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. पीक कर्ज घेणाऱ्या आणि  बिगर कर्जदार शेतकऱ्यांना  योजनेतील सहभाग ऐच्छिक राहीलभाडेपट्टीने शेती  करणाऱ्या शेतकऱ्यांना पिक विमा पोर्टलवर नोंदणीकृत भाडे करार अपलोड करणे आवश्यक आहे.

 ई-पीक पाहणी :- शेतकऱ्याने लागवड केलेल्या पिकाची नोंद ई-पीक पाहणी  मध्ये करावी. आपल्या मालकीच्या नसलेल्या जमिनीवर विमा काढणेउदाहरणार्थ शासकीय जमीनअकृषक जमीनकंपनीसंस्थामंदिरमस्जिद  यांच्या जमीनीवर विमा काढल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल.

              या योजनेत आपण जे पीक शेतात लावले आहे त्याचाच विमा घ्यावा. शेतात विमा घेतलेले पीक नसेल तर आपणास विमा नुकसान भरपाई पासून वंचित राहावे लागेल. यावर्षी भातकापूससोयाबीन  पिकांमध्ये महसूल मंडल मधील पिकाचे सरासरी उत्पादन नोंदवताना रीमोट सेसिंग तंत्रज्ञानाचा वापर करून येणाऱ्या उत्पादनास ४० टक्के भारांकन आणि पीक कापणी प्रयोगाद्वारे आलेल्या उत्पादनास ६० % भारांकन देऊन मंडळाचे सरासरी उत्पादन निश्चित केले जाणार आहे.

            अर्ज करण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक आहेपिक विम्यातील अर्ज हा आधार वरील नावाप्रमाणेच  असावापिक विम्यातील नुकसान भरपाई ही केंद्र शासनाच्या विमा पोर्टलद्वारे आधार संलग्न बँक खात्यामध्ये करण्यात येते. यासाठी आपले बँक खाते आधार संलग्न पेमेंट मिळण्यासाठी अधिकृत असणे आवश्यक आहे. याकरिता आपले बँक मॅनेजर माहिती देऊ शकतात आधार कार्डवरील नाव व बँक खात्यावरील नाव सारखे असावेविमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी सीएससी  विभागास  रुपये ४० मानधन केंद्र शासनाने निर्धारित करून दिलेले आहे. ते संबंधित विमा कंपनी मार्फत सीएससी विभागास दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रति अर्ज एक रुपया प्रमाणे रक्कम सीएससी चालकांना देणे अभिप्रेत आहे.

            विमा संरक्षणाच्या बाबी पुढीलप्रमाणे आहेत : पिक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घटपिक पेरणीपूर्व /लावणीपूर्व नुकसानहंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसानकाढणी पश्चात पिकाचे नुकसानस्थानिक नैसर्गिक आपत्ती मुळे नुकसान.

विमा योजनेत सहभागी होण्याकरिता शेतकऱ्याने काय करावे?

            अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी पिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांस देखील या विमा योजनेत सहभाग बंधनकारक नाही. मात्र त्यासाठी शेतकऱ्याने विमा योजना भाग घेण्याच्या अंतिम दिनांक आधी किमान ७ दिवस संबंधित बँकेस विमा हप्ता न भरणे बाबत लेखी कळवणे गरजेचे आहे. इतर बिगर कर्जदार शेतकऱ्याने आपला ७/१२ चा उताराबँक पासबुकआधार कार्ड  व पिक पेरणीचे स्वयं घोषणापत्र  घेवून प्राधिकृत बँकेत किंवा  कॉमन सर्विस सेंटर (CSC) च्या मदतीने आपण विमा योजनेत सहभाग घेऊ शकता  किंवा www.pmfby.gov.in या पोर्टलचे सहाय्य घेऊ शकता. योजनेत सहभागासाठी अंतिम मुदत  १५ जुलै २०२४ आहे.

             सर्वसाधारण पीकनिहाय विमा संरक्षित रक्कमयात जिल्हानिहाय फरक संभवतो. 

भात पिकासाठी विमा संरक्षित रक्कम हेक्टरी रु.४०००० ते ५१७६०ज्वारी रु.२०००० ते ३२५००बाजरी रु १८,००० ते ३३,९१३नाचणी रु. १३७५० ते २००००मका रु ६००० ते  ३५५९८,  तूर रु २५००० ते ३६८०२मुग २०००० ते २५८१७उडीद रु. २०००० ते २६०२५भुईमुग रु. २९००० ते ४२९७१सोयाबीन रु. ३१२५० ते ५७२६७,  तीळ रु. २२००० ते २५०००कारळे रु. १३७५०कापूस रु. २३००० ते  ५९९८३कांदा रु. ४६००० ते ८१४२२.    

            या योजनेच्या अधिक माहितीसाठी केंद्र शासनाचे कृषि रक्षक पोर्टल हेल्पलाईन १४४४७संबंधित विमा कंपनीस्थानिक कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 17 व्या हप्त्याचे वितरण राज्यातील 90.48 लाख लाभार्थींना रू. 1845.17 कोटी वितरीत होणार

 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 

17 व्या हप्त्याचे वितरण

राज्यातील 90.48 लाख लाभार्थींना 

रू. 1845.17 कोटी वितरीत होणार

- कृषी मंत्री धनंजय मुंडे

 

            मुंबईदि. 18 :    प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (एप्रिल 2024 ते जुलै 2024) 17 व्या हप्त्याचे वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसीउत्तर प्रदेश येथून करण्यात आले.

            देशातील शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबीयास रु. 2000/- प्रती हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात रू. 6000/- प्रती वर्षी लाभ दिला जातो.

            केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रतिवर्षी पुढील वेळापत्रकानुसार पात्र शेतकरी कुटुंबाच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (DBT) निधी जमा करण्यात येत आहे. पहिला हप्ता माहे डिसेंबर ते मार्च रु 2000दुसरा हप्ता एप्रिल ते जुलै रु.2000तिसरा हप्ता ऑगस्ट  ते नोव्हेंबर रु.2000 असा असेल. राज्यात पी.एम.किसान योजनेच्या एकूण 16 हप्त्यांमध्ये शेतकरी कुटुंबाच्या खात्यावर एकुण रु 29630.24 कोटी रक्कम जमा करण्यात आलेली आहे.

            देशातील एकूण 9.20 कोटी शेतकऱ्यांना सुमारे 20 हजार कोटी रक्कम वितरीत करण्यात येणार असून त्यामध्ये राज्यातील एकूण 90.48 लाख लाभार्थींना रक्कम रू. 1845.17 कोटी वितरीत होणार आहेतखरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना पिकाचे सुधारित बियाणेखते घेणेपेरणी करणे इत्यादी शेती कामासाठी या निधीचा निश्चित चांगला उपयोग होणार आहे .

००००

कबड्डीला प्रोत्साहन देण्यासाठी निधी उपलब्ध करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रीय क्रीडा संहितेनुसार राज्य कबड्डी असोसिएशन कार्यकारिणी निवडणूक घेण्याची सूचना

 कबड्डीला प्रोत्साहन देण्यासाठी निधी उपलब्ध करणार

 - उपमुख्यमंत्री अजित पवार

राष्ट्रीय क्रीडा संहितेनुसार राज्य कबड्डी असोसिएशन कार्यकारिणी निवडणूक घेण्याची सूचना

 

            मुंबई, दि. 18 : राष्ट्रीय क्रीडा संहितेचे राज्य कबड्डी असोसिएशन कार्यकारिणीने तंतोतंत पालन करावे आणि त्यानुसार राज्यस्तरीय निवडणूक पार पाडावी. तसेच कोणत्याही खेळाडूवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावीअशा सूचना उपमुख्यमंत्री तथा राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिल्या. महाराष्ट्रात कबड्डी खेळ रूजवावा - वाढवावा यासाठी प्रयत्न करावे. कबड्डीला प्रोत्साहन देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

            महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन सल्लागार समिती व कार्यकारिणीची बैठक आज दादर शिवाजी पार्क येथील कबड्डीमहर्षी शंकरराव साळवी सभागृहात अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. असोसिएशनचे उपाध्यक्ष आमदार भाई जगतापमाजी आमदार अमरसिंह पंडितदिनकर पाटीलउपाध्यक्ष शकुंतला खटावकरसहकार्यवाह बाबुराव चांदेरेखजिनदार मंगल पांडेसहकार्यवाह रविंद्र देसाईअसोसिएशनचे आजीव सदस्य अविनाश सोलवट यांच्यासह कार्यकारिणी सदस्य आणि असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीकबड्डी खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी बक्षिसांची रक्कम वाढविण्यात आली आहेत. राज्यात खेळ संस्कृतीला महत्व प्राप्त व्हावे यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. ग्रामीण भागात कबड्डी जास्त रूजली आणि वाढली असल्याने आमदार निधीजिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून दिला जातो.  कबड्डी खेळाला पूर्वीचे दिवस आणण्यासाठी असोसिएशनमार्फत प्रयत्न करायला हवेत. राष्ट्रीय संहितेनुसार कार्यकारिणी निवडणूक घेण्यात यावी. तसेच स्पोर्ट्स कोडचे पालन करण्यात यावे. २१ जून रोजी नव्याने होणाऱ्या कार्यकारिणीसाठी निवडणूक होणार असून१९ जून ही जिल्हानिहाय मतदारांची नावे स्विकारण्याची अंतिम तारीख असल्याचेही त्यांनी सांगितले.

देवळा बाहेरचा विठ्ठल!!*

 *!!देवळा बाहेरचा विठ्ठल!!*

🙏🌹🙏

काल सकाळी सहज फेरफटका मारायला खाली उतरलो..एक चक्कर संपूर्ण कॉलनी ला मारून ,सकाळची हसरी आणि प्रसन्न शांतता अनुभवून,मध्येच सुरेल किलबिल पक्षांची एकुन आणि डोंगराच्या आड निवांत निद्रा घेणाऱ्या पण अवनी मातेला आपल्या तेजाने कृत्य कृत्य करण्यास आतुर असलेल्या सूर्याचे प्रथम दर्शन घेणे हा तसा तर माझा नित्य दिनक्रम..


प्रभात ऊर्जेचा हा श्वास संपूर्ण दिवसासाठी मला drive करणारा एक फॅक्टर आहे.आणि हा कार्यक्रम गेली पंधरा वर्षे अखंड सुरू आहे..


आज ही ऊर्जा फेरी सकाळी सुरू झाली..अगदी एखाद किलोमीटर वर असलेल्या विठ्ठलाच्या मंदिरापाशी मला थोडीशी गर्दी दिसली म्हणून मी ही घुटमळलो तेथे..


पाहिले तर सात वर्षाची एक चिमुरडी आपल्या दीड वर्षाच्या भावाला बाजूला घेऊन लता दिदींचे "ज्योती कलश छलके ..." गात होती..


कपडे बेताचेच..घरची गरिबी प्रचंड असावी..पण सुरांची सरस्वती मात्र तिच्यावर प्रसन्न होती..तिच्या तेजस्वी रुपात आणि प्रतिभासंपन्न गळ्यात लक्ष्मी साक्षात उतरली होती..तिचा तो दीड वर्षाचा भाऊ सुद्धा त्याच्या वयापेक्षा कितीतरी पटीची स्वभावातील परिपक्वता दाखवत होता..शांतपणे आपल्या बहिणीची प्रतिभा तो ही कौतुकाने पाहत होता..


मला कळेना..किती सुखद अनुभव..माझी सकाळ सार्थकी लागली या आनंदात मी तिथेच रेंगाळू लागलो..एका मागे एक सुरेल गीतांची ती मैफिल मला सोडायची च नव्हती.. मंत्रमुग्ध होऊन मी तिथेच थांबलो..हळू हळू गर्दी ओसरली..आणि आता मी एकटाच होतो.. काही वेळाने त्या गान सरस्वती ने गाणे थांबवले.मला अत्यंत आदराने नमस्कार करून आपल्या भावाला सोबत घेऊन निघायच्या तयारीत ती उठली खरी आणि मला काहीतरी दिसले.. तिच्या बाजूलाच तिने एका छोट्याश्या पाटीवर काही अक्षरे लिहिली होती.. ती पाटी वाचली आणि मी ही थबकलो..


*"मला शिकायचंय...."*


दोनच शब्द..पण माझे कुतूहल शिगेला पोचले.. आस्थेने तिची चौकशी केल्यावर मला कळले तीचे नाव कस्तुरी होते..आणि तिच्या भावाचे प्रसन्न.. कस्तुरी चे बाबा संगीत विशारद होते आणि एका अपघातात त्यांना त्यांचे पाय गमवावे लागले होते.. तेव्हा पासून म्हणजे साधारण वर्ष भरापासून ते घरीच असायचे.. घरची गरिबी सुरवातीपासूनच होती पण बाबांच्या अपघाताने ती दरिद्र्याकडे वळली.. आई घरकाम करून काहीतरी मिळवायची आणि जेमतेम खाता येईल इतकच हे कुटुंब कमवत होते. संस्कारा शिवाय हे दांपत्य आपल्या मुलांना अतिरिक्त काहीही देऊ शकत नव्हते.. त्यात कस्तुरी ला वर्षभरापूर्वी नाईलाजाने शाळा सोडावी लागली.. आणि याचे दुःख कस्तुरी च्या बोलण्यातून जाणवत होते. मला समजलच नाही बोलता बोलता एक तास कसा संपला..



काका मला निघायला हवे.. आई ला मदत करायची आहे..असे म्हणून कस्तुरी, प्रसन्न ला अंगावर घेऊन लगबगीने निघाली..


ती पाटी मात्र माझ्या डोक्यातून काही निघत नव्हती..


*"मला शिकायचंय..."*


विचारांच्या चक्रातून मी बाहेर येतच नव्हतो..माझ्या मुलीचे demands मला आठवू लागले.अमुक एक प्रकारची च बॅग हवी म्हणून असलेला तिचा हट्ट,आणि तो पुरवण्यासाठी आम्हा उभयतां चा चाललेला आटापिटा..सगळे डोळ्यासमोरून हटतच नव्हते..मला शिकायचंय..


शिकण्यासाठी केव्हढी तपश्चर्या करावी लागतेय..सकाळी उठून आपल्या दीड वर्षाच्या भावाला घेऊन गळ्यातल्या सरस्वतीचा आविष्कार इतरांना देऊन त्यात ही भीक ना मागता फक्त एकच अपेक्षा, मला शिकायचंय..


खरंच मला जड होते का तिला शिकवणे?? असे किती पैसे लागतील??? महिना दोन ते तीन हजार ..जास्तीत जास्त..मला खरंच फार नव्हती ही रक्कम..पण द्यावे की नाही हा संभ्रम मात्र नक्कीच होता.कुटुंबाला घेऊन एकदा हॉटेलिंग करताना अतिशय मामुली वाटणारी रक्कम अचानक मला खूप मोठी वाटायला लागली..कसे असते ना..


समाजासाठी आपण काही तरी करायला हवे हे स्वतःसह इतरांना मी आज पर्यंत हजारो वेळा सांगितलंय.पण मग आज जी गोष्ट मला शक्य आहे ते करताना मात्र माझा हात आणि मेंदू दोन्ही आखडले आहे.. लाज वाटली स्वतःची..आणि एक निर्णय झाला..


दिवसभर मी कस्तुरी च्या admission साठी माझे सो कॉल्ड सगळे resources वापरले.तिच्या वडिलांना भेटलो..कागदपत्रे घेतली.आणि तिचे admission आमच्या विभागातील एका अत्यंत प्रतिष्ठित अशा शाळेत केले..कस्तुरी आणि प्रसन्न यांच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेतली ती पुढे किती तरी वर्षे..ते कुटुंब आमचे कधी झाले ते कळलच नाही..साधारण आठ एक वर्षांनी कस्तुरी ला तिच्या कुटुंबीयांसमवेत आपल्या गावी जावे लागले ते कायमचे....


हळू हळू संपर्क तुटला..आणि कस्तुरी विस्मृतीत गेली..


परवा सहज टीव्ही लावला..आणि एका सुरेल आवाजाने अक्षरशः डोळ्यात पाणी आणलं..reality show मध्ये एक तरुणी गाऊन झाली होती..आणि अंतिम निकाल तिच्या बाजूने लागला..संगीत क्षेत्रातले दिग्गज तीचे कौतुक करताना थकत नव्हते..एका कॉर्पोरेट मध्ये अतिशय मोठ्या हुद्द्यावर काम करत असलेल्या या मुलीला जेव्हा विचारण्यात आले की या यशाचे श्रेय कुणाला..तर ती लगेच म्हणाली विठ्ठला ला..


म्हणजे..???


*होय त्या विठ्ठला ला ..त्या परमेश्वराला जो मला त्या मंदिरात नाही तर मंदिरा बाहेर भेटला..*


मला योग्य दिशेला जायचे होते पण काकांनी ती हिम्मत केली आणि मला शाळेत घातलं..कदाचित त्यांनी केलेली ही मदत त्यांच्या साठी खूप छोटी असेल आज ही ..पण माझे आणि प्रसन्न चे आयुष्याचं सोनं झाले..


काका आज जर तुम्ही मला ऐकत असाल तर हा पुरस्कार तुमचा आहे काका..


माझ्या डोळ्यातून अश्रू थांबतच नव्हते..कस्तुरी ने आज मला खूप मोठे केले..पण मी खरंच काय केलेलं..एक छोटीशी मदत ..आणि एक आयुष्य घडले.. स्वतचा अभिमान नव्हे पण बरे वाटले..एव्हढे समाधान मी कधीच अनुभवले नव्हते..हे मला आयुष्यभर पुरणार होते..


*देवळाबाहेर चा विठ्ठल...*


माझ्या कायम लक्षात राहिला आणि माझ्या या नंतरच्या पंढरी चा शोध घेण्याचा निश्चय करून मी एका वेगळ्या अनुभूतीने झोपायला गेलो..


सकाळी मला सर्वात आधी देवळातल्या विठ्ठला चे आभार मानायचे होते..आणि प्रार्थना करायची होती.., 

*"तुझा छोटासा अंश माणुसकीचा सर्वांना दे..मला दिलास काही वर्षांपूर्वी ..आणि जीवन काय हे मला कळले.."*


*"..आणि देवळाबाहेर चे असे विठ्ठल बरेच होऊ देत.."*


कारण अशा बऱ्याच कस्तुरी ज्यांच्यात लक्ष्मी,सरस्वती आणि प्रतिभा उपजतच आहेत..त्यांना या विठ्ठलाची गरज आहे...


🙏🙏🌹🙏

धीरे चलो💐💐

 *🌳🦚आज की कहानी🦚🌳*


*💐💐धीरे चलो💐💐*


नदी के तट पर एक भिक्षु ने वहां बैठे एक वृद्ध से पूछा "यहां से नगर कितनी दूर है?

सुना है, सूरज ढलते ही नगर का द्वार बंद हो जाता है।


अब तो शाम होने ही वाली है। क्या मैं वहां पहुंच जाऊंगा?'


वृद्ध ने कहा "धीरे चलो तो पहुंच भी सकते हो।" 


भिक्षु यह सुनकर हैरत में पड़ गया। वह सोचने लगा कि लोग कहते हैं कि जल्दी से जाओ, पर यह तो विपरीत बात कह रहा है।


भिक्षु तेजी से भागा। लेकिन रास्ता ऊबड़-खाबड़ और पथरीला था। थोड़ी देर बाद ही भिक्षु लड़खड़ाकर गिर पड़ा।


किसी तरह वह उठ तो गया लेकिन दर्द से परेशान था।


उसे चलने में काफी दिक्कत हो रही थी। वह किसी तरह आगे बढ़ा लेकिन तब तक अंधेरा हो गया।


उस समय वह नगर से थोड़ी ही दूर पर था। उसने देखा कि दरवाजा बंद हो रहा है। 


उसके ठीक पास से एक व्यक्ति गुजर रहा था। उसने भिक्षु को देखा तो हंसने लगा भिक्षु ने नाराज होकर कहा, "तुम हंस क्यों रहे हो?"


उस व्यक्ति ने कहा, 'आज आपकी जो हालत हुई है, वह कभी मेरी भी हुई थी। 


आप भी उस बाबा जी की बात नहीं समझ पाए जो नदी किनारे रहते हैं।'


भिक्षु की उत्सुकता बढ़ गई। उसने पूछा "साफ साफ बताओ भाई।


उस व्यक्ति ने कहा "जब बाबाजी कहते हैं कि धीरे चलो तो लोगों को अटपटा लगता है। 


असल में वह बताना चाहते हैं कि रास्ता गड़बड़ है, अगर संभलकर चलोगे तो पहुंच सकते हो।



💐💐शिक्षा💐💐


 जिंदगी में सिर्फ तेज भागना ही काफी नहीं है। सोच-समझकर संभलकर चलना ज्यादा काम आता है।

सार्वजनिक चेतावणी


 

एका शून्यातून तयार झालेला हिरो - बोमन इराणी!..*

 *एका शून्यातून तयार झालेला हिरो - बोमन इराणी!..*


मित्रांनो,


बोमन इराणी तुम्हाला आवडतो का?


मुन्नाभाई एम बी बी एस मधला डॉ. रस्तोगी,


थ्री इडियटस मधला इंजिनीअरींग कॉलेजचा प्रिंसिपल, प्रो. सहस्त्रबुद्धे उर्फ व्हायरस,


आणि अशाच अनेक विविधरंगी भुमिकांमुळे बोमन आज एक लोकप्रिय अभिनेता आहे. 

  

पण बोमनचा एक विनोदी अभिनेता बनण्यापर्यंतचा प्रवास सोपा होता का?


बोमनचा जन्म मुंबईतल्या एका पारशी घरात झाला, 


बोमन जन्मण्याच्या सहा महिने आधीच बोमनच्या वडीलांचे निधन झाले,


बोमनला तीन बहिणी होत्या, दोन मावश्या, आणि एक आत्या होती, 


सतत सर्व स्त्रियांच्या सहवासात राहील्यामुळे लहानग्या बोमनचाही स्वभाव काळजी करणारा आणि भित्रा झाला,


त्याला डिस्लेक्सिया नावाचा रोग होता, शाळेत, अभ्यासात बोमन अतिशय मंद होता,


बोलताना तो तोतरे बोलायचा, त्यामुळे त्याचे मित्र त्याची मस्करी उडवायचे,


न्युनगंडामुळे बोमन इराणी स्वतःला अपयशी मानु लागला होता, त्याने स्वतःसाठी कसलीही मोठी स्वप्ने पाहिली नाहीत, 


त्याचे मित्र डॉक्टर, इंजिनीअर आणि सी.ए. झाले, मात्र बोमन कधीच काही मोठे मिळवण्यासाठी स्वतःला पात्र समजायचा नाही. 


बोमनने स्वतःसाठी वेटरचा जॉब निवडला,


बोमनची आई कुटूंबाची उपजीविका चालवण्यासाठी फरसाण, फाफडा वगैरे तयार करुन पदार्थ विकायची, 


बोमनचे ग्रॅंट रोडवर फरसाण विक्री करायचे आठ बाय आठ फुटाचे एक छोटेशे टपरीवजा दुकान होते,


वयाच्या बत्तीस तेहतीस वर्षांपर्यंत बोमन इराणी त्या दुकानातुन जेमतेम उत्पन्न कमवायचा,


ग्रॅंट रोड हा मुंबईचा एक रेड लाईट एरीया आहे, सगळी रफ पब्लिक दुकानात यायची,


ह्या सगळ्या परिस्थितीची बोमनला चीड आली,


बोमनने साईड बिजनेस म्हणुन फोटोग्राफी सुरु केली,


१९९0-९२ तो काळ असेल,


बोमन क्रिकेट, फुटबॉल खेळणाऱ्या मुलांचे छान छान फोटो काढायचा,


वीसवीस रुपयांना ते फोटो त्या मुलांच्या आईवडीलांना विकायचा,


अशा प्रकारे काही रुपये त्याने जमा केले,


लग्नानंतर सात वर्षांनी आपल्या बायको मुलांना घेऊन उटी फिरायला गेला,


जमलेली बचत फार मोठी नव्हती, म्हणुन एक बजेटमधले हॉटेल त्याने बुक केले,


पण ते हॉटेल अतिशय निकृष्ट दर्जाचे निघाले,


एखाद्या भुतबंगल्याप्रमाणे असलेल्या त्या हॉटेलात अत्यंत भीतीदायक वातावरण होते,


हॉटेलच्या खोलीत फक्त एकच झिरोचा बल्ब होता,


बोमन म्हणतो, तो झिरो लाईट पाहुन मला स्वतःचीच, माझ्या गरीबीचीच जबरद्स्त चीड आली,


“आयुष्यात पुन्हा कधी अशी ‘झिरो लाईट मोमोंट’ येऊ नये म्हणुन मी संपुर्ण जीवनभर मी झोकुन देऊन मेहनत करेन असा मी चंग बांधला,”


पुढे ह्या झिरो लाईटने बोमनचे आयुष्यच बदलावुन टाकले, 


बोमन इराणीला मुंबईत होणाऱ्या बॉक्सिंग ऑलंपिकबद्द्ल माहिती मिळाली,


तो ऑलिंपीक च्या ऑफिसमध्ये गेला, व त्याने बॉक्सिंगचे फोटो काढण्याची परवानगी मागितली,


पण तिथल्या डायरेक्टरने ती धुडकावुन लावली,


बोमनने अनेक अर्ज विनंत्या केल्या, आर्जवे केली,


मी फ्रीमध्ये काम करीन असे सांगितले, 


तेव्हा तो खडुस डायरेक्टर थोडासा नरमला, 


आणि सध्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा चालु आहेत, त्याचे फोटो काढुन आण, 


तुझ्यातली गुणवत्ता बघुन तुला काम देऊ असे सांगितले,


बोमन कंबर कसुन कामाला लागला,


पुढचे सहा महिने बोमनने प्रचंड मेहनत घेतली,


*कसेही करुन त्याला हे कॉन्ट्रॅक्ट मिळवायचेच होते,*


*ह्या एकाच विचाराने त्याला पुर्ण झपाटले होते,*


*उठता-बसता, खाता पिता, त्याला फक्त आणि फक्त बॉक्सिंगचे फोटोच दिसायचे,*


*माझं काम आणखीण उत्कृष्ट कसे होईल, हा एकच विचार त्याच्या डोक्यात असायचा,*


*तो कॅमेरा गळ्यात घेऊन आठ आठ - दहा दहा तास बॉक्सिंगच्या मॅचेस च्या ठिकाणी तळ ठोकुन बसायचा,*


त्यादरम्यान त्याने अप्रतिम फोटोग्राफ्स शुट केले,


सगळे फोटोग्राफर फक्त व्यवसाय आणि कामाचा भाग म्हणुन फोटो काढायचे,

बोमन मात्र पॅशनेट होता, 


शेवटी जागतिक बॉक्सिंग ऑलंपिकचा ऑफिशीयल फोटोग्राफर म्हणुन बोमनचीच निवड झाली,


अमेरीकेतल्या मॅनेजरची बोमनने अपॉईंटमेंट घेतली,


त्याने बोमनला तीन फोटो काढायची ऑर्डर दिली,


 एक अमेरीकन बॉक्सर समोरच्या मुष्ठियोद्ध्याला एक जोरदार पंच मारेल तेव्हाचा,


एक समोरचा बॉक्सर जमिनीवर पडलेला असताना, अमेरीकन बॉक्सर उन्मादाने उड्या मारतानाचा,


आणि तिसरा,


सामना जिंकल्यानंतर अमेरीकन बॉक्सरचा हात उंचवताना,


ह्या प्रत्येक फोटोबद्द्ल बोमनला तीनशे डॉलर्स मिळणार होते,


बोमन जोमाने कामाला लागला,


इथपर्यंत पोहोचण्यासाठी मागचे सहा आठ महिने त्याने प्रचंड मेहनत केली होती,


आता यश अगदी दृष्टीपथात होते,


त्याने रिंगच्या बाजुचा एक योग्य कोपरा निवडला,


सामना सुरु झाला, पण बोमनचे नशीब त्याच्यावर जणु रुसले होते, 


बोमनचे ग्रह काही ठिक नव्हते की काय माहित पण त्या दिवशी अमेरीकन बॉक्सर सपाटुन मार खात होता,


तीनपैकी एकाही फोटोची शक्यता दिसत नव्हती,


बोमनचे स्वप्न जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर होते,


त्याची मेहनत पाण्यात चाललेली त्याला दिसत होती,


हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाताना जे तीव्र दुःख होते, अगदी तसेच दुःख त्याच्या मनात साठुन आले होते,


त्याच्या डोळ्यात पाणी तरळले, उर भरुन आला,


एकेक ठोसा अमेरीकन बॉक्सर खात होता, पण त्याच्यापेक्षा कितीतरी मोठे दुःख बोमनला होत होते,


बोमनने स्वतःला समजावले,


“मी आणखी मेहनत करीन, एके दिवशी नियतीला माझी नक्की दया येईल,”


आणि त्याची आर्त प्रार्थना ब्रम्हांडापर्यंत जाऊन पोहोचली,


चमत्कार घडावा असे काही रिंगमध्ये घडले,


पंचेचाळीस मिनीटे मार खाणारा अमेरीकन बॉक्सर त्वेषाने उठला,


त्याने समोरच्या बलाढ्य मुष्टियोद्धयाला एक जोरदार तडाखेबाज पंच मारला, 


बोमनने तो क्षण अचुक टिपला, 


समोरचा बॉक्सर खाली पडला, बोमनने दुसरा क्लिक केला,


आणि अमेरीकन बॉक्सर विजेता झाला, बोमनने तिसरा क्लिक केला,


त्या बॉक्सरला झाला नसेल तितका आनंद बोमनला झाला,


त्याने तात्काळ धावतपळत स्कुटरवरुन आधी फोटो डेव्हलपिंगची लॅब गाठली, मग टेलिफोन ऑफीसला पोहोचला,


तिथुन त्याने अमेरीकेला फोटोज स्कॅन करुन पाठवले.


पण रात्रीचे दोन वाजले तरी फोटो अमेरीकेला पोहोचले नाहीत, असा फोन आला,

दुसऱ्या दिवशी बोमन पुन्हा टेलेफोन ऑफीसला पोहोचला,


ती मशीन मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमासाठी पॅक करुन नेण्यात येणार आहे, असे त्याला सांगण्यात आले,


बोमन खवळला, त्याने तिथे प्रचंड आरडाओरडा केला,


सरकारी यंत्रणेच्या अशा भोंगळ कारभारामुळे भारताचे नाक कापले जाईल, असे त्याने ऑफीसरला ठासुन सांगितले,


त्याच्या ह्या ह्र्दापासुन केलेल्या युक्तिवादाचा परिणाम झाला,


आणि पॅक केलेली मशीन उघडण्यात आली,


फोटो अमेरीकेला पाठवले गेले,


बोमनला नऊशे डॉलर्सची रॉयल्टी मिळाली,


त्याला लगेच पुढची टुर्नामेंट कव्हर करण्यासाठी चेन्नईला पाठवण्यात आले,

बोमन स्वखुशीने गेला,


त्याने आपल्या लाघवी, विनोदी, निरागस स्वभावाने जिथे जाईल तिथे मित्र जोडले, लोकांना जिंकुन घेतले,


त्याचा फोटो स्टुडीओ मुंबईत एक टॉपचा फोटो स्टुडीओ म्हणुन ओळखला जाऊ लागला,


एके दिवशी फोटोसेशन करण्यासाठी बोमनच्या स्टुडीओत सुप्रसिद्ध कोरीओग्राफर शामक दावर आला,


शामकने बोमनला नाटकात काम करशील का असे विचारले,


व त्याची भेट प्रसिद्ध नाटककार अल्काझी पद्मसी यांच्यासोबत करुन दिली,

बोमन साशंक होता,


अल्काझीनी तर बोमनला पाहिल्याबरोबर नाकारले,


पण शामक दावर आपल्या मागणीवर अडुन राहीला,


अल्काझींना त्याने बोमनला घ्या, नाहीतर मी नाटक सोडुन देईन अशी धमकीच दिली,


बोमनला आपल्या पहिल्या नाटकात एका वेश्येच्या दलालाचा एक छोटासा रोल मिळाला,


बोमनने त्याचेही सोने केले,


पुढची पाच सात वर्ष बोमनने नाटकाचे मैदान गाजवले,


अनेक उत्तमोत्तम भुमिका केल्या,


एकदा त्याचे नाटक विधु विनोद चोप्राने पाहिले, आणि त्याला चित्रपटात काम करण्याविषयी विचारले,


बोमन त्यासाठी तयार नव्हता,


पण राजु हिराणी हा चोप्रांचा असिस्टंट बोमनच्या स्टुडीओत आला,


पंधरा मिनीटांसाठी ठरलेली ही भेट पुढचे आठ तास कशी चालली, हे दोघांनाही कळले नाही,


बोमनने स्वतःला राजुच्या हातात स्वाधीन केले,


आणि मुन्नाभाईमधले मामु नावाचे पात्र अवतरले,


ह्यावेळी बोमन पंचेचाळीस वर्षांचा होता,


त्यासाठी बोमनला त्यावर्षीचे बेस्ट कॉमेडी फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले,


पुढे काही वर्षांनी थ्री ईडीयटस मध्ये बोमनने तोंडातल्या तोंडात बोलणाऱ्या व्हायरस उर्फ सहस्त्रबुद्धेची भुमिका केली 


त्यासाठी त्याने आपली लहानपणीची तोतरे बोलण्याची खास लकब वापरली, 


मित्रांनो,


एक मंदबुद्धी, तोतरा बोलणारा, दहा एक वर्ष वेटरची कामे करुन, वयाच्या तेहतीसाव्या वर्षी फरसाणची टपरी चालवणारा एक माणुस वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी चित्रपटात डेब्यु करतो काय,


आणि साठाव्या वर्षापर्यंत एंशी हुन अधिक चित्रपट काय करतो?  


सगळेच थक्क करुन टाकणारे आहे,


बोमन म्हणतो,


उटीच्या हॉटेलात आलेल्या झिरो लाईट मोमेंटमुळेच माझ्या ह्र्द्यात आग लागली, आणि त्यामुळेच मी इथवर पोहचु शकलो आहे,


मित्रांनो, 


*जेव्हा केव्हा आयुष्यात , व्यवसायात ,कुटुंबात  कसली संकटे येतील तेव्हा बोमन इराणीला आठवा....*


*त्याच्या आयुष्यात आलेल्या संकटांना आठवा, त्याच्या झिरो लाईट फिलॉसॉफीला आठवा...*


*संकटावर मात करण्याची कितीतरी पट जास्त उर्जा तुम्हाला मिळेल.....*


*किती ही संकटे आली तरी घाबरु नका, धैर्याने तोंड द्या....*


 *आभार आणि शुभेच्छा!* 

*विजय खरात*

Featured post

Lakshvedhi